पुढे पंतप्रधानपदी पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी विराजमान झाल्या. त्या कशा पंतप्रधान झाल्या व काॅंग्रेसमधील इतर जेष्ठ नेत्यांपैकी पंतप्रधानपदी बसू का शकले नाही याबाबत ही चर्चा झाली पण तेव्हा आजच्या सारखे अद्यावत माहिती व तंत्रज्ञानाच्या अभावी पडद्यामागील घटना कधी बाहेर आल्या नाहीत. इंदिरा गांधी रशियाच्या पाठबळाने पंतप्रदानपदी बसल्या याचा ओझरता उल्लेख मी लेखाच्या पहिल्या भागात केले आहे. इंदिरा गांधी यांची कार्यपध्दत रशिया व चीन या देशातील एक पक्षीय साम्यवादी राज्यपद्धीतीची असल्यामूळे काॅंग्रेस मध्ये उभी फूट पडली. अर्थात ती फूट नव्हती. उलट पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पक्षांवर ही आपले नियंत्रण हवे होते. म्हणून त्यांनी राष्ट्रपतीपदाचे काॅंग्रेसचे उमेदवार निलम संजीव रेड्डी यांच्या विरोधी पडद्यामागे अपक्ष उमेदवार वि वि गिरी यांना पाठींबा देऊन विजयी केले. एका अर्थाने खुद्द पंतप्रधानाने आपल्या पक्षात बंड केले व ते यशस्वी झाले. आपल्या पक्षात पंतप्रधानपदाचा स्पर्धक निर्माण होऊ नये यासाठीच त्यांनी कामराज योजना म्हणजे साठ वर्षे वय पुर्ण झालेल्यांनी राजकीय पद भूषविता येणार नाही असा नियम काॅंग्रेस कार्यकारिणीत पास करून घेतला. तेव्हाच काॅंग्रेस मध्ये उभी फूट पडली. मोरारजी देसाई, स का पाटील इत्यादी बुजूर्ग नेत्याच्या गटाला सिन्डीकेट काॅंग्रेस व इंदिरा गांधीच्या गटाला इन्डीकेट काॅंग्रेस हे नाव पडले. मूळ काॅंग्रेसची बैलजोडी हि निशाणी गोठली गेली. दोन्ही गटाना भिन्न निवडणूकीचे चिन्ह देण्यात आले. तेथूनच काॅंग्रेसची मालकी इंदिरा गांधीकडे जाण्याचा मार्ग खुला झाला. १९७१च्या निवडणूक जाहिरनाम्यात रशियाच्या सल्ल्यानूसार समाजवादाच्या आधारावरील अर्थव्यवस्था व गरीबी हटाव अशा घोषणा जाहीर करून इंडीकेट काॅंग्रेस प्रचंड बहुमताने सत्तेवर आरूढ झाले. त्यानंतर थोड्याच अवधीत इंडीकेट काॅंग्रेसला इंदिरा काॅंग्रेस असे नाव प्राप्त झाले. नंतर इंदिरा इज इंडीया असे भौमतीक सुत्राच्या आधारावर रशिया, चीनच्या धर्तीवर एक व्यक्तीय, व एक पक्षीय राज्यव्यवस्था निर्माण करीत आपल्या लोकशाहीचे बळ कमी होऊ लागले. इंदिरा गांधीनी आपल्या धाकट्या, संजय नावाच्या मुलाला काॅंग्रेसचे सरचिटणीसपद देऊन काॅंग्रेस पक्षात हळूहळू घराणेशाही प्रस्थापित केली. पुढे भ्रष्टाचार, महागाई , बेकारी, वाढली. सत्तेचं केंद्रीकरणत होत गेले. काॅग्रेसच्या विरोधात लोकांची नाराजी वाढली. लोकांचा असंतोष वाढला. या असंतोषाचे जनक सर्वोदयी जयप्रकाशजी नारायण ठरले. विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले. त्यातच खुद्द इंदिरा गांधीनी आपल्या मतदार संघात अवैध मार्गाचा अवलंब करून विजय मिळविला होता असा निकाल एका खटल्याच्या सुनावणीत अलाहाबादच्या न्यायालयाने दिला. त्यातूनच राजकारणात संधी दिलेल्या आपल्या संजय नावाच्या धाकट्या मुलाच्या सल्ल्याने देशात पंतप्रधान इंदिरा गांधीनी देशात आणिबाणी आणली. सिंडीकेट काॅंग्रेसच्या नेत्यासकट सर्व विरोधी नेत्यांनां तुरूगात डांबले गेले. प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य स्थगित केले. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली. भारतात लोकशाही ऐवजी एकाधिकारशाही आली. पुढे १९७७ च्या निवडणूकीत सिन्डीकेट काॅंग्रेस, विरोधी पक्षांनी निर्माण केलेल्या जनता पार्टीत विलीन झाली. व इंदिरा काॅंग्रेसला अधिकृत काॅंग्रेस पक्ष असे मानण्यात येऊ लागले.१९७७ च्या निवडणूकीत काॅंग्रेसचा दारूण पराभव झाला. खुद्द इंदिरा गांधी व त्यांचे पुत्र संजय गांधी यांचा आपआपल्या मतदार संघात पराभव झाला. त्यानंतर १९७८ साली इन्डीकेट काॅंग्रेस मध्ये फूट पडली. देवराज अर्स, यंशवतराव चव्हाण, ए के ॲन्टनी, प्रियरंजनदास मुन्शी, के उन्ननीकृष्ण, इत्यादी नेतृत्वाखाली एक नवीन काॅग्रेस पक्ष उदयास आला.
