सूप्रभात! नमस्कार मंडळी! आज गुढी पाडवा. हिंदू धर्माच्या मान्यतेप्रमाणे नववर्षाचा हा पहिला दिवस. आपणांस तसेच आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यास नववर्षाच्या हार्दिक शूभेच्छा.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त. काहीतरी नवीन संकल्प सोडावा असा हा मुहूर्त. मी आपल्याशी आजपासून संवाद साधण्याचा संकल्प सोडला आहे. त्यात मला कसं आणि किती प्रमाणात यश मिळेल हा प्रश्न गौण आहे असे मी मानतो. कारण संवादात वादविवादाला स्थान नसते. वादविवादात सरशी आणि हार ह्यांचा जन्म असतो. कोणीतरी म्हटलं आहे कि "You may win the argument but lose the relationship." आणि हे पटण्यासारखे आहे. कूठल्यातरी ऐताहासिक कांदबरीच्या लेखकाने म्हटलं आहे कि "माणसाला गैरसमज टाळता आले असते,तर जगातील निम्याहून अधिक यूद्धे टळली असती". तूम्ही म्हणाल कि मी संवाद सोडून लेखकांची वाक्ये का ऐकवितो? ही काही संवादाची रीत झाली काय? तूमचा प्रश्न रास्त आहे परंतु एक सत्य नाकारण्यासारखे नाही, आणि ते म्हणजे साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ, अध्यात्मिक गूरू, इतिहासकार ही मंडळी अस्तित्वात नसती, तर मानव जात आज जितकी प्रगत दिसते,तशी ती नसती. आपल्या शास्त्रकारांनी म्हटले आहे, " साहित्य संगीत कला विहिनः साक्षात पशू पुच्छविषाणहिनः॥" असो. आता संवाद साधायचा म्हटला कि प्रथम प्रश्न समोर येतो की, तसं पाहता आजकाल आपण WhatsApp द्वारे संवाद करीतच आहोत. मग आणखिन बाॅल्ग वर कशाला हवा संवाद?. मला प्रामाणिकपणे वाटते कि हल्ली WhatsApp द्वारे आपण संवाद कमी आणि माहिती जास्त शेअर करीत असतो. अर्थात ती ही आवश्यक आहेच. तरीसुद्धा त्यातून समोरासमोरील संवादातून मिळणार्या तृप्तीची सर नाही असाही एक मतप्रवाह आहे. अलीकडे माझ्या एका परम मित्राला सध्याच्या राजकीय स्थितीवरील त्यानी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी WhatsApp वरून पाठविली. त्याच समाधान झालं. आम्हां दोघांना प्रत्यक्ष एकमेकांची भेट झाल्याचाच आनंद मिळाला आणि तो ही आम्हां दोघांची राजकीय मते भिन्न असूनही. असे का शक्य झाले असावे? माझ्या मित्राला मी म्हटले कि आपण सर्रास म्हणत असतो,कि व्यक्ती तितक्या प्रकृती. आपण असेही म्हणत असतो कि "पिंडी ते ब्रम्हांडी". ह्याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती चे एक स्वतंत्र ब्रम्हांड असू शकते. त्यामध्ये त्याचे कुटूंबीय, सोबती, मित्र असतात आणि नात्याच्या पलीकडील लोकही असू शकतात. नात्याच्या पलिकडची मंडळीसाठी खास नाव वा प्रकार अशी संज्ञा नाही. फक्त "समान शीले व्यसनेषू सख्यम्! ".असे वर्णन करू शकतो.
मी आज ह्या blog च्या माध्यमातून आपल्या सर्वांशी किमान आठवड्यातून एकदा तरी संवाद करण्याचा संकल्प सोडत आहे. मित्रांनो माझ प्रांजळ मत असे आहे कि व्यक्ती ही प्रथम स्वःतहाचीच व्यक्त होत असते. परंतु त्याच वेळी ती अप्रत्यक्षरित्या त्याच्या जिवलग माणसांशी संवाद साधत असते. आपलं विचारचक्र चालू असते तेव्हा नैसर्गिक रित्या ही क्रिया घडत असते. आणि WhatsApp नव्हतं, त्याही काळी असे घडत होतं. इतकंच काय भाषा अस्तित्वात नव्हती तेव्हा ही क्रिया घडत आली आहे. मित्रहो आपण सारे माझ्या ब्रम्हांडातील मंडळी. आणि म्हणून मला संवाद करायला आवडेल. आपल्या प्रतिक्रिया नक्की share करा. मला विश्वास आहे कि अशा प्रकारच्या संवादासाठी जे हे माध्यम आपण वापरणार आहोत त्यासाठीचे जे नियम व बंधनं आहेत ती पूर्णतया स्विकाराल. विषय अर्थातच विविध क्षेत्रातील चालू घडामोडी असतील. पून्हा आपल्याला नववर्षाच्या शूभेच्छा देऊन येथे थांबतो. धन्यवाद!
हार्दीक शुभेच्छा.
उत्तर द्याहटवा