बुधवार, २६ मे, २०२१

धगधगता पश्चिम बंगाल (भाग १ )



महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया पश्चीम बंगाल या शिर्षकाचे दोन लेख आपण मागे वाचले आहेत. त्या लेखांत आपल्या देशातील राजकीय स्थिती संबंधी जी काही चर्चा केली आहे, तीच चर्चा पुढे सुरू करीत आहे. फक्त लेखाचे शिर्षक बदलले आहे. आज पश्चीम बंगाल मधील स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. या विषयाचा आवाका मोठा असल्याकारणाने या लेखाद्वारे होणार्या चर्चाचे दोन भाग करणे क्रमपाप्त झाले आहे. म्हणून या पहिल्या भागात जागतिक स्तरावरील राजकारण, आपला देश आणि जगाचा आपल्या देशाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचा इतिहास, तसेच वर्तमान माहिती- तंत्रज्ञान आणि व्यापारी युगाचा परीणाम इत्यादी विषयासंबंधी चर्चा करू या.

कोरोना संकट हेच मूलतः जागतिक राजकारणाचेच अपत्य असल्याचे सिद्ध होऊ लागले आहे. म्हणून कोरोना विषाणूचा पॅथाॅलाॅजकल अभ्यास, औषधे आणि लस शोधण्याचे प्रयत्न झाल्यावर सध्याच्या व्यापारी युगात जगभरातील काही देशांमध्ये जसे अंतर्गत राजकारण आहे तितकेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सत्तास्पर्धा सुरू झालेली दिसते. पण तसे होत असताना शक्तीशाली देश स्वतःचा फायदा अधिक प्रमाणात घेण्यात यशस्वी होताना दिसतात. याची मुख्य कारणे दोन आहेत. पहिले कारण त्या देशांची वरचढ ठरणारी सामरीक शक्ती, आणि दुसरे कारण त्या देशाची आर्थिक संपन्नता. आर्थिक संपन्नतेतून अत्याधूनिक माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करून इतर देशांत भय भ्रम, फैलावणे त्यांना सोपे जाते. असा उपयोग करताना सत्य स्थिती दडपून ठेवणे व त्या जागी खोटे-नाटे विडीओ पाठविणे अशा क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. आपल्या देशातील कोरोनाच्या दुसर्या लहरीसंबंधीत दाखविले जाणारे आकडे, मृतांचे चित्रांचे प्रक्षेपण फेक आहेत. पण सध्याच्या या महिती व तंत्रज्ञानाच्या युगात ' ज्याच्या हाती अत्याधूनिक मिडीया त्याची म्हैस ' हा जगाचा न्याय ठरला आहे. त्यामूळे आपल्या देशात सोशल मिडीयावर उलट-सुलट चर्चा होत आहे. त्यातून आपला समाज राजकीय दृष्ट्या दुभंगत आहे आणि ते  देशाच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. आजचे युग हे केवळ जाहिरातबाजीचे राहिले नाही. पुर्वी जाहिरातबाजी फक्त व्यापार जगापुरता मर्यादीत होती. आजचे जग माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. त्याचा परिणाम हळुहळू सत्तास्पर्धेवर होत गेला आणि शेवटी हेच तंत्र आज सत्तास्पर्धातील मग ती देशपातळीवरची असो वा जागतिक पातळीवरील असो एक महा अणुकूचीदार शस्त्र बनले आहे. हेच शस्त्र काही विदेशी शक्तींनी आपल्या देशाविरूद्ध उगारलेले दिसते. हे शस्त्र इतके विषारी आहे की आपल्या देशाच्या राज्यव्यवस्थेलाच हादरे देऊ शकते.

कुठल्याही देशातील निवडणूका मध्ये बड्या राष्ट्रांचा, विदेशी धनाड्य लोकांचा, आणि धार्मीक उन्माद चढलेल्यांचा प्रत्यक्ष हस्तक्षेप होत नाही असे म्हटले जात असले तरी ट्रम्प महाशयांने रशियाच्या साह्याने अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असे जगभर मानले गेले. तेच शस्त्र अमेरिकेतील डेमाॅक्रॅटीक पक्षाने बायडोन महाशयांना निवडणून आणण्यात वापरले नाही असे छातीठोकपणे म्हणता येत नाही. फरक इतकाच की यावेळी तिथल्या अध्यक्षीय निवडणूकीची पटकथा रशियाच्या ऐवजी चीनने तयार केली असावी. मिस्टर बायोडेनचा पक्ष डेमाॅक्रॅटीक, पण छुप्या मार्गाने सलगी मात्र एक पक्षीय हुकूमशाही असलेल्या चीनशी. सांप्रत काळातील जागतिक राजकारणाचं स्वरूप आपल्या श्रीगुरूचरित्रातील द्वितीय अध्यायात कलीयुगाचे जे वर्णन केले आहे, त्याच्याशी तंतोतंत जुळते आहे. आपला भारत देश हा सध्या तरी विकसनशील देश मानला जातो. त्यामूळे आपल्या देशातील राजकारणावर जगातील सर्वच बड्या देशांकडून नाक खुपसण्याचे प्रकार घडत आले आहेत. आपल्या देशाची दोन आगळी-वेगळी वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य हे की आपली संस्कृती एकेश्वरी नाही. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कालच्या जगात ही  हिंदु समाजाचा एकमेव देश फक्त भारत होता आणि आज ही तोच आहे आणि पुढेही हिंदू समाजासाठी तोच एकमेव राहणार आहे. कारण धर्माच्या नावाखाली साम्राज्य वाढविणे ही दुष्टप्रवृत्ती आपल्यात भिनली नाही. कारण आपल्या रोमारोमात सहिष्णुता भरलेली आहे.  या एकमेव कारणामूळे मध्ययुगीन काळात जगातील दोन एकेश्वरी पंथीयांच्या म्हणजेच मुस्लीमांच्या आणि ख्रिस्तांच्या मनांत या देशाचे लचके तोडण्याची पाशवी इच्छा निर्माण झाली आणि त्यात त्यांना आपल्यातील एकतेच्या अभावामुळे यश मिळाले.

कोणी मानो वा ना मानो पण जर्मनीतील नाझी भस्मासुराच्या उदयामूळे जगभरातील पारतंत्र्यतेच्या जोखडात अडकलेले सारे देश स्वतंत्र झाले ही  एक चांगली गोष्ट घडली. त्या भस्मासुराने ' ब्रिटीश राज्याचा सूर्य कधी मावळत नाही ' अशा पुशारक्या मारणार्या आणि आपल्या महात्मा गांधीजीना अर्धा नग्न फकीर म्हणणार्या तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान चर्चील यांना युद्धकाळात दिवसाढवळ्या बिळात लपून बसण्याची पाळी आणलीच ना !  ताकदवान देशांना भस्मसात करण्यात तो असफल ठरला पण जाता जाता त्याने ताकदवान देशांना धूळ चारली आणि  दुर्बळ देशांना 
'ज्याच्या हाती काठी त्याची म्हैस ' हा मंत्र दिला. आपल्या येथे प्राचीन काळापासून ' नायमात्मा बल हिनेन लभ्यः'  असे वचन म्हटले गेले आहे. (दुर्बलांना ईश्वर दर्शन देत नाही) या आशयाचे एक सुभाषित ही आहे. ते असे आहे,    
            अंश्व नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैवच |
            अजापूत्रं बलि दद्यात् देवो दुर्बल घातकः ||
( ना घोडा, ना हत्ती आणि वाघाला तर नाहीच नाही फक्त
   बकरीच्या छोकर्याचाच बळी दिला जातो)

मध्ययुगीन काळात आपल्याला वरील वचन आणि सुभाषिताचा विसर पडला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लागलीच पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला तेव्हा ही बातमी महात्मा गांधीजींना कळविली तेव्हा त्याचे उत्तर असे आहे,  ' पाकिस्तानला शांतीची भाषा कळत नाही. आता त्याच्यावर लष्करी कारवाई करा '  मुद्दा हा की कलियुगात बळी तो कान पिळी हाच न्याय ठरतो. ठकासी व्हावे महाठक' हा समर्थ रामदास स्वामीचा उपदेश लक्षात ठेवूनच  देशाचे संरक्षण, परराष्ट्र, आणि आतंरीक सुरक्षा संबंधीचे धोरण ठरविणे आवश्यक आहे. याला कोणी आक्रमक राष्ट्रवाद म्हणत असतील तर  त्या विचाराची मंडळी वरून गांधीवादी पण आतून विदेशी पैशाला गुलाम झालेली होय.

आज स्वतंत्र झालेले देश ही परमाणू शस्त्रधारी झाले. म्हणून गेल्या ७५ वर्षात महायुद्ध खेळण्याची बिशाद कुठल्याच देशाला झाली नाही. काळ बदलला. शेवटी आर्थिक स्पर्धेत सर्वात पुढे राहावे आणि महासत्तापदी विराजमान होण्याची एक नवी कल्पना जन्मास आली. आजच्या जगात भारत देश आर्थिक स्पर्धेत महासत्ता होऊ शकतो ही जाणीव मुस्लीम आणि ख्रिस्ती समाज व्यापलेल्या काही देशांना होऊ लागली आहे.  त्यांच्या रक्तात भिनलेली हिंदु द्वेषाची खाज अधून-मधून डोके वर काढते, आणि तेच एकमेव कारण आहे ज्याच्यातून चीनशी अप्रत्यक्षपणे सहकार्य करीत या दोन्ही समाजाच्या लाॅब्या भारतात अस्थिरता निर्माण करीत असतात. त्याचेच प्रत्यंतर आपल्या देशाच्या राजकीय मंचावर  विशेषतः महाराष्ट्र, दिल्ली, आणि पश्चीम बंगाल, इथे जी नाट्ये होत आहेत त्यातून होत आहे.

बंगालमध्ये जे घडतयं त्याचे स्वरूप राजकीय मंचावरील एक नाटक किंवा चाल असे राहिले नाही. ते देशांतर्गत उभे केलेलं एक युद्ध आहे. या नंतर देशात घडल्या जाणार्या किंवा घडविल्या जाणार्या घटना ही एका महायुद्धाची सुरूवात आहे असे मला वाटते. म्हणून केंद्र सरकार विरूद्ध पश्चीम बंगालच्या सरकार मधील सध्या  सुरू झालेली जी लढाई आहे, ही कदाचीत इस्ट इंडीया कंपनीच्या विरूद्ध झालेल्या प्लासीच्या लढाईची नवी आवृत्ती तर नाही ना, असा विचार ही मनाला शिवून गेला. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या देशात भाजप सोडला तर बाकी सारे राजकीय पक्ष हे प्रांतीय स्तरावरचे आहेत. त्यांच्यातलं एक सामाईक वैशिष्ट्यं म्हणजे ते सारे पक्ष घराणेशाहीने बरबरटले आहेत.  म्हणजेच प्रत्येक राज्यात राजेशाही आहे. ह्या राजेमहाराजांचे आपआपल्या राज्यातील प्रत्येक शहरात, जिल्ह्यात आणि तालूक्यात अनेक सुभेदार आहेत. या राजेमहाराजांचा कारभार जसा लहरी व आत्मकेंद्रीत तसाच त्यांच्या सुभेदारांचा. त्यामूळे देशातील  प्रत्येक जिल्हा व तालूका पातळीवर  समाजातील शीलवान, साहित्यिक, विचारवंत, संपादक आणि नोकरशहा सारख्या मडंळीनाही  सर्वत्र आपआपल्या राजांचे वा सुभेदारांचे चरणच या जगतातील अती पवित्र प्रार्थनास्थळ वाटू लागले आहे. त्यामूळे या आधुनिक राजेमहाराजांनी विदेशी शक्तींशी हात मिळवणी केली तरी तरी त्यांच्या भाटांना ते गैर वाटत नाही. याच मानसिकतेमूळे मध्ययुगीन काळापासून एक हजार वर्षाहून अधिक काळ आपला देश पारतंत्र्यात अडकला.

आज पश्चीम बंगाल मध्ये तृणमूल काॅग्रेसच्या जिल्हा-तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांनी जो धुडघूस घातला आहे तो आपल्या देशाच्या मध्ययगीन काळाच्या इतिहासाशी साम्य दाखवतो. मध्ययुगीन कालीन मानसिकतेने कोणाला घेरले आहे,, पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची विस्तवाशी खेळण्याची खुमखुमी, त्यांचा उतावेळपणा, व त्यासाठी त्यांना विरोधी पक्ष तथाकथीत सेक्यूलर मिडीया हाऊस आणि डावे व पुरोगामी विचारवंताकडून मिळत असलेले प्रोत्साहन इत्यादी बाबी, तसेच केंद्र सरकार आणि पश्चीम बंगाल सरकार मधील जंग, बंगालच्या स्थितीसंबंधी  हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचीका, आणि त्यांच्या निकालातून काय निष्पन्न हाती लागते या विषयांवरील चर्चा आपण भाग २ मध्ये करू या. 
(सोबत भाग २ जोडला आहे )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...