पुढे जनता पार्टीचे सरकार अंतर्गत मतभेद होऊन गडगडले. पुढे १९८० सालच्या लोकसभेच्या निवडणूकीत इंदिरा काॅंग्रेसला प्रचंड बहूमत मिळाले. नंतर यंशवतराव चव्हाणच्या नेतृत्वाखाली अनेक नेत्यांनी काॅंग्रेसमध्ये वापसी केली. सिन्डीकेट काॅंग्रेसचे अस्तीत्व अगोदरच नष्ट झालेले होते. हात या चिन्हाची इंदिरा काॅंग्रेसच अधिकृत ठरली. पुढे संजय गांधी विमान अपघातात मृत्यु पावले. नंतर इंदिरा गांधीनी एयर इंडीयात पायलटची नोकरी करणारे पुत्र राजीव गांधीना काॅंग्रेसचे सरचिटणीस नेमले. इंदिरा गांधीची दुर्दैवी हत्या झाली. स्वाभाविकपणे घराण्याचा वारस म्हणून पंतप्रधानपदी व काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी राजीव गांधी विराजमान झाले. इंदिरा गांधीच्या मृत्यूची सहानभूती मिळावी म्हणून राजीव गांधींनी १९८४ साली मध्याविधी निवडणूका घेऊन प्रचंड विजय मिळविला. त्यानंतर बोफोर्सच घोटाळा झाला म्हणून विश्वानाथप्रताप सिंगने काॅंग्रेस मध्ये बंड करून विरोधी पक्षांच्या साहय्याने विशेषतः चांगला केडर बेस व लोकसंपर्काच्या जोरावर शक्तीशाली झालेल्या भाजपाच्या साहय्याने १९८९ साली काॅंग्रेसचा पराभव केला व स्वतः पंतप्रधानपदी विराजमान झाले. दरम्यान भाजपाने अयोध्येत रामजन्मभुवीवर श्रीराम मंदिर उभे राहावे यासाठी अध्यक्ष लालकृष्ण आडवाणीची रथ यात्रा काढली. जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण राजीव गांधीची ऐन निवडणूक प्रचाराच्या काळात दुर्दैवी हत्या झाली. मतदानाचे पुढील काही चरण थांबविण्यात आले. पुढील चरणाच्या निवडणूकीत काॅंग्रेसला सहानुभूती मिळून काॅंग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेवर आला. त्यावेळी काॅंग्रेसचे अध्यक्षपदी तसेच पंतप्रधानपदी वयाच्या जेष्ठतेच्या निकषावरून नरसिंहराव विराजमान झाले . म्हणजे काॅंग्रेस मध्ये सामूहिक नेतृत्व पुन्हा रूजू झाले असा अनुभव आला पण तो तेवढ्यापुरताच टिकला. काॅंग्रेसच्या बहुमताची मक्तेदारी संपली. पुढे जनमत खंडीत येऊ लागले, आणि देशात आघाडी सरकाराचे पर्व सुरू झाले. राजकीय अस्थिरता आली. शेवटी निवडणूकीत भाजपा सर्वाधिक जागा मिळून भाजपा आघाडीचे सरकार आले आणि प्रधमच भारतिय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले.
नंतर बदलत्या काळाचे आव्हान स्विकारावे म्हणून गांधी घराण्याची सून असलेल्या सोनिया गांधीकडे काॅंग्रेसचे अध्यक्षपद आले. पण काॅग्रेसला एक हाती सत्ता त्या आणू शकल्या नाहीत. पण काॅग्रेसच्या आघाडीची सत्ता आणू शकल्या. तेथूनच काॅंग्रेस पुर्णतयः गांधी परिवाराची मालमत्ता झाली. सोनीया गांधीनी स्वर्गीय इंदिरा गांधीची नक्कल केली पण शेवटी त्यांच्याच नेतृत्वाखाली काॅग्रेस रसातळाला पोहचली. याचे कारण सोनीयांच्या काळात काॅग्रेसचे स्वरूप हिंदू विरोधी होऊ लागले. भगवा आंतकवाद नावाचे काल्पनीक अस्त्र उभे करून हिंदु संन्याशांना छळले. हिंदु मंदिराच्या चाव्या अहिंदूच्या हाती ठेवण्यात आल्या. ख्रिस्ती मिशनरी आणि जिहादी मौल्लवी उघड उघड भाजपाविरोधी मतदान करण्याचे फर्मान काढू लागले. राहूल गांधी तर पाक व चीनच्या भुमिकेला साजेसे असे वर्तन करू लागले. भ्रष्टाचाराने कळस गाठला. या सगळ्या घटना युपीए म्हणजे सोनीयाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारच्या दहा वर्षात घडल्या. भाजपा व विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदु हिताय भूमिका व विधायक कार्यामूळे भाजपाचा जनाधार वाढत गेला. भाजपाची धु'रा आक्रमक व जनहिताच्या कार्याचा सम्राट म्हणून नावारूपास आलेले गुजरातचे मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदीकडे आले. २०१४ साली नरेंद्र मोदीच्या लाटेत भाजपाचे सरकार आले ते आज ही कायम आहे. तेव्हापासून काॅग्रेस विकंलाग झालीच पण इतर विरोधी पक्षात सुद्धा भाजपाला झुंज देण्याइतके त्राण राहीले नाही. त्यामूळे मुख्य विरोधी पक्ष असे जेमतेम का असेना काॅग्रेसचे स्थान अस्तित्वात आहे. आज नाही म्हटले तरी देशात जितके घराणेशाहीचे पक्ष आहेत त्या सर्व पक्षांच्या वारसांपेक्षा राष्ट्रीय पातळीवर फक्त गांधी घराण्यांचेच राहूल व प्रियंका गांधी वड्रा यांचा वावर आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामूळे काॅग्रेसची मालकी आज ही सोनीया गांधीकडेच आहे आणि पुढेही राहील. इथे एक प्रश्न आपल्या मनात येतो की मतदार घराणेशाही का पंसत करतात? का एका व्यक्तीची लाट निर्माण होते. शेवटी माणूस हा प्राणी आहे. पशु-पक्षीत जसे अनुकरणियता अस्तीत्वात आहे ती माणसातही असते. बाजारात एखाद्या कपड्याच्या दुकानात सेल लागला की ग्राहकांची झुंड उडते. कारण स्वभाव. आपले शरीर पंचमहाभूतांने बनलेले आहे. तेज म्हणजे प्रकाश. सूर्याची किरणे जिथे अडथळा निर्माण होतो तेथून परावर्तीत होऊन जिथे अडथळा नाही तिथे विसवतात. वायू म्हणजे वारा जिथे पोकळी दिसते तिथे घुसतो. आप म्हणजे जल ते पाणी नदिचे असो वा पावसाचे ते खाली उतरत वाहत जाते. जिथे खड्डा दिसला तिथे साचते. तो खड्डा भरला की पुढे वाहात वाहात मोठ्या खड्यात म्हणजे समुद्राला मिळते. माणसाचे वर्तन व आचरण असेच असते. मानसशास्त्रात याला ग्रुप सायकाॅलजी म्हणतात. इतर देशातही राजकारणात व्यवसायात, धंद्यात घराणेशाही आहेत. तिथले ग्राहक एखाद्या प्राॅडक्ट ब्रँन्डचे चाहते बनतात. कारण स्वभाव. आजच्या घटकेला राजकरणातील घराणेशाहीच्या ब्रँन्डमध्ये काॅग्रेसचा ब्रँन्ड अधिक सरस आहे. भारतातील कुठचाच प्रान्त स्तरावरील पक्ष काॅग्रेसच्या पेक्षा अधिक खासदार निवडून आणू शकणार नाही तो पर्यंत काॅग्रेसच मुख्य विरोधी पक्ष राहील. म्हणजे काॅग्रेसच्या २३ बंडखोरांना वेगळा पक्ष स्थापन करावा लागेल. पण त्याच्यांकडे ही पंतप्रधान मोदींना आव्हान देण्या इतका सशक्त नेता नाही. त्यातही बंडखोरांपैकी कोण्या एकाचे नेतृत्व इतर विरोधी पक्ष स्विकारणार नाहीत. म्हणून काॅग्रेसची आज जी वाटचाल चालू आहे ती तशीच राहणार आहे.
