सन २०१४ ला केंद्रात मोदी सरकार विराजमान झाल्यानंतर लिबरल पत्रकार-संपादक मंडळींचा मतदारांवर प्रभाव हळुहळू कमी होऊ लागला आहे. परंतु तो प्रभाव संपला आहे असे म्हणता येत नाही. याचे पहिले कारण लिबरल राजकीय अभ्यासक ही जगभर पसरलेली एक मोठी शक्ती आहे. तसेच तिच्या प्रसार आणि प्रचाराचं (बुद्धी भ्रम करण्याचं) नेटवर्क प्रचंड आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे जगभरच्या सर्व श्रीमंत मंडळीचं प्रचंड आर्थिक पाठबळ तिच्या पाठिशी आहे. दुसरे कारण हे आहे की आपल्या देशात द्विपक्षीय लोकशाही नाही. भाषावार प्रान्त रचना आहे. या प्रान्त रचनेचा उपयोग लिबरल अभ्यासकांची लॉबी देशात फितुरी वाढण्यासाठी करते. तिसरे कारण आपल्या देशात बाराशे वर्ष इस्लाम आणि ख्रिचनांचे राज्य होते. त्या काळात आपल्या देशातील हिंदुचे जबरदस्तीने धर्मांतर केले आहे. याची आठवण त्या दोन्ही समाजातील काही लोकांना अजुनही आहे. केवळ आठवणच नाही तर त्या इतिहासाची पुनरावृत्ती भारतात होऊ शकते या भावनेने ते पछाडलेले असु शकतात. तिच मंडळी या लिबरल लॉबीत ही आहे. म्हणून लिबरल लॉबीचा प्रभाव आज ही शिल्लक आहे.
कुठल्यातरी एका लेखात मी म्हटले आहे की माय, मायबोली आणि मायभूमी सर्वांना प्रिय असते. साहित्याचे सर्व प्रकार आपण मायबोलीतून वाचत असतो आणि ऐकत असतो. त्यातूनच मानवी जीवनाचे खरे प्रयोजन काय आहे हे आपण आपल्या कुवतेनुसार समजत असतो. भाषावार प्रान्त रचनेचा हेतू चांगला होता आणि आहे. परंतु आपल्या येथील राजकारणी लोकांना प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून बघण्याची सवय आहे. प्रान्तीय अस्मितेला खत-पाणी घालण्याचे काम सर्वाधिक पक्ष इंडी नावाच्या आघाडीत आहेत. या पक्षांच्या आतापर्यंतच्या प्रान्तीय आणि राष्ट्रीय पातळीवरील राजवटीला जनता कंटाळलेली आहे. याची साक्ष सन १९९१ ते १९९८ तसेच सन २००४ ते २०१४ यूपीए सरकारची कामगिरी देते. सन २०१४ पासून 'सबका साथ सबका विकास' या टॅग लाईनचा विजय का होतो आहे याची कारणें दोन प्रकारची आहेत. एक सकारात्मक आहे. ते म्हणजे भाजपाचे ब्रिद वाक्य ' राष्ट्रहित सर्वोच्च ' असे आहे. त्याची प्रचिती जनतेला वाजपेयी सरकारच्या काळात आली आणि मोदी सरकारच्या काळात पदोपदी येत आहे. दुसरे कारण युपीए सारखे सरकार नकोच अशी मतदारांची भावना आहे. भाजपा सरकाराच्या कामगिरीचा आढावा इथे मांडणे गरजेचे नाही. त्या पलिकडे जाऊन लक्षात येते की भारतीय मतदार परराष्ट्र आणि संरक्षण खात्यासंबंधीचे धोरण, दशहतवादाचा नायनाट करण्यासाठी आक्रमक धोरण आणि बहुसंख्याक समूहाच्या भावनेची कदर भाजपा सरकार घेत असल्यामुळे जनतेचा विश्वास वाढू लागला.
सन २०१४ पासून केंद्र सरकारने पद्मश्री, पद्मभूषण इत्यादी पुरस्कार दिलेली यादी पाहिली तर त्यात ना कुठेही पक्षपातीपणा दिसला ना वशीलाबाजी दिसली. केवळ गुणवत्तेच्या कसोटीवरून हे पुरस्कार दिले आहेत. हे कारण दिसायला छोटसं वाटत असले तरी जशी एक छोटी पणतीची ज्योत संपुर्ण खोली दाही दिशातून उजळ करून टाकते, त्याच प्रकारे देशाच्या कानाकोपर्यात दुर्लक्षीत गेलेल्या देशबांधवांना 'आपल्यात असलेल्या गुणवत्तेचं चीज होत आहे, सरकार आपले आहे ' अशा तेजस्वी भावनेने देश उजळ होत आहे. पुरस्कारपात्र व्यक्तींना आणि त्यांच्या प्रान्तातील समाजबांधव व भगिनींच्या हृदयातील या पवित्र भावनेचं मुर्तीमंत दर्शन पुरस्कार सोहळ्यातून टिव्हीच्या माध्यमातून आपण सन २०१४ पासून दर वर्षी पाहात आहोत. मोदी सरकारचे हे कार्य देशात एकात्मता वाढविण्याचे कार्य करते. म्हणून मोदी सरकारला जनतेचा पाठींबा मिळतो आहे. त्यातून लिबरल लॉबीची स्थिती छोटे छोटे भूकंपाचे हादरे बसल्यानंतर जसे घराच्या भितींना तडे जातात तशी होत आहे. ही लिबरल लॉबी आपले बंधु आणि भगिनीं आहेत. मला मनापासून वाटते की या लॉबीने आपला पराभव होत आहे याचे शल्य मनातून काढून टाकावे. आपली वाट चुकली आहे, आपण कुठेतरी भरकटत आहोत याची जाणीव होऊन सांस्कृतिक राष्ट्रवादाचा स्विकार त्यांनी केला तर देशात खरीखुरी द्विपक्षीय लोकशाही आकारास येऊ शकते. पण--
बहुतांश प्रान्तीय पक्षांच्या राजवटीचा कारभार भ्रष्टाचाराने ओलाचिंब झालेला आपण पाहातो. भ्रष्टाचार करण्यात प्रान्तीय पक्षांचे मुख्यमंत्री आणि इतर प्रमुख खात्याचे मंत्री महोदयांच्या परिवारातील सदस्य आणि नातलग अग्रणी स्थानावर दिसतात. तरीही प्रान्तीय पक्षांना त्या प्रान्ताच्या विधानसभेच्या निवडणूकात विजय मिळतो. याचे कारण प्रान्तीय पक्षांनी एक नवीन शक्कल अंमलात आणली आहे. ती म्हणजे केंद्र सरकार आम्हाला हक्काचा निधी देत नाही असा सतत आरोप करण्याची. केंद्र सरकार आपल्यावर अन्याय करते अशी टेप सतत ऐकावयास आली की मतदारांची चलबिचल होत असते. आपले मन, बुद्धी आणि दृष्टी हे इंद्रियें प्रवाही आहेत. म्हणून प्रान्तीय पक्षांना मतें मिळतात. दुसरे कारण असे आहे की तिसर्या आणि चौथ्या पातळीवरील प्रान्तीय पक्षांच्या नेतेमंडळीचा आणि नातलगाचाही भ्रष्टाचारात हिस्सा असतोच की. यालाच डीजिटल भाषेत नेटवर्क म्हणतात. कुमार केतकर आणि इतर लिबरल पत्रकार आणि संपादकीय मंडळींची मन, बुद्धी आणि दृष्टी जागतिक डाव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या आधीन झालेली आहे. जगातील विशेषतः बड्या देशांत उजव्या विचारसरणीचा प्रभाव असला तरी भारताचा विकास तिथल्या काही वर्गाच्या नाकात झुबंतो आहे. त्यामुळे ही मंडळी त्यांच्या देशातील मिडीया भारतातील राजकीय व सामाजिक स्थितीसंबंधी फेक बातम्या देत आहेत त्याबद्दल तेथील सत्ताधारी पक्ष कोणताही असो तो नरो वा कुंजरो ची भूमिका घेत असतो. दुसर्या महायुद्धात नाझी पक्षात एखादे असत्य कसे सत्य आहे हे दाखविण्याची यंत्रणा हिटलरचे खास विश्वासु गोबेल्स यांच्याकडे होते. तशीच यंत्रणा अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साधनांचा वापर करून अधिक वेगाची, अधिक व्याप्तीची जगातील बडी राष्ट्रे व तेथील काही मिडीया वर्ग वापरत आहेत. दुर्देवाने आपल्या येथील विरोधी पक्षांचे नेतेमंडळी आणि त्यांची समर्थक मिडीया आणि राजकीय अभ्यासक मंडळी ही सर्व बड्या राष्ट्रांच्या आधीन गेली आहे. त्या काळात गोबेल्सची शीं थूं करणार्या मंडळीचे वंजश आज गोबेल्स पेक्षाही मानवजातीला अधिक धोकादायक ठरत आहेत.
आपल्या देशातील लिबरल मंडळीचे असेच उद्योग सुरू असतात. त्याच्यांशी भाजपा ठकास महाठक अशी टक्कर देत आहे. म्हणूनच विरोधी पक्ष प्रथम अटलबिहारी वाजपेयींचे कौतुक करीत असत आणि लालकृष्ण अडवाणींना खलनायक बनवित असत. मोदींचा उदय झाल्यावर अडवाणींची स्तुती करू लागले आहेत आणि मोदींना खलनायक मानत आहेत. अधून मधून ही लिबरल मंडळी नितीन गडकरी नाराज असल्याच्या फेक विडीओ पसरवितात. पण नितीनजी गडकरी संसदेत लिबरल मंडळींची आपल्या खास शैलीत हजेरी घेतात.
भाजपा सर्वच राज्यात आपली ताकद वाढवित आहे. दक्षिणेकडील राज्यात वाढीचा वेग संथ आहे हे मान्य आहे. पण त्यातून भाजपा राष्ट्रीय पक्ष नाही अशी टिका करण्यात काही अर्थ नाही. कुमार केतकरांना समाधान मिळत असेल तर ते त्यांनी घ्यावे. त्यांचे मन ही त्यांची मालमत्ता आहे. पण इंदिरा गांधीनी जनता पार्टीचे सरकार असताना कर्नाटकातील चिटमंगुळर मधून पोट निवडणूक लढविली पण उत्तर भारतातील राज्यातुन पोटनिवडणूक का लढविली नाही ? त्यावेळी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष नव्हता असे जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याने किंवा जनता पार्टीच्या समर्थक पत्रकाराने म्हटले नव्हते. नंतर जनता पार्टीचे सरकार डाव्या लॉबीनेच पाडले. देशाचे दुसरे पंतप्रधान लाला बहादूर शास्त्रींजींचे अकस्मात निधन झाल्यानंतर इंदिराजी स्वतः पंतप्रधान झाल्या ते ही भारतीय काँग्रेस पक्षात अस्तित्वात असलेली रशिया पुरस्कृत तरूण तुर्क नावाच्या लॉबी मुळे. दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींचे रशियात अकस्मातपणे निधन झाले, त्यासंबंधी संशयाचे बोट डाव्या लॉबीकडे आज ही जात आहे. काळ बदलत गेला. आर्थिक उदारीकरण आणि जागतिककरणामुळे राजकारणात ' यह पैसा बोलता है ' हे युग आले. नेहरू-गांधी घराण्याकडे काँग्रेसची तिजोरी होती. त्यामुळे त्या घराण्याची दादागिरी वाढू लागली. त्यामूळे प्रत्येक राज्यातील काॅग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतंत्र पक्ष स्थापन केले. काँग्रेस विकलांग होत गेली. ही वस्तुस्थिती आहे. हे एसी मध्यें बसलेल्या लिबरल राजकीय अभ्यासकांना कसे कळणार हो ? काॅग्रेस पक्षाचा ज्यांना फार लळा लागला आहे, तीच पत्रकार-संपादक मंडळी इतर विरोधी पक्षांना विशेषतः प्रान्तीय पक्षांना काॅग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे अशी इच्छा प्रगट करतात. त्या प्रान्तीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ही राजकीय अभ्यासक मंडळी एक शब्द ही बोलत नाहीत. त्यामुळे त्या नेत्यांची प्रान्तीय अस्मिता एक प्रकारे कवच कुंडली बनली आहेत. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे.
" पंजाब, सिंध, गुजरात, मराठा
द्राविड, उत्कल, बंग
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा
उच्छल जलधितरंग
तव शुभ नाम जागे,
तव शुभ आशिस मागे
गाहे तव जयगाथा " देशाच्या राष्ट्रगीतातील या ओव्या गात असतांना देशभक्तीची ज्योत आपल्या शरीराच्या प्रत्येक नसानसातून तेवत असते. लिबरल मंडळी, प्रान्तीय पक्ष आणि विरोधी पक्ष केवळ सत्तेच्या आणि पैशाच्या लालसेने धोकादायक राजकारण खेळत ती भक्तीज्योत आपली लेखणी, वाचा व फुंकरेच्या साह्याने मालविण्याचे प्रयत्न करीत असतात. पण त्यांना यश मिळणार नाही. कोरोना नंतर World Order बदलत असल्याचे दिसू लागले आहे. आपल्या देशातला मतदार राजा जागा होत आहे. हळूहळू का होईना Nation First ही भावना मूळ धरत आहे. काळाच्या ओघात लिबरल लाॅबी अस्तगत होईल. विरोधी पक्षांना ही बहुसंख्याकांचा अनादार करीत राजकारण परवडणारे नाही याची जाणीव थोड्या प्रमाणात का होईना होत आहे. दुसरे असे आहे की मोदी सरकारने काही निर्णय असे घेतले आहेत की ते राष्ट्रहिताचे आहेतच शिवाय देशातील कुठल्याही वर्गाचा अनादर न करता ते घेतले आहेत. पुढे भविष्यात विरोधी पक्ष सत्तेवर आले तरी त्यांना ते रद्द करता येणार नाहीत. हे ही विरोधी पक्षांना ठाऊक आहे. पण राजकारण हे असे क्षेत्र आहे की एखाद्या विषया संबंधीत अमूक एक भूमिका घेतली की ती भूमिकाच आपल्याला एखाद्या अजगारासारखे वेष्टून धरते. त्यातून मग आपली सूटका होत नसते. भाजपाच्या विरोधी पक्षांची स्थिती अशीच झाली आहे. सध्या अयोध्येतील रामजन्मभूमीवर रामललाच्या प्रतिष्ठान सोहळ्याबाबत देशातील जनतेत उत्साह आहे. रामजन्मभूमी संबंधीतल्या खटल्यात न्यायालयाचा निर्णय मान्य केल्यानंतर विरोधी पक्षांनी मोदी सरकारशी स्वतःहून पुढाकार घेऊन सहकार्य केले असते तर त्यांचे भाजपाच्या समर्थकांनी सुद्धा अभिनंदन केले असते. देशातील राजकारणाला एक नवी दिशा देण्याचे श्रेय विरोधी पक्ष गमावून बसले आहेत. निदान विरोधी पक्षांनी रामभक्तांच्या उत्साहवर विरजण टाकण्यासारखे भाष्य वा कृती करू नये अशी अपेक्षा करून ही लेखमालिका इथे संपवितो. आपल्या सर्वांना इंग्रजी कॅलेन्डरच्या नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
|| वन्दे मातरम ||
आपल्या, पुनर्लिखित ३ र्या भागांतल लिबरल/ विरोधी लाॅबीवरील विश्लेषण हे सर्वांगी, सखोल व अचुक आहे.
उत्तर द्याहटवाया लाॅबीज्, कथित विचारवंत- लिबरल- डावे- भाडोत्री- मोदीद्वेष्टे व यांत आणखी एक जमात आहे, मुख्यत: हिंदुच, जे स्वयंघोषित अती शहाणे- विघ्न संतोषी, जे आसपास सर्वत्र आढळतात-
सध्या दुप्पट वेगांत कार्यरत आहेत, सर्व हातखंडे, जातीभेद- जातीगत जनगणना- भाषाभेद- प्रांत भेद- दक्षिण उत्तर- बिनबुडाचे तकलादु आरोप ई.
पण मोदीजी त्यांना पुरुन उरले आहेत.
मोदीजींची कार्यपध्दती व कालानुरुप घोषणा या विरोधकांच्या आकलना बाहेर आहेत, सबका विकास- चारच जाती, युवा- महिला- श्रमिक- बळीराजा, मजबुत अर्थव्यवस्था व सर्वांगीण वेनवान विकास, शुन्य भ्रष्टाचार, यामुळे मोदीजींची *गारंटी* लोकांना भावते आहे व विरोधी लाॅबीचा अपप्रचार, काही मोदी द्वेष्टे वगळता, परिणाम शुन्य ठरतोय.
धन्यवाद 🙏