कोरोना व्हायरसची साथ जगभर पसरत आहे. प्रथम चीन मध्ये या जीवघेण्या रोगाची लागण सुरू झाली. चीनमध्ये एक पक्षीय राजवट आहे. ती ही साम्यवादी पक्षाची. तिथे माहिती व प्रसारण मंत्रालयावर सरकारचे नियंत्रण असते. तिथे सेन्साॅरशिप असल्यामूळे तेथून प्रसारीत झालेल्या बातमीवर जगभरातल्या लोकांना सतत संभ्रम पडत असतो. म्हणून कोरोना व्हायरस वर अनेक प्रतिक्रिया ऐकू येतात. कोणी म्हणतात कोरोना म्हणजे चीनने आपल्याच नागरिकांवर रासायनिक शस्त्राचे केलेलं प्रात्यक्षिक आहे तर कोणी म्हणतं अमेरिका व चीनने आपल्या फार्मासिटीकल कंपनीचा व्यापार वाढावा या हेतूने संगनमताने केलेलं एक कारस्थान आहे. याचा अर्थ असा आहे की एखाद्या रोगाची साथ निर्माण करून त्यावरील औषधे तयार करणे हा एक व्यवसाय झाला आहे असे मानावयाचे की काय? यात किती सत्यता आहे, हे पडताळून पाहण्याची सोय नसल्यामूळे अशा प्रकारच्या शंका-कुशंका, अफवा, निर्माण होत आहेत का? एक गोष्ट स्पष्ट आहे की आजचे जग अनिश्चतेच्या रोगाने ग्रासले आहे, त्यावर सध्या तरी उपाय नाही. कारण हे कलीयुग आहे. आजच्या जगाची स्थिती गुरू चरीत्रात वर्णन केलेल्या स्थितीशी जुळते. पण सारं काही दैवावर सोडून देण्यात जीवनाचे सार्थक नसते. म्हणून आपण कोरोनाच्या बाबतीत प्रशासनाला सहकार्य करायला हवे. त्यातील एक भाग म्हणून सोशल मिडीयाचा वापर या घडीला सुज्ञपणे करू या व कोरोनो विषयीची आपली चर्चा पुढे रेटू या.
गेल्या तीन दशकापासून अनोळखी तापाच्या ज्याला इंग्रजीत Unknown Fever असे म्हटले जाते, त्याची साथ अधून-मधून येत आहे. या विश्वात सर्वात अनाकालनीय गुढ म्हणजे हे विश्व होय असे विख्यात शास्त्रज्ञ आर्कमिडीजने म्हटले आहे, ते तंतोतंत पटते. या ब्रह्मांडात काय काय दडले आहे ते आपण सारे काही शोधले आहे अशा भ्रमात आपण राहू नये. पण विश्वातील रहस्यें शोधण्याचा प्रयत्न सुरू ठेवणे गरजेचे आहे. त्याचे नाव विज्ञान होय. आधूनिक वैद्यकशास्त्राने अनाकलनीय तापावर वेळोवेळी तातडीचे औषधोपचार शोधून अनोळखी रोगजंतूचा संसर्ग थाबविण्यात यश मिळविल्याचे आपण अनुभवले आहे. म्हणून विज्ञानाची कास धरण्यात शहाणपण आहे. पण विज्ञानाची कास धरणे म्हणजे चंगळवाद नव्हे. आपण काय खावे, किती खावे, किती मौज करावी, यावर बंधने घालणे आवश्यक आहे हे ही वैद्यकीयशास्त्र आपल्या नजरेत पदोपदी आणत असते. थोडेसं पाठीमागे वळून पाहिले तर काय दिसते, जेव्हा वैद्यकशास्त्र फारसे प्रगत झाले नव्हते, तेव्हा आहार-विहारमध्ये पथ्य पाळणे हा एक उपचार होता. तरीही मृत्युचा दर Death rate घसरला नव्हता. माणसाचे आयुर्मान कमी होते. हा झाला मध्ययुगातील मानवाचा इतिहास. वैद्यकशास्त्र जस जसं प्रगत होत गेलं, तसतसे अनेक आजारावर लस, औषधे, सर्जरी इत्यादी उपाय उपलब्ध झाले आणि माणसाचे आयुर्मान वाढत गेले. पण या ठिकाणी हे ही लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे अकस्मात मृत्युंच्या घटना तसेच एकाच वेळी व एकाच पद्धतीने होणार्या मृत्युंची संख्या अधिक होते आहे. असें का ? यावर आजचं वैद्यकीय शास्त्र समाधानकारक उत्तर देताना दिसत नाही. एक सत्य असे आहे की सृष्टीतील प्रत्येक जीवाची उत्क्रान्ती होत असते. त्यामूळे ॲन्टीबायोटीक औषधें जितके परीणामकारक व्हावयास हवेत तसे अनुभवयास येत नाहीत. शिवाय ॲन्टीबायोटीक औषधांचा साईड इफेक्ट होतो त्याचे काय करावे हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. म्हणूनच उत्क्रान्तीचा मक्ता फक्त मानवाकडे आहे असे आपण जे समजतो ते चुकीचे ठरते. वैद्यकीय क्षेत्रात औषधे तयार करताना प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पर्यावरण इत्यादी शाखांच्या अभ्यासकांना ही सामील करून घ्यावयास हवे. तसे घडत नाही. त्यामूळे सृष्टीतील संतुलन बिघडते. शेवटी सृष्टीचे संतुलन बिघडणे हे ही नैसर्गिक आहे कारण उत्पत्ती, स्थिती, व लय ही सृष्टीचे वैशिष्टें आहेत या सत्यापाशी आपण येऊन पोहोचतो. नव-नवीन जंतुचा वाढत जाणारा संसर्ग व त्यातून होणारे मृत्यू हे आधूनिक वैद्यकशास्त्राच्या समोर फार मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याचे कारण नव-नवीन जंतुची होणारी उत्पत्ती रोखण्याचे काम आधूनिक विज्ञान करू शकत नाही. म्हणूनच पर्यावरणवादी कार्यकर्ते चंगळवादी जीवनशैलीला दोष देत असतात. पर्यावरणाचा अभ्यास हा ही आधूनिक विज्ञानाचाच भाग असल्यामूळे पर्यावरण चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यावर दुर्लक्ष न करणे हे हितावह ठरते. पर्यावरणाचा होणारा र्हास थांबविण्याचा प्रयत्न करणे ही संपूर्ण मानव जातीची जबाबदारी आहे. पण त्याबाबत विकसीत देश आणि विकसनशील-अप्रगत देशांत सहमती होतांना दिसत नाही. शस्त्रात्रे निर्माण करून त्याचा व्यापार हेच जर प्रगतीचे लक्षण व उत्पन्नाचा एकमेव मोठा स्त्रोत मानण्याची मानसिकता प्रगत देश सोडणार नाहीत तो पर्यंत अनोळखी रोगांचे आक्रमण मानव जातीवर अधून-मधून होत राहणार असे दिसते. जागतिक पातळीवर युनो एक संस्था कार्यरत आहे, पण तिथे ही प्रगत राष्ट्रांना मिळालेला (वेटो) अधिकार मानवजातीच्या समस्या सोडविण्यात अडसर ठरतो. बरं त्यातही एक गोम अशी आहे की पर्यावरणवादी सुद्धा शास्त्रज्ञांनी ओके केलेल्या उर्जाप्रकल्पाला नाहक विरोध करीत असतात. तिथे अनेक लाॅब्या आहेत. पर्यावरणवादी होणे हा एक व्यवसाय होतो आहे की अशी शंका उत्पन्न होते. असे असले तरी WHO ह्या संस्थेचा कारभार बर्यापैकी समाधानकारक आहे. अर्थात तिथेही बलशाली देशांच्या फार्मासिटीकल कंपन्याच्या लाॅब्या असव्यात असेच दिसते. आज जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळेतून मानवाच्या विभिन्न शारिरीक आजारावर विभिन्न औषधोपाचारांचा शोध घेतला जातो व निर्मिती होते याबाबत दूमत नाही. त्यात ही व्यापारी वृत्तीचा प्रभाव आहे पण तो ही राहणार आहे त्यासंबंधी खल करण्यात काही अर्थ नाही. कारण आपले अध्यात्म सांगते की, ज्ञान, शौर्य, व्यापार व सेवा ही वैशिष्टे प्रत्येक व्यक्तीत असतात आणि त्यातून स्वार्थ कोणालाही सुटला नाही. सत्ता स्पर्धेतून शस्त्रस्पर्धा वाढते. शस्त्रस्पर्धेतून युद्धे होतात. युद्धातून वा शस्त्राच्या चाचणीतून प्रदूषण वाढते आणि प्रदूषणातून रोगराई पसरते. मग आपल्याला हताश होण्यापलिकडे पर्याय राहात नाही. माल्थस नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने थेअरी ऑफ पापूलेशन च्या ग्रंथात युद्ध होणे, रोगराई होणे, चक्रीवादळ, महापूर, भूकंप, अवर्षण इत्यादी संकटातून पृथ्वीवरील प्राणीमांत्राचा भार कमी होतो असे म्हटले आहे. फार दूर कशाला जावे, सातशे वर्षापूर्वी आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटले आहे,
युद्धकारण पृथ्वी वरती | विषवायू पसरेल ||
असंख्य जीव ते विषवायूने | प्राणासी मुकतील ||
युद्धकारणे पृथ्वीवरती | प्रदुषण पसरेल ||
अनेक दशके या परिणामे | मानव त्रासवेल ||
रोग-खुजी निकृष्ट अशी | प्रजोत्पत्ती होईल ||
पृथ्वावरचे व्यवहार सारे | बंद होऊनी पडतील ||
ज्या देशात ज्ञानेश्वर महाराज जन्मले व समाधिस्त झाले त्याच भारत देशात सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे आणि अशा पेंशटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकाचा मृत्यु ही झाला आहे. कोरोनाची लागण झालेले बहुतांश पेंशट विदेशवारी करून आलेले नागरिक असल्याचे दिसतात. म्हणजे कोरोनो हा आयात झालेला रोग आहे. पण त्याचा फैलाव सर्वत्र होऊ शकतो. म्हणूनच राष्ट्रीय, प्रान्तीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पातळीवरून आरोग्य खात्यातर्फे काही सूचना, उपायाबाबत माहीती दिली जात आहे. त्याला आपण एक समाज म्हणून सकारात्मक प्रतिसाद द्यावयास हवा. ज्यांना या साथीच्या रोगावर राजकारण करावयाचे त्यांच्यापासून ही आपण दोन हात दूर राहीले पाहीजे. आपले दुर्दैव असे आहे की देशातच नव्हे तर जगाच्या कोपर्यात काही ही घडले, त्यावर सुद्धा राजकीय पोळी भाजून घेण्याची अनिष्ट प्रथा देशातल्या राजकीय व्यवस्थेत रूजली आहे. त्याला काही अंशी आपण मतदार म्हणून ही जबाबदार आहोत. शेवटी समाज म्हणजे काय? आपणच सारे मिळून बनला आहे ना ! समाज आहे म्हणून तर राजकीय व्यवस्था आहे. राजकीय व्यवस्था आहे म्हणून तर प्रशासन अस्तित्वात आहे. Goverment is the machinery of the state हे सत्य जाणून आपण सार्यांनी प्रशासनाला मदत होईल असे जे जे शक्य आहे ते सर्वोतपरी करावे. सकारात्मक व्यवहार म्हणजे सदाचारच की. हा संतजनांनी दिलेला सल्लाच. तो आपण पाळावा. कारण संतवाणी, सृष्टीची वाणी आहे म्हणून ती ईश्वर वाणी आहे.
सार्क संस्थेचे आपले शेजारील सर्वच देश कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. या बाबतचा पुढाकार आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीने घेतला हे आपण टि व्ही चॅनेलवरून पाहीले आहे. त्याबद्दल सार्क देशाच्या प्रमुखांनी आपल्या पंतप्रधानांचे अभिनंदन करून धन्यवाद दिले आहेत. प्रगत देशात ही कोरोनोची लागण झालेले रूग्ण आढळत आहेत. तरीही काॅग्रेसचे नेते राहूल गांधी पंतप्रधान मोदीवर टिका करण्यासाठी सरसावलेले दिसल्याचे पाहीले, तेव्हा काॅग्रेसच्या या युवराजाची कींव कराविशी वाटली. मला वाटतं, उद्या राहूल गांधी कोरोनोचे संकट ही पंतप्रधान मोदीनी निर्माण केले आहे असा आरोप करू लागतील. शेवटी एखाद्या विषयीचा मत्सर डोक्यात शिरला की माणूस वायफळ बडबड करीत राहातो ज्याला आधूनिक मानसशास्त्रात हिप्नोटीझम(वशीकरण) म्हटले जाते, तसेच काहीतरी राहूल गांधी बाबत घडले असावे. सार्क परिषदेच्या विडीओ काॅन्फरन्समध्ये अनुपस्थित राहीलेल्या पाकचे पंतप्रधान इमरान खान बाबतही तसेच काहीतरी घडले असावे. असे अनूमान काढावे लागले याचे कारण अलीकडे राहूल गांधी व पाकचे पंतप्रधान इम्रान खानच्या भारतातील घडोमोडी वरील भाष्यें सारखीच असतात.
जगातील बहूतांश देश कोरोना नावाच्या विषाणूशी परस्पर सहकाराच्या जोरावर लढत देण्यासाठी सज्ज झाले आहेत. एक खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या संस्कृती मधील परस्पर दोन्ही हात जोडून नमस्कार करण्याची पद्धत इतर देशांना भावली आहे, हे टिव्हीवरून पाहायला मिळाले. या बद्दल आपल्याला अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. पण त्याचे भांडवल करण्याचा मोह टाळावयास हवा. कारण आपल्या नमस्ते मध्ये ' ईश्वर जसा माझ्या हृदयात वसला आहे तसाच तो समोरच्या व्यक्तीत आहे, ईश्वर चराचर सृष्टीत सामावलेला आहे ' अशी व्यापक भावना आहे. म्हणून ' सर्वेत्र सूखीनः सन्तू, सर्वे सन्तू निरामयाः ' अशी प्रार्थना करून कोरोनाशी लढाई करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करणे हेच आजच्या घडीला आपले सर्वात महत्वाचे कर्तव्य आहे, व ते पार पाडणे हीच आपली प्राथमिक व आत्यंतिक गरज आहे.
म्हात्रेजी, अत्यंत महत्वाच्या,ज्वलंत विषयावरील सखोल व आध्यात्मिक दृष्टीकोनातुन केलेले भाष्य अप्रतिम ! राहुल व ईम्रान यांचा संयुक्त उल्लेख बरच कांही सांगुन जातो, परंतु राहुलची अलीकडची वक्तव्ये दखलपात्र नाहीत. धन्यवाद.
उत्तर द्याहटवाधन्यवाद, बिवलकरजी !
उत्तर द्याहटवाएकदम सटीक अवलोकन महात्रे जी । राहुल गांधी मनोरोग की दशा में है। सभी को सावधान रहना चाहिए ।
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
उत्तर द्याहटवायुद्धकारण पृथ्वी वरती | विषवायू पसरेल ||...
उत्तर द्याहटवाहे ज्ञानेश्वरी मधील नसून गगनगिरी महाराज यांच्या "कालज्ञान" मधील आहे.
Ref. https://facebook.com/361428987271541/photos/a.886953421385759/2799652010115881