बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

शीख आणि हिंदुत्व भाग २




गुरू नानक संस्थांपक आणि पहिला गुरू
( स्वरूप, दृष्टी आणि चमत्कार )

गुरू नानक हे उत्तम कवी होते. त्यांची वाणी मधुर होती. आपल्या मतांच्या  प्रसारासाठी चार यात्रा केल्या. त्यांनी  भारत, अफगणिस्तान, इराण आणि अरब येथील प्रमुख शहरात प्रवास केला. पार्शिया, मक्का, मदिना,बगदाद प्रत्येक ठिकाणी त्यांनी मानवी जीवनात सेवाधर्माला सर्वाच्च स्थान आहे हे पटवून दिले. आपल्या इथे  'सेवा परमो धर्मः' असे वेद काळापासून आजतागायत मानत आहोत.

गुरूग्रंथसाहिबाचा  प्रारंभच मंगलाचरण ओंकारात होतो. तो असा ' इशक ओंकार सिरी परसावी ' आहे. हिंदु धर्मशास्त्रात  ज्याने पर्वत, चार युगे व चार वेद उत्पन्न केले, जो सर्वांना मुक्ती देणार तोच ओंकार आहे.

गुरूग्रंथसाहिब मध्ये ईश्वर, अनादी, सर्वव्यापी, अंतर्यामी, निराकार, त्रिगुणातीत आहे ही कल्पना सर्वत्र मांडण्यात आली आहे. उपनिषदांमध्ये व अन्य हिंदु धर्मग्रथांत वर्णिलेल्या ईश्वर स्वरूपाशी हे सर्व वर्णन तंतोतंत जुळणारे आहे. यमदूत, यमपाश, यमदंड हे शब्द गुरूग्रंथसाहीबात पदोपदी आहेत. गुरू ग्रंथात ईश्वराला सर्वत्र  हरी आणि राम असे संबोधिले आहे. जेथे मुस्लीमांना उद्देशून उपदेश केला आहे तिथे गुरू नानकांनी  'अल्ला ' या नावाचा उल्लेख केलेला अढळतो. ' संतसगती ' हे मुक्तीचे श्रेष्ठ साधन आहे. हे गुरूग्रंथसाहिबात माडले आहे. त्याचा ही उल्लेख हिंदुधर्माच्या अनेक ग्रंथात पदोपदी आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णूने नारदाला प्रत्यक्ष उदाहरण देऊन सुसंगतीमूळे एका किड्याची उन्नती होत पुढे एका राजाच्या पोटी जन्म कसा मिळतो यातून सिद्ध केले आहे. 

या ठिकाणी गुरू नानकांच्या चरीत्रातील एक कथा आपल्या समोर मांडणे आवश्यक वाटते. गुरू नानक  वैष्णव, काशी, प्रयाग यात्रा संपवून परत येते वेळी त्यांचा सहकारी अर्थात अनुयायीला मक्काला जावेसे वाटले. गुरू नानक तयार झाले. गुजरात येथील बंदरातून सागरी मार्गे ते गेले. तेथून पुढे पायी प्रवास करण्यासाठी दोघांनी हज यात्रेसाठी करावा लागणारा वेश घातला. प्रवासात ते दमले आणि रात्री एका गावातल्या चौकात गुरू नानक आणि मर्दाना झोपी गेले. गुरू नानकजींचे झोपताना पाय ज्या दिशेला होते त्या दिशेला मुस्लीमाचे काबा नावाचे पवित्र प्रार्थना स्थळ होते. मुस्लीमांच्या धर्मज्ञाप्रमाणे काबाच्या दिशेने पाय करून झोपणे निषिद्ध मानले जाते. भल्या पहाटे कोणी यात्रेकरूने  हटकले आणि रागाने विचारले आण आपण कोण आहात ?  पवित्र प्रार्थना स्थळातील अल्लाच्या दिशेने तुम्ही पाय ठेवून करून झोपला आहात ? नानकजी म्हणाले, मी प्रवासात फार दमलो आहे. कृपया ज्या दिशेला अल्ला नाहीत, त्या दिशेने माझे पाय उचलून ठेवा. यात्रेकरूने नानकजीचे पाय उचलले आणि जरा तिरके ठेवले. पण काबाची ती क्युब( अशी इमारत जिची सहा बाजूने उंची, लांबी, जाडी समान असते) आकाराची इमारत नानकजीच्या पायाच्या दिशेने दिसली.  चार वेळा असाच प्रकार घडला तेव्हा त्या यात्रेकरूला जाणीव झाली की ही कोणी असाधारण व्यक्ती आहे. आपल्या संत नामदेवांना त्यांचे गुरू विसोबा खेचर यांनी शिवलिंगावर आपले पाय पादत्राणा सकट ठेवून दृष्टांत दिला होता. तो दृष्टांत हाच  ' ईश्वर सगळीकडे आहे.' वैदिक काळापासून हिंदुना ' ईशावास्यम इदं सर्वम् ' (ईश्वर सर्वत्र व्यापलेला आहे ) हे ज्ञात होत आलेले आहे.