गांधी परीवाराविरूद्ध जे खटले उभे आहेत त्यासंबंधीत काही हालचाल होऊन गांधी परिवाराला कारावास झाला तर कदाचित काॅग्रेस मधील बंडखोर नेत्यांचा निदान काॅग्रेसच्या परिघात विजय मिळाल्या सारखे वातावरण तयार होऊ शकेल. पण त्यातही गोच अशी आहे की नेतृत्व कोणी करावे याबाबत संम्रभ होऊ शकतो. पण इतक्या लौकर गांधी परिवारा विरूध्दात असलेल्या न्यायालयीन खटल्याचा निकाल लागेल अशी शक्यता फार कमी आहे. कारण न्यायालयात प्रचंड केसेस पडलेल्या असतात. त्यातच लाॅकडाऊनचा काळामूळे न्यायालयातील कामाचा भार फारच मोठा झालेला असेल. या शिवार काॅग्रेस गांधी घराण्याच्या ताब्यात राहणे, राजकारणासाठी भाजपाच्या फायद्याचे ठरतच आहे. दुसरे असे की एकाच वेळी काॅग्रेस, व बाॅलीवूड जगत, नक्षलवाद, ड्रग्ज माफीया, जिहादी इस्लामी, ख्रिस्ती मिशनरी इत्यादींशी सलगी असणार्या भाजपेतर पक्षांना व मिडीयांना एक्सपोज करणे, म्हणजे सर्व पक्षांच्या मूळावर घाव घातल्या सारखे होऊ शकते. त्यातून त्यांना एकत्र येण्याची संधी मिळू शकते. हे पंतप्रधान मोदी जाणतात. म्हणून हळूहळू स्लो पाॅईझनचा डोस भाजपेतर पक्षांना देणे ही भाजपाची म्हणा वा मोदी-शहा या जोडीची रणनीती राहील असे वाटते.
एकंदरीत बेरोजगारी, महागाई, मंदी, इत्यादी समस्या असूनही आपल्या नाकार्तेपणा मूळे विरोधी पक्षांनी राजकारणाची सारी सुत्रे मोदीकडें सोपविली आहेत. बरं त्यातही पंतप्रधान मोदी सुत्रे हालवित असताना राष्ट्रहिताला तिलांजली देऊन स्वार्थ साधत नाही ही जमेची बाजू विरोधी पक्ष लक्षात घेत नाहीत. त्यातही भाजपाचे वैशिष्य हे आहे की तो पक्ष इतर पक्षांपेक्षा सांघिकतेत सर्वात सरस आहे. तिथे सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान होऊ शकतो हे प्रत्यक्षात अनुभवास आल्यामूळे आजच्या नव्या पिढीला भाजपाची ओढ लागली आहे. सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोरोनाशी लढतीतील, तसेच वादळ, पूर इत्यादी आपत्तीतले योगदानाचा भाजपाला फायदा होत असतो.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उभारलेल्या सेवा प्रकल्पातून केवळ परिश्रम करणारे व त्यागी स्वयंसेवकांच्या शक्तीच्या जोरावर असंख्य गरीब समाजबांधवांना आत्मनिर्भर करून सर्वसमावेशक हिंदू जीवन पद्धतीच्या यज्ञाचे जे अहोरात्र दर्शन घडवित आहे
त्याचा ही फायदा भाजपाला होत आहे. त्यामूळे काॅग्रेस मध्ये फूट पडो वा ना पडो सध्या तरी भाजपा सर्व पक्षांना भार पडत राहील. सध्या तरी भाजपा नरेंद्र मोदींना पर्याय निर्माण करेल अशी शक्यता नाही. त्यामूळे पंतप्रधानपदी श्री नरेंद्र मोदीच राहणार आहेत. तोवर राहूल गांधी व काॅग्रेस हेच विरोधी पक्षांचे नेतृत्व करीत असताना दिसतील. असे असले तरी घराणेशाहीचे जे पक्ष आहेत त्याकडे नजर फिरविली तर समाजवादी मध्ये अखिलेश व त्याचे काका, राष्ट्रवादी व शिवसेनेतील काका -पुतण्या, डीएमके, तृणमूल, बहूजन विकास पक्ष, इत्यादी पक्षात कलह निर्माण झालेले दिसतातच. तसाच प्रकार राहूल व प्रियंकात ही असू शकतो. पण त्याची वाच्यता बाहेर पडेल अशी सुतराम शक्यता नाही. म्हणून इतर विरोधी पक्षांमधील स्पर्पेत आज तरी काॅग्रेस वरचढ आहे व भविष्यातही राहील असे दिसते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा