बुधवार, २९ मार्च, २०१७

भाजप चा काॅंग्रेस होतो आहे का?



आपल्या देशासमोर आर्थिक, सामाजिक, कृषी, औद्योगिक, सार्वजनिकआरोग्य, अंतर्गत सूरक्षा, अतिरेकांच्या कारवाया, भ्रष्टाचार, बेकारी, दळणवळण अशा सर्वच क्षेत्रात एक ना दोन अनेक समस्या आहेत. असे असूनही भाजप चा काॅंग्रेस होतो आहे का हयासंबंधी जोरदार चर्चा होत आहे. असे का होतय? देशभरात कूठे ना कूठे होत असणार्या निवडणूका, त्या वरील ओपीनियन पोल्स आणि हाती येणारे निकाल इत्यादी बाबत न्यूज चॅनेल्स वरील कार्यक्रम, आणि त्यातून दिसणारे भाजप आणि भाजपेतर पक्षातील प्रवक्तां मधील होणारे आरोप-प्रत्यारोपामूळे सर्वसामान्य लोकही अशा चर्चेत ओढले जात असण्याची शक्यता असावी. भारत ही एक फार मोठी बाजारपेठ आहे. हे एकदा मान्य झालं कि मिडीयाला दोष देता येत नाही. जे चटकन विकलं जाते त्याच उत्पादन करायचं, त्याची जाहिरातबाजी करून मिडीयामार्फत दाखविले जाते. त्यामुळे जनमानसात जे उमटते, ते मिडीया दाखविते का हयाबाबतचा संवाद ठप्प होणारच. प्रत्येक व्यक्ती आपल्या कल्पनेप्रमाणे तसेच त्या व्यक्तीची ज्या विचारसरणीवर निष्ठा आहे त्याप्रमाणे आपलं मत मांडणार. भाजपमध्ये इतर पक्षांचे नेते सामील होत आहेत म्हणून भाजपला आरोपी ठरविणे सोपं जाते, ही एक बाजू. भाजपेतर पक्षांबद्दल लोकांमधे भ्रमनिरास झाला म्हणून इतर पक्षांचे नेते भाजपामध्ये प्रवेश करू लागले आहेत. ही दूसरी बाजू. जस आपण मिडीयासंबंधी विचार करतो तसाच विचार राजकिय पक्षांच्या बाबत केला तर जशी जिंकण्याची शक्यता तशी रणनीती भाजप आखीत असेल तर Everything is fair in love, war and politics. हे सूत्र मानून भाजप ला आरोपी म्हणून ठरविणे अयोग्य ठरते.

माझ्या एका  मित्राने महाराष्ट्रातील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयानंतर सहज गप्पांच्या  ओघात  त्याला वाटणारी खंत माझ्या समोर मांडली. त्याच्याच शब्दांत सांगतो. "व्यक्ती कडून समष्टीकडे" असे आपले तत्वज्ञान सांगते. परंतु आपल्या राजकिय व्यवस्थेत समष्टी कधीच केंद्रस्थानी नव्हती. स्वातंत्र्योत्तर सत्तर वर्षातील बहूतांश काळ या देशातील राजकारण हे एका कुटुंबाभोवती फिरत होते. आता ते एका व्यक्ती भोवती फिरेल अशी तजवीज मोदी आणि भाजप यांनी केली आहे. हे 2014 च्या निवडणूकांनी दाखवून दिले होते. ताज्या विधानसभेच्या निवडणूक निकालांनी याच सत्याचा खूंटा हलवून अधिक बळकट केला आहे. माझ्या मित्राची खंत रास्त होती. त्यामूळे थातूरमातूर उत्तर देऊन चालणारे नव्हते. आणि त्यात तो एक हूषार तरूण म्हणून आमच्या गावातील पंचक्रोशीत नावाजलेला आहे. पूष्कळदा संवादातील स्पष्टता आणि कूठल्याही पूर्वग्रहाने (जो आपल्या राजकिय पक्षांच्या व्यवहारात ठळकपणे आढळतो.) संवाद दूषित नसेल तर काही वेळा आपोआप प्रश्नाच उत्तर मिळते याचा अनूभव मला आला. मी त्याला WhatsApp वर माझ उत्तर पाठविले. ते पुढीलप्रमाणे आहे. असे म्हटले जाते, कि आपलं शरीर पंचमहाभूतांच बनलेले आहे. पंचमहाभूतांपैकी तेज (प्रकाश), वायू आणि आप(जल) ह्यांच्यातील वैशिष्ट्य पाहू या. प्रकाशाला अडथळा असला कि तो परावृत्त होतो आणि नंतर परतून अडथळा नसेल तिथे विसावतो. वायू जिथे पोकळी, तिथे घूसतो. आणि जल मग ते पावसाचे असो वा नदीचे ते उताराने प्रवास करीत असते आणि जिथे खड्डा मग तो छोटा असो वा सागरा सारखा मोठा तिथे साचतं. हा जर निसर्गाचा नियम असेल तर मानव अपवाद कसा ठरणार. त्यामुळे सर्वच क्षेत्रात माणूस समूहाकडे ओढला जात असावा. उदाहरणार्थ कपड्यांच्या दूकानात सेल लागल्यानंतर लोकांची दिसणारी झुबंड. एखाद्या घराण्याकडे वा नेत्याकडे मतदार मोठया संख्येने ओढला जातो ही बाब सूध्दा ह्या प्रकारात मोडत असावी. अमेरिका सारखी प्रगत लोकशाहीत बूश घराणे, क्लिंटन घराणे ही उदाहरणं आपल्याला ठाऊक आहेत. अर्थात हा मानसशास्त्राचा विषय आहे. मी त्यातला तज्ञ नसल्यामुळे ठोबळ उत्तर दिल. पुढे मी हे ही नमूद केलं कि कूठल्याही घराण्यात लोकोत्तर पुरुष होऊन गेल्यावर त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची पूण्ण्याई तीन पिढ्या नंतर संपत असावी त्यामुळे राहुल गांधीकडे मतदार आकृष्ट होत नसावेत. दुसरे कारण हे आहे कि जेव्हा  राष्ट्रीय स्तरावर नेतृत्वाची पोकळी दिसत असते आणि त्यातही विद्यमान  सरकारबद्दल मतदारांचा    भ्रमनिरास होतो तेव्हा  जनता नवा नेता स्वःताहून शोधत असते. जगभरातील अनेक देशाचा इतिहास ह्या सिध्दांताला साक्ष आहे. भाजपने अचूक संधी हेरून नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करून निवडणूक जिंकली, जिंकत आहे, आणि पूढच्या विधानसभेच्या आणि लोकसभेची ही निवडणूक जिंकणार असा सार्वत्रिक अंदाज आहे. त्यामुळे मोदींच्या नावाने मते मागणे ही बाब राज्यशास्त्रात गैर मानली जात नसावी.

भाजप निवडणूका जिंकण्यासाठी काग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांना आपल्यात सामील करून घेत आहे, म्हणून भाजपचा काॅंग्रेस होतोय का ह्या प्रश्नाच ऊत्तर कूठल्या हेतूने प्रश्न चर्चिला जातो त्यावर अवलंबून आहे. काॅग्रेस सर्वधर्मसमभावी असे मानले आणि भाजपामध्ये काॅग्रेस आणि इतर पक्षातील नेते सामील होत असल्यामूळे,भाजपाचा काॅग्रेस होतोय अस मानल तर, भाजपाला सांप्रदायिक म्हणून का हिणवावे? काॅंग्रेसला भ्रष्टाचाराच्या अनेक केसेसमूळे सत्तेवरून पायउतार व्हावे लागले.आणि त्या काॅंग्रेसमधील नेते भाजपात जात आहे म्हणून भाजप भ्रष्टाचारवाल्यांचा पक्ष आहे असे दाखवावयाचे असेल तर काॅंग्रेसने भ्रष्टाचारामूळे निवडणूकीत पराभव झाला असे मान्य केल्यासारखेच आहे. मोदींची जाहिरतबाजी किवा राहूल गांधींचा "मोदी अच्छे मार्केटिंग करते है और भाजपा धृवीकरण करके जितते है" हा आरोप ही खोटा ठरतो. एका प्रश्नातून दूसरा प्रश्न जन्माला येतो. त्यामूळे भाजपचा काॅंग्रेस होतोय का हा प्रश्न आजच्या राजकीय स्थितीत गैरलागू ठरतोय असे वाटते. मुळ प्रश्न नरेंद्र मोदींचा झंझावात विरोधी पक्ष कसा थोपवणार हा आहे.  ज्यांना सारे विरोधी पक्ष उदारमतवाादी म्हणून गौरवितात अशा अटलबिहारी वाजपेयींचे सरकार एका मताने पाडले होते त्याच क्षणी नरेंद्र मोदीचा राष्ट्रीय पातळीवरील राजकीय प्रवेश  नियतीने निच्चित केला होता. असेच मागे वळून पाहता म्हणावेसे वाटते.

लोकसभेच्या निवडणूका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या कार्यशैलीनूसार जनता-जनार्दनाचे समर्थन अधिक बळकट करीत आहेत. भ्रष्टाचाराविरूद्धची लढाई हे आता नाटक राहिले नाही, असे आम जनतेलाच नव्हे तर विरोधी पक्षांतील नेत्यांनांही वाटू लागले आहे. विशेष महत्वाचे म्हणजे गरीबी म्हणजे काय आणि ती कशी असते हे मोदीनीं अनुभवलं आहे. मानसशास्त्रीय सिद्धांत हे कुठल्याही ईझमवर अवलंबून नसतात. त्यामुळे जोवर राष्ट्रीय पातळीवर नेत्याची पोकळी आहे, तोवर जनता मोदींभोवती फिरत राहणार,आणि गरीबी अनूभवलेला हा नेता तळागाळातील माणसांच भलं करणार असा विश्वास निदान आज तरी वाटतो.

1 टिप्पणी:

  1. अभिव्यक्त होण्यासाठी, माणसं जोडण्यासाठी प्रतिपदे पासून ब्लॉग म्हणेज नवीन माध्यमात वावर सुरू केल्याबद्दल अभिनंदन.

    भाजपंच कांग्रेसी करण किंवा प्रतिस्पर्धी पक्षाचं एकमेकीकरण नैसर्गीक आहे. राजकारणात डाव , प्रतिडाव नेहमीचेच असतात. एखाद्या प्रश्नावर आपल्या पक्षांची काय भूमिका असावी या वर विचार करण्यापेक्षा आपली प्रतिस्पर्धी पक्षाची काय भूमिका असेल या वर जास्त खल होत असतो. एका अर्थी त्या प्रश्नावर आपण प्रतिस्पर्ध्याच्या भूमिकेतून बघत असतो. बरोबरना. बघा पटतंय का ?

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...