राज्यसभेच्या निवडणूकीच्या पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणूकीत महाराष्ट्र भाजपाने मविआ सरकारवर मात केल्याची बातमी परवा रात्री टिव्ही चॅनेल्स वर झळकली. लागलीच विविध टिव्ही चॅनल्सवरून निवडणूकीच्या निकालाचे विश्लेषण ही झाले. त्यातून बहुतांश चॅनेल्सनी मविआ सरकार मधील शिवसेना आणि काॅग्रेस या दोन पक्षांची मतें फूटली असा निष्कर्ष काढल्याचे ऐकले. मतें का फुटली यावर मविआ सरकार मधील घटक पक्षांच्या नेत्यांनी आपली प्रतिक्रीया न देता आम्ही यावर अभ्यास केल्यानंतर उत्तर देऊ असे म्हटले. मविआचा सहावा उमेदवार निवडून येऊ शकत होता. तरीही मविआची मतें फूटली ती ही चार-पाच नव्हे तर राज्यसभेच्या निवडणूकी पेक्षा तब्बल दहा मतें अधिक फूटली. म्हणून मविआ सरकार अल्पमतात येण्याची शक्यता वाढली असे बहुतांश चॅनेल्सनीं निकालाच्या रात्री मान्य केले. विधान परिषदेच्या निवडणूकांचा निकाल परवा रात्री उशीरा आल्यामुळे मविआच्या नेत्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल देण्यात आयत्या संधीचा उपयोग केला असावा अशी शंका माझ्या मनात आली होती. काल सकाळी शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे ३५ आमदारासह सुरत येथे असल्याची बातमी आली. याचा अर्थ निदान माझी शंका खरी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
बुधवार, २२ जून, २०२२
शिवसेनेत फूट की काळाने उगवलेला सूड ?
Everything is fair in love and war असे आपण ऐकत असतो आणि बोलत ही असतो. हे वाक्य इंग्रजी शब्दकोशातले आहे. याचे जनक कोण आहेत हे ठाऊक नाही. परंतु हे वाक्य Everything is fair in love, war and in politics too ' असे सुधारीत आवृतीत असावयास हवे होते. वस्तुतः विरोधी पक्ष फोडणे, आमदार- खासदार यांचे आयाराम- गयाराम इत्यादी प्रथा देशात स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधीनी सुरू केल्या. महाराष्ट्रात १९७८ साली शरद पवारांनी काॅग्रेसचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून तत्कालीन प्रमुख विरोधी पक्ष जनता पार्टीच्या सहकार्याने पुरोगामी लोकशाही दल असे सरकार स्थापन केले होते. परंतु त्यावेळी मिडीयाने शरद पवार तसेच त्यांचे राजकीय गुरू किंवा मानलेले पिता यशवंतराव चव्हाणांवर टिका केली नव्हती. याच शरद पवारांनी मायावतीच्या साह्याने अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार तेरा महिन्यानंतर एक मताने पाडले होते. शिवसेनेचे भूजबळ यांनी सोबत सात-आठ आमदार घेऊन राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा शरद पवारांनी शिवसेनेत फूट पाडली होती. त्यावेळी सुद्धा शरद पवारांवर मिडीयाने टिका केली नव्हती. भाजपा सोबत शिवसेनेची २५ वर्षाहून अधिक काळ युती होती. सन २०१९ सालच्या विधानसभा निवडणूकीत भाजपा-सेनेचा प्रचंड विजय झाला. पण युतीचे सरकार स्थापण्यात शरद पवारांनी मोठा अडथळा निर्माण केला. नंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून शरद पवारांनी मविआ सरकार अस्तित्वात आणले. ही घटना अलिकडची. तरी ही बहुतांश मराठी मिडीयांनी उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष सत्ता देण्याचे आश्वासन भाजपचे नेते अमित शहांनी पाळले नाही, अशी टूम वाजविण्यास सुरूवात केली, ती आजपावेतो वाजत ठेवलेली दिसते. पवार-ठाकरे समर्थक मिडीयाला आणि सोशल मिडीयावरील मविआच्या कार्यकर्त्यांना (महाभारतातील संजय ला व्यासमुनींने दिलेली भव्य- दिव्य दृष्टी सारखी) काही दैवी शक्ती प्राप्त झाली होती का? त्यांना अमित शहा व उद्धव ठाकरें यांच्यातला संवाद प्रत्यक्ष पाहावयास व ऐकावयास मिळाला होता का? असे प्रश्न मिडीयांनी विचारले नव्हते. कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना अडचणीत आणू शकतील असे प्रश्न विचारावयाचे नाही असे पवार व ठाकरें समर्थक मिडीयाचे धोरण ठरले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्याचा जणू काही महापराक्रम केला अशा थाटात ही मंडळी वावरत आली आहे. ती मंडळी काल-परवाच्या घटनामूळे जमिनीवर आली असावी असे मानू या.
या घटकेला एकनाथ शिंदेनीं केलेल्या बंडातून मविआ सरकार जवळपास मृत्युशयेला लागलेले दिसत आहे. एकनाथ शिंदेंचं बंड शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे. तरीही देशभरातील विरोधी पक्ष आणि त्यांची समर्थक मिडीया हाऊसेसनीं केंद्र सरकार विरूद्ध थयथयाटास सुरूवात केली आहे. त्याबद्दल आश्चर्य वाटत नाही. कारण बहुतांश विरोधी पक्षांना केद्र सरकारने गेल्या साडेसात वर्ष देशात डिकाॅलनाईजचे धोरण अमंलात आणून देशाला आत्मनिर्भर करण्याच्या मार्गावर आणत असल्याचे पसंत पडत नाही. जे मिडीया हाऊसेस केंद्र सरकारवर सतत टिका करीत आहेत, त्यांचे गोत्र विदेशी आहे. संघ द्वेष हा त्यांना स्वातंत्र्यपूर्व काळातच वारस हक्काने प्राप्त झालेला आहे.
गेली दोन-अडीच वर्ष देशभरात विशेषतः किसान आंदोलन आणि लाल किल्ल्यावरील धुडगूस, शाहीनबाग येथील धरणं, सीएएच्या विरोधात मोर्चा पंजाबमध्ये काॅग्रेस सरकारने पंतप्रधान मोदींच्या दौर्यात निर्माण केलेलं विघ्न, राहूल गांधींना ईडीचे समन्स वरून काॅग्रेस कार्यकर्त्यांनी सुरू केलेला हंगामा, भाजपाच्या प्रवक्त्या नुपर शर्मा याच्या वक्तव्यावरून भाजपाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून सुद्धा ठिकठीकाणी मुस्लीम बंधवांनी सुरू केलेला धुडगूस, देशातील युवकांना संस्कारक्षम आणि देशभक्तीचे शिक्षण योग्य वयात मिळणार्या अग्नीपथा सारख्या योजनेला विरोध करण्यासाठी अल्पसंख्यांकांची माथी भडकाविण्याचे सुरू केलेलं सत्र इत्यादी उपद्रव पाहता विरोधी पक्षांना देशापेक्षा सत्तेसाठी देश अस्थिर ठेवून भाजपाची सत्ता उलथून टाकण्याचा आंतरराष्ट्रीय कटात सामिल होणे अधिक महत्वाचे वाटत आहे. महाराष्ट्रातील मविआ सरकारची स्थापना हा ही या कटाचा एक भाग आहे.
शिवसेनेच्या एकनाथ शिंदेचें बंड भाजपाकडे आलेली महत्वाची संधी आहे. ती सोडता कामा नये असे भाजपाला एक राजकीय पक्ष म्हणून वाटत असेल तर त्यात वावगे काही नाही. पक्ष फोडणे, आयाराम-गयारामाची प्रथा विरोधी पक्षांची राज्य सरकार कलम ३५६ लावून बरखास्त करणे इत्यादी कार्याचे जनकत्व माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी कडेच जाते. केवळ केंद्रात मोदी सरकार आहे, म्हणून अशा घटनांना ऊत आला आहे असा मिडीयाचा प्रचार हा अनाठायी आहे. शिवसेनेत फूट आताच पडते आहे असे नव्हे. काॅग्रेस, साम्यवादी, जनता दल, समाजवादी पक्ष, द्रमूक पक्ष अकाली दल अशा सर्वच पक्षात फूट पडलेली आपण अनुभवली आहे. तेव्हा देशभर भाजपाची सत्ता होती का? भाजपेतर पक्षांत मोदी सरकार आणि भाजपा बद्दल जो द्वेष वाढला आहे, त्याचे कारण केवळ सत्तेचा हव्यास आहे असे मला वाटत नाही. कारण ' सत्तेचा हव्यास ' ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्यातून फार तर एखाद्या पक्षात फूट पडेल किंवा काही आमदार पक्षांतर करतील. पण सत्तेच्या हव्यासातून एखाद्या राजकीय विचारसरणीचा द्वेष पराकोटीला पोहचेल हे अशक्य वाटते. मग ते कारण कोणते असेल यावर संक्षिप्त चर्चा करून मूळ विषयाकडे वळू या.
सन २०१४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत नरेंद्र मोदींना जाहिरातबाजीचा चेहरा असे हिणवित असणार्या मिडीयांनीच भाजपा विरोधी पक्षांचे फार मोठे नुकसान केले आहे. आपली बुद्धी, दृष्टी आणि मन ही इंद्रियें मुलतः प्रवाह पतित आहेत. चंद्र मनाचा कारक आहे. असे आपले ज्योतिषशास्त्र सांगते. त्यावर विश्वास ठेवा वा ना ठेवो, पण समुद्राला भरती-ओहटी येते हे तर चंद्र आणि पृथ्वीची गती आणि भ्रमण कक्षे मूळे येते, हे विज्ञानाने शोधलेले सत्य आहे. ते तर मानावे लागतेच. मानवी मन जितके चंचल तितकेच ते प्रवाह पतीत असते. आपल्या शरीरातील ॲसीडीटी,बद्धकोष्ठता, डोकेदुखी, पोटदुखी, संधिवात, दमा, मधुमेह हृदयरोग, ब्लड प्रेशर इत्यादी रोगांचे मूळ मनाच्या अस्थीरतेत असते हे आपले आयुर्वेद सांगते. आधूनिक शरीर विज्ञान ही याला पुष्टी देते. देशातील प्रमूख मिडीया ज्यांच्यावर विदेशी शक्ती आणि डाव्या विचारवंताचा पगडा आहे त्या सतत संघ, भाजपा, मोदी-शहा संबंधी जो द्वेष पसरवित आहे. त्याचे मूळ त्यांना मिळालेल्या वारस हक्कात आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपावर टिका करताना हीन पातळी गाठली आहे, ज्याची प्रचिती आपल्याला रोज येत आहे. विरोधी पक्षांना राजकारण, राज्यव्यवस्था, प्रशासन या संबंधीत भारतिय समाजमानस मध्ये जो बदल होत आहे तो दिसत नाही. स्वातंत्र्यलढाच्या उत्तरार्धातच देशाचे पहीले पंतप्रधान स्वर्गीय पंडीत नेहरूनां देशापेक्षा मोठा नेता मानण्याच्या रोग देशातील काॅग्रेस समाजवादी व साम्यवादी विचारसणीच्या नेत्यांना, राजकीय अभ्यासक आणि पत्रकार- संपादक मंडळींना जडला होता तो आज ही चिकटून राहीला आहे. तो नष्ट होण्यासाठी काही काळ जावा लागतो. पुष्कळदा वर नमूद केलेल्या शारीरीक रोगांसारखा आपल्या मृत्युसोबत राहतो. त्यामूळे ही मंडळी आपली राजकीय वाट वा कूस बदलण्याची शक्ती गमावून बसले आहेत. म्हणूनच Nation First अशी भूमिका मांडणार्या भाजपा पक्षाचा जनाधार वाढत आहे.
भाजपाला जनाधार वाढण्याची सुरूवात अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी आंदोलनाने सुरू झाले. त्या संघर्षात काॅग्रेसने व इतर भाजपेतर पक्षांनी भगवान श्रीरामाच्या जन्मासंबंधीतच शंका उपस्थित केल्यामूळे भारतिय समाजाला सर्वधर्मसमभावाचे जे नकली रूप गेली सत्तर वर्षे मांडण्यात आले होते ते पटेनासे झाले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय जवाहरलाल नेहरूंच्या पश्चात काॅग्रेसमध्यें गांधी- नेहरू परिवाराची घराणेशाही निर्माण झाली. तिचे लोण भाजपेतर सर्व पक्षांत पसरले. नेमक्या त्याच वेळेस भाजपातील नरेंद्र मोदी सारखा एक सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान बनला हे आपल्या डोळ्यादेखत पाहावयास मिळाले. मोदी सरकारच्या काळात सर्वसामान्यांच्या कल्याणकारी योजनातील पैसा थेट सर्वसामान्यांच्या बँक खात्यात जमा होताना प्रत्यक्ष अनुभवास आल्यामूळे एकूणच राज्यव्यवस्था लोकाभिमूख होत आहे. त्याचे स्वागत बहुतांश देशबांधव करीत आहेत. ही वस्तूस्थिती आहे. या वस्तुस्थिला सामोरे जाण्याची शक्ती भाजपेतर पक्ष गमावून बसले आहेत. आता आपण या लेखाच्या मूळ विषयाकडे उरलेली चर्चा करीत या लेखाची समाप्ती करू या.
हा लेख लिहीताना उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे अशी बातमी आली आहे. पण सोबत उद्धव ठाकरें मंत्रीमंडळाची बैठक घेऊन विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांना देणार ही बातमी सुद्धा झळकली आहे. यातील खरी बातमी कुठली आता सांगता येत नाही. जाता जाता मला नाहीतर तुला ही सत्ता देणार नाही असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देऊ इच्छीत असतील तर ---- गिरा फिर भी तंगडी उपर असेच म्हटले जाणार. परंतु विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार राज्यपालांच्या सल्ल्यानुसार फक्त राष्ट्रपतींना आहे. या सर्व घटना घडत असताना, एवितेवी सरकार जातच आहे तर आपणच समर्थन मागे घेऊन सरकारचा पाठींबा काढून घेतो असे पत्र काॅग्रेसच राज्यपालांना देण्याची शक्यता आहे. काॅग्रेस पक्षाला ही आपला जनाधार इनटॅक्ट ठेवण्याचा हक्क आहेच की ! पण तितकी कुवत काॅग्रेस श्रेष्ठींकडे राहिलेली दिसत नाही. कारण तो पक्ष ही घराणेशाहीमूळे कमकूवत झाला आहे.
शिवसेनेच्या अंतर्गत जी बंडाळी माजली आहे, त्यासंबंधी येत असणार्या बातम्या पाहता एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे की घराणेशाही पक्षांना घरघर लागल्याची ही सुरूवात आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेनी जी काही कारणें मांडली आहेत त्यातील एक अति महत्वाचं कारण हे आहे की पर्यावरण आणि परयर्टन मंत्री आदित्य ठाकरेंचा सर्वच खात्यात वाढत जाणारा हस्तक्षेप हे होय. शिवसेनेसाठी ज्यांनी आपले आयुष्य खर्ची केले आहे अशा नेत्यांना काल-परवाचे युवराज वरचढ ठरणार असतील तर महाराष्ट्र ही ठाकरें-पवार घराण्याची जहागिरी आहे का असा प्रश्न नवा मतदार उभा करीत आहे. भारतिय समाज बदलत आहे. देशात मोदींची हुकूमशाही सुरू आहे असा प्रचार करणार्या पैकी भाजपेतर पक्ष जे घराणेशाही राबवित आहेत त्यांची गत जी काॅग्रेस आणि तेलगु दसम पक्षांची झाली आहे, तशीच होत जाणार आहे. पुर्वी जगभर असलेल्या राजेशाहीचा जसा अंत झाला तसाच शेवट घराणेशाही पक्षांचा होणार आहे. त्यासाठीचे प्रयत्न नियती म्हणा, काळ म्हणा स्वतःच करणार आहे. काळ बदलत असतो आणि हेच सृष्टीतील अंतिम सत्य आहे. त्यात मानवाला हस्तक्षेप करता येत नाही. म्हणूनच तर करावे तसे भरावे, Every action has reaction अशी वाक्ये मानव अप्रगत असतानाच त्याच्या मुखीं आली आहेत. याची दखल भाजपेतर घराणेशाही पक्षांनी घेणे आवश्यक ठरेल आणि त्यातच खरे राष्ट्रहीत दडले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)
गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...
-
मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात स...
-
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली तरीही अधूनमधून नवीन चित्रपट येऊ घातला कि समाजातील एखाद्या वर्गाच्या भावना दुखावल्या जाण...
-
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकाचा निकाल लागला. महायुतीचा प्रचंड विजय झाला. असा एकतर्फी निकाल महाराष्ट्रात आजपावेतो आला नव्हता हे सत्य आहे ...
विष्णुजी,
उत्तर द्याहटवाविश्लेषण परीपुर्ण आहे. जो मुद्दा इतके दिवस जनमानसात चर्चेत होता, त्याच मुद्यावरुन शिंदे यांनी, भरघोस अंतर्गत पाठींब्यान, समय सुचकता दाखवुन, दंड थोपटले आहेत. याचा सकारात्मक परीणाम झाल्याशिवाय रहाणार नाही.
धन्यवाद, नमस्कार
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचे विश्लेषण चांगले आहे. या फोडाफोडीच्या राजकारणाचा फायदा घेऊन भाजपा पुन: सत्तेत येईलही . पण तोही पक्ष या राजकीय संस्कृतीचा एक भाग होत चाललाय. याची खंत आहे. कालाय तस्मै नम: !
उत्तर द्याहटवासुरेंद्र तन्ना
उत्तर द्याहटवा