केंद्र सरकारने सीएए कायदा मंजूर करून बरेच दिवस झाले. विरोधी पक्ष विशेषतः डावे, काॅग्रेस व मित्र पक्षांनी हिंसक आंदोलने करण्याचा सपाटा लावला आहे. केंद्र सरकारवर अशा हिंसक आंदोलनाचा काही परीणाम झाल्याचे दिसत नाही. उलट केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला सीएए कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या शासकीय ढाच्यात सूचना पाठविल्या आहेत. भाजपेतर पक्षांची ज्या राज्यात सत्ता आहे, त्यातील काही राज्यांच्या विधानसभेत सीएए च्या अंमलबजावणीस विरोध दर्शवून तसा ठराव मंजूर करून घेतला आहे. या शिवाय सुप्रिम कोर्टात बहूतांश विरोधी पक्षांनी तसेच काही स्वयंसेवी संघटना व व्यक्तींनी सीएए विरोधात केसेस दाखल केल्या आहेत. हे सारे पाहता, सीएए संबंधीत सरकार व विरोधी पक्षांत सुरू झालेल्या लढाईचा काळ लांबला जाण्याची शक्यता दिसत आहे. त्यामूळे या लढाईचे स्वरूप कसे असेल, या लढाईतून शेवटी काय निष्पन्न निघेल, हे आताच काही सांगता येईल अशी स्थिती नाही. पण काॅग्रेसचे एक नेते शशी थरूर ह्यांनी जयपूर येथे सीएए संबंधी केलेले भाष्य म्हणजे अजब तर्कदुष्ट आहे. त्यांनी केलेल्या विधानातून काॅग्रेस मुस्लीम बांधवांना एकप्रकारे बंडखोरीसाठी उद्युक्त करीत आहे तर दुसर्या बाजूला देशातील हिंदू समाज बांधवात पुन्हा एकदा देशाच्या फाळणीचे भय उत्पन्न करणारी एक धोकादायक खेळी खेळते आहे असे दिसते, ते ही कडव्या डाव्या पक्षांची व हिंसक नक्षलवाद्यांशी साथ घेऊन.
काय म्हणाले होते हे शशीथरूर महाशय? म्हणे,
' सीसीए हा कायदा बँरिस्टर जिनांचा विजय करणारा ठरेल.' हा बॅरिस्टर जीना कोण? स्वातंत्र्यपुर्व राष्ट्रीय सभेचा (म्हणजे आजचा काॅग्रेस पक्ष) एक क्रियाशील पण महत्वकांक्षी नेता. लोकमान्य टिळकांनी जीनाच्या व त्यांच्या मुस्लीम सहकारी मित्रांचा राष्ट्रीय सभेतील वाढत्या उपद्रवाची दखल घेतली होती. म्हणून लखनौ कराराच्या वेळी राष्ट्रीय सभेत स्पष्टपणे म्हटले होते की या पलिकडे जीना आणि त्यांच्या मुस्लीम समाजाची कुठलिही अवाजवी मागणी पुर्ण करू नये. परंतु लोकमान्य टिळकांच्या महानिर्वाणानंतर महात्मा गांधीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सभेने तुर्कस्थानातील खिलापत चळवळीला पाठींबा दिला. तेथूनच बॅरिस्टर जींनानी राष्ट्रीय सभेला वाकविण्याची सुरूवात केली व पुढे मुस्लीम लिग पक्ष स्थापन करून हिंदुद्वेष वाढवित मुस्लीमासाठी स्वतंत्र पाकिस्तान निर्माण करून घेतले. सोबत ५१ कोटी रूपये घेतले. इथल्या मुस्लीम बांधवापैकी ज्यांना पाकिस्तानात जावयाचे होते, त्यांना सन्मानाने जाऊ दिले. चांगली गोष्ट आहे. आपली संस्कृती आहे तशी. पण पाकिस्तानमधून हिंदू बांधव कसे आले? आले कसले, छळ करून पाठविले ! हजारो-लाखो हिंदू बांधवांच्या अमानूष रित्या कत्तली केल्या, बायका मुलींच्यावर बलत्कार केले. जे हिंदू पलायन करून वाचू शकले ते ही अर्ध्या-फाटक्या कपड्यात निर्वासतांसारखे भारतात आले. असा हा हिंदुस्थानच्या फाळणीचा संक्षिप्त इतिहास. श्री शशी थरूरनी बॅरिस्टर जीनांचा विजय झाला असल्याचा तर्क कुठल्या आधारावर केला? युनोमध्यें भारताचे प्रतिनिधीत्व केल्यामूळे देशातील सर्वात विद्वान समजतात काय स्वतःहाला? प्रथम स्वतःच्या चारीत्र्याचे धिंडवडे उडाले आहेत तिथे लक्ष द्यावे. देशाच्या इतिहासातील घटनांचा सोयिस्कर अर्थ काढून काॅग्रेसला जनमत आपल्या बाजूने वळविण्यात सत्तर वर्षे यश मिळत राहीले असेल, पण आता तशी आशा करून नये आणि असे नसते उद्योग ही करू नयेत. लागोपाठ दोन वेळा लोकसभेत दारूण पराभव झाला तरी ह्या दिडशहाण्यांची खोड मोडली नाही की काय ?
देशाची फाळणी होऊन आज ७३ वर्षे झाली. मुस्लीम समाजाला स्वतंत्र देश मिळाल्यानंतर पाकिस्तानातील राजकीय पक्षांचा, राज्यकर्त्यांचा, लष्करांचा हिंदूद्वेष अजूनही संपला नाही. उलट वाढत गेला आहे. त्यांच्या हिंदूद्वेषाला खतपाणी आपल्या येथील ही दिडशहाणे मंडळीच देत आली आहेत. पाक पुरस्कृत दशहतवाद्यांचा आपल्या सेनादलाने खात्मा केला की ही मंडळी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतात. जणू काय दशहतवादी ह्यांची जावई मंडळी. मोदी सरकार घेत असलेल्या प्रत्येक राष्ट्रहिताच्या निर्णयाला फक्त विरोध करणे हाच झाडून सर्व विरोधी पक्षांचा एक कलमी कार्यक्रम ठरला आहे. तिथे पाकिस्तानमध्ये १९४७ नंतर आजतागायत लोकशाही पेक्षा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लष्करशाहीच्या तंत्राने राज्यकारभार चालत आला आहे. राजकीय स्थिती सतत अस्थिर राहीली आहे. आर्थिक दृष्ट्या पाकिस्तान कंगाल झाला आहे. त्या अर्थी फाळणीतून बॅरिस्टर जीनांने काय कमाविले ? हाच का तो बॅरिस्टर जीनांचा विजय?. भारतात सीएए च्या अंमलबजावणीला होणारा विरोध म्हणजे भारताची पुन्हा फाळणी होईल असे विधान करून मुस्लिम बांधवांना अधिक आक्रमक व फितूर होण्याची संधी शशी थरूर देत आहेत. हा एक प्रकारे देशद्रोहच आहे. देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली हे सत्य नजरेआड करणे म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आहे. या ढोंगातून मुस्लीम समाजाचे धार्मिक स्वरूपाच्या मागण्या पुरविण्याचे अनेक वर्ष सुरू असलेले धंदे राजधर्माच्या सिध्दांताच्या विपरीत आहे. ते आपण बंद करायला हवेत. वस्तूतः बँरिस्टर जीनांच्या मुस्लीम लिगापुढे हतबल होऊन फाळणीला मंजूरी देण्यात तत्कालीन काॅग्रेसच्या नेत्यांनी फार मोठी घोडचूक केली आहे. हे शशी थरून यांनी प्रथम लक्षात घ्यावे, मगच सीएए संबंधी वक्तव्यें करावीत. देशाच्या फाळणीतून बॅरिस्टर जीनांच्या विजयापेक्षा आपल्या येथील तत्कालीन काॅग्रेस पक्षांच्या नेत्यांचा विशेषतः महात्मा गांधीजी आणि पंडीत नेहरूच्या तकलादू धोरणांमूळे हिंदूस्थानचा पराभव झाला असे म्हणणे अधिक तर्कसंगत वाटते.
आता केंद्रात हिंदुत्ववाद्यांचे भक्कम सरकार आहे. देशाच्या कुठल्याही प्रान्तातून बॅरिस्टर जीना सारखा हटवादी राजकीय नेत्याचा उदय होऊच नये असा कायमचा बंदोबस्त करणारे सरकार केंद्रात आहे. याचा विसर शशी थरूर यांना पडला असेल तर शशी थरूरांना काॅग्रेसने समजावून द्यावे. पण हा सल्ला स्विकारायला काॅग्रेस पक्ष तरी कूठे जागेवर आहे ? काॅग्रेसने आपल्या पक्षाचा कारभार तसेच सीएए विरोधातील अंदोलनाचे नेतृत्व डाव्या विचारसरणीचे पक्ष, त्यांचे नेते, विचारवंत - साहित्यिक व रक्तरंजीत क्रान्ती घडविणार्या नक्षलवाद्यांच्या हातात सोपविले आहे. ज्यांच्या पुढाकाराने सीएए विरोधात हिंसक आंदोलने केली जात आहेत त्यासाठी केरळच्या पीपल पापूल्यर फ्रन्टचा पैसा उपयोगात आणला जातो आहे हे उत्तर प्रदेशमधील बँक खात्याद्वारें उघड झाल्याची बातमी झळकली आहे. याची चौकशी रितसर होईल. त्यातून या पैशाचा स्त्रोत ही कळेल. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमीत शहा यांच्या रणनीतीचा अंदाज विरोधी पक्षांना येत नसावा. म्हणून मुस्लीम धर्जीणे विधाने करणे, मुस्लीम समाजाला फितूर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहेत. यासंबंधी मोदी सरकार नरमाईचे धोरण स्विकारत आहे असे दिसत असले तरी कबड्डी खेळात, चढाई करणार्या प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला दमवावे व मग त्याची चारही बाजूनी पकड करावयाची अशी एक चाल असते, तशीच चाल मोदी-शहांनी रचून ठेवली असावी. म्हणजे आंदोलकांकडे दुर्लक्ष करीत राहवयाचे. आम जनतेला आंदोलनामूळे होणार्या त्रासामूळे आंदोलन करण्यार्याविषयी राग उत्पन्न होत जावा, आंदोलकांची शक्ती क्षीण होऊ द्यावयाची , मग 'हा आमच्या देशातला अंतर्गत मामला आहे ' असे म्हणत डावे पक्ष, डावे विचारवंत व साहित्यिक, काॅग्रेस व मित्र पक्ष, पाक पुरूस्कृत दशहतवादी, नक्षलवादी , ख्रिस्ती मिशनरी, पक्षपाती मानवधिकारी आयोगाचे कार्यकर्ते इत्यादींनाच नाही तर ह्या सर्व मंडळीच्या विदेशातील मालकांना प्रथम ठणकावले जाईल, मग योग्य वेळी आंदोलन करणार्या पक्षांच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे कबंरडे मोडावयास सरकार सुरूवात करेल असे वाटते. पंतप्रधान मोदी व अमित शहा या जोडीचा राजकीय चाली खेळण्याचा आलेला अनुभव पाहता योग्य वेळ कुठली असेल ती योग्य वेळीच कळेल.
उत्तम लेख, थरुर महाशयांना त्यांची योग्य शब्दांत जागा दाखवल्या बद्दल आपले अभिनंदन. हा माणुस स्वतःच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्युच्या प्रकरणांतुन निर्दोषपणे बाहेर यायच्या आधीच असली बिनबुडाची जाहीर वक्तव्ये कसा करु शकतो याचे आश्चर्य वाटते. सुंदर लेखासाठी धन्यवाद.
उत्तर द्याहटवाधन्यवाद ! बिवलकरजी, असाच लोभ असावा !
उत्तर द्याहटवानमस्कार.
हटवा