गुरूग्रंथसाहिबातील दृष्टांत सर्वपरिचीत आहेत. पाणी पाण्याला मिळणे, ज्योतीला ज्योती मिळणे हे आत्मा-परमात्मा यांच्या ऐक्य संदर्भात आले आहे. गुरू नानक यांचा योगशास्त्राचाही चांगला अभ्यास होता. गुरूग्रंथसाहिबात भक्तांची नावे दिली आहेत, ती नारद, वाल्मिकी विदूर, कृष्ण, नामदेव, रविदास ही हिंदुना परिचीत आहेत इतकेच नव्हे तर दहा गुरूची नावें पाहिली तरी त्यातून हिंदुत्व दिसते.
गुरू नानक एकेश्वरी वादाचे पुरस्कर्ते होते पण देव-देवतांचे अवताराच्या कल्पनेला विरोध केला नाही. पण तो ईश्वर एकच आहे असे म्हणत असत. अशाच आशयाचे हिंदु धर्मात (संस्कृत) भाषेत वचन आहे. ' एकं सत् विप्रा वदन्ती बहुधा ' 

ईश्वरी  कृपा ही कल्पना  शीखमताचे वैशिष्ट्य आहे. काही शीख विद्वांनानी ईश्वरकृपा ही ख्रिस्ती तत्वाची जुळते आहे, असे म्हटले आहे. परंतु ते निराधार आहे. भगवान येशूच्या हजारो वर्षे अगोदर कठोपनिषादात या कल्पनेचे बीज आहे. 
 ' लभ्यतैपि तस्य कृपयैव ' असे नारद भक्तिसुत्रात वाचल्याचे मला आठवते. गुरूग्रंथसाहिबातील रचनात अनेक दृष्टांत, कथा, या रामायण महाभारत आणि पुराणातल्या आहेत.

शीख वाःड्मयात पुरख, अकाल -पुरख हे ईश्वराचे नामवाचक आहेत. पुरख म्हणजे पुरूष या ईश्वरवाचक नामाचे अपभ्रंश आहे. वैदिक काळात तर ईश्वराचे वर्णन म्हणा वा व्याख्या अशी --
' सहस्त्रशिर्षा पुरूषः सहस्त्राक्षः सहस्त्रपात् '  सहस्त्र शिर, सहस्त्र डोळे आणि सहस्त्र हात-पाय आहेत असा पुरूष म्हणजेच ईश्वर आहे.

समाजात क्षात्रवृत्ती जागृत होण्यासाठी दहावे गुरू गोविंदसिंहांनी  चंडी चरीत्र, चंडी दीवार, राम अवतार, कृष्णावतार ही काव्यें केली. विचित्र नाटकाच्या प्रारंभी ते महादेवाचे स्मरण करतात व चौदाव्या अध्यायात ,' देव कालिका माता हमारी असे ' समजतात.

सध्या जी खलिस्तान चळवळ डोके वर काढत आहे याचे कारण  मेकाॅलिफ यांच्या सारख्या शीख पंथाच्या इतिहासकारांनी केलेल्या विकृत प्रणित शिक्षणाच्या पद्धतीतून रोवले गेलेले आहे.  शीख ब्रिटीशांची राजनिष्ठ राहावेत या उद्देशाने शीखाचा इतिहास बदलला गेला. आपण हिंदुपासून वेगळे आहोत असे मानल्याने आपला फायदा होतो हे हळूहळू शीख नेत्यांच्या लक्षात येऊ लागले. ' जिथे सरशी तिथे आम्ही ' हा विचार माणसात लौकर रूजतो. कारण सृष्टीत काटेरी झुडपें सहजगत्या उगवतात. याचा अर्थ सर्वच शिखांनी खलिस्तान चळवळीत भाग घेतलेला नव्हता.  ब्रिटीशांनी भारतिय तथाकथित विचारवंताना हाताशी धरून  तसेच स्वातंत्र्यनंतरच्या काळात इतिहास अभ्यासक्रमाची जबाबदारी सांभाळणार्या डाव्या विचारवंतानी, हिंदु धर्मातील  शीख, लिंगायत, बौद्ध, दलित-आदिवासीयांना हिंदूपासून वेगळे आहेत असा विषारी प्रसार गोबेल्स तंत्राने सुरू केलेला आहे. एखादी गोष्ट कानावर सतत पडत असली माणसाची दृष्टी आणि बुद्धी याच्यांवर प्रभाव पडतो. ब्रिटीश सत्तेने  हिंदु आणि शीख यांच्यातल्या स्नेहावर फोडा आणि झोडा या नीतीने हातोडा फिरविण्याचे कार्य सन १९२० पासूनच सुरूवात केली होती. त्यातूनच खलिस्तान चळवळीच्या उदय झाला होता. स्वातंत्र्यानंतर भाषाच्या आधारे तत्कालीन केंद्र सरकारने भाषावार राज्यरचना उभी केली. त्यातूनच पंजाब आणि हरियाणा ही दोन अनुक्रमे पंजाबी आणि हिन्दी भाषिक राज्ये झाली. पंजाबात हिंदु संख्या कमी झाली त्यातूनच स्वतंत्र पंजाब राष्ट्राची मागणी झाली. पुढे खलिस्तान राष्ट्रावाद निर्माण झाला त्यातूनच विदेशी शक्तीने  खलिस्तान चळवळी उभी करण्यात हातभार लावला. हा राजकारणाचा विषय आहे म्हणून यावर आपण आज चर्चा नको करू या. एखाद्या राजकीय लेखात या संबंधी चर्चा करू या. आता शिखाच्या गुरूंची शिकवण हिंदु धर्मशास्त्राशी किती आणि कसे साधर्म्य साधते हे पाहू या आणि लेखाची समाप्ती करू या

