आपल्या देशातील गेल्या साडेचार वर्षामधील राजकारणावर बीबीसीचे बुजूर्ग संपादक मार्क टूली आपल्या येथील मिडीया पेक्षा निपक्षपातीपणे भाष्य करतात. ते मोदींची स्तुती करीत असतात. दोन वर्षापूर्वीच त्यांनी भाकीत केले आहे की, "मोदींनी स्विकारलेल्या मार्गात विरोधी पक्ष भले मोठे अडथळे निर्माण करतील. मिडीयातील विरोधी पक्षांचे चमचे मोदींच्या रस्त्यावर काटे पेरतील. शनिवार दिनांक २२ डिसेंबर २०१८च्या मटा मधील 'बाटलीतला राक्षस ' ह्या अग्रलेखावरील माझी प्रतिक्रीया माझ्या ब्लाॅगवरील लेखात पुर्वाध भाग १ मध्ये मांडल्या आहेत. आता मी उत्तरार्ध मांडीत आहे. लिखाणाला सुरवात करण्या अगोदर दोन गोष्टी स्पष्ट करीत आहे. आपल्या येथील बहुतांश मिडीया संघ आणि संघ परिवारवर टिका करतात म्हणून अशा लोकांच्या विरोधात मी लिखाण करतो आहे असे कोणी समजू नये. दुसरी गोष्ट म्हणजे संघ जाणून न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पराकोटीचा द्वेष करणे हे काही मला उचीत वाटत नाही. महात्मा गांधीजी, लोकनायक जयप्रकाश नारायण, माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री ह्यांनी संघाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. पण पुरोगामी मंडळीनी कायमचे ह्या सत्या कडे दुर्लक्ष केले आहे. असे का, ह्यासंबंधीचा शोध घेता मला जे जाणवले आहे ते मी खाली मांडतो.
स्वातंत्र्यानंतर ब्रिटीश त्यांच्या मायदेशी परतले. मग आपण आरडाओरडा कोणावर करावा हा प्रश्न काँग्रेसवाल्यांना सतावित राहीला. महात्मा गांधीजींच्या हत्येचे निमित्त मिळाले. गांधी हत्यानंतर सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. तेव्हापासून काँग्रेसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टिका करण्याची सवय लागली. न्यायालयाने संघाचा गांधी हत्येच्या कटात हात नाही असा निर्णय देऊन संघावरील बंदी उठविली. तरी काँग्रेसची संघावर टिका करण्याची सवय आजातागायत सुरूच आहे. स्वातंत्र्यानंतर हिंदुत्व विचारसरणीवर टिका करण्याची एक फॅशन अनेक बुद्धीवाद्यांमध्ये रूजली होती. कारण स्वातंत्र्य मिळाले तरी वसाहात वाद संपला नव्हताच. दुसरे महायुद्ध संपले पण लागलीच अमेरिका व रशिया असे देश, पुढे चीन, सौदी अरेबिया सारखे नवीन साम्राज्यवादी देश निर्माण झाले. प्रत्यक्ष राज्य न करता आर्थिक बळावर हे साम्राज्यवादी देश विकसीत तसेच अविकसीत देशातील विचारवंताना, प्रसारमाध्यामातील मंडळींना, जमल्यास सरकारमधील वा विरोधी पक्षातील मंडळींना वश करून नवा वसाहातवाद निर्माण करीत आहेत हे आपण पाहतो. त्या वसाहातवादातूनच आपल्या देशात ज्यांना बुद्धीवंत म्हणून मिरवावयाचे आहे, त्यांनी हिंदुत्ववाद्यांवर, राष्ट्रवाद्यांवर म्हणजेच पर्यायाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारावर टिका करावयास हवीच अशी एक व्यवस्था निर्माण केली गेली. प्रसारमाध्यमात अशाच मंडळीचा समावेश करण्याच्या तत्कालीन काॅग्रेसी सरकारच्या नीतीमूळे साम्राज्यवादी देशांना यश मिळाले, त्यात नवल ते काय? भारताच्या नव्या विदेश-नीती पासून ते संरक्षण सामुग्रीच्या खरेदीमधील दलालांची झालेली गच्छंती हे सर्व बदल आत्ताच का दिसावेत ह्याचा मागोवा कूणी घेणार नाही. ख्रिश्चन मिशेलच्या "माझे वडिल आणि गांधी परिवाराचे मित्रत्वाचे संबंध होते" ह्या विधानावर कूणी अग्रलेख लिहीत नाही. बहूदा असे संबंध सहिष्णूतेच्या उदात्त विचारांती निर्माण झाले असावेत. शेवटी विचारवंत म्हणजे काय तर सामान्यांचा बुद्धीभेद करणे हीच व्याख्या जगभरात मान्य पावलेली दिसते. विदेशी NGO आणि विदेशी कंपन्यांची प्रसारमाध्यमातील गुंतवणूक, व नोकरशाहीमधील डाव्या विचारसरणीची मंडळी ह्यांचे योगदानही महत्वाचे ठरले. नसरूद्दीन शहा अशाच तथाकथीत पुरोगामी व सेक्युलर विचारवंतापैकी एक होत.
आपल्या देशात विदेशी पैशावरून ऐशआराम करणार्या विचारवंताची विभागणी पाच प्रकारात मोडते. एक अर्बन माओवादी. जे नक्षलवाद्यांचे नेटवर्क सांभाळीत असतात. माओवाद्यांच्या नेटवर्कसंबंधीची संपूर्ण माहीती देणे इथे शक्य नसले तरी अभ्यासाअंती सार मांडावयाचे झाल्यास असे म्हणता येईल कि ह्यांच्या नेटवर्कमध्येही अंतर्गत स्पर्धा, पर्सनॅलीटी कॅल्शेसही आहेत. शेवटच्या तळातील कार्यकर्त्यांचे खाण्या-पिण्याचेही हाल होत आहेत. ट्रायबल भागातील शेतकरी-शेतमजूरांच्या हिताच्या गप्पा मारीत त्यांच्या हातात शस्त्रे देऊन त्यांना मुळ राष्ट्रीय प्रवाहात येऊ द्यावयाचे नाही, आणि कंटाळून पलायन करण्याचा प्रयत्न करणार्या शेतमजूरांच्या अमानुषपणे हत्याही हा वर्ग करीत असतो. आपल्या देशात अस्थिरता माजविण्यासाठी येणार्या विदेशी पैशातून ऐशआराम करणारी ही अर्बन माओवादी मंडळी. ह्यांना ना साम्यवाद्याचं ज्ञान ना शेतीचे ज्ञान. ना गरीबांच्या समस्या ठाऊक, ना त्यावरील उपाय ठाऊक. ज्यांना हा वर्ग विचारवंत वाटत असेल तर त्यांनी ह्यांच्या घरातील नोकरांना ही मंडळी सामाजिक न्यायाने वागणूक देत आहेत का हे पाहून यावे. श्रमजीवी व दलीतांना भडकावित हिंदु समाज खिळखिळा करण्याचा कुटील डाव खेळणार्या अट्टल चिवट खेळाडूंचा हा वर्ग.
दुसरा वर्ग हा जम्मू काश्मीर मधील विविध अलगावादी गटांचा व दशहतवाद्यांचा पाठीराखा ; दशहतवाद्यांचे एन्काउन्टर झाले की सरकारला व आर्मीला धारेवर धरणार्यांचा धंदा करणारा पण तोही मानवाधिकाराच्या गोंडस नावाने; दशहतवाद्यांना व अलगावाद्यांना आपल्या बुद्धी कौशल्याने पाठींबा देणारा हा वर्ग ; सतत प्रसिद्धीच्या झोकात राहणारा ; शहीद होणार्या जवानांबद्दल पराकोटीची असंवेदनशीलता असलेली ही मंडळी. पण अतिरेकी ठार झाला तर घळाघळा रडत बसते पाकिस्तानातील कलाकार मंडळींना जवळ करून शांतीचे नाटक करण्यात ही मंडळी तरबेज. नसरूद्दीन शहा ह्या गटात मोडत असावेत. जिहादी आतंकवाद्याना पैसा पुरविणारे व खोट्या नोटा छापणार्या मंडळींना पाक लष्करांचे व सरकारचे सहाय्य असते हे उघड झालेले आहेच.
तिसरा वर्ग आहे तो मानवाधिकाराचे कार्यकर्त्यांचा. विकसीत राष्ट्रांचं हे शोभेचं बाहूलं आहे. ह्यात भरणा असतो तो ख्रिश्चन मिशनर्यांचा. अविकसीत व विकसनशील देशात विविध विकासाच्या प्रकल्पासाठी शेतकर्यांनी आपल्या जमीनी सरकारला देण्यात अडथळे निर्माण करण्यासाठी ही मंडळी सतत पुढे असते आणि तरबेज ही असते. पर्यावरण हे ह्यांचे कार्यक्षेत्र नसतेच. ते फक्त पर्यावरणाच्या नावाखाली आपल्या देशात अस्थिरता माजविण्याचे कार्य अधिक करीत असतात. मुळात सर्व बडी राष्ट्रे आपआपले हित जपत असतात. इतका प्रखर असतो त्यांचा राष्ट्रवाद. आणि इथे ख्रिश्चन धर्मगुरू राष्ट्रवाद्यांचा पराभव करा असे पत्रक काढतात. आतापर्यंत हिंदू बुवांचा व्यभिचार प्रसारमाध्यमातून कळला होता. पण आता ख्रिश्चन धर्मगुरूंची लफडी बाहेर येऊ लागली आहेत. ह्या धर्मगुरूनीं प्रथम युरोपियन देशामधील राष्ट्रवादाचा पाडाव करावा आणि मग इथे पत्रकबाजी करावी. ह्या वर्गाच्या कामाची व्याप्ती विकसनशील वा अविकासीत देशातल्या सार्वभौम सरकाराच्या कामापेक्षा अधिक असते. सेवेच्या नावाखाली धर्मातंर घडवून आणण्याचे कार्य ही करीत असतात. त्यासाठी अंधश्रद्धेचा आधार घेतात. आमचा देव आजार बरा करतो हे ही भोळ्या भाबड्या समाजबांधवाना सांगत असतात. पण आमचे अनिसची मंडळी तिथे का जात नाही हे मला पडलेले मोठ कोडं आहे. अर्थशास्त्रापासून ते शिक्षण- आरोग्य व्यवस्थेवर विदेशी पैशाच्या बळावर प्रवचन देत बुद्धीभेद करणारा हा वर्ग. एक प्रकारे साम्राज्यवादी देशांचे हे राजदूतच.
चौथा वर्ग हा विकसीत वा अविकासीत देशातील लोकशाहीचा चौथा स्थंभच आपल्या ताब्यात ठेवणारा. ह्या मंडळींचा मेंदू हिटलरशाहीतील गोबेल्सच्या मेंदूच्या शतपटीने तेज. ही मंडळी विकसनशील व अविकासीत देशातील नोकरशाही व नेत्यांना आपल्या शैलीनुसार कह्यात ठेवीत असतात. ह्या वर्गाचे नाव सांगावयाची गरजच नाही. रोज चोवीस तास टिव्ही व वृत्तपत्रातून ह्या वर्गाचे दर्शन घडत असते. अर्थात काही राष्ट्रवादी विचारांचे लोक मिडीयात आहेत त्यामुळेच तर देशाच्या लोकशाहीचे स्वरूप खुललेले दिसते.
पाचवा वर्ग हा चित्रपट सृष्टीत पैसा ओतणारा. पुष्कळदा माध्यमांना व सेन्साॅर बोर्डाला खिशात ठेवणारा हा वर्ग. इथे पैसा कोठून उभा करावयाचा इथपासून ते कुठल्या निर्मात्याचा, कुठल्या नटा-नट्यांचा, चित्रपट हिट करावयाचा, इत्यादी संबंधी लाॅब्या असतात. मग ज्यांची लाॅबी तगडी ते निर्माते, नट -नट्या, दिग्दर्शक विचारवंत म्हणून गणले जातात. पद्मपुरस्काराचे मानकरी होतात. जर त्या क्षेत्रात राजकारण नसते तर ते फक्त कलाकार म्हणून ओळखले गेले असते. पण तसे प्रत्यक्षात नाही ही वस्तुस्थिती आहे.
ह्या सार्या विचारवंताचा धर्म कुठला तर पैसे कमाविणे व ऐशआराम करीत सतत प्रकाशझोतात राहण्याचा. ना हे सच्चे मुस्लीम असतात ना हे सच्चे ख्रिश्चन असतात. ह्यांच्या पैकी कोणाला कधीतरी "चांगला" हिंदू होण्याचे मनात आले तर ह्यांच्या मुखी महात्मा गांधीजींच्या नामाचा जप असतो. गांधीजींच्या सत्य व अंहिसा ह्या तत्त्वांशी दुरायन्वेही ह्यांचा संबंध नसतो. लालूच दाखवून धर्मातंर करणार्या प्रकाराबद्दल महात्मा गांधीजींना आत्यंतिक घृणा होती ह्याचा सोयीस्कर विसर ह्यांना पडत असतो. हे जरी भिन्न गटात मोडत असले तरी सरकार तर्फे ह्यांच्यातल्या कुठच्याही गटावर आघात झाला तर ही सारी मंडळी एकत्र येत असतात. ह्यांच्या मदतीस तत्परतेने धावणारी हाय प्रोफाईल वकील मंडळीही आहे. ती सुद्धा कट्टर संघद्वेषी.
गेल्या साडेचार वर्षात ही मंडळी अनेकदा एकत्र आलेले आपण पाहात आहोत. ह्याचे कारण केंद्रात आज हिंदुत्व विचारसरणीचे सरकार आहे. ह्या सार्या विचारवंताच्या गुप्त कृत्यांना हिंदुत्व विचारसरणीचा मोठा अडथळा वाटत आहे. देशातल्या स्वायत्त संस्थामधील ह्या मंडळीचा वावर व हस्तक्षेप मोदींच्या कारकिर्दीत कोडमडला आहे. म्हणूनच चोराच्या उलट्या बोंबा करणारी न्यायधिश मंडळी, नसरूद्दीन शहा, आमीरखान सारखी चित्रपट सृष्टीतील मंडळी कार्यरत होताना दिसत आहे. केंद्रात काॅंग्रेस प्रणीत आघाडीचे सरकार होते त्यावेळी सारं काही आलबेल होते. पण कोणासांठी? ह्या सार्या मंडळीसाठी. कारण ह्याचेंच मायबाप सर्व सरकारी संस्थांवर विराजमान होते. त्यामुळे 'आपसमे बाटके खाओ' ह्या धर्माचे राज्य होते. म्हणूनच कधी नव्हती इतकी कंगाल अवस्था सार्वजनिक बॅंकाची झाली. त्यासंबंधी सारी माहीती पंतप्रधान मोदींजींनी संसदेत उघड केली आहे. ती सुरवातीला उघड केली असती तर देशाची पत जगासमोर आली असती हे ही पंतप्रधाननांनी म्हटले आहे. सगळा कारभार ताळ्यावर आणावयास चार वर्षे लागणारच होती आणि कारभार सुरळीत चालण्यास अजून अवधी लागणारच ना ! त्यात सार्या विरोधी पक्षाचे अडथळे दूर