मंडळी, पुष्कळदा संवादातूनही लिखाणासाठी विषय सूचतो, असे ऐकिवात आले आहे. राजेश खन्नाच्या चित्रपटातील एका गाण्यासाठी लागणारी चाल, नायक-नायिकेचं नृत्य, शूटींगचं ठिकाण, इत्यादी बाबी तयार होत्या आणि त्यावरून गीत तयार करण्याचे आव्हान गीतकारांसमोर होते. संगीतकारांच्या घरात बैठक संपली. गीतकारांना गाणं काही सुचलं नाही. गीतकार संगीतकारांना म्हणाले, अच्छा तो हम चलते है! संगीतकारांनी पृच्छा केली, फिर कब मिलोगे? असा संवाद झाला आणि गीतकार घरी गेल्यानंतर या संवादावरून गीत तयार केले. मराठीतील 'सखी चांदणी' ह्या अजरामर गाण्याचा जन्म संपूर्णतया वेगळा आहे. गीतकारांना गाणं सुचत नव्हतं आणि त्या कारणाने गीतकाराला रात्री झोप येत नव्हती. ते झोपेला आमंत्रण देत राहीले आणि तेच गाणं म्हणून स्विकारले गेले. अलीकडे माझ्या एका मित्राने "Your blog is gaining momentum" असा मेसेज मला पाठविला. मी त्याला आभार मानताना सहज म्हणालो, "आपण आपआपसात चर्चा करतो, त्यातूनही विषय सूचतात". मित्राशी बोलणं संपलं, माझं विचारचक्र सुरू झालं. बस त्यातून जे काही सूचत गेलं ते ते सारे लिहित गेलो. लेखाची व्याप्ती वाढत गेली. नंतर असे ठरविले जे काही लिहिलंय ते प्रत्यक्ष आपल्या पर्यंत पोहचवावे ते टप्प्याटप्प्याने. आपण स्वागत कराल अशी आशा बाळगतो.
लिखाणासाठी आधी शब्द सूचतात कि विषय? थोडया वेळासाठी वाटलं, विषय सुचला तरच लिखाण करू शकतो. लगेचच मनातल्या मनात म्हटलं, आपआपसांत चर्चा करतो, तीही आपल्या वाणीद्वारें बाहेर येणार्या शब्दातूनच की. आपण आपल्याशी बोलत असतो ते ही परा नावाच्या वाणीच्या साहाय्यानेच. चीनमधील तत्ववेत्ता कनफ्युशस म्हणतो "शब्द हा आत्म्याचा उद्गगार आहे". ज्ञानेश्वर महाराज, वाड़ःमयरूपी श्री गणेशाचे वर्णन करून, ज्ञानेश्वरी ग्रंथात सुरवातीलाच शब्दब्रह्माला नमन करतात. "हे शब्दब्रह्म अशेष| तेचि मूर्ती सुवेष||". तुकाराम महराजांनीही म्हटले आहे, "तुका म्हणे पहा,शब्दाचि हा देव| शब्देंचि गौरव, पूजा||"
शब्द म्हणजे साक्षात ईश्वराचं रूप. असं म्हटलं जातं, कि भगवान शंकराने डमरू वाजविला. त्यातून "ॐ" असा ध्वनी निघाला. तेच नादब्रह्म आणि तेच ते अ ऊ म हे शब्दब्रह्म. मानवाने हे ईश्वरी रूप प्रथम अनुभविले ते आपल्या वाणीतूनच. पुढे ते क्रमशः अक्षरातून, म्हणजे लेखणीतून अनुभवयास सुरूवात झाली.मग छापखाने आले, शब्द छापून येऊ लागले, आता तर संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून शब्दांची भेट होत आहे. लेखनाची माध्यमे बदलत गेली. लेखनासाठी विषयाची सूची वाढत आहे. आजचा काळ झपाट्याने बदलत आहे. असे असुनही, लेखनासाठी लागणार्या विषयाचा उगम आजपावेतो मानवाच्या मेंदूतून आणि मनातील भावविश्वातून होत आहे. पुढेही ही क्रिया अशीच राहिल, असे वाटते. हे आपण शरीर विज्ञानात शिकलो आहे. समाज, आसपासचा परिसर, सृष्टीत घडणार्या घटना, निसर्ग व मानवामधलं नातं ह्या गोष्टी लेखनाचे स्त्रोत आहेत आणि भविष्यातही तेच स्त्रोत राहतील. असे वाटते. ह्याचं कारण या सृष्टीत सर्वात अधिक संवेदनशील प्राणी कोण आहे तर त्याच उत्तर निःसंदिग्धपणे 'मानव' हेच आहे. त्यामुळे आसपासचा परिसर, समाज ह्यांच्यासह राहणे हे त्याच्यासाठी नैसर्गिक आहे.
माणसाला समाजात राहायला आवडणं, हे आपण नैसर्गिक मानलं. पण समाज म्हणजे काय? आणि निसर्ग म्हणजे काय? ह्या दोन्ही प्रश्नापैकी निसर्गाबाबतची व्याख्या अतिविस्तिर्ण आहे. एका वाक्यात उत्तर द्यावयाचे असेल तर "पंचमहाभूताचा समुदाय" हेच होय. अंबामातेच्या स्तवनात म्हटले जाते "मेळोवोनी पंचमहाभूताचा मेळ, अंंबे त्वां रचिला गोळ!" अशा ह्या पंचमहाभूतांची आपल्याला अनुभूती येत असते. त्यामुळे आणखिन खोलात जाऊन त्याविषयी चर्चा नको करुयात. निसर्गातील अगदी मेघांचा गडगडाट असो वा त्या पाठोपाठ आकाशात दिसणारे वीजेचे लोळ असो, वा अती वेगाने आणि तेही चक्रगतीने घोंघावणारे वादळ, सागराला येणार्या उंच उंच लाटा, अक्राळविक्राळ प्राणी, त्यांच्या भयंकर आरोळ्या आणि तसेच निसर्गातील न उलगडलेली रहस्यें, यामुळे असुरक्षिततेची भावना अष्मयुगापुर्वीपासूनच मानवामध्ये होती आणि त्यातूनच समूहामध्ये मानव राहू लागला. हा इतिहास आहे. समूहातून समाजाची निर्मिती आणि मग पुढे प्रगती होत होत जगात सर्वत्र प्रगत समाज(Civilized Society) निर्माण झाले. जगभरातील अनेक विद्वानांनी समाजाच्या व्याख्या केल्या आहेत. त्यापैकी प्लेटोने म्हटले आहे, "मानवाच्या विविध गरजा व त्यांच्यी पूर्ती स्वतःच करण्याविषयीची त्याची असमर्थता या दोन कारणांमुळे समाज निर्माण झाला असावा". तर अॅरिस्टाॅट्लने, ती माणसाची उपजतप्रवृती असे मानले. आपल्या येथील ऋषीमूनीपासून ते संतांपर्यतांच्या महापुरूषांनी ह्यासंबंधी जे काही म्हटले आहे, त्याच सार एका वाक्यात सांगावयाचे, तर "सृष्टीमाजी जितुकी शरीरे, तितुकी भगवंताची घरे " हाच समाज.
आपल्याला काय हवयं ह्याची जाणीव होणे, आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हे मानवाचं वैशिष्ट्य आहे. त्यातून समाजाच्या गरजा, त्रूटी तसेच मानव आणि निसर्ग हयामधील नातं काय आहे हे ही त्याला कळत गेलं असावं. समाजातील लोकांच्या ठायीं अंगभूत गुणवैशिष्ट्येही विभिन्न असतात. त्यामुळे समाजातील काही लोक आपल्या अगंभूत गूणांच्या आधारे समाजाच्या ऐहिक, गरजा पूर्ण करण्याचं काम हातात घेतात, तर कोणी वैचारिक गरजा पूर्ण करण्याचा कार्याला लागतात. आणखिन काही लोक भावनिक गरजा पुर्ण करण्याचं काम हाती घेतात. ऐहिक गरजा ह्या बहुतांशीं विविध वस्तूच्यां उपयोगातून वा उपभोगातून पूर्ण होतात. त्यामूळे ज्या लोकांमधला अंगभूत कल वस्तूनिर्मितीकडे असतो, त्यातून लघु उद्योगपती, मोठे उद्योगपती, व्यापारी, कारागिर, ठेकेदार, बिल्डर, औषधी उत्पादक, टूर्स अॅन्ड ट्रॅव्हलवाले, ट्रान्स्पोर्टवाले, हाॅटेलमालक, इत्यादी मंडळी उदयास आली असावीत. ह्यांना Entrepreneurs असेही म्हटले जाते आणि ज्या लोकांना सेवा निर्मितीचे अंग प्राप्त झाले आहे, त्यातून शास्त्रज्ञ, डाॅक्टर,कवी, लेखक, कलाकार, चित्रकार, शिल्पकार, शेतकरी, वकील, प्राध्यापक, चार्टड अकौंटंट, प्राध्यापक, प्रवचनकार, किर्तनबूवा प्रबोधनकार ही मंडळी उदयास आली असावी. हा माझा ढोबळ अंदाज आहे असेच समजावे. ह्या बाबतीत अधिक तार्किक दृष्टया खुलासा मानसशास्त्र, समाजशास्त्र, तसेच मानववंशशास्त्रातील तज्ञ मंडळीच करू शकतात.
माणसाच्या गरजा ह्या भौमैतिक पध्दतीने वाढत असतात. कूठलीही एक नविन सुविधा येते, तिच्यासंगे नवीन असुविधाही येत असते. त्यामुळे व्यक्ती, मग ती श्रीमंत असो, वा गरीब,पुरूष असो वा स्त्री, सदाकाळ सुखी राहिल ही गोष्ट असभंवनीय वाटते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात "जगी सर्व सुखी असा कोण आहे". पण मग सुखी होण्याचा मार्ग काय? समर्थांनीच उत्तर दिलयं, "विचारे मना तूची शोधून पाहे| मना त्वाची रे पूर्वसंचीत केले| तयासारिखे भोगणे प्राप्त झाले||". पूर्वसंचीता प्रमाणे भोग म्हणजे नेमकं काय? मागच्या जन्मीचे पाप पुण्य वगैरे म्हणण्यापेक्षा माणूस म्हणून समाजात तुम्ही कसे वागता ह्यालाच तुमचे संचित म्हणावे. पाप काय नी पुण्य काय त्याच्या परीभाषा समाज हितानुरूपच ठरविलेल्या दिसतात. म्हणूनच माणसाने समाजाची चिंता केली पाहीजे. समाजाला दु:खी ठेवून तो एकटा सुखी होऊ शकणार नाही. त्याच प्रमाणे व्यक्तीला दु:खी ठेवून समाजही सुखी होऊ शकणार नाही. शरीरामधे ज्याप्रमाणे हृदयाकडून अवयवांकडे आणि अवयवांकडून हृदयाकडे रक्ताचे अखंड अभिसरण सुरू असते, त्याच प्रमाणे समाजाकडून व्यक्तीकडे आणि व्यक्तीकडून समाजाकडे सुखांचे, इच्छा-आकांक्षांचे, विचारांचे,तत्वज्ञानाचे आणि ध्येयवादाचे अभिसरण होत राहिले पाहिजे. या परस्पर आदान-प्रदानावरच मानवी समाजाचे सुख अवलंबून आहे.
माणसाच्या गरजा ह्या भौमैतिक पध्दतीने वाढत असतात. कूठलीही एक नविन सुविधा येते, तिच्यासंगे नवीन असुविधाही येत असते. त्यामुळे व्यक्ती, मग ती श्रीमंत असो, वा गरीब,पुरूष असो वा स्त्री, सदाकाळ सुखी राहिल ही गोष्ट असभंवनीय वाटते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात "जगी सर्व सुखी असा कोण आहे". पण मग सुखी होण्याचा मार्ग काय? समर्थांनीच उत्तर दिलयं, "विचारे मना तूची शोधून पाहे| मना त्वाची रे पूर्वसंचीत केले| तयासारिखे भोगणे प्राप्त झाले||". पूर्वसंचीता प्रमाणे भोग म्हणजे नेमकं काय? मागच्या जन्मीचे पाप पुण्य वगैरे म्हणण्यापेक्षा माणूस म्हणून समाजात तुम्ही कसे वागता ह्यालाच तुमचे संचित म्हणावे. पाप काय नी पुण्य काय त्याच्या परीभाषा समाज हितानुरूपच ठरविलेल्या दिसतात. म्हणूनच माणसाने समाजाची चिंता केली पाहीजे. समाजाला दु:खी ठेवून तो एकटा सुखी होऊ शकणार नाही. त्याच प्रमाणे व्यक्तीला दु:खी ठेवून समाजही सुखी होऊ शकणार नाही. शरीरामधे ज्याप्रमाणे हृदयाकडून अवयवांकडे आणि अवयवांकडून हृदयाकडे रक्ताचे अखंड अभिसरण सुरू असते, त्याच प्रमाणे समाजाकडून व्यक्तीकडे आणि व्यक्तीकडून समाजाकडे सुखांचे, इच्छा-आकांक्षांचे, विचारांचे,तत्वज्ञानाचे आणि ध्येयवादाचे अभिसरण होत राहिले पाहिजे. या परस्पर आदान-प्रदानावरच मानवी समाजाचे सुख अवलंबून आहे.
अगदी योग्य शब्दात व्यक्ती व समाजातील परस्पपर संबंध उलगडून दाखविले आहेत. खूपच सुंदर.
उत्तर द्याहटवा