गुरू नानक यांचा उपदेश
१) ईश्वर प्रत्येक व्यक्तीत आहे. (गीतेत भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, ' सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो ' मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे.)
२)गोर-गरीबांना अन्नदान करणे  हे सर्वात मोठे दान आहे. त्याला त्यांनी नाव दिले लंगर. हा उपक्रम वर्गणीतून करावा. हिंदु धर्म शास्त्रात मांडले आहे, 
क्षुधितस्य च भोजनम्  म्हणजे भूकेलेल्याना भोजन द्यावे. 'हस्तस्य भूषणम् दानं' दान हे हाताचे भूषण म्हणजे अलंकार आहे.
३) सर्व समान आहेत - प्राचीन ऋषींनी समता
 यावी म्हणून उपदेश केला आहे तो असा -- 
  ' समानी व आकूतिः समाना हृदयानि वः
  समानमस्तु वो मनो यथा वः स सुहासति || '
  (तुमची भावना व संकल्प समान असोत. तुमचे
   हृदय समान असोत. तुमच्या मनोभावना
   समान असोत, ज्यायोगे तुम्ही परस्पर 
   सहकार्याने काम करू शकाल.)
३) अंधश्र्द्धा फेकून द्या.
अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्य हिंदु नेतेमंडळीचेच केले आणि शेवटीच्या अंधश्रध्देचा पाडाव होत नाही. तोपर्यंत हे कार्य अविरत पुढे चाललेले दिसेल.
४) दुसर्या धर्माचा आदर करा. तो हिंदुच्या रक्तात भिनलेला असतो.
५) कर्म हाच सर्वोच्च धर्म, दुःख सुद्धा कर्माचेच
     फळ असते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात. 
   ' नियतं कुरू कर्म त्वं | '
६) पुनर्जन्म असतो.
७)षढरिपूवर मात करा
८) संयम आणि प्रेम ही सर्वोच्च जीवन मूल्यें.
९) मुस्लीम असाल तर मुस्लीम राहा आणि
     हिंदू असाल तर हिंदू राहा. हिंदु मुस्लीम यांचे
      ऐक्य साधणे गुरू नानकांचा उद्देश होता हे
     सत्य असले तरी शीख हा स्वंतत्र धर्म
     नव्हताच.तो हिंदूचा एक पोटविभागच.
      
गुरू नानक यांना हिंदु आणि मुसलमानात ऐक्य हवे होते हे सत्य आहे. पण  म्हणून शीख हा  हिंदु पंथ नव्हता असे सिद्ध होत नाही. कारण महात्मा गांधीजींना ही हिंदु-मुस्लीम ऐक्य हवे होते आणि त्यांनी तसे प्रयत्न ही केले. म्हणून महात्मा गांधीजीं हिंदु राहीले नव्हते असे आपण मानतो का? नानक मत असो की गांधीवाद असो, दोघे ही हिंदु धर्माचेच होते. स्वातंत्रयवीर सावरकर विचार दर्शन चे लेखक आणि संकलक डाॅ अरविंद गोडबोले म्हणतात, विवाह, घटस्पोट, वारसा इत्यादी विषयी गुरू नानकजीने विचार मांडले नव्हते. म्हणून शीख आणि शीखेतर हिंदु ह्यात यासंबंधी काही वेगळेपण नव्हते.  ' हिदु- शीख कानिफ्लक्ट इन पंजाब ' शिर्षकाखाली एक पुस्तिका प्रसिद्ध झाली आहे त्यातील एक लेखात के टी लालवानी ह्यांनी म्हटले आहे की, ' एकाच घरात एक भाऊ हिंदु आणि दुसरा शीख असे राहात असत.  म्हणून देशाच्या कायद्यानुसार शीख हा हिंदुधर्माचा पंथ होय.
दस्तूर खुद्द दहावे गुरू गोविदसिंहने  म्हटले आहे,
         सकल जगतमे खालसा पंथ गाजे
          जगे धर्म हिंदु सकळ भंड भाजे

गुरूअंगदेवचे कार्य

१) गुरूमुखी लिपी तयार केली २) ६२ अध्याय लिहले. गुरू नानकांच्या सर्व रचनाचे संकलन केले. ३) गुरू (अकाल) तख्त निर्माण केले.४) देशाच्या इतर प्रांतातील १८ समकालीन संताच्या रचना, उपदेशाचा ग्रंथात समावेश केला. याचाच अर्थ देशभरातल्या सर्व साधुसंताचा आदर करा.
                
गुरू अर्जून देवचे कार्य
गुरू ग्रंथाची सुरवात केली.
   
गुरू हर गोविंदचे कार्य
मोगलाच्या अत्याचाराविरूद्ध लढण्यासाठी सेना तयार केली.  ठकासी व्हावे ठग हाच उपदेश समर्थ रामदास स्वामिनी दिलेला आहे. भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापूर येथे जावयास निघाले तेव्हा त्यांनी पांडवांना आपली शस्त्रे पाजळून ठेवा म्हणजे ऐनवेळी युद्ध येऊन ठेपले तर आक्रमण थोफवितात येते.

गुरू हर रायचे कार्य
गीतेचे पारशी भाषेत भाषांतर केले.
गीते बद्दल इतकी आत्मियता काय दर्शविते?
                
गुरू तेग बहादूरचे धाडस

औरंगजेबची धर्मातंराच्या धमकी दिली तेव्हा त्या धमकीला गुरू तेग बहादूर यांनी भिक घातली नाही दाद दिली नाही, आणि बहादूरपणे  चांदणी चौकात हत्येची शिक्षा स्विकृत केली.