करण्याचे महत कार्य करावयाचे आहे. मोदींनी ते कार्य हाती घेतलेले दिसू लागताच सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची झोप उडालेली दिसू लागली आहे. तृणमूल काॅंग्रेस आणि तेलगू दसम पक्षांच्या नेत्यांना सीबायची इतकी भिती का वाटते ? आपल्या पक्षाच्या नावामागे काॅंग्रेस नाव जोडून ममता बॅनर्जी महात्मा गांधीजींच्या शिष्या होऊ शकतात का? हुकूमशाहीचे बीज हे राजकीय व्यवस्थेतील घराणेशाहीतून रोवले जाते. ममता बॅनर्जींचा थयथयाट आणि कारभार पाहता शांतीचे प्रतीक असलेल्या शुभ्र पांढर्या रंगाच्या साडीचाच अपमान होत आहे असे भासते. आपल्या सासर्यांना सत्तेच्या शर्यतीत कुटील नीती वापरून गंडाविणारा खादी बुशशर्ट परीधान करणारा तेलगू दसमचा सर्वेसर्वा चंद्राबाबू , ना हुतात्मा बाबू गेनू होणार ना बापू गांधीजी होणार ! महाराष्टतला ' जाणता राजा ' शरद पवार ह्यांच्या बाबत काय म्हणावे ? मुख्यमंत्री फडणवीस ह्यांची जात काढणारा, खादीचा बुटशर्ट वापरणारा हा नेता फळापासून मद्य कसे बनवायचे ह्या विचारांचा पाईक. म्हणूनच सुप्रसिध्द पत्रकार, संपादक माधवराव गडकरींना ' काॅंग्रेसचा प्रवास - साबरमती ते बारामती ' असा लेख लिहावा लागला. ते साहेब म्हणूनच शोभून दिसतात. महात्मा गांधींजीचे नाव ह्यांच्या मुखी म्हणजे मुहमे राम बगलमे छुरी असेच ठरते. देशाच्या राजकीय मंचावरील सर्वात अविश्वासनीय असे हे पात्र. गांधी टोपी परिधान करून स्वतःच्या पक्षाचे नाव आम आदमीशी जोडणारा पण शेवटी आम आदमीच्या आशा धुळीस मिळविणार्या केजरीवाल संबंधी अधिक काही बोलण्याची गरज भासत नाही. स्वतः दिल्लीचा मुख्यमंत्री आणि विरोधकांच्या थाटात उपोषणाला बसलेला पाहीला तेव्हा पटलं ह्याच्यासारखा राजकारणातला विदूषक दुसरा कोणी नसणार. पण परवा पत्रकार परिषदेत "किसानोंका कर्जा मैने पहला माफ किया, मोदींजीने नही " हे वाक्य बोलण्यासाठी दहा-वीस काॅंग्रेसचे बडे नेते पाठीमागून प्राम्टींग करीत असतांना न्युज चॅनेलवर राहूल गांधी दृष्टीस पडले, तेव्हा त्वरेने केजरीवालांना विदुषक म्हणून दिलेला पहीला क्रमांक मी खोडून काढला. बाकी मायावती, अखिलेश यादव इत्यादी नेते पंतप्रधानांच्या शर्यतीत दिसत नाहीत. पण विरोधी पक्षांच्या महाआघाडीमध्ये स्पर्धेत न दिसणारे नेतेच पंतप्रधानपदी बसलेले आपण पाहीले आहेत. 'जशी सोय तशी पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसविण्यात येणारी मुर्ती' हे धोरण. त्यामुळे महागठबंधन केंद्रात सत्तेवर आले तर पंतप्रधानपदावर कोण बसणार ह्यावर सट्टाबाजार कधी नव्हता इतका तेजीत झालेला पाहावयास मिळेल.