शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग --१)



महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकाचा निकाल लागला. महायुतीचा प्रचंड विजय झाला. असा एकतर्फी निकाल महाराष्ट्रात आजपावेतो आला नव्हता  हे सत्य आहे ; अनेक संस्थाचे ओपिनियन पोल चूकले हे ही सत्य आहे ; राजकीय अभ्यासकांचे भाष्य खोटी ठरली हे ही सत्य आहे. 

या वर्षीच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकात महाराष्ट्र राज्यातून मविआने महायुतीपेक्षा अधिक जागा पटकाविल्या हे ही सत्य. तेव्हा मविआच्या नेते मंडळीपासून ते गल्लीतल्या कार्यकर्त्यानी  महायुती च्या नेत्यापासून ते महायुतीच्या कार्यकर्त्याची भरपेट टर उडविली.  महायुतीला अपेक्षापेक्षा कमी जागा मिळाल्या.पण महायुतीने जो निकाल लागला तो खिलाडू वृत्तीने स्विकारला आणि आपण कुठे कमी पडलो यावर चिंतन करून पुढे येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकात चांगले यश मिळविण्याच्या कामाला लागली. पण मविआ यशाच्या नशेत डुबली. 

विधानसभेच्या निवडणूकांची घोषणा झाली ; एकामागून एक दिवस सरत चालला. उमेदवारांची यादी, फार्म भरण्याचे दिवस जवळ येऊ लागले. पण मविआच्या घटक पक्षात जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपदावर दावा या संबंधीत शाब्दिक युद्ध सुरू झाले. तर महायुतीचे घटक पक्ष मतदारां समोर समन्वयाचं विलोभनिय दर्शन पेश करीत होते. 

निवडणूका झाल्या. महायुतीने मविआचा दारूण पराभव केला. दारूण पराभवाने गलीतगात्र झालेले मविआच्या घटक पक्षांचे नेते मंडळी, त्यांचे समर्थक मिडीया व राजकीय अभ्यासक 'महायुतीचा विजय ' ही  एविएम मशीनची करामत आहे असे म्हणत हा निकालच धुडकावित आहेत. 

जी गोष्ट प्रथमच घडते म्हणून ती खोटी आहे, त्यात दगाबाजी आहे, असे आरोप करणे म्हणजे आपली बुद्धी गहाण ठेवण्यासारखी आहे. दुसरे असे की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकात एखाद्या  आघाडीचा दारूण पराभव होऊ नये असे देशाच्या संविधानात कलम ठेवले आहे का व त्यासाठी महाराष्ट्र राज्याला स्पेशल दर्जा मिळालेला आहे का? तसे काही ही नाही. महाराष्ट्रात भाजपाची ताकद कमी होती, पण ती भूतकाळाची गोष्ट आहे.  जगातला सर्वात अधिक सदस्य संख्या असलेला पक्ष भाजप आहे. माझे तर स्पष्ट मत असे आहे की विधानसभा निवडणूकातला महायुतीचा विजय हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार व राहूल गांधी यांच्यावर काळाने उगारलेला सूड आहे. काळाने उगारलेला सूड हा अनाकलनीयच असतो.

ब्रम्हांडात अनेक चमत्कारीक घटना दर दिवशी घडत असतात. त्यावर आधुनिक विज्ञानाच्या अत्याधूनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने संशोधन करून ही अशा चमत्कारी घटनांचे कारण लागलीच सापडत नसते. त्यावर वर्षानुवर्ष  संशोधन झाल्यावर चार ते पाच टक्के उत्तर हाती लागते. 

सारे पोल खोटे ठरले आहेत ही सबब निवडणूकीच्या निकालासंबंधीत संशय व्यक्त करून ना न्यायालयात केस उभी राहील, ना जनतेच्या दरबारात केस उभी राहील. कारण निवडणूक आयोग मविआची यासंबंधीतली तक्रार तडकाफडकी फेटाळून लावणार ! तसे पाहता मविआ व इंडी आघाडीची माता सोनिया गांधी, युवराज राहूल गांधी  इतर होयबा नेतमंडळी व कार्यकर्ते, लिबरल पत्रकार संपादक व अभ्यासक इत्यादी मंडळीने आत्मपरिक्षण करणे आवश्यक आहे. पण आत्मपरीक्षण हा शब्दच मुळी  घराणेशाही पक्षांच्या शब्दकोशातच नाही.            
             
काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून सोनिया गांधीने हिंदू समाजाच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत, भगवा आतंकवादाचे खोटे-नाटे नॅरेशन जगभरात पसरविण्याची मोहीम राबविली तर दुसर्या बाजूस धर्मांध मुस्लिमांच्या दिवसागणिक वाढत जाणार्या मागण्यांची पुर्तता करू असे काँग्रेस प्रणित राष्ट्रीय स्तरावरील इंडी आघाडी व महाराष्ट्रातील मविआ च्या लेखी आश्वासनामूळे हिंदू समाज हळूहळू जागा होत आहे. जागा होत असलेल्या हिंदूना कुठल्या तरी भितीने ग्रासून ठेवण्याच्या क्लुप्त्या विरोधी पक्ष व त्यांचे समर्थक मिडीया व विचारवंत लढवित असतात. हे नित्याचे होऊन बसले आहे. 

युक्रेन व रशिया मधील सुरू असलेल्या युद्धात भारताची भूमिका लंगडी पडत आहे, तसेच इजराईल व इराण देशामधील युद्धात ही भारताची भूमिका सावध आहे, भारत कचाट्यात सापडला आहे, जागतिक स्तरावर भारत एकाकी पडला आहे, इत्यादी खोटे-नाटे नॅरेटिव जे घुमते आहे, त्यातून जनसामान्याचा संभ्रम वाढवयाचा, मग मोदी सरकारची लोकप्रियता कमी होत भारतात अराजक माजले जाईल असा प्रचार विरोधी पक्षांचे चमचे असलेला मिडीया हाऊसेस करीत आहेत. पण--

वस्तुस्थिती भितीदायक नाही उलट आपल्याला अभिमान वाटेल अशी आहे. भारत आर्थिक, सामरिक, उद्योगिक, व परराष्ट्रीय संबंधात इतका सक्षम झालेला आहे की अमेरिका, रशिया व चीन सारखे देश भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत करीत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात धाडसी तितके संयमी व लोकप्रिय नेते गणले जात आहेत.  हे जनसामान्यांना ठाऊक झाले आहे.  जगभरातील लिबरल विचारवंत, संपादक मंडळीं, सतत गोबेल्स तंत्राने  भारत सरकार, भाजपा, आणि हिंदु संस्कृतीच्या विरूद्ध नेगेटिव्ह नॅरेशन पसरवित असतात. हे जनसामान्यांना पक्के ठाऊक झाले आहे. पण बहुतांश हिंदु समाज बांधव आक्रमक किंवा रागाच्या भरात प्रतिक्रीया देत नाहीत. पण मतदान  'राष्ट्र प्रथम' याच भावनेने करीत असतो. त्यांमुळे लिबरल मंडळीच्या नेगेटिव्ह नॅरेशनस् दिवाळी संपल्यावर उरलेल्या फटाक्या सारखे फूसके बार ठरत आहेत.

आतापर्यंत मणीशंकर अय्यर, दिग्विजयसिंग व राहूल गांधीच्या वक्तव्याने भाजपाला प्रत्येक निवडणूकीत फायदा होत गेलेला आहे. बांगला देशात अराजक माजले व तेथील पंतप्रधानांना हद्दपार केले, तसेच काही तरी भारतात होईल असे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनी केलेले वक्तव्य  मविआ व इंडी आघाडीला अदृष्य स्वरूपात महाग पडले पण महायुतीला मोठी मदत देऊन गेले असे मला वाटते. कुठल्याही पक्षाच्या नेत्याने केलेलं वक्तव्य जर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या देशहिताला ठेंच पोहचणारे वाटते,  तेव्हा त्या नेत्याने देशद्रोह केला अशी सर्वसामान्यांची समजूत होते आणि ती खरी ही आहे. सलमान खुर्शिद यांना बांगला देशातल्या हिंदू समाजावर अत्याचार होत आहे या बद्दल   यत्किंचीत दया आली नाही. 

अमेरिका व पाक पुरस्कृत दशहतवाद्यांतर्फे मोदी सरकार उलथून पडावे अशी आशा सलमान खुर्शिद तसेच इंडीचे नेते मंडळी  मविआचे नेते - कार्यकर्ते, लिबरल पत्रकार-संपादक धरून बसतात. वर्षभर अभ्यास न करता काही विद्यार्थी IMP प्रश्नोत्तरांचा आधार घेतात तसेच मविआ व इंडी आणि प्रान्तीय पक्ष देशी-विदेशीच्या अभ्यासकांनी केलेले आयते नॅरेशन्सवर भर देतात. काही नॅरेशन्स ऑउट ऑफ डेट असतात. परीणाम  ' सपशेल नापास !'  शरद पवार, उद्धव ठाकरे व राहूल गांधी यांचा प्रवास मणीशंकर अय्यर यांच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. म्हणूनच निवडणूकांचा निकाल एकतर्फी लागला. महाराष्ट्रातल्या मतदारांनी कसलाही गवगवा न करता, (गनिमी काव्याने म्हणा हवे तर) मविआला सपशेल झिडकारले. 

निवडणूकीतला अनाकलनिय निकाल म्हणजे सारासार विचार करून, दृढ निश्चयाने, शांत चित्ताने, राष्ट्रहीत सर्वोच्च मानून धर्माच्या रक्षणासाठी जनतेने केलेलं मतदान होय. संघ परिवाराचा ' सजग रहो ' या इशाराला मतदारांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद आहे. आपण एखादे काम मनःपुर्वक करतो तेव्हा त्यात अद्भूत यश मिळते. हा सृष्टीचा नियम व एक वैशिष्ट्य आहे. याची जाण असुनही मविआचे नेतेमंडळी आपल्या धोरणात व वागण्यात बदल करणार नसतील तर काय म्हणावे ? एकच उत्तर आहे ते म्हणजे ' विनाशकाले विपरीत बुद्धी ! '

एखादी गोष्ट घडते, ती अनाकलनीय का वाटते या संबंधीचं एक सामान्य उदाहरण आपल्या समोर मांडतो. गेल्या आठवड्यात मी एका लग्न समारंभा साठी गावी गेलो होतो. दुसर्या दिवशी संध्याकाळी नालासोपारा ते बोरीवली कडे येणार्या रेल्वे गाडीने आलो. बोरीवली स्टेशनवर डब्यातून उतरलो. तेव्हा फ्लॅटफार्मवर एक -दोन नव्हे तब्बल आठ तिकीट इन्स्पेक्टर उतरणार्या प्रवाशाकडून टिकेट टिकेट असे म्हणत तपासणी करू लागले. मी तिकीट दाखविले आणि गम्मत पाहावी या हेतूने बाजूला उभा राहून पाहू लागलो. उतारू प्रवाशांपैकी सहा-सात जणांना विना तिकीट प्रवास करणार्यांना नियमानुसार ताब्यात घेतले. उतारूंची संख्या फार होती. त्यामानाने टिकीट इन्स्पेक्टरांची संख्या फार कमी होती. मी ब्रिजवरून चढत असतांना पुढे चालत असलेले आमच्या डब्यातले दोन उतारू' देवाची कृपा आपण वाचलो ' असे म्हणत असल्याचे ऐकले. विना तिकीट प्रवास करणारे काही प्रवासी अडकले तर काही अनायासे सुटले. हे असे का व्हावे ? मी माझ्या मनाशी प्रश्न विचारला. विना तिकीट प्रवास करणारे काही उतारू अडकले तर काही सुटले. सारं तर्कशास्त्र धुंडाळून पाहिले. उत्तर मिळाले नाही. 

शेवटी   Law of averages व Law of probability यांचाच आधार घेत माझ्या मनाची घालमेल थांबविली. या विश्वात सर्वात गूढ असे काय या प्रश्नावर विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांनी उत्तर दिले आहे-- 
'हे विश्वच !' जे उतारू पकडले गेले. त्यापैकी काही जण नेहमीच विना तिकीट प्रवास करणारे असू शकतात. त्यांच्यापैकी जे पकडले गेले त्यांना जे घडले ते अनाकलनीय वाटू शकते. तर काहींनी पुन्हा विना तिकीट प्रवास करायचा नाही असे ठरविले असेल. काही जण विना तिकीट प्रवास करणे सुरू ठेवतील. जे सुटले ते देवाची कृपा, नियती नशीब असे समजत असतील. मी ही लेखमालिका लिहावयास बसलो त्याच्या आदल्या दिवशी हा मला आलेला अनुभव आहे. थोडक्यात हेच की महायुतीच्या विजया संबंधीचे आकलन संपुर्णतया होईल आणि तंतोतंती भाष्य वा भाकीत कोणी ही करू शकत नाही. कारण मतदान हे फक्त बुद्धी स्तरावरून होत नसते. तिथे ही मनाला पंसत पडते त्या उमेदवाराला ते दिले जाते. प्रत्येक  क्षेत्रात मतभिन्नता असतेच त्यात नवल ते काय ? मग अशावेळी  ' करावे तसे भरावे ' हेच आपण म्हणतो आणि ऐकतो.

एकंदरीत जे अनाकलनिय घडले असे आपल्याला वाटते ते होणार होतेच. तो निसर्गाचा एक नियम असतो. अनाकलनिय घटना घडते तेव्हा त्यातील सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे क्रमप्राप्त असते. पण मविआचे नेते मंडळी एवीएम मशीनवर पर्यायाने निवडणूक आयोग, केंद्र सरकार वर टिका करीत आहे. विरोधी पक्षांचे असे रडगाणं न्यायालयात टिकले नव्हते. याचा अनुभव त्यांना आला आहेच. निवडणूक आयोगा समोर असलेली मविआ वा इंडी ची याचिका असो वा ठराव सपशेल धुडकावले जाणार हे निश्चीत. अन्याय करणारे, धातांत खोटे बोलणारे इत्यादींना सहानुभूती मिळत नसते. थोडीफार क्वचीत मिळेल पण सतत मिळत नसते. खोटे बोलणार्यांचे, अन्याय करणार्यांचे पाय सतत चिखलात रूतत जातात. नंतर सत्यानाश ओढवतो मग ते क्षेत्र कोणते ही असो. 
                              क्रमशः---

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

त्रिपुरात अफवा पण महाराष्ट्रात धुडघुस कसा ? (भाग-२)



वाचक हो, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार मध्ये जे दंद्व माजले आहे, त्याचे स्वरूप मला जसे दिसले, भासले त्यातून जे आकलन झाले, ते मी या लेखाच्या भाग १ मध्ये मांडले आहे. ही मांडणी म्हणजे मी दावा मांडला आहे असे नाही. ही घटना गंभीर स्वरूपाची आहे. या घटनेवरील राजकारण संपणार नाही. त्यामूळे या विषयावर चर्चा ही सुरू राहणार आहे. म्हणून या घटनेचा भौगोलिक तसेच निसर्ग नियम, मानसशास्त्र आणि सामान्य ज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहाता आपल्या हाती काय लागते यावर चर्चा करू या.

त्रिपुरात मशीदी जाळल्या, मुस्लीम बांधवांवर हल्ले झाले ही अफवा नसून सत्य घटना आहे असे  आपण मानले तरी फक्त महाराष्ट्रातच दंगली कशा झाल्या हा प्रश्न शिल्लकच राहातो. त्रिपुरा देशाच्या ईशान्या टोकाला आणि महाराष्ट्र देशाच्या पश्चीम टोकाला  म्हणजे जवळपास त्रिपुरा राज्याच्या अगदी विरूद्ध दिशेला.  त्सुनामी, अतिवृष्टी, भुकंप, इत्यादी नैसर्गिक आपत्तीत जी राज्यें एकमेकांच्या शेजारी आहेत, ती राज्यें कमी अधिक प्रमाणात सापडली जातात हा आपला अनुभव आहे. We are all governed by the Laws of Nature.  अग्नी, पाणी, प्रकाश, आणि वायु ही पंचमहाभूतापैकी चार. ही चार महाभूते प्रवाही आहेत आणि पाचवं आकाश नावाचं पंचमहाभूत हे एक माध्यम हे वैज्ञानिक आणि शाश्वत सत्य आणि आपण प्रत्यक्ष अनुभवतो. मानवी शरीर ही पंचमहाभूतांनी बनलेले असते. त्यामूळे मानवी मन जात्याच प्रवाही असते. मानव जेव्हा सुरक्षा तसे एकमेकांच्या अडचणीच्या काळात मदत होईल या कारणाने समुहात राहू लागला, तेव्हा त्या तशा समुहाला  समाजाचं स्वरूप मिळालं. सामन्यतः समाज प्रवाह पतीत असतो. कपड्याच्या दुकानात किंवा चप्पलाच्या दुकांनात ' सेल, ४० टक्के सूट ' अशी पाटी झळकली की त्या दुकानात लोकांची तुबंड गर्दी आपण पाहातो. दंगल करण्याचा किंवा अफवा पसरविण्याचा उगम आपल्या मनात होतो. त्यामूळे दंगली सारख्या घटना ज्या राज्यात प्रथम होतात तेथून त्या शेजारील दुसर्या राज्यात, पुढे दुसर्या राज्याच्या शेजारील राज्यात म्हणजे तिसर्या राज्यात पसरत जातात. यातुनच तर ' दंगलीचे लोण ' असा शब्दप्रयोग आपण व्यवहारात वापरत असतो.  याचा अर्थ त्रिपुरा येथे जर दंगल झाली असती तर त्याची झळ शेजारील राज्यांना पोहचली असती. म्हणजे दंगलीचे लोण प्रथम त्रिपुरा राज्याच्या शेजारील राज्यात पोहचायला हवे होते की नाही. तसे घडले नाही. म्हणजेच त्रिपुरात ना दंगली झाल्या ना मशीदी जाळल्या गेल्या हेच सत्य असावे.

आता सामान्य ज्ञान काय सांगते ते पाहू या.  सर्वसाधारणतः आपल्या नात्यातील वा परिचयातील एखाद्या युवकाच्या अकस्मात मृत्युची बातमी आली की आपण ती बातमी खरी आहे की नाही याची खातरजमा करून घेतो की नाही? त्रिपूरात खरोखरीच मशीदी पाडल्या आहेत का, मुस्लीम बांधवांवर हल्ले झाले आहेत का याची खातरजमा रजा ॲकॅडेमीने केली होती का? समजा तशी खातरजमा रजा ॲकेडेमीने केली असती तर सत्यस्थिती कळली असती. जर त्रिपुरात दंगल झाली असती तर रजा ॲकेडमी सारखी संस्था जिचे ऑफीस मुंबईत आहे आणि ती मुस्लीम समाजाच्या फतवा काढण्याइतकी सक्षम आणि सर्वोच्च संस्या नसताना ती दंगलीची सुरूवात कशी करेल ? आणि महाराष्ट्रात सुरूवात का म्हणून करेल? त्रिपुरात दंगल झाली असतीच तर  मुस्लीम समाजाच्या सर्वोच्च संस्थेने फतवा काढून या दंगलीची सुरूवात महाराष्ट्रात करण्याऐवजी, जिथे पुढील तीन महिन्यानंतर निवडणूका आहेत अशा उत्तर प्रदेश मध्ये केली असती की नाही ? वाचक हो आपल्या देशात झालेल्या धार्मिक दंगलीच्या इतिहासाच्या आधारे हे मी मांडले आहे.

आता आपण सामान्य ज्ञानाच्या दुसर्या कोनातून पाहू या. जर का रजा ॲकेडेमीने त्रिपुरात झालेल्या दंगलीची खातरजमा केली नसेल तर तिने आपली स्वाभाविक वृत्ती ठेचली असेल असे मानावे लागेल (कारण खातरजमा करणे ही सहज प्रवृत्ती.) पण तसे संभवत नाही. कारण स्वाभाविक वृत्ती वा प्रवृत्ती सहजा सहजी ठेचून काढता येत नाही. स्वाभाविक प्रवृत्ती वा विकृती म्हणा  इत्यादीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रचंड तपस्या लागते. ती शक्ती आपल्या येथील फक्त अध्यात्मिक गुरू आणि संत-महंतानी प्राप्त केलेली आहे. रजा ॲकेडेमी ही तशी सामान्य संस्था पण  शिक्षण आणि सेवा संस्था असल्यामूळे तिच्यात थोडा तरी चांगूलपणा टिकणारच. म्हणजे तिने थोडी फार का असेना, पण त्रिपुरात खरोखरीच दंगल झाली आहे का? खातलजमा केली असती आणि दंगल झाली असती तर दंगल करण्यासाठी रजा ॲकेडमी नसतीच, आणि दंगलीचं ठिकाण ही महाराष्ट्रीतील मुस्लीम बाहूल जिल्हे नसते. याचा अर्थ असा आहे की त्रिपुरात मशीदी नष्ट केल्या, मुस्लीम बांधवांवर हल्ले केले ही अफवाच होती.  त्यामूळे रजा ऑकेडेमीला अफवाची खातरजमा करून घेण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. त्यामूळे अगोदर ठरल्याप्रमाणे महाराष्ट्रात रजा ॲकेडेमी तर्फे मोर्चा, बंद, दगडफेक आणि हिंदु बांधवांवर हल्ले झाले आहेत. ते काम रजा ॲकेडेमीने पार पडले असावे. कारण त्या संस्थाने आपले नाक नाही त्या ठिकाणी खुपसून मोर्चा काढून जवळपास तीन वेळा महाराष्ट्रात  हिंसाचार आणि फोडतोड केली आहे. यावरून हे सारे प्रकरण भाजपा विरोधी पक्षांनी रचलेले एक कारस्थान आहे याबाबत दुमत नसावे असे मला वाटते.

या कारस्थानाच्या पाठीमागे  एकूण चार हेतू असावेत. ते खालील प्रमाणे आहेत --
१)  किसान आंदोलनातील हवा कधीच संपली आहे. त्यामूळे भाजपा शासीत एखादं राज्य बरखास्त करण्याची मागणी साठी कारस्थान करावे लागणार होते. त्यात त्रिपुरा राज्याची निवड केली आणि आगामी काळात जास्तीत जास्त विरोधी पक्षांना सामील करून बंद, मोर्चे इत्यादी नाटकांच्या संयुक्त कवायती करण्याची योजना तयार करणे.   

२) महाराष्ट्रातील मविआ सरकाराच्या  दुष्कृत्यांमूळे इभ्रतेचे जे धिंडवडे उडाले आहेत त्यावरून मराठी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा हा प्रयत्न आहे. 

३) दोन विदेशी शक्तीच्या लाॅब्यांचा एकत्रित उपयोग करून घेण्याची एक छोटीसी लिटमस टेस्ट यशस्वी करणें.

४)महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्याचा जो प्रयोग उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केला आहे त्यात काॅग्रेस पक्षाला गौण स्थान दिल्याने काॅग्रेसजन अगदी राहूल गांधी पासून ते महाराष्ट्रातील गाव पातळी पर्यंत नाराज आहेत. त्यासाठी एखादी सांप्रादायिक घटना, भाजपाने घडविली आहे असे भासवून भाजपाशी लढत देण्यासाठी एकत्र राहीले पाहीजे  ही जाणीव काॅग्रेसला करून देणे.

वरील पैकी चौथ्या हेतू ची कल्पना काॅग्रेसला दिली नसली तरी त्या पाठीमागील कारस्थानाची कल्पना काॅग्रेसने हेरली नसेल इतके काॅग्रेसचे श्रेष्ठी खुळे नाहीत. शेवटी काॅग्रेसच भाजपा सोडून सर्व विरोधी पक्षांची आई आणि बाप आहे. यातील बाप हा शब्द काॅग्रेसच्या राजकारणाच्या दृष्टीने अधिक उचीत ठरतो. पण हे कारस्थान तर घडले आहेच त्यामूळे  काॅग्रेसला त्रिपुरा सरकार विरूद्धच्या लढ्यात सामील व्हावे लागणार आहे तसेच महाराष्ट्रात ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत भाजपा विरूद्ध आखलेल्या टिका सिरीज मध्ये भाग घ्यावा लागेल. कारण मामला आहे हिंदू-मुस्लीमाचा. वस्तुतः मुस्लीम मतपेटीचा. म्हणजे तथाकथित पुरोगामी विरोधी पक्षांतर्गत स्पर्धेचा.

एकंदरीत या चर्चेअंती  त्रिपूरा आणि महाराष्ट्रात जे कटकारस्थान रचले त्या पाठीमागील मास्टर माईन्ड शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेस हे पक्ष आहेत हा निष्कर्ष निघतो. याचे कारण असे आहे की त्रिपुरात दंगल पेटविण्याची यांच्यात धमक नाही. म्हणून तिथे ऑन लाईन वरून अफवा सोडून देण्याचे कार्य उरकले. आणि महाराष्ट्रात दंगल घडविली. कारण भारतातल्या सर्व विरोधी पक्षात  शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेसचे अस्तित्व पणाला लागले आहे. दंगलीचे स्वरूप  ही असे ठेवले होते की दंगलीची चौकशी आपल्या राज्याच्या गृहखात्यापर्यंत सिमीत राहील. या पाठीमागचे खरें कारण म्हणजे आगीशी खेळ करताना या दोन्ही पक्षांचे हात-पाय पोळून निघाले आहेत. त्यातच या दोन्ही पक्षांतील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारांची प्रकरणे बाहेर आली आहेत.  विद्यमान मविआ सरकारच्या काळात काॅग्रेसच्या एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. म्हणून ज्या मराठी मतदारांना भाजपाला मते द्यावयाची नाहीत त्यांच्यासाठी काॅग्रेस हा ऑप्शन चांगला आणि पसंतीचा होऊ शकतो. याच भितीमूळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची झोप उडाली आहे. एकदा खोटे बोलले की पुढे शंभर वेळा खोटे बोलावे लागते. तसेच  एक कारस्थान केले की शंभर कारस्थान करावे लागतात. उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकामागोमाग कारस्थाने करीत चालले आहेत. पण त्यासाठी शक्ती फक्त या दोन्ही पक्षांचीच खर्च होत आहे. म्हणून  विरोधी पक्षांची आघाडी व्हावी असे शरद पवार काल म्हणाले आहेत आणि त्यांचीच री संजय राऊत ओढत आहेत आता त्यांच्या कपाळी हीच पाळी आली आहे.  शरद पवारांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न नुसते भंगलेच नाही तर ते आता मोडून तुटून नवाब मलिकांच्या भंगारखान्यात जमा झाले आहे. तर उद्धव ठाकरेंना आपल्याच घरातील पितृस्वरूप वाघाची डरकाळी ऐकू येत नाही. कारण २०१९ च्या निवडणूका जाहीर झाल्यापासून त्यांच्या दोन्ही कानात सतत शरद पवार गुणगुणत आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे असे काही चक्रव्युहात अडकले आहेत की यांची अवस्था उत्तर प्रदेश मध्ये सपा आणि बसपाची झाली आहे तशीच होणार आहे, तर मविआ सरकारातील यांचा घटक पक्ष काॅग्रेसला महाराष्ट्रात उभारी मिळेल असे स्पष्ट दिसू लागले आहे.

बाकी महाराष्ट्रातील या दंगलीतील  दोषींचा तपास, आरोपींची निश्चिती करून एफआयआर नोंदणे नंतर न्यायालयात खटला उभा राहणे इत्यादी गोष्टीसाठी एक वर्षाहून अधिक काळ जाणार आहे ही बाब आपल्याला अंगवळणी पडली आहे. पण त्रिपुरा सरकार मात्र अफवा मागील सत्य शोधण्याचा कसून प्रयत्न करणार आणि त्यात विदेशी शक्तीचा हात सापडला तर महाराष्ट्रातील दंगलीचा तपास एनआयए या केंद्रीय एजन्सीकडे जाईल. तेव्हाच कदाचीत महाराष्ट्र सरकार बरखास्त झालेले दिसेल. कारण मोदी सरकारने  कृषी बिलें मागे घेऊन विरोधी पक्षांना निष्प्रभ केल्याची बातमी या लेखाची (भाग २) समाप्ती करतेवेळीच आली आहे. त्यावर चर्चा पुढच्या भेटीत करू या.

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...