 गुरू गोविंद सिह
धार्मिक शांतीने न्याय मिळणार नाही असा उपदेश देत मोगल दशहतवादाला लढाईनेच उत्तर देण्याचा प्रभावी उपदेश केलाच पण स्वतः लढाईत भाग घेतला. एकूण पाच लढाया केल्या. त्यातील दोन जिंकल्या. खालसा पंथ तयार केला. वेशभूषा निर्माण केली.  याला 5 K मानले जाते. केश-दाढी, कंगवा, कृपाण, कच्छ( सदरा) आणि हातात कडा. महत्वाचे कार्य म्हणजे संस्थापक गुरू नानकांनी आपल्या मुलाला गुरूपद बहाल न करता अंगदेव ला बसविले पण नंतर घराणेशाही आली होती. ती मोडीत काढली. इतकेच नव्हे गुरूपदी व्यक्ती न बसता ग्रंथालाच गुरूपदी बहाल केले. 

गुरूग्रंथसाहिबात हिंदु प्रमाणेच गोहत्येचा निषेध केला आहे. त्यासंबंधी गुरू गोविंदसिंह म्हणतात ,
            ' यही देहु आज्ञा तुरक को खपाऊ |
              गोघात का पाप जगसे मिटाऊं | |

एकंदरीत वरील चर्चेचे सार असे निघते की  ' एक सत् विप्रा बहुधा वदन्ती ' हेच खरें. ईश्वर एक आहे तो अनेक रूपात दिसतो.  हे आपल्या येथे प्राचीन काळापासून मानले जात आहे. शिखांच्या हिदुत्वाचे सर्व पातळ्यांवर उपलब्ध साधन आणि माध्यमांद्वारे प्रसार होणे आवश्यक आहे.  हिंदूत्व हा सिद्धान्त असून हिंदु धर्म हा त्या सिंद्धांताचा प्रत्यक्ष व्यवहारीक आचार किंवा उपयोजन आहे. रंग कितीही भिन्न असले तरी इंद्रधनुष्य एकच असते. पाकळ्या कितीही आकाराने आणि रूपाने भिन्न दिसल्या तरी फुल एकच असते. अवयव आकाराने रूपाने आणि कार्याने भिन्न असले तरी शरीर एकच असते. तद्वत बहुरंगी आणि बहुढंगी असलेल्या हिंदु धर्माच्या मूळाशी एकच हिंदुत्व असते. 

शीख आणि हिंदुत्व भाग १



परवा रविवारी २० फेब्रवारीला पंजाब मधील मतदान पार पडले. अकाली दल हा एक राजकीय पक्ष आहे आणि त्याची स्थापना सन १४ डिसेंबर १९२० साली झाली आहे. भारतात काॅग्रेसच्या खालोखाल इतका हा जुना पक्ष आहे. त्याचे अकाल तक्तशी  ऐताहासिक नाते जोडलेले आहे. अकाल तख्त शीख धर्माशी निगडीत आहे. अलीकडे खलिस्तान चळवळ पुन्हा वळवळ करू लागलेली दिसत आहे. त्याचे परीणाम पुन्हा देशाच्या सर्व व्यवस्थेवर होऊ शकतात. म्हणून मनांत आले की पंजाब मधील निवडणूकात  अकाली दलाची कशी कामगिरी राहील यावर नंतर लिहता येईल. पुढे विचार केला की ' शीख आणि हिंदुत्व ' या विषयावर काही लिहता येते का ते पाहू या.  शिखांचा इतिहास छोटा नाही आणि हिंदुत्व हा विषय तर अथांग सागरासारखा खोल आणि अवकाशाचा पलिकडचा मग लिखाण करावे की करू नये असा पेंच पडला. शेवटी ठरले, शीख हा  धर्म माना की पंथ माना, त्याची पाळेमूळे  हिंदु धर्मात आहेत. हे स्पटिका सारखे स्वच्छ आहे.  हेच नजरे समोर ठेवून माझ्या कूवती प्रमाणे हा लेख लिहीता झालो. या लेखाच्या विषयाच्या अनुषंगाने मध्ययुगाच्या पाठीमागचा तसेच मध्ययुगीन काळातला आणि अर्वाचीन काळातला आपल्या देशाचा तसेच जगाच्या इतिहासातील काही घटनांचा, बड्या देशांचे इतर देशात अस्थिरता माजविण्याची कृत्यें इत्यादीचा उहापोह टाळता येणार नाही. म्हणून  लेखाचा भाग १ मध्ये जनरल इतिहास, आणि  भाग २ मध्यें मुख्यत्वे करून शीख पंथातील गुरूंची शिकवण,  हिदू तत्वज्ञान आणि दर्शनाशी कसे साधर्म्य साधते हे दाखविण्याचा प्रयत्न राहील.


इसवी सन पुर्व सहाव्या शतकात जगभर जवळपास ६२ नवीन धर्म निर्माण झाले. भारतात याच काळात अंहिसा, समता आणि शांती या जीवनमुल्यावर आधारीत जैन आणि बौद्ध धर्म अस्तित्वात आले.  इसवी सनाच्या अकराव्या शतकापासून जगभरात धार्मिक उन्मादाच्या घटना सुरू झाल्या. सन १०९५ ते १२९१ पर्यंत मध्यपुर्वेत ख्रिस्ती आणि ईस्लाम धर्मियांमध्ये  ७ धर्मयुद्धे झाली. अंधश्रद्धा आणि  कट्टरता उत्तेजीत करण्याने माणूस कसा आपला विवेक गमावून बसतो याचे जागतिक स्तरावरील सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ही धर्मयुद्धे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच दोन धर्मीयांच्या काही बड्या देशांची साम्राज्यवादाची लालसा आज ही कायम आहे. म्हणून  विकसनशील आणि अविकसित देशात येनकेन प्रकारे अस्थिरता माजविण्याचे काम बडी नाटो सदस्य राष्ट्रें, मुस्लीम देश व रशिया चीन- पाक करीत असतात. आपल्या देशात बहुतांशी  प्रांतात या देशांच्या छोट्या-मोठ्या देशविघातक तसेच संस्कार- संस्कृती भक्षक कृत्यें सुरूच असतात. त्यातलीच एक खलिस्तान चळवळ.

इसवी सन ७२५ काळापासून उन्माद आणि धर्मांधता मुळे सारासार विचार करण्याची शक्ती गमावून बसलेल्या मुस्लीम धर्मियांनी भारतावर एका पाठोपाठ आक्रमणें सुरू केली. हिंदुवर अत्याचार करून लुटमार केली तसेच अनेक हिंदुचे जबरदस्तीने धर्मांतर केले गेले. आणि धर्मांतर करण्यास नकार दिला अशाच्या अमानुषपणे हत्या करण्यात आल्या.  ही इस्लामी आक्रमणे  संस्कृती भक्षक असल्यामूळे आपल्या भारत देशाला आज ही अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्या काळात  देशाच्या कानाकोपर्यात अनेक  संतमहंत उदयास आले आणि त्यांनी आपल्या परीने संस्कृती रक्षणाचे कार्य केले. तसेच अनेक राजे-महाराजांनी, योद्ध्यांनी आक्रमणा विरूद्ध कडवा प्रतिकार  केला. याच काळात म्हणजे २० आक्टोबर १४६९ ला व्यवसायाने वैश्य असलेल्या माता त्रिप्ती आणि मेहता कालू या हिंदू दापत्यांच्या पोटी आताच्या पाकिस्तानातील लाहोर नजीक तलंबडी जिल्ह्यात एक अपत्य जन्मले. तेच श्री गुरू नानक ; ज्यांनी आपल्या वयाच्या २८, व्या वर्षी म्हणजे सन १४९९  समता, बंधुभाव आणि शांतता या तत्वाच्या आधारावर शीख धर्म स्थापन केला.  पुढे शांततामय शिखांना हातात तलवार घेऊन आपल्याच समाजबांधवांचे इस्लामी आक्रमकांपासून रक्षण करण्याची वेळ आली. पण शीख योद्धांचे वैशिष्ट हे आहे की त्यांनी शत्रुंशी ज्या लढाया केल्या त्या हिंदु म्हणूनच या संबंधीची पुष्टी दहावे गुरू गोविंदसिंहाच्या चरीत्रातून मिळते. म्हणून स्वामी विवेकानंदानी एके ठिकाणी म्हटले आहे की
' हिंदुनी गुरू गोविंदसिंह सारखे हिंदु व्हावे .'

आपल्या देशात मध्ययुगीन काळात एका बाजूला साधुसंत भजनं, किर्तनाच्या माध्यमातून  शांती, बंधुभाव, समता, अहिंसा, भूतदया इत्यादी जीवनमूल्यांची  गरज समजावून  अंधश्रद्धा,  भेदभाव, आळस मद, मत्सर, क्रोध इत्यादी शत्रूंची हाकलपट्टी करण्यासाठीचे अहोरात्र आवाहन करत असत. तर दुसर्या बाजूला हातात तळपणार्या तलवार घेऊन इस्लामी आक्रमक आपल्या समाजात दशहतीचे साम्राज्य वाढवित होते. हा नियतीचा खेळ म्हणावा की आपण भ्याड होतो? आपआपसातील भेद, फितूरी ही कारणें होतीच.  पण तेवढेच कारण होते का आपली नाच्चकी होण्यामागे? मला वाटतं याहून अधिक काही कारणे असावीत.

हिंदू  समाजात एकात्मता नव्हतीच असे नाही. जी होती ती धार्मिक व सांस्कृतिक धारणांवर होती. तिला राजनैतिक दृष्टी नव्हती. त्यामूळे परकिय आक्रमणाच्या वेळी एक होऊन त्याचा प्रतिकार करावा, ही जाणीव निर्माण झाली नाही. अनेक वर्षे आपल्या देशावर (म्हणजे इ स ७२५ च्या अगोदर) आक्रमण न झाल्यामूळे (जी काही झाली होती ती सिमेवरून परतून लावली होती) प्रतिक्रीया स्वरूप हिंदु समाजाचा धार्मिक वा सांस्कृतिक अभिमान जागृत होऊ शकला नाही. राजनीतीबद्दल उदासीनता सर्वसामान्यात इतकी होती की तिकडे युद्ध चालले असले तरी इकडे शेतकरी शेतात नांगर चालवित असेल, सुतार, सोनार आपआपल्या  कारागिरीत व्यस्त होत असेल अशी स्थिती देशभर होती. याचा अर्थ त्यांना राजनैतिक घडामोडीचे सोयर-सुतक नव्हते. युद्ध  सैनिक- सैनिकामध्ये चाले. संपूर्ण समाज गोवला जात नसे. शत्रूचे सैनिक जनतेवर अत्याचार करीत, पण त्याचा प्रतिकार करण्याचे काम राजाचे ही भावना होती. सैनिका मध्ये ही देश वा राज्याबद्दल निष्ठा नव्हती. होती ती आपल्या स्वामीबद्दलची. जो आपली उपजीविका चालवितो त्याच्याशी प्रामाणिक राहण्याची, आणि खाल्ल्या मिठाला जागणे. या पलिकडचा विचार मनाला शिवला नव्हता. आपल्या राजाला परकीय शक्ती पदच्युत करीत असताना  प्रधानाला वा सेनापतीला त्या परकिय आक्रमकांची मदत करण्यात संकोच वाटला नाही. हेच कारण होते ज्यामूळे  एक हजार वर्षाहून अधिक काळ आपला देश गुलामीत गेला.

इसवी सन पुर्व सहाव्या शतकात जन्माला आलेल्या अंहिसा आणि शांती तत्वाचे जैन व बौद्ध धर्म तसेच मध्ययुगात जन्मलेल्या शीख धर्माचे संस्थांपक हिंदूच होते. म्हणूनच आपल्या देशाच्या संविधानात हिंदु कोड या धर्मांना ही लागू आहे. वस्तूतः हे हिंदू धर्मातील पंथच आहेत. जैन, बौद्ध, आणि शिख पंथातील बांधवांच्या चालिरीती,  हिंदू समाजा सारख्याच आहेत. दिपावली, दसरा सारखे सण जैन, बौद्ध आणि शीख बांधव सुद्धा साजरा करतात.  जन्मापासून ते अंतेष्टी संस्कार पर्यंतच्या पद्धती सुद्धा हिंदू धर्माप्रमाणे आहेत. हिंदु धर्म हा अति प्राचीन काळातला. त्याचा कोणी एक संस्थापक नाही. त्यामूळे त्याला सनातन असे ही संबोधिले गेले आहे.

हिंदु धर्मशास्त्र चार वेदावर आधारलेले आहे पण ते कोणी लिहले हे ठाऊक नाही. म्हणून त्याला अपौरूषिय मानले गेले आहे. तो वैदिक काळ समजला जातो. वेद सृष्टीच्या नियमांनी खचाखच भरलेले. म्हणून त्या धर्माला शाश्वत धर्म असे ही एक नाव आहे. ईश्वर एक आहे, तो कसा आहे, त्याला कसे ओळखावयाचे या संबंधी एकच उत्तर मिळते ते ही सृष्टीतून. ' जशी दृष्टी तशी सृष्टी ! '  त्या काळात अनेक महामानवाला  सृष्टी द्वारे जशी प्रेरणा मिळाली, तसे त्याने  ईश्वराचे रूप मांडले. कोणी सूर्य तर कोणी अग्नी, कोणी सागर तर कोणी आकाश  कोणी शीव तर कोणी विष्णू , कोणी सरस्वती, कोणी लक्ष्मी तर कोणी अंबामाताला देव-देवता मानले.  पण सर्वत्र ' सर्व देवं नमस्कारम केशवं प्रतिगच्छती ' हे सत्य  स्विकारलेले दिसत होते, आजही दिसते. तरीही  शैव, वैश्णव आणि ब्रह्म उपासक असे भेद झाले.  तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश मिळून अत्री आणि अनुसयेचा पुत्र असा दत्तात्रेय अवतरला. अत्री म्हणजे जे तीन नव्हे ते आणि अनसुया म्हणजे समाजात देव-देवतां बाबत जी असुया माजली आहे ती संपून अनसुयेचे राज्य यावे या करिता अवतरले ते दत्तात्रेय. त्यामूळे पुर्वीचे ते भेद आपोआप हवेत विरले. दत्तदेवाचे दुसरे नाव आहे दत्तगुरू. पुढे दत्तभक्तांचा दत्त संप्रदाय अशी ओळख झाली आहे. आपआपल्या गुरूंची प्रतिमा आपल्या वेशभूषाची शोभा वाढते असेच मानले जाते.  पंथ हे विशाल शाश्वत अशा हिंदु धर्मरूपी वृक्षाच्या फांद्या समजल्या जातात ही वस्तूस्थिती आहे. काहीं महामानवांना अशी प्रेरणा मिळाली की ईश्वर अस्तित्वात नाही.  काहीं महामानवांना  ' मुर्ती पुजेची गरज नाही, आपले कर्म हेच ईश्वर ' अशी प्रेरणा मिळाली. हीच ती प्रेरणा गुरू नानकांची. अशा महामानवांचा ही उपदेश त्यांच्या आसपाच्या भूभागातल्या भारत वर्षातील जनतेला  बोधप्रत आणि हितकारक वाटला आणि स्विकारला हेच भारताचे आगळे वेगळे वैशिष्ट. असा उपदेश स्विकारण्यात हिंदुच अधिक होत. मध्ययुगीन काळात जबरदस्तीने ज्यांना मुस्लीम आणि ख्रिश्चन करण्यात आले त्यांच्यापैकी कोणी  शीख- शिकवण स्विकारली असे ऐकण्यात आणि वाचनात ही आलेले नाही. मुर्तीपूजा हे हिंदु धर्माचे व्यवच्छेदक लक्षण मानता येत नाही. कारण नास्तिक ही हिंदू धर्मात हिंदू म्हणून राहू शकत होता आणि आज ही राहू शकतो. त्या बद्दल हिंदुच्या मनांत ना राग आहे आणि ना तक्रार आहे. भक्त शिरोमणी संत नामदेव निर्गुण भक्तीस पात्र ठरले तेव्हा त्यांनी मुर्तीपुजा सोडून दिली.

शीख पंथाचा प्रसार गुरू नानकांच्या जन्मभूमीच्या परिसरात म्हणजेच पाकिस्तान आणि भारताच्या उत्तर-पश्चीम भागात विशेषतः पंजाबात अधिक झालेला दिसतो. गुरू नानकांनी मुर्तीपुजा मानली नाही.  म्हणून तो धर्म  हिंदुतील पंथ नाही, असे सतत  विदेशी शक्तींने मिडीया द्वारें पसरविले आणि आज ही पसरवित आहेत. आपले  दुर्दैव हे आहे की आपल्याच देशातले विचारवंत शीख हा धर्म  हिंदू आणि मुसलमानाच्या समन्वयाने निर्माण झाला आहे असे म्हणतात आणि त्यांचेच हे वाक्य इतिहास विषयाच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थी वाचत मोठे झाले.  एक हजार वर्षे आपण गुलामगिरीत काढले ते अशा बिनडोकांच्या विचारवंतामूळेच. प्रसिद्ध पत्रकार-संपादक- लेखक महाशय खुशवंतसिंगने  १९७७ साली पब्लीश झालेल्या आपल्या History of the Sikh Vol 1 यामध्ये लिहले आहे, की पंजाबचा इतिहास म्हणजे पंजाब राष्ट्रवादाचा इतिहास आहे.  नंतर  The Sikh या पुस्तकात ते म्हणतात शीख मताचा उदय हिंदु धर्मातून झाला असला तरी हे मत इस्लामच्या जवळचे आहे. याच्या बरोबर उलट मत त्याच खुशवंतसिंगनी १९८४ साली Free Press Journal मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्याच लेखात  लिहले आहे की शीख धर्मातील ९०, टक्के विचार हे वेदान्त विचार आहेत. उशीरा का होईना आपल्या एका  विचारवंताला त्यांची चूक कळली.

डाव्या विचारवंतानी आणि विरोधी पक्षाच्या नेतेमंडळीनी लक्षात घ्यावे की जे मुर्तीपूजा मानत नाही ते सुद्धा शेवटी मुर्ती पुजा करयाला लागले आहेत.  डावे पक्ष जवळपास कार्ल मार्क्सची पुजाच करीत आहेत.  लेनिनचा पुतळा ईशान्य भारतात  उभा आहे ना ? बौद्ध बांधव सुद्धा भगवान बुद्धांच्या प्रतिमेची पुजा करीत आहेत की नाही? द्वैत -अद्वैत अशी मतें असणे हे हिंदु धर्माचे व्यवच्छेदक लक्षण आहे. म्हणून अद्वैताचे भाष्यकार आद्य शंकराचार्यांनी पंचदैवतांची कल्पना मांडून पुजा कल्पनेचा प्रसार केला.

मुर्ती पुजा हा तसा भारतियांचा स्थायीभाव आहे. भारत देवभूमी आहे. इथे  ' ज्याची वंदावी पावले '  ' तेथे कर माझे जुळती ' अशा लाखो व्यक्ती जन्मल्या आणि भविष्यात जन्म घेत राहणार आहेत. गुरू नानकांचे भक्तगण  गुरूग्रंथसाहिबाच्या दरबारात भजन, स्तुती स्तोत्र गात आहेत ना !  शीखांची गुरूग्रंथसाहिबाची पुजा ही आपल्या देशात महर्षी व्यासांच्या शिष्यांनी सुरू केलील्या गुरू-शिष्य परंपरेतीलच आहे.  शिखांना ही प्रेरणा मिळाली ती हिंदु' धर्मातूनच. कारण ते हिंदुच आहेत. तसे पाहता  ' जगातले लोक जंगलात राहात होते, तेव्हा भारतात गुरूकुल पंरपरा होती, असे भारतात व्हाॅईसराॅय म्हणून आलेल्या लार्ड कर्झन यांनीच म्हटलेलं आहे. म्हणून मला वाटते  गुरू-शिष्य परंपरा ही हिंदुकडून जगाला मिळालेली देणगी आहे. 
' गुरूः ब्रह्मा गुरूः विष्णू गुरूः देवो महेश्वरा |
   गुरू: साक्षात परब्रह्म  तस्मैश्री गुरवे नमः | 'अशी प्रार्थना वैदिक काळापासून आपल्या इथे प्रचलीत आहे. ही परंपंरा जगभर पसरली. त्यामूळेच प्लेटो अभिमानाने म्हणत माझा गुरू साॅक्रेटीस आहेत,  ऑरिस्टाॅटल छाती फुगवून म्हणत असत की माझे गुरू प्लेटो, तसेच  मिल जेम्सला त्यांचे गुरू जेरेमीचा अभिमान वाटत होता.

शीखांच्या दाहीं गुरूंचे सारे कार्य आणि त्यांची वचनें वाचल्यावरून सहज लक्षात येते की शीख हा हिंदु धर्माचा पंथ आहे.  या लेखातील मूळ विषयाला पुष्टी मिळू शकेल असा गुरूग्रंथसाहीब आहे. म्हणून त्यातील काही निवडक गुरूंची निवडक कार्य आणि वचने  भाग २ मध्ये मांडली आहेत. शिखांचा संपूर्ण इतिहास जाज्वल्य देशभक्तीने ओतप्रोत भरलेला आहे म्हणून तो प्रत्येक भारतियांने वाचावा अशी वाचकांना नम्र विनंती करून मी इथे थांबतो. 
(लेखाचा भाग २ सोबत खाली जोडला आहे)

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

पंजाब मधील निवडणूक --(भाग २) आप पक्षाचे भाग्य


आम आदमी पार्टी संबंधी कोणी किती ही बोटं मोडली तरी ती पार्टी देशाच्या कानाकोपर्यात निवडणूका लढवित आपले चिन्ह पोहचवित आहे हे नाकारता येत नाही.  दिल्लीत त्या पक्षाने सलग दोनदा विजय मिळविला. तसेच पंजाब मध्ये ही गेल्या निवडणूकीत २० जागा पटकाविल्या होत्या. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की राजकीय पार्श्वभूमी नसलेले पण राजकारणात काम करण्याची जबरदस्त इच्छा असेल तर राजकारणात जम बसविता येतो.

