महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकाचा निकाल लागला. महायुतीचा प्रचंड विजय झाला. असा एकतर्फी निकाल महाराष्ट्रात आजपावेतो आला नव्हता हे सत्य आहे ; अनेक संस्थाचे ओपिनियन पोल चूकले हे ही सत्य आहे ; राजकीय अभ्यासकांचे भाष्य खोटी ठरली हे ही सत्य आहे.
या वर्षीच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकात महाराष्ट्र राज्यातून मविआने महायुतीपेक्षा अधिक जागा पटकाविल्या हे ही सत्य. तेव्हा मविआच्या नेते मंडळीपासून ते गल्लीतल्या कार्यकर्त्यानी महायुती च्या नेत्यापासून ते महायुतीच्या कार्यकर्त्याची भरपेट टर उडविली. महायुतीला अपेक्षापेक्षा कमी जागा मिळाल्या.पण महायुतीने जो निकाल लागला तो खिलाडू वृत्तीने स्विकारला आणि आपण कुठे कमी पडलो यावर चिंतन करून पुढे येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकात चांगले यश मिळविण्याच्या कामाला लागली. पण मविआ यशाच्या नशेत डुबली.
विधानसभेच्या निवडणूकांची घोषणा झाली ; एकामागून एक दिवस सरत चालला. उमेदवारांची यादी, फार्म भरण्याचे दिवस जवळ येऊ लागले. पण मविआच्या घटक पक्षात जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपदावर दावा या संबंधीत शाब्दिक युद्ध सुरू झाले. तर महायुतीचे घटक पक्ष मतदारां समोर समन्वयाचं विलोभनिय दर्शन पेश करीत होते.
निवडणूका झाल्या. महायुतीने मविआचा दारूण पराभव केला. दारूण पराभवाने गलीतगात्र झालेले मविआच्या घटक पक्षांचे नेते मंडळी, त्यांचे समर्थक मिडीया व राजकीय अभ्यासक 'महायुतीचा विजय ' ही एविएम मशीनची करामत आहे असे म्हणत हा निकालच धुडकावित आहेत.
जी गोष्ट प्रथमच घडते म्हणून ती खोटी आहे, त्यात दगाबाजी आहे, असे आरोप करणे म्हणजे आपली बुद्धी गहाण ठेवण्यासारखी आहे. दुसरे असे की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकात एखाद्या आघाडीचा दारूण पराभव होऊ नये असे देशाच्या संविधानात कलम ठेवले आहे का व त्यासाठी महाराष्ट्र राज्याला स्पेशल दर्जा मिळालेला आहे का? तसे काही ही नाही. महाराष्ट्रात भाजपाची ताकद कमी होती, पण ती भूतकाळाची गोष्ट आहे. जगातला सर्वात अधिक सदस्य संख्या असलेला पक्ष भाजप आहे. माझे तर स्पष्ट मत असे आहे की विधानसभा निवडणूकातला महायुतीचा विजय हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार व राहूल गांधी यांच्यावर काळाने उगारलेला सूड आहे. काळाने उगारलेला सूड हा अनाकलनीयच असतो.
ब्रम्हांडात अनेक चमत्कारीक घटना दर दिवशी घडत असतात. त्यावर आधुनिक विज्ञानाच्या अत्याधूनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने संशोधन करून ही अशा चमत्कारी घटनांचे कारण लागलीच सापडत नसते. त्यावर वर्षानुवर्ष संशोधन झाल्यावर चार ते पाच टक्के उत्तर हाती लागते.
सारे पोल खोटे ठरले आहेत ही सबब निवडणूकीच्या निकालासंबंधीत संशय व्यक्त करून ना न्यायालयात केस उभी राहील, ना जनतेच्या दरबारात केस उभी राहील. कारण निवडणूक आयोग मविआची यासंबंधीतली तक्रार तडकाफडकी फेटाळून लावणार ! तसे पाहता मविआ व इंडी आघाडीची माता सोनिया गांधी, युवराज राहूल गांधी इतर होयबा नेतमंडळी व कार्यकर्ते, लिबरल पत्रकार संपादक व अभ्यासक इत्यादी मंडळीने आत्मपरिक्षण करणे आवश्यक आहे. पण आत्मपरीक्षण हा शब्दच मुळी घराणेशाही पक्षांच्या शब्दकोशातच नाही.
काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून सोनिया गांधीने हिंदू समाजाच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत, भगवा आतंकवादाचे खोटे-नाटे नॅरेशन जगभरात पसरविण्याची मोहीम राबविली तर दुसर्या बाजूस धर्मांध मुस्लिमांच्या दिवसागणिक वाढत जाणार्या मागण्यांची पुर्तता करू असे काँग्रेस प्रणित राष्ट्रीय स्तरावरील इंडी आघाडी व महाराष्ट्रातील मविआ च्या लेखी आश्वासनामूळे हिंदू समाज हळूहळू जागा होत आहे. जागा होत असलेल्या हिंदूना कुठल्या तरी भितीने ग्रासून ठेवण्याच्या क्लुप्त्या विरोधी पक्ष व त्यांचे समर्थक मिडीया व विचारवंत लढवित असतात. हे नित्याचे होऊन बसले आहे.
युक्रेन व रशिया मधील सुरू असलेल्या युद्धात भारताची भूमिका लंगडी पडत आहे, तसेच इजराईल व इराण देशामधील युद्धात ही भारताची भूमिका सावध आहे, भारत कचाट्यात सापडला आहे, जागतिक स्तरावर भारत एकाकी पडला आहे, इत्यादी खोटे-नाटे नॅरेटिव जे घुमते आहे, त्यातून जनसामान्याचा संभ्रम वाढवयाचा, मग मोदी सरकारची लोकप्रियता कमी होत भारतात अराजक माजले जाईल असा प्रचार विरोधी पक्षांचे चमचे असलेला मिडीया हाऊसेस करीत आहेत. पण--
वस्तुस्थिती भितीदायक नाही उलट आपल्याला अभिमान वाटेल अशी आहे. भारत आर्थिक, सामरिक, उद्योगिक, व परराष्ट्रीय संबंधात इतका सक्षम झालेला आहे की अमेरिका, रशिया व चीन सारखे देश भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत करीत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात धाडसी तितके संयमी व लोकप्रिय नेते गणले जात आहेत. हे जनसामान्यांना ठाऊक झाले आहे. जगभरातील लिबरल विचारवंत, संपादक मंडळीं, सतत गोबेल्स तंत्राने भारत सरकार, भाजपा, आणि हिंदु संस्कृतीच्या विरूद्ध नेगेटिव्ह नॅरेशन पसरवित असतात. हे जनसामान्यांना पक्के ठाऊक झाले आहे. पण बहुतांश हिंदु समाज बांधव आक्रमक किंवा रागाच्या भरात प्रतिक्रीया देत नाहीत. पण मतदान 'राष्ट्र प्रथम' याच भावनेने करीत असतो. त्यांमुळे लिबरल मंडळीच्या नेगेटिव्ह नॅरेशनस् दिवाळी संपल्यावर उरलेल्या फटाक्या सारखे फूसके बार ठरत आहेत.
आतापर्यंत मणीशंकर अय्यर, दिग्विजयसिंग व राहूल गांधीच्या वक्तव्याने भाजपाला प्रत्येक निवडणूकीत फायदा होत गेलेला आहे. बांगला देशात अराजक माजले व तेथील पंतप्रधानांना हद्दपार केले, तसेच काही तरी भारतात होईल असे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनी केलेले वक्तव्य मविआ व इंडी आघाडीला अदृष्य स्वरूपात महाग पडले पण महायुतीला मोठी मदत देऊन गेले असे मला वाटते. कुठल्याही पक्षाच्या नेत्याने केलेलं वक्तव्य जर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या देशहिताला ठेंच पोहचणारे वाटते, तेव्हा त्या नेत्याने देशद्रोह केला अशी सर्वसामान्यांची समजूत होते आणि ती खरी ही आहे. सलमान खुर्शिद यांना बांगला देशातल्या हिंदू समाजावर अत्याचार होत आहे या बद्दल यत्किंचीत दया आली नाही.
अमेरिका व पाक पुरस्कृत दशहतवाद्यांतर्फे मोदी सरकार उलथून पडावे अशी आशा सलमान खुर्शिद तसेच इंडीचे नेते मंडळी मविआचे नेते - कार्यकर्ते, लिबरल पत्रकार-संपादक धरून बसतात. वर्षभर अभ्यास न करता काही विद्यार्थी IMP प्रश्नोत्तरांचा आधार घेतात तसेच मविआ व इंडी आणि प्रान्तीय पक्ष देशी-विदेशीच्या अभ्यासकांनी केलेले आयते नॅरेशन्सवर भर देतात. काही नॅरेशन्स ऑउट ऑफ डेट असतात. परीणाम ' सपशेल नापास !' शरद पवार, उद्धव ठाकरे व राहूल गांधी यांचा प्रवास मणीशंकर अय्यर यांच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. म्हणूनच निवडणूकांचा निकाल एकतर्फी लागला. महाराष्ट्रातल्या मतदारांनी कसलाही गवगवा न करता, (गनिमी काव्याने म्हणा हवे तर) मविआला सपशेल झिडकारले.
निवडणूकीतला अनाकलनिय निकाल म्हणजे सारासार विचार करून, दृढ निश्चयाने, शांत चित्ताने, राष्ट्रहीत सर्वोच्च मानून धर्माच्या रक्षणासाठी जनतेने केलेलं मतदान होय. संघ परिवाराचा ' सजग रहो ' या इशाराला मतदारांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद आहे. आपण एखादे काम मनःपुर्वक करतो तेव्हा त्यात अद्भूत यश मिळते. हा सृष्टीचा नियम व एक वैशिष्ट्य आहे. याची जाण असुनही मविआचे नेतेमंडळी आपल्या धोरणात व वागण्यात बदल करणार नसतील तर काय म्हणावे ? एकच उत्तर आहे ते म्हणजे ' विनाशकाले विपरीत बुद्धी ! '
एखादी गोष्ट घडते, ती अनाकलनीय का वाटते या संबंधीचं एक सामान्य उदाहरण आपल्या समोर मांडतो. गेल्या आठवड्यात मी एका लग्न समारंभा साठी गावी गेलो होतो. दुसर्या दिवशी संध्याकाळी नालासोपारा ते बोरीवली कडे येणार्या रेल्वे गाडीने आलो. बोरीवली स्टेशनवर डब्यातून उतरलो. तेव्हा फ्लॅटफार्मवर एक -दोन नव्हे तब्बल आठ तिकीट इन्स्पेक्टर उतरणार्या प्रवाशाकडून टिकेट टिकेट असे म्हणत तपासणी करू लागले. मी तिकीट दाखविले आणि गम्मत पाहावी या हेतूने बाजूला उभा राहून पाहू लागलो. उतारू प्रवाशांपैकी सहा-सात जणांना विना तिकीट प्रवास करणार्यांना नियमानुसार ताब्यात घेतले. उतारूंची संख्या फार होती. त्यामानाने टिकीट इन्स्पेक्टरांची संख्या फार कमी होती. मी ब्रिजवरून चढत असतांना पुढे चालत असलेले आमच्या डब्यातले दोन उतारू' देवाची कृपा आपण वाचलो ' असे म्हणत असल्याचे ऐकले. विना तिकीट प्रवास करणारे काही प्रवासी अडकले तर काही अनायासे सुटले. हे असे का व्हावे ? मी माझ्या मनाशी प्रश्न विचारला. विना तिकीट प्रवास करणारे काही उतारू अडकले तर काही सुटले. सारं तर्कशास्त्र धुंडाळून पाहिले. उत्तर मिळाले नाही.
शेवटी Law of averages व Law of probability यांचाच आधार घेत माझ्या मनाची घालमेल थांबविली. या विश्वात सर्वात गूढ असे काय या प्रश्नावर विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांनी उत्तर दिले आहे--
'हे विश्वच !' जे उतारू पकडले गेले. त्यापैकी काही जण नेहमीच विना तिकीट प्रवास करणारे असू शकतात. त्यांच्यापैकी जे पकडले गेले त्यांना जे घडले ते अनाकलनीय वाटू शकते. तर काहींनी पुन्हा विना तिकीट प्रवास करायचा नाही असे ठरविले असेल. काही जण विना तिकीट प्रवास करणे सुरू ठेवतील. जे सुटले ते देवाची कृपा, नियती नशीब असे समजत असतील. मी ही लेखमालिका लिहावयास बसलो त्याच्या आदल्या दिवशी हा मला आलेला अनुभव आहे. थोडक्यात हेच की महायुतीच्या विजया संबंधीचे आकलन संपुर्णतया होईल आणि तंतोतंती भाष्य वा भाकीत कोणी ही करू शकत नाही. कारण मतदान हे फक्त बुद्धी स्तरावरून होत नसते. तिथे ही मनाला पंसत पडते त्या उमेदवाराला ते दिले जाते. प्रत्येक क्षेत्रात मतभिन्नता असतेच त्यात नवल ते काय ? मग अशावेळी ' करावे तसे भरावे ' हेच आपण म्हणतो आणि ऐकतो.
एकंदरीत जे अनाकलनिय घडले असे आपल्याला वाटते ते होणार होतेच. तो निसर्गाचा एक नियम असतो. अनाकलनिय घटना घडते तेव्हा त्यातील सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे क्रमप्राप्त असते. पण मविआचे नेते मंडळी एवीएम मशीनवर पर्यायाने निवडणूक आयोग, केंद्र सरकार वर टिका करीत आहे. विरोधी पक्षांचे असे रडगाणं न्यायालयात टिकले नव्हते. याचा अनुभव त्यांना आला आहेच. निवडणूक आयोगा समोर असलेली मविआ वा इंडी ची याचिका असो वा ठराव सपशेल धुडकावले जाणार हे निश्चीत. अन्याय करणारे, धातांत खोटे बोलणारे इत्यादींना सहानुभूती मिळत नसते. थोडीफार क्वचीत मिळेल पण सतत मिळत नसते. खोटे बोलणार्यांचे, अन्याय करणार्यांचे पाय सतत चिखलात रूतत जातात. नंतर सत्यानाश ओढवतो मग ते क्षेत्र कोणते ही असो.
क्रमशः---