सामान्यतः डाॅक्टराचा पुत्र डाॅक्टर होत असतो. इजिनीयरचा मुलगा इंजिनियर बनतो. प्रत्येकाचा व्यवसाय हा त्या घराचा कर्ता पुरूष किंवा कर्ती स्त्री पासून दुसर्या पिढीला मिळत असतो. असे असले तरी विद्यार्थी वर्गाला शाळेचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी शाळेतील शिक्षकांचा आधार लागतोच. ब्रिटीश राजवटीत आपली पुर्वीची शिक्षण व्यवस्था म्हणजे गुरूकूल व्यवस्था संपुर्णतः मोडीत काढली गेली. त्यामूळे शिक्षण देण्यासाठी शाळा उघडण्यात आल्या; शिक्षण देण्यासाठी शिक्षक नावाचा वर्ग निर्माण करण्यात आला. असे असले तरी गुरू-शिष्य परंपरा आज तागायात टिकून राहिली आहे. याचे श्रेय शिक्षक वर्गाला जाते. प्रश्न असा आहे की गुरू- शिष्य परंपरा अबाधित असतांना शिक्षक दिन साजरा करण्याची प्रथा सुरू का झाली, प्रत्थेक वर्षात ५ सप्टेंबर लाच शिक्षक दिन का पाळला जातो याची कारणें काय आहेत? यावर चर्चा करू या.
काळानुसार मानवी जीवनातल्या प्रत्येक व्यवस्थेत बदल होत असतो. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. गती हा या युगाचा मंत्र आहे. विद्येचे स्वरूप ही बदलेलं आहे. विद्येचं बदलेल्या स्वरूपाचे प्रशिक्षण शिक्षक वर्गाला दिले जाते. असे असले तरी वैदिक काळापासून सुरू झालेली प्राचीन शिक्षण व्यवस्था ब्रिटीश सरकारने मूळासकट उखडून काढल्यामूळे, तसेच नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्यामुळे देशात कारकून निर्माण होत गेले. तरीही ब्रिटीश राजवटीला खिळखिळी करण्यात अनेक देशभक्तांना यश मिळत गेले. कोणी अहिंसा व सत्याग्रह या शस्त्राच्या साह्याने ब्रिटीश राजवटीशी झूंज दिली तर कोणी हातात शस्त्रे घेऊन ब्रिटीश सरकारच्या अधिकारी वर्गाला यमसदनास पाठविले.
एक तिसरा वर्ग असा होता की त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर इंग्रज राजवटीला धक्के दिले. या तिसर्या वर्गात बहुतांशी शिक्षक वर्ग होता. या मार्गावर असलेल्या अनेक थोर पुरूषांनी आपल्या प्राचीन संस्कृतील साहित्य व ज्ञान भांडारचा अभ्यास करीत आपले धर्मग्रंथ व आपल्या संस्कृतीचा प्रसार जगभर केला. या तिसर्या वर्गात अग्रणी स्थानावर स्वामी विवेकानंद होते. स्वामी विवेकानंद च्या पश्चात जगभरात आपल्या संस्कृतीचा प्रसार करण्याचे शिवधनुष्य लिलयाने पेलविले असे अध्यात्मिक गुरू म्हणजे डाॅ राधाकृष्णन. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वर्णन शब्दात मांडणे मला अशक्य होत आहे. मी इथे हिंदी पुस्तकात वाचलेले एक वाक्य मला आठवले ते असे आहे ' व्यक्तीत्वकी भी एक पहचान होती है , वह बिना शब्द और बिना भाषासे दुसरोंके अंतरमनको छू लेता है |
शिक्षक दिवस हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे. शिक्षक दिवस साजरा करण्याची कल्पना एकोणीसाव्या शतकात अनेक देशांमध्ये रूजली. बहुतांशी स्थानिक शिक्षक किंवा शिक्षण क्षेत्रातील महत्वाचा टप्प्यावर योगदान दिले आहे अशा व्यक्तीचा सत्कार होतो. अनेक आंतरराष्ट्रीय दिवसापेक्षा हा दिवस अनेक देशात वेगवेगळ्या तारखेला होतो. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन ५ ऑक्टोबरला साजरा होतो. तर आपल्या देशात डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवशी म्हणजे ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होतो.
डाॅ राधाकृष्णन यांचा जन्मदिवस कसा शिक्षक दिन साजरा होऊ लागला, याची एक छोटीसी कथा आहे. सन १९६२ ला डाॅ राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांचे काही विद्यार्थी त्यांना भेटावयास गेले. त्यांनी ५ सप्टेंबरला डाॅ राधाकृष्णनचा दिमाखदार वाढदिवस साजरा करण्यासाठी परवानगी मागितली. तेव्हा डाॅक्टर राधाकृष्णन यांनी नम्रतेने नकार दिला. स्वतः शिक्षक असल्यामूळे देशातील तमाम शिक्षकांचा तसाच शिक्षण व्यवस्थेचं कौतूक व्हावे ही इच्छा प्रगट करून विद्यार्थ्यांना ५ सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा करण्यास सांगितले. त्यांच्या विद्यार्थ्यांचे समाधान झाले. तेव्हापासून ५ सप्टेंबरचा दिवस शिक्षक दिवस साजरा होऊ लागला.
एक महान तत्वज्ञानी, सनातन संस्कृतीचे गाढे अभ्यासक, युनेस्कोचे माजी चेअरमन, बनारस हिंदु विद्यापिठाचे कुलगुरू, भारतीय संविधान समितीचे सदस्य, पहिल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष, स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यवीर सावरकारांना आपले आदर्श मानणारे अलौकीक विद्वान, ऑक्सफोर्ड विद्यालयात प्राचार्य, तल्लक बुद्धी व स्मरणशक्ती दैवाजात प्राप्त झालेले महान विद्यार्थी व शिक्षक, फिलासाॅफी ऑफ रविंद्रनाथ टागोर, इथीक ऑफ वेंदात, दि रेगीन इन रिलीजन कन्टेमपररी अशा ग्रंथाचे महान लेखक, छोट्या छोट्या कथातून सनातन संस्कृतीचे दर्शन घडविणारे दशसहस्त्रेषू वक्ता, अमेरिका व युरोपमध्ये लोकप्रिय हिंदू नेता, पाश्चात्य व सनातन संस्कृतीचे खंदे समन्वयक आणि ----
आचारः परम धर्मं |
विद्या विनयेन शोभते |
विद्या सर्वत्र पुज्यते |
सा विद्या या विमुक्तये |
वसुधैव कुटुम्बकम् |
इत्यादी सनातन संस्कृतीचे बोधवचने आपल्या आचरणात आणली अशा सनातनी अवतारी महापुरूषास माझे कोटी कोटी प्रणाम |