गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०
कायद्याचे राज्य (भाग १)
रविवार, १३ डिसेंबर, २०२०
बंगालची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे?
गुरुवार, १० डिसेंबर, २०२०
मुक्काम पोस्ट चेन्नईवरून-- तामिळनाडूतील निवडणुका निमित्ताने
सुपरस्टार रजनीकांतनी तामिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणूकीत आपल्या पक्षाचे उमेदवार उभे राहतील असे अलिकडे स्पष्ट केले. त्यामूळे सर्वसामान्यांपासून ते सिनेजगत, मिडीया, राजकीय अभ्यासक आणि विविध राजकीय पक्षात या विषयावर चर्चा सुरू झाल्या आहेत. आपल्या देशात कितीही आर्थिक मंदी आली तरी, तीन क्षेत्रातल्या लोकांना मंदीची फिकीर नसते. ती क्षेत्रं म्हणजे राजकारण, मिडीया,आणि मनोरंजन सोबत जाहिरात. जाहिराताची गरज पहिल्या तीन क्षेत्रांना लागते. उद्योग क्षेत्राला जाहिराताची गरज असतेच पण तिथे मंदीचा प्रभाव पडतो तेव्हा जाहिरातीवरील खर्चात थोडीफार काटछाट होत असते. पण मंदी आहे म्हणून जाहिरातीवरील खर्चात काटछाट करू नका असा सल्ला देण्यात जाहिरात कंपनी यशस्वी होतातच. कारण उद्योग क्षेत्र म्हणजे ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मितीचे क्षेत्र. ग्राहक मंडळी मंदीच्या काळात बातम्या, चित्रपट सिरियल्स, संगीत कला नृत्य इत्यादी कार्यक्रम टिव्हीवरून अधिक वेळेसाठी पाहात असतात. म्हणून उद्योग क्षेत्रातील लोकांना जाहिराती बारा महिने द्याव्याच लागतात. राजकारणातल्या आणि सिनेसृष्टीतल्या मंडळींना प्रसिद्धीची गरज असते. त्यातील काही राजकारणी नट (आम्ही सुद्धा नट आहोत हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची फेमस कबूली) आणि काही सिनेसृष्टीतील राजकारणी मंडळी विविध घटनांवर प्रतिक्रीया देऊन आपले मनोरंजन करीत असतात. काही राजकारणातील मंडळी प्रतिक्रीया अशाच प्रकारे देत असतात की ते विनोदी नटच आहेत असे वाटते. काही राजकीय मंडळी खलनायकांची भूमिका पार पाडतात. चित्रपट जगतातील काही मंडळी, प्रत्यक्ष राजकारणात आली आहेत पण ते फक्त डायलाॅग चांगले म्हणतात. चित्रपट सृष्टीतील काही मंडळी प्रत्यक्ष राजकारणात नसतात पण राजकीय घटनेवर प्रतिक्रीया देतात ती डी गँगच्या, वा नक्षलगँगच्या आदेशातून. मग ते जावेद अख्तर सारखे गीतकार असो, तीन खान ट्रायो, सारखी हिरो मंडळी. नासीर हूसेन सारखी नट मंडळी, शबाना आझमी सारख्या नट्या असोत. काही मिडीयाचे मालक व त्यांची संपादक मंडळी थेट डी गँग आणि नक्षलगँगच्या आदेशावरू प्रतिक्रीया देतात. सारांश काय तर ही मंडळी सतत व्यग्र असते पण प्रसिद्धी मिळण्याच्या धडपडीत. प्रसिद्धीतून पैसा व पैशातून प्रसिद्धी हे एक सुत्र आहे. या सुत्राचा उपयोग करण्यासाठी देशातील व राज्यातील सत्तेची जरूरी नसते, फक्त विदेशी न दिसणार्या शक्तीची साथ किंवा आशिर्वाद असला की काम फत्ते होत असते. त्यामूळे रजनीकांत सारख्या सुपरस्टारच्या पत्रकार परिषदेवर चर्चा होणे , रंगणे, विविध राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यात शाब्दिक चकमकी घडण्यात विशेष असे नवीन काही नाही.
रविवार, ६ डिसेंबर, २०२०
आनंदवनातील दुःखद घटना आणि सामाजिक संस्थासंबंधीच्या व्यथा व उपाय
वीस पंचवीस वर्षानंतर दिवाळी सणासाठी गावी गेलो होतो. सोमवार ३० नोव्हेंबरला बोरीवलीत परतलो. संध्याकाळी पुजनीय बाबा आमटेच्या आनंदवनाच्या सिईओ डाॅ शितल आमटे यांची आत्महत्या अशी बातमी ऐकली. क्षणभर विश्वास बसेना. मुळात अकस्मात मृत्यूच्या बातमीवर विश्वास बसत नाही. त्यात सेवाधर्मातील अग्रणी संस्थापैकी आनंदवनाच्या डाॅ शितलजींची आत्महत्या ! अनेकांना दुःख झाले. घटना दुर्दैवी पण तितकीच गंभीर अशी. आतापर्यंत गवगवा होत असणार्या समाजकारणात घडलेली भूकंप सद्दश ही घटना. देशाच्या राजकीय मंचावर उठसूठ भूकंप होत असतात. खरं म्हणजे पत्रकार व संपादक मंडळी पक्षांतरासारख्या गोष्टींना भूकंपाची संज्ञा का देतात हाच प्रश्न पडतो. राजकारणात या घटना नित्याच्या झाल्या आहेत, सदा मरे त्याला कोण रडे अशा धर्तीच्या त्या घटना. परंतु सामाजिक संस्थेतील एका अग्रणी संस्थेच्या सिइओ डाॅक्टर शितल आमटेंच्या आत्महत्येची जी कारणें ऐकू आली, त्यावर विश्वास ठेवणे जड जात आहे. कारण स्वर्गीय बाबा आमटेंनी निर्माण केलेले आंनदवन म्हणजे कुष्ठरोगाच्या रूग्णांचा या भूतलावरील स्वर्ग आहे. म्हणूनच या बातमी संबंधी संवाद कसा साधावयाचा हा माझ्यासमोर पेच उभा राहीला आहे, हे प्रथम प्रांजळपणे कबूल करतो.
रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? (भाग-२)
क्रमशः भाग एकवरून ....
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? (भाग-१)
आपल्या महाराष्ट्रातील मविआ सरकारचा कारभार पाहून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा विचार असंख्य मतदारांच्या मनात येत आहे. त्याचे प्रत्यतंर अर्णव गोस्वामीच्या पाठीमागे उभे राहण्याची जी सह्यांची मोहीम सुरू झाली आहे तिला जनसामान्यांचा दर दिवशी वाढत असलेल्या प्रतिसादावरून येत आहे. केवळ अर्णव गोस्वामीचा छळ होत आहे म्हणून या लेखाचे प्रयोजन नाही. आम्ही रोखठोक ,आम्ही वाघ, आमची भाषा मराठी, आम्ही मराठी लोकांचे हितचिंतक, आमची मुंबई अशा घोषणाबाजी करून राजकारणात ज्या मंडळीने गेली कित्येक वर्षे एक नाटक कंपनी सुरू केली आहे, अशांनी सुडाचे राजकारण सोडून जरा सबूरीचे, सभ्यतेचे, शुचीतेचे राजकारण करावे हे या लेखाचे प्रयोजन आहे.
बिहार निवडणूक निकाल -- अजूनही आहे मोदी लाट
बिहार राज्याच्या विधानसभा निवडणूकाचा निकाल लागला. अत्यंत चुरशीच्या लढाईत रालोआचा विजय झाला. सन २०१४ पासून देशातील प्रत्येक राज्याची विधानसभा, विधान परिषद, लोकसभेच्या पोट निवडणूका वा राज्यसभेच्या निवडणूकांना इतकं महत्व आले आहे की राजकारण म्हणजे समरांगण झाले आहे की काय अशी शंका येते. याचे कारण सार्या विरोधी पक्षांना प्रत्येक राज्यात मोदीचा पराभव व्हावा अशी इच्छा आहे. पण ही इच्छा म्हणजे तोळामासाची तब्येत असलेल्या माणसाने धडधाकट कुस्ती पहेलवानला चीत करण्याची इच्छा बाळगण्यासारखी आहे. पण त्यांना हे कळतंय कुठे? की कळते पण वळत नाही अशी स्थिती आहे का? आपल्याला ही आता समजेनासे झाले आहे. बिहारमधील निवडणूक निकालासंबंधीचे भाष्य सविस्तर रित्या मागील लेखात दिले असल्यामुळे या लेखात बिहारच्या निकालाचे विश्लेषण मांडण्याची गरज नाही. त्या ऐवजी बिहारच्या निवडणूकाच्या निकालाचे संक्षिप्त वर्णन मांडून हा लेख आटोपता घेणार आहे.
सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०
बिहारमध्ये काय होणार ?
दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)
गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...
-
मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात स...
-
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली तरीही अधूनमधून नवीन चित्रपट येऊ घातला कि समाजातील एखाद्या वर्गाच्या भावना दुखावल्या जाण...
-
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकाचा निकाल लागला. महायुतीचा प्रचंड विजय झाला. असा एकतर्फी निकाल महाराष्ट्रात आजपावेतो आला नव्हता हे सत्य आहे ...