केजरीवाल माजी प्रशासकीय अधिकारी असल्यामूळे त्यांनी राजकारण जवळून पाहीले आहे. तसेच देशो-देशीचे मिडीयाचे स्वरूप, तेथील व्यवहार आणि कारभार,  एनजीओंचे स्वरूप तेथील कारभार आणि व्यवहार इत्यादी गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आणि हळूहळू संपर्क साधला. आजचे जग हे व्यापारी तसेच आर्थिक जग मानले जाते. अनेक अविकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक सत्ता किंवा आर्थिक अधिराज्य मिळविणे म्हणजे एक प्रकारे त्या देशांना गुलाम करण्याची एक स्पर्धा आर्थिक दृष्ट्या संपन्न झालेल्या देशांत आहे.  प्रत्यक्ष युद्ध न करता अशा प्रकारचे आपले साम्राज्य निर्माण करण्याची वा वाढविण्याची प्रगत देशांना जडलेली खोड आहे. ही एक विकृती आहे हे मान्य पण या जगात जीवो जिवस्य जिवनम् हाच धर्म मानला जातो त्यावर ' हे विश्वची माझे घर ' हे आपले तत्व राजकारणात कोण स्विकारणार?

विकसनशील तसेच अविकसित देशांच्या राज्यव्यवस्थेत दोष आहेत हे ही मान्य करावे लागते. केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला विदेशी आर्थिक बळ मिळाल्यामूळेच त्यांच्या पक्षाला जम बसविणे शक्य झाले आहे हे निखालस सत्य आहे. समाज सेवक अण्णा हजारेंना चेहरा बनवून  ' इंडिया अगेन्स्ट करप्शन ' ही चळवळ उभारली आणि त्यातून निर्माण झालेला या पक्षाबद्दल लोकांच्या फार अपेक्षा होत्या. पण तेरड्या सारखे रंग बदलत तो ही  शेवटी  पारंपारीक राजकीय पक्षाचे स्वरूप घेऊन  देशात स्थिरावू पाहात आहे. पंजाब मध्ये गेल्या विधानसभेत त्याने पहिल्याच फेरीत २० जागा कमाविल्या होत्या. ही त्या पक्षाची करामत नसून काॅग्रेस आणि अकाली दल यांच्या नाकर्तेपणाचे आप पक्षाला मिळालेले फळ आहे. दुसरे असे आहे की आता केजरीवाल यांच्या पत्नी आणि मुलगा ही आपच्या प्रचार मोहिमेत भाग घेणार आहेत. ही बाब पंजाबी लोकांना खटकणारच. म्हणजेच आप ला बहुमत मिळाले तर पंजाब सरकारवर नियंत्रण गांधी घराण्याकडून केजरीवालांच्या घराण्याकडे जाणार अशी भावना तेथील मतदारात निर्माण होत आहे. त्यामूळे आप पक्ष मोठे यश मिळण्यापासून वंचित राहू शकते. मागील निवडणूकीत केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित न केल्यामूळे पंजाबवासियांना केजरीवाल यांनाच मुख्यमंत्री  व्हावेसे वाटते ही भिती वाटली. म्हणून आप  पक्षाला अनुकूल स्थिती असतानाही त्यांची विजयाची गाडी २० जागावर अडकली.

मागील निवडणूकीत कॅप्टन अरमिंदरसिंगांच्या पाठिशी पंजाब उभा राहीला हे सत्य . पण काॅग्रेसने तो  गांधी घराण्याचा  विजय मानला.  कॅप्टन अरमिंदरसिंग हे निव्वळ स्थानिक उमेदवार आहेत असे नाही तर ते एक कर्तबगार नेते आहेत हे सन १९९८ पासून सिद्ध झालेले आहे. म्हणूनच काॅग्रेसला मागच्या वेळी प्रचंड बहूमत मिळाले होते. या ठिकाणी लोकसभेच्या २००९ ला केंद्रात काॅग्रेस प्रणित आघाडीला पुन्हा सत्ता का मिळाली याचे कारण नमूद करणें आवश्यक वाटते. 

तत्कालीन पंतप्रधान डाॅ मनमोहनसिंगांनी देशाच्या संरक्षणासंबंधी डाव्या पक्षांचा दबाब झिडकारून  अमेरिकेशी जो करार केला तो भारतीय जनतेस भावला. पण डाव्या पक्षांनी डाॅ मनमोहनसिंग सरकारला दिलेला पाठींबा काढून टिका सुरू करण्याचे सत्र अवलंबिवले. सन २९६२ ला साम्यवादी चीनने भारतावर आक्रमण करून भारताचा भाग पादक्रांत केला तेव्हापासून भारतियांच्या मनात साम्यवादी पक्षांबाबत अडी निर्माण झालेली आहे. त्यामूळे डाव्यांनी पंतप्रधान डाॅ मनमोहनसिंगावर केलेल्या यथेच्छ टिकेतून मनमोहनसिंग संबंधी भारतियांच्या मनात सहानुभूती निर्माण झाली. त्यामूळे युपिएला पुन्हा सत्ता मिळाली. 

पण गांधी घराण्याने तसेच काॅग्रेसमधील त्या घराण्याच्या निष्ठावंतानी तो सोनियांