मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये २०१८च्या विधानसभा निवडणूकीत भाजपाचा पराभव झाल्यावर देशातील भाजपेतर पक्षांना इतका आनंद झाला होता, की २०१९च्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाचे पानिपत होणार हे गृहीत धरले. म्हणून विरोधी पक्षांमध्ये मनापासून आघाडी झाली नाही. युपीए मधील घटक पक्ष असो, वा डावे पक्ष असो या सार्यांनी आपआपल्या खासदारांची संख्या कशी वाढेल अशीच व्युहरचना करीत, निवडणूक लढले. त्यामूळे लोकसभेच्या २०१९ निवडणूकीत त्यांचेच पानिपत झाले. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड मध्ये भाजपाची पिछेहाट झाली तेव्हापासून तर भाजपेतर पक्षांना इतका गर्व झाला की, त्यांनी सीएएच्या विरोधात हिंसक आंदोलने सुरू केली. दिल्लीत भाजपाचा पराभव झाल्यावर विरोधी पक्ष लोकसभेच्या मध्यावधी निवडणूका घेण्याचे आव्हान देऊ लागले. पण मध्यप्रदेश मधील काॅग्रेसचे सरकार गडगडले आणि सार्या विरोधी पक्षांचे अवसान पुन्हा गळाले. अवसान गळाले म्हणून यांची कोल्हेकुई सुरू झालीच आहे. म्हणे, 'कोरोनो व्हायरसचे संकट असताना मोदींना फक्त विरोधी पक्षांची सरकार पाडण्यात रस आहे.' वस्तुतः इथे भाजपाचा संबंध येतोच कुठे? जे राजकारण झाले ते काँग्रेसचे हाय कमांड व ज्योतिरादित्य सिंधीया मध्ये ! देशावर कोरोनो व्हायरसचे संकट समोर असताना काॅग्रेसच्या श्रेष्ठींना मध्यप्रदेश मधील काॅग्रेस नेत्यांमधील भांडण सोडविता आले नाही हे बेपर्वाइचे तसेच अंहकाराचे लक्षण आहे. काॅग्रेसमध्ये आमच्या कुंटुंबाचा शब्द शेवटचा हेच दाखविण्यात काॅग्रेस हायकमांडांना शौर्य वाटत असेल तर त्यांना सल्ला द्यावयास काॅग्रेस मधील इतर जेष्ठ नेते पुढे कसे सरसावतील ?
२०१४ पासून देशातील विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारला अनाठायी टिकेचे लक्ष्य बनवित असल्यामूळे पंतप्रधान मोदींचे आसन दिवसें दिवस बळकट होत जात आहे. त्यातूनच २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपला मोठा विजय प्राप्त झाला. आजही मोदींची लोकप्रियता केवळ टिकूनच नव्हे तर वाढत जात आहे. म्हणून मध्यप्रदेशात मंत्रीपदावर असलेल्या काॅग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा दिले, व ज्योतीरादित्यांसोबत भाजपाशी जवळीक साधली आहे. ' भाजपा आमचे राज्यातील सरकार पाडण्याचे काम करीत आहे ' असा विरोधी पक्षांनी कितीही टाहो फोडला तरी त्यांच्या टाहोचा आवाज मतदारांच्या कानीं पोहचत नाही. मध्यप्रदेश व राजस्थान मधील विधानसभेच्या निवडणूकीत भाजपा पिछाडीवर राहीला पण तुल्यबळ राहीलाच होता. ही वस्तूस्थिती काॅग्रेस पक्ष मानायला तयारच नाही. २०२४ च्या निवडणूकीतही मोदीच्या विजयावर आताच शिक्कामोर्तब झाल्यासारखे दिसत असल्यामूळे काॅग्रेस ( माता-पुत्र-कन्या-जावई च्या) पक्षात काॅग्रेसजन किती काळ राहतील हा प्रश्न काॅग्रेस व विरोधी पक्षांचे समर्थक संपादक, साहित्यिक मंडळींना पडत नाही, तो पर्यंत राष्ट्रीय स्तरावरील प्रमूख विरोधी पक्ष असलेल्या काॅग्रेसची घरघर थांबणार नाही.
मध्यप्रदेशचे लोण राजस्थान व महाराष्ट्रात ही पोहचेल असे दिसत आहे. महाराष्ट्रातही भाजपा-सेनेचा विजय झाला होता आणि तो ही मोदींच्या करिष्मा मुळेच. पण शिवसेनेला अवदसा आठवली आणि काॅग्रेस व राष्ट्रवादी सोबत शय्या केली. शिवसेनेला तात्पुरता लाभ झाला असला तरी तिचा पुढचा प्रवास खडतर आहे हे दिसू लागले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की शिवसेना बिनधास्त असल्याचा आव आणत आहे. महाराष्ट्रातील काॅग्रेस पक्षातील नेते सोनिया गांधी व राहूल गांधीच्या अंहकारामूळे नाराज दिसत आहेत. ते काॅग्रेस सोबत राहतील की जातील अशा प्रश्नचिन्हामूळे शिवसेना चिंतेत आहे. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अधून मधून मोदींची प्रशंसा करावी लागत आहे. महाराष्ट्रातील काॅग्रेसमध्ये उभी फूट पडण्या अगोदर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नसेल तर भाजपाकडे शिवसेनेचे आमदार आकृष्ट होण्याची शक्यता आहे. शिवसेना कमकुवत होईल. बाकी लोकसभेच्या मध्यावधी निवडणूका घेण्याचे भाजपाला आव्हान देणार्या शरद पवारांना बारामतीचा ही गड राखत येणार नाही. महाराष्ट्रात महाआघाडी सरकार स्थापन केल्यानंतर शरद पवार पंतप्रधानपदी बसण्याचे दिवसाढवळ्या स्वप्न पाहात आहेत. त्यातच ते म्हणत आहेत की त्यांना इतर राज्यातील नेते भाजपा विरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी बोलावित आहेत. ही निव्वळ थाप आहे. शरद पवारांची महाराष्ट्रात जितकी शक्ती आहे, त्याच्या दुप्पट ताकद भाजपेतर पक्षांची आपआपल्या राज्यात आहे. ते शरद पवारांना का व कशासाठी बोलावतील ? राष्ट्रीय स्तरावर पवारांचा काय मोठा प्रभाव आहे ? सोनीयांनी जे खातें दिले ते निमूटपणे दहा वर्षे चघळत बसले, हे इतर प्रांतातील स्थानिक पक्षांनी पाहिले आहे. खरोखरीच इतर प्रान्तीय पक्षातील नेते भाजपा विरूद्ध एखादी स्थिर आघाडीसाठी शरद पवारांना मार्गदर्शनासाठी बोलावित असते तर हरियाणातील काॅग्रेसने सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना का बोलाविले नाही , मध्यप्रदेशमधील कमलनाथांनी सरकार वाचविण्यासाठी शरद पवारांना बोलाविले का नाही ?
मध्यप्रदेश काॅग्रेसच्या हातून गेला. तिथे भाजपा सरकार स्थापन करणार हे निश्चीत झाले आहे. राजस्थान व महाराष्ट्रात ही भाजपा प्रणित सरकार स्थापन होणार आहे. प्रथम महाराष्ट्रात की राजस्थानात एवढाच काय तो प्रश्न राहिला आहे. या प्रश्नाचे उत्तर दोन्ही राज्यातील काॅग्रेस पक्षांतर्गत स्थितीवर अवलंबून आहे. मला वाटतं राजस्थानात लौकर सत्तांतर घडेल. याचे कारण असे की मध्यप्रदेश मध्ये कमलनाथ व दिग्विजयसिंगच्या प्रभावामूळे काॅग्रेसने जसे ज्योतिरादित्य सिधींयांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयोग काॅग्रेसचे हाय कमांडने राजेश पायलट यांचे चिरंजीव सचीन पायलटचे खच्चीकरण केले आहे. काॅग्रेस आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहे. उगीच त्यांच्या नेत्यांनी भाजपावर खापर फोडू नये. कर्नाटकात परस्पर विरोधात लढविलेले जेडीयु (एस) व काॅग्रेसला जनादेश होता का? तिथे सरकार स्थापन केले होते ते कुठल्या आधारावर ? मुळात आधार नव्हताच, मग त्यांचे सरकार पडले त्याचे खापर भाजपावर का फोडता ? शरद पवारने शिवसेनेला फितविले नाही असे म्हणत भाजपाने शिवसेनेला फसविले अशी भाषा भाजपेतर विरोधी पक्ष व त्यांचे मिडीयातील संपादक मंडळी, साहित्यिक, कलाकार, व ख्रिस्ती व इस्लाम धर्मगुरू कुठल्या तोंडाने बोलत आहेत ? निवडणूक पुर्व युती ज्या दोन पक्षांची होती त्यानांच लोकांनी निवडून दिले होते ना ? पण असा विचार महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत, संपादक महाशय, साहित्यीक, ख्रिस्ती व मुस्लिम धर्मगुरू करत नाहीत. कारण अर्थस्य पुरूषो दासः | महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा कधी पडेल तेव्हा ही मंडळी भाजपाच्या नावाने शिमगा करणार. हा झाला लहान मुलांच्या खेळातील रडीचा डाव. भारतीय राजकारणात एक गोष्ट स्थिर होऊ लागली आहे ती म्हणजे, ' जहाँ है मोदी तो सब है मुमकीन | जहाँ है भाजपा, वहाँ रहेगी सत्ता और जिसका मंत्र है, सबका विकास, सबका विश्वास लेकीन ना किसीपर खास मेहरबान |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा