गुरुवार, १० डिसेंबर, २०२०

मुक्काम पोस्ट चेन्नईवरून-- तामिळनाडूतील निवडणुका निमित्ताने



सुपरस्टार रजनीकांतनी तामिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणूकीत आपल्या पक्षाचे उमेदवार उभे राहतील असे अलिकडे स्पष्ट केले. त्यामूळे सर्वसामान्यांपासून ते सिनेजगत, मिडीया, राजकीय अभ्यासक आणि विविध राजकीय पक्षात या विषयावर चर्चा सुरू झाल्या आहेत. आपल्या देशात कितीही आर्थिक मंदी आली तरी, तीन क्षेत्रातल्या लोकांना मंदीची फिकीर नसते. ती क्षेत्रं म्हणजे राजकारण, मिडीया,आणि मनोरंजन सोबत जाहिरात. जाहिराताची गरज पहिल्या तीन क्षेत्रांना लागते. उद्योग क्षेत्राला जाहिराताची गरज असतेच पण तिथे मंदीचा प्रभाव पडतो तेव्हा जाहिरातीवरील खर्चात थोडीफार काटछाट होत असते. पण मंदी आहे म्हणून जाहिरातीवरील खर्चात काटछाट करू नका असा सल्ला देण्यात जाहिरात कंपनी यशस्वी होतातच. कारण उद्योग क्षेत्र म्हणजे ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मितीचे क्षेत्र. ग्राहक मंडळी मंदीच्या काळात बातम्या, चित्रपट सिरियल्स, संगीत कला नृत्य इत्यादी कार्यक्रम टिव्हीवरून अधिक वेळेसाठी पाहात असतात. म्हणून उद्योग क्षेत्रातील लोकांना जाहिराती बारा महिने द्याव्याच लागतात.  राजकारणातल्या आणि सिनेसृष्टीतल्या मंडळींना प्रसिद्धीची गरज असते. त्यातील काही राजकारणी नट (आम्ही सुद्धा नट आहोत हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची फेमस कबूली) आणि काही सिनेसृष्टीतील राजकारणी मंडळी विविध घटनांवर प्रतिक्रीया देऊन आपले मनोरंजन करीत असतात. काही राजकारणातील मंडळी प्रतिक्रीया अशाच प्रकारे देत असतात की ते विनोदी नटच आहेत असे वाटते.  काही राजकीय मंडळी खलनायकांची भूमिका पार पाडतात.  चित्रपट जगतातील काही मंडळी, प्रत्यक्ष राजकारणात आली आहेत पण ते फक्त डायलाॅग चांगले म्हणतात. चित्रपट सृष्टीतील काही मंडळी प्रत्यक्ष राजकारणात नसतात पण राजकीय
 घटनेवर प्रतिक्रीया देतात ती डी गँगच्या, वा नक्षलगँगच्या आदेशातून. मग ते जावेद अख्तर सारखे गीतकार असो, तीन खान ट्रायो, सारखी हिरो मंडळी. नासीर हूसेन सारखी नट मंडळी, शबाना आझमी सारख्या नट्या असोत. काही मिडीयाचे मालक व त्यांची संपादक मंडळी थेट डी गँग आणि नक्षलगँगच्या आदेशावरू प्रतिक्रीया देतात. सारांश काय तर ही मंडळी सतत व्यग्र असते पण प्रसिद्धी मिळण्याच्या धडपडीत. प्रसिद्धीतून पैसा व पैशातून प्रसिद्धी हे एक सुत्र आहे. या सुत्राचा उपयोग करण्यासाठी देशातील व राज्यातील सत्तेची जरूरी नसते, फक्त विदेशी न दिसणार्या शक्तीची साथ किंवा आशिर्वाद असला की काम फत्ते होत असते. त्यामूळे रजनीकांत सारख्या सुपरस्टारच्या पत्रकार परिषदेवर चर्चा होणे , रंगणे, विविध राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यात शाब्दिक चकमकी घडण्यात  विशेष असे नवीन काही नाही. 


श्री रजनीकांत यांनी ३१ डिसेंबर २०१७ साली पत्रकार परिषद घेऊन राजकारणात भाग घेणार असे जाहीर केले होते. लोकसभेच्या निवडणूकीत ते भाग घेणार नव्हते हे ही त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले होते. तामिळनाडू मधील निवडणूका २०२१ साली येणार होते हे २०१७ ला आपल्या सार्यांना ठाऊक होतेच की.  तरीही मिडीयातील सुत्रधार राजकीय अभ्यासकांना प्रश्न विचारतात, " आपको नही लगता है की रजनीकांतने राजनीतीमे प्रवेश लेने मे देर कियी है ? " आता प्रश्नाचे उत्तरच ज्यात सामावले आहे अशी पद्धत प्रश्न विचारताना अवलंबवली जाते, तेव्हा उत्तर प्रश्नकर्त्यांच्या मनातलेच येणार हे स्वाभाविक आहे. सुत्रधार असा प्रश्न कुठल्या पक्षाच्या प्रवक्त्याला, किंवा राजकीय अभ्यासकाला विचारतात हे जर नीट विचार करून पाहीले तर यातही राजकारणच दिसेल. तामिळनाडूतील राजकारणाचे स्वरूप डीएमके विरूद्ध एडीएमके असेच कित्येक वर्षे राहिले आहे. या दोन्ही पक्षाचे राजकारण द्रविडीयन थेअरीवर चालत आले आहे. त्यामूळे राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्व विचारसरणीचा प्रभाव पडू नये, या कारणा साठी डाव्या विचारसरणीचे  विचारवंत, इतिहासकार, संपादक, साहित्यिक, सिनेसृष्टीतील डाॅन इत्यादी मंडळी आणि इसाई व मुस्लीम धर्मगुरूंच्या लाॅब्या स्वातंत्र्यपूर्वापासूनच जाणीव पूर्वक केलेल्या आहेत. या लाॅब्यांना पैसा कोठून मिळतो हे जगजाहीर आहे. केरळ, बंगाल, काश्मीर, महाराष्ट्र आन्ध्र,झारखंड, ईशान्य भारतातील राज्यें इथे ही असाच प्रकार घडत आलेला आहे. त्यामूळे अडचणीत न येणारा प्रश्न भाजपेतर (विरोधी) पक्षांच्या प्रवक्त्यांना विचारला जातो. चर्चा सत्रात भाजपाचा एक प्रवक्ता असतो. बाकी आठ जण वरील लाॅबीतील असतात. ते सारे जण उत्तर देतात ते असे आहे, " रजनीकांतने बहूत देर कियी है, और रजनीकांतकी क्रेज रही नही है | उनके पास समय भी कम है | और दुसरी बात यह है की, तामिळनाडूमें  द्रविडीयन राजनिती है और रजनीकांतकी स्पिरीच्युअल पाॅलिटीक्स चल नही पायेगी | " यापैकी काही प्रवक्ते तामिळ अस्मिताची बाजू सरस ठरेल असे मांडतात. काही जण रजनीकांत हे मोदी - शहा ह्या फॅसीस्ट नेत्यांचे चेले आहेत असे मांडतात. जेव्हा अशा प्रकारे चर्चा सत्र बघायला मिळते तेव्हा ती चॅनल्स कोणती ते ही आपण जाणताच. एकंदरीत मिडीया असे दाखविल की भाजपा व रजनीकांतची डाळ शिजणार नाही. हवा डिएमकेचीच आहे आणि डीएमकेच सत्तेवर येईल असे सर्वत्र दाखवतील. अशाच पद्धतीने बिहारचे निवडणूकपुर्व चित्र एनडीएच्या विरूद्ध दाखविले होते. निकाल काय लागला, हे आपण पाहीलच आहे.

अर्थात बिहार म्हणजे तामिळनाडू नव्हे हे मी शंभर टक्के खरे मानतो . पण बिहार मध्ये भाजपा २०१४ पुर्वी नगण्यच होता की ! ' सुपरस्टार रजनीकांतचा राजकारणात प्रवेश ' या शिर्षकाचा लेख १ जानेवारी २०१८ ला मी पब्लीश केला आहे. त्यात ब्रॅन्ड क्रिएटींग एक्स्परटने जे म्हटले आहे ते आपल्यासमोर पुन्हा ठेवतो " रजनीकांतने दो साल पहले ही राजनैतिक पार्टी बनानेकी तैयारी कि है | बूथ लेवलपर उनके फॅन्सके क्लब मेंबर्सकोही चुना है | " याचा अर्थ रजनीकांत गेल्या तीन वर्षापासून आपल्या ठिक-ठीकाणाच्या फॅन्स क्लब च्या संपर्कात आहेत.

डीएमके आणि एडीएमके या दोन्ही पक्षांना तामीळनाडूतील जनता आलटून पालटून सत्तेवर बसवित आली आहे. ते ही ॲन्टी इन्कम्बन्सीतून. अशाच प्रकारचे मतदान करून तेथील जनता कंटाळली नसेल असा अंदाज आपण किती काळ बांधू शकतो ? इंग्रजीमध्ये असे म्हटले जाते,You can not fool all the people at all the time. मला वाटते कि डीएमके आणि एडीएमके या दोन्ही पक्षांना Law of marginal diminishing utility चा नियम अनुभवयास येईल. कारण तिथे रजनीकांत चा पर्याय उपलब्ध झाला आहे. पण डीएमके पक्षाला फटका अधिक बसेल की ज्याचे सरकार आहे त्या एडीएमकेला हा एक कूट प्रश्न आहे. एडीएमके सत्तेवर आहे म्हणून डीएमके एडीएमकेवर घणणघाती टिका करेल. पण अशी टिका करूणानिधीच्या गैरहजेरीत, आणि करूणानिधीचे पुत्र अलगिरी व त्याचे कार्यकर्ते भाजपावासी झाल्यामूळे किती फळ देईल याबद्दल डीएमकेचे वर्तमान सर्वेसर्वा स्टॅलीनच सांशक असावेत. या शिवाय डीएमकेच्या सोबत काॅग्रेस आहे, जी बिहार मधील निवडणूकीत महाविकास गठबंधनसाठी एक liability ठरली. म्हणजे डिएमके व डिएमकेचे घटक पक्ष जितकी भाजपावर टिका करील ती उलटी अंगावरच येईल. पण भाजपा जी काही टिका काॅग्रेसवर करेल तितका डीएमकेवर नेगेटिव्ह परिणाम घडू शकेल.

तामिळनाडूतीलच नव्हे तर दक्षिण भारतातल्या जनतेला चित्रपटाची क्रेझ आहे आणि आवडत्या नटाला व नटीला देव-देवताचे स्थान देत असतात. रजनीकांतला तसे स्थान मिळाल्यामूळे त्यांच्या प्रभावाचा परीणाम मतदानावर किती होईल यावर निकाल अवलंबून आहे. डीएमके आणि एडीएमके पक्ष रजनीकांतच्या स्पिरिच्युअल बेसड् पाॅलिटीक्सच्यावर जोरदार टिका करणार असले तरी रजनीकांत तामिळ अस्मिताच्या परिघातच राहून प्रचार करतील. त्यामूळे डीएमके आणि एडीएमके कडे जे अस्त्र आहे ते निकामी ठरण्याची शक्यता अधिक आहे. 

भाजपाचा आणि पंतप्रधान मोदींच्या प्रभावासंबंधी बहुतांश मिडीया वर्ग फारशी दखल न घेण्याच्या मनस्थितीत असले तरी भाजपाकडे गमाविण्यासारखे काही नाही. पण भाजपा सोबत असल्यामूळे एडीएमकेला फायदा होऊ शकेल. अलिकडे अमित शहाचे तामिळनाडूत झालेले स्वागत पाहता, आणि एडीएमकेशी युती असल्याने,  करूणानिधीचे सुपूत्र अलगिरी व त्यांचे कार्यकर्ते भाजपात आल्यामूळे अंदाज  पारंपारिक पद्धतीने काढून निकालाचे संभाव्य आकडे चूकीचे ठरू शकतील. ते किती प्रमाणात चूक ठरतील हे आता सांगणे कठीण आहे. भाजपा बिहारमध्ये जसा जेडीयु सोबत राहिला तसा इथे एडीएमके सोबतच राहील. त्यामूळे डिएमके, काॅग्रेस व डाव्या पक्षांवर टिका करण्याची एडीएमकेची व भाजपाची पद्धत सारखीच राहील. पण बिहारमध्ये लोकजनशक्तीच्या पासवान यांनी फक्त जेडीयुवर टिका केली तसला पक्षपात करणार नाहीत. कदाचित ते त्या दोन्ही प्रादेशिक पक्षावर फारशी टिका करणार नाहीत. माझ्या तर असा अंदाज आहे की, रजनीकांत Vibrant Tamilnadu, Developed Tamilnadu या टॅग लाईन वर प्रचार करतील. नव्या ढंगातील तामिळ अस्मिता सादर करीत विकास हाच मुद्दा मांडून प्रचाराचा नारळ फोडतील.

सन २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूका लढविणार नाही, असे रजनीकांतनी २०१७ च्या वर्ष अखेरीस घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. याचे स्मरण आपणास आहे. लोकसभेच्या निवडणूका न लढता त्यांनी एकूण पाच गोष्टी साध्य केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत

१) पहिली गोष्ट म्हणजे  तामिळनाडूतील राजकीय पक्षांची वैचारिक बैठक प्रांतीय हिताशीच अधिक निगडीत असल्याने उगीच लोकसभेच्या निवडणूकीत हात पोळून का घ्यावेत ही सोयीची राजकीय चाल स्विकारली. ती सफल झाली.
२) राजकारणातील श्रीगणेशा पारंपारिक तामिळी प्रथांचे अनुकरण करीत आपल्या लोकप्रियतेचा उपयोग फिल्मी स्टाईलने कुठल्याही दबावा विना करता येणं शक्य व्हावे हा हेतू साध्य झाला.
३) एआयडीएमकेला २०२० पर्यंतचा सत्ताकाळ पूर्णपणे वापरण्यापासून आपण अडथळा निर्माण करून एआयडीएमकेला समर्थन करणार्या तामिळीयांचा रोष ओढवून घेण्याचे रजनीकांतला टाळावयाचे होते. तो हेतू ही साध्य झाला.
४) डीएमके आणि एडीएमके या दोन्ही पक्षापासून निवडणूकीच्या प्रचारात समान अंतर ठेवणे त्यांना आता सोपे जाईल आणि टिका करताना दोन्ही पक्षांनी तामिळी जनतेचे काय भले केले असे म्हणत स्वतःच्या पक्षाचा जाहीरनामा सादर करण्याची योग्य ती संधी साधता येईल  हा हेतू साध्य झाला आहे.
५) देशभर पंतप्रधान मोदी, मोदी सरकार, भाजपा आणि संघाला मिळणार्या पांठींब्याला आपण आव्हान करीत आहोत असा चूकीचा संदेश देशभरातील स्वतःच्या चाहत्यापर्यंत जाऊ नये. उलट मोदी,भाजपा व संघाला जो जनमताचा पाठींबा मिळतो त्याचा आपल्या पक्षाला लाभ मिळण्याची सोय करावी हा हेतू साध्य झाला आहे.

टाईम्स नाॅऊ या न्युज चॅनेलवर रजनीकांत ची पत्रकार परिषद संपल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आर्थिक विषयावरील तज्ञ श्री गुरूमुर्ती यांच्याशी टाईम्स नाऊ चॅनलवर तामिळनाडूतील एकूण राजकीय स्थिती आणि येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकी संबंधीत प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला. तेव्हा गुरूमुर्तीने प्रांजळपणे  म्हणाले की  " रजनीकांत माझ्याकडून सल्ला घेत असतात पण निर्णय घेण्याचे काम त्यांचे आहे. मी सल्ला देतो हेच काम करतो.  बाकी रजनीकांतच्या निर्णय प्रकीयेत मी हस्तक्षेप करीत नाही." गुरूमुर्ती पुढे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की की " रजनीकांतने वापरलेला स्पिरीच्युअल बेस्ड पाॅलिटीक्स हा शब्द तामिळनाडूत सर्रास वापरण्यात येतो.  तो हिंदुत्व या शब्दाचा समान अर्थी शब्द आहे. त्यामूळे रजनीकांत यांचा पक्ष निवडणूक पुर्व वा निवडणूकीनंतर एनडीएचा हिस्सा होऊ शकतो. "

तामिळनाडूतील राजकारणाचे दोन बाॅस डाॅ करूणानिधी आणि सुश्री जयललीताच्या निधनानंतर विधानसभेची ही पहिली निवडणूक आहे. त्यामूळे डीएमके आणि एडीएमके या दोन्ही पक्षांची ताकद क्षीण झालेली असावी. दुसरे असे की डीएमके आणि एडीएमकें या  दोन्ही जुन्या पक्षांना आपले मत देऊ इच्छीत नाही,असा बर्यापैकी संख्याचा मतदार आहे. तो रजनीकांतकडे आकृष्ट होऊ शकतो. एकंदरीत रजनीकांत मुळे तामिळनाडूतील राजकारण घुसळून निघेल आणि हे घुसळून निघतांना डिएमके व एडीएमके ची दमछाक होईल पण त्यांचे किती नुकसान होईल या संबंधीचा अंदाज प्रत्यक्ष प्रचाराला गती आल्यावर मांडू या.

२ टिप्पण्या:

  1. म्हात्रेजी,
    छान आहे लेख, नविन विषय, तामिळनाडु राजकारणावरील. रजिनीकांत यांनी संदिग्धता संपविली, व त्यांचा कल भाजपला पुरक राहील ही बाब भाजपाला अनुकुल राहील, पण दुसरा तारा, कमल हसन, जो भाजपला प्रतिकुल आहे, त्याचा सामान्य मतदारावर किती प्रभाव पडेल,हे पाहणही आवश्यक आहे. काहिही असो, हैद्राबाद निगम मधुन मिळालेला संदेश भाजपसाठी, दक्षिणे कडील केरळ व तामिळनाडु मधे पाय रोवण्यासाठी आश्वासक आहे.
    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. बिवलकरजी, कमल हसन संबंधी चा उल्लेख निसटला. आठवण करून दिलीत बरें झाले. पुढे एक लिहावा लागेल त्यात जरूर उल्लेख करीन. धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...