ज्या काही याचिका कलकत्ता हायकोर्टात दाखल झालेल्या आहेत त्या याचिकेतील, हरेण अधिकार आणि अभिजीत सरकार या दोन भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्याबाबत हरेण अधिकाराच्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेची सुप्रिम कोर्टाने तातडीने सुनावणी हाती घेतली आहे. याचे कारण कै हरेण अधिकारीने आपल्या जीवाला तृणमूल काॅग्रेसच्या कार्यकर्त्याकडून धोका आहे असे फेसबूकवर म्हटले होते. त्याच्या दुसर्याच दिवशी त्याची हत्या झाली. आहे. कै हरेण अधिकारीच्या पत्नीने फेसबूकवरील ती क्लिप ही सुप्रिम कोर्टात सादर केलेली आहे. सुप्रिम कोर्टाने याबाबत TMC चे सरकार, बंगाल राज्याचे डीजीपी यांना नोटीशा पाठविल्या आहेतच पण सोबत केंद्र सरकार तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला ही नोटीस पाठविली आहे. ममता बॅनर्जींनी तृणमूल काॅग्रेसची स्थापना केल्या पासूनच देशाचे संविधान, कायदे, शिष्टाचार इत्यादीबाबतची फिकीर न करण्याची त्यांना वाईट सवय जडली आहे. कारण आपल्या पक्षांचे श्रेष्ठी त्या स्वतःआहेत. दिल्लीत कोणी पक्ष श्रेष्ठी असणे हे काही अंशी भारता सारख्या विशाल देशात उपकारक ठरते. कारण आपल्या देशाच्या संविधानात जी काही मार्गदर्शक तत्वे आणि कायदा व सुव्यवस्थेच्या संबंधीत ज्या जबाबदारी आणि मर्यादा स्पष्टपणे निर्देशली आहेत, त्याचे भान प्रादेशिक पक्षांना राहात नाही. संघ भाजपाचा द्वेष करणार्या मिडीया हाऊसने ममता बॅनर्जीची प्रतिमा Larger than nation, अशी केल्यामुळे ममता बॅनर्जीमध्यें पराकोटीचा अहंकार आणि फाजील आत्मविश्वास निर्माण झाला आहे. पश्चीम बंगालच्या निवडणूक निकालाचे विश्लेषण सेक्यूलर मिडीयांनी चूकीच्या पद्धतीने मांडले. त्यामूळे पश्चीम बंगाल मध्ये काॅग्रेस आणि डावे पक्ष सपशेल नामशेष झालेले ममतांना दिसतच नाही. भाजपाला आपण एक हाती पराजित केले या गुर्मीत त्या वागत आहेत. त्यांचे वागणे, त्यांचे हावभाव इत्यादीचे सुक्ष्मपणे निदान केले तर मला रशियात क्रान्ती झाल्यानंतर तेथील एक महिला रात्री- बेरात्री, स्वातंत्र्याच्या नशेत ट्रॅफीकचे नियम मोडत फिरू लागली होती त्या घटनेचे स्मरण झाले. त्या महिलांला ट्रॅफीक पोलीस विनंती केली की ती म्हणत होती, मी स्वतंत्र आहे मी रस्त्याने कशीही चालू शकते. पोलिसांनी बळाचा वापर केला असता ती त्यांना वीजेच्या गतीने झटका देऊन पुढे सरकत होती. शेवटी तिला माथेफिरू समजण्यात येऊन जबरदस्तीने रूग्णालयात दाखल केले गेले.
अती अहंकार, आणि अती आत्मविश्वास हे दोन प्रमूख दोष ममता बॅनर्जीना कधीतरी अडचणीत आणणार आहेत असे वेळोवेळी वाटत आले आहे. तशी वेळ जवळ येत आहे असे दिसते. कारण अनेक केससमध्ये ममता बॅनर्जी पुर्णपणे घेरल्या जाण्याची शक्यता आहे. एकंदरीत निपक्षपाती कायदेतज्ञांचं मत असे आहे की बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणूक निकाल झाल्यावर लागलीच भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्यासत्र सुरू झाले त्यावेळी ममता बॅनर्जींचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झालेला नव्हता ही सबब तोकडी पडणार आहे. तसेच बंगालच्या डीजीपीचा कारभार चुनाव आयोगकडे होता ही सबब ही संविधानातल्या कलमानुसार टिकू शकणार नाही. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारवर अविश्वास ठराव पास झाल्यानंतर कारगील मध्ये पाकिस्तानने घुसखोरी केली. तेव्हा पंतप्रधान अटलबिहारींनी आपण केअर टेकर पंतप्रधान आहोत अशी सबब न सांगता संविधानाने दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवले होते. अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये ममता बॅनर्जी मंत्री होत्या. त्यामूळे वाजपेयींनी घातलेल्या आदर्श पायंडाची ममता बॅनर्जीना विस्मृती व्हावयास नको होती. या केसेस संबंधीतील गोम अशी आहे की ममता बॅनर्जी केअर टेकर म्हणून मुख्यमंत्री कार्यरत होत्याच की. केअर टेकर पंतप्रधान किंवा एखाद्या राज्याचा केअर टेकर मुख्यमंत्री जबाबदारीपासून पलायन करू शकत नाही. केंद्र सरकारने याच कारणासांठी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट निवडणूक पुर्वी लावली नाही. ममता बॅनर्जी स्वतःच्या कर्मानेच आपल्या पायावर धोंडा मारून घेतील अशी जाण देशाचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमीत शहांना होतीच आणि तसेच काहीतरी घडेल असे दिसते.
अशीच एक दुसरी घटना घडली ज्यामूळे ममता बोनर्जीने स्वतःच्या पायाखाली खड्डा खोदून ठेवला. ती घटना म्हणजे अलीकडे कलकत्त्यातील सीबीआच्या कोर्टात जाऊन ममता बॅनर्जींनी घातलेला धुडगूस. काय झाले? ममताच्या मंत्र्यांना ऐरवी जामीन मिळाला असता. तो मिळाला नाहीच उलट तीन दिवस मंत्र्यांना जेलची हवा खावयास लागली. ममताचा हा तमाशा पाहून विरोधी पक्षांना आणि त्यांच्या समर्थकांना ममता बॅनर्जी म्हणजे Dashing Woman, आहे असेच वाटले असावे. राजकारणात आक्राळस्तेपणा धोक्याचा असतो. निवडणूक निकाल लागल्याच्या काही दिवसात नारदा स्टिंग ऑपरेशन च्या विडीओ संबंधी ममता बॅनर्जीच्या सरकारमधील काही मंत्र्याविरोधात असलेल्या आरोपाची चौकशी सीबीआयने सुरू केली आहे. त्यामूळे ममता बॅनर्जींचा पारा चढला असावा. त्यातूनच कलकत्त्याच्या सिबीआयच्या कोर्टात कार्यकर्त्यांचा मोठा ताफा घेऊन त्या तिथे धरणास बसल्या. हा एक प्रकारचा न्यायालयीन व्यवस्थेचा अपमान आहे. केंद्र सरकार गेली सात वर्षे ममता बॅनर्जीचा उपद्व्याप सहन करीत आहे. तरी केंद्र सरकाराने संयम पाळला. पण अलीकडे तर ममता बॅनर्जींच्या कारस्थानांनी लक्ष्मण रेषा पार केली आहे. त्यामूळे नारदा स्टींग ऑपरेशन ची केस केंद्र सरकारने हाती घेतली. विरोधक आणि त्यांच्या पायाशी लोटांगण घालणारे संपादक महाशय, भले म्हणतील की तृणमूलने भाजपाचा बंगाल मध्ये पराभव केला म्हणून पंतप्रधान मोदी आणि अमीत शहां पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सीबीआयचा गैरवापर करीत आहे. पण गैरवापर करण्याची संधी ममता बॅनर्जी देतातच का? ही बाब विरोधी पक्ष आणि ममताचे गुणगान करणारे संपादक मंडळी लक्षात घेतच नाही. ममता बॅनर्जीचा शिरजोरपणा हा न्यायाचा आणि सत्याचा, ममता बॅनर्जी ग्रेट फायटर ' अशी भाषा करणार्यांना एक तर राजकारणच कळेनासे झाले असावे किंवा ते खाल्या अन्नाला जागत असावेत. विरोधी पक्षांनी किती प्रयत्न केला तरी ममता बॅनर्जी राष्ट्रीय पातळीवरील नेत्या बनू शकतील असे दिसत नाही. याचे कारण विरोधी पक्षांत एकी नाही. तसेच ममता बॅनर्जींना केद्र सरकारशी लढण्यात जो आसूरी आनंद घेण्याची लागलेली सवय, तसेच बंगालमध्ये प्रचंड बहूमत बहूमत मिळाल्यामूळे त्यांना बंगाल मध्ये अडकवून ठेवण्याची संधी केंद्र सरकारची रणनीती यशस्वी होऊ शकेल.
दिल्लीतील शाहीनबाग येथील धरणे, तसेच किसान आंदोलनासाठी पाण्यासारखा पैसा विदेशी महाशक्तींनी ओतला. प्रजासत्ताक दिनी लाजीरवाणें कृत्यें घडली. पुढे काय झाले ? परवाच एका मित्राने मला विचारले की प्रजासत्ताक दिनी असा गोंधळ माजविणार आहेत याची खबर देशाच्या गुप्तहेर खात्याला समजली नाही का? मी त्याला थंडपणे उत्तर दिले, " सत्याची बाजू कोणाची आहे? भाजपा सरकार पाडण्यासाठी जागतिक महाशक्तींशी टक्कर ज्यांना द्यावयाची आहे असे आपल्या पंतप्रधानांनी स्वतःहाचे जीवन त्यांच्याहून अधिक तपस्वी महानुभावांच्या मार्गदर्शनाखाली देशासाठी वेचले आहे. अशा पंतप्रधानांकडे संयम आणि राजकारणातील डावपेच केव्हा कोणते आणि कसे करावेत या संबधीचे ज्ञान नाही असे तू कसा समज करून घेतोस ? आपण तह करावयास येत आहे अशी भाषा वापरून अफझलखानला आपल्या अंगणात आणून त्याला यमसदनास पाठविणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन जो स्वयंसेवक बालपणापासून ' हिंदु साम्राज्य दिन ' असा पवित्र उत्सव मानून दर वर्षी मनोभावे छत्रपती शिवाजी महारांजाच्या चरणी लिन होतो अशांना परकीय शक्तीची भिती वाटत नसते. शरद पवार सारख्या नेत्याला रात्रीच्या प्रशांत समयी गुजरातला अमित शहाशी गुप्तपणे भेट घ्यावी लागली, तिथे उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी किस पेडकी मूली. इजरायल आणि हवास मध्ये युद्ध सुरू झाले पण भारताने इजरायल देशाला अधिकृत पाठींबा व्यक्त केला नाही. इजरायलने पाठींबा देणार्या देशांची नावे जाहीर केली. त्यात आपल्या देशाचे नाव नव्हते. आपल्या पंतप्रधानांनी इजरायलला पाठींबा द्यावयास हवा होता अशी चर्चा सोशल मिडीयावर होऊ लागली. पण बाराव्या दिवशी इजरायल आणि हमासने युद्ध थांबविण्याचा निर्णय घेतला आणि युद्ध थांबले. इजरायलनी भारत आमचा खरा मित्र आहे हे युद्ध थांबल्यावर जाहीर केले. का आणि कसे? याचे उत्तर फक्त नरेद्र मोदी आणि इजरायलच्या पंतप्रधानांनाच ठाऊक. माझा असा अंदाज आहे की इजरायलने आपल्या शस्त्रांची घेतलेली एक ट्रायल असावी. ही एक ट्रायलच होती हे ही आतंराष्ट्रीय समुदायला अप्रत्यक्षपणे कळण्यासाठी इजरायलने युद्ध संपल्यावर भारत आमचा खास दोस्त आहे हे स्पष्टपणे जाहीर केले असावे. चीनची डोकलाम येथे अरेरावी वाढत असताना अचानक आपल्या पंतप्रधानांनी जगातील छोटे राष्ट्र पण सर्वात आक्रमक आणि अद्यावत शस्त्रांनी परिपूर्ण अशा इजरायचा दौरा केला. अमेरिका आणि रशिया सारखे देश आवाक झाले. चीनच्या अरेरावी बद्दल युनोकडे धाव मारली नाही. डोकलाम येथील चीनची अरेरावी एका झटक्यात संपली. आमच्या देशाचे संरक्षण आणि परराष्ट्र धोरण हे कुठल्याही देशाच्या दबावात आखले जात नाही असा स्पष्ट इशारा चीनला आणि अमेरिका तसेच युरोपियन देशातल्या महाशक्तींनाही पोहोचला."
माझ्या मित्राशी झालेले कालचे संभाषण मी इथे नमूद केल्याने थोडसं विषयातंर घडले आहे. पण सध्या देशातील राजकारण वेगळ्या वळणावरून जात आहे म्हणून पंतप्रधान मोदीची कार्यशैली कशी आहे याची झलक देण्याची गरज वाटली. येत्या काळात विदेश शक्ती आपल्या देशात येनकेन प्रकारे अस्थिरता निर्माण करणारच आहेत. त्यासंबंधीची एक माहितीवजा लेख पब्लीश करणार आहे पण राजकीय घटना इतक्या तीव्रतेने घडत आहेत, अनेक प्रकरणे जी न्यायालयात आहेत त्यासंबंधी रोज काहीतरी बातमी येत राहते म्हणून त्यावर लेख लिहण्यास प्राधान्य द्यावे लागत आहे. अनेक प्रकरणे न्यायालयात आहेत त्यांचे ही निवाडे येत राहणार आहेत. पुढील आठवड्यातही अनेक घटना घडतील, अनेक शह-काटशाह दुर्दैवाने सुरूच राहणार आहेत. तो पर्यंत २०२४ साल उजाडलेले असेल. तेव्हा भाजपा आणि भाजपाचे कट्टर विरोधक यामधील अंतीम सामन्याच्या अगोदरच मोदी सरकारने समान नागरी कायद्याचे अस्त्र बाहेर काढलेले असेल. तो पर्यंत आपण जागरूक राहून राष्ट्र हिताच्या गोष्टी शेअर करीत राहू या.
म्हात्रेजी,
उत्तर द्याहटवादोनही भाग वाचुन परिस्थितीचे अचुक मुल्यमापन व विश्लेषण जाणवते.त्यांची पार्श्वभुमी व दुसर्या भागांतील ईस्राएलचा संदर्भही बरेच काही सांगुन जातो.
पहिल्या भागांतील पाकिस्तानच्या काश्मिरवरील हल्ल्यानंतर गांधींची प्रतिक्रिया माझ्या वाचनांत आली नाही.तसेच आणखी एक गोष्ट,सर्वोच्च न्यायालयांत एका न्यायमुर्तिंनी नारदा मधील सर्व आरोपींना अटक न केल्याची टिपणी कदाचित ममतांच मनोबल वाढवु शकेल
आता बंगालची परिस्थिती सरकार कसे हाताळते ते बारकाईने अभ्यासावे लागेल. आताच्या बातमीनुसार,उद्या सर्वोच्च न्यायालयांत यावर, मोठ्या,५ न्यायमुर्तिंच्या खंडपीठासमोर होणार आहे.त्यांत काय निष्पन्न होते ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
आणखी एक टीप,डाॕ.मनीषकुमारांच्या युट्युब् वरील व्हीडीओंत त्यांनी बंगालच्या त्रिभाजनाची शक्यता वर्तवलेली आहे व ममता त्यास नेटाने विरोध करतील असेही म्हटले आहे.
माहितीपुर्ण लेखांसाठी धन्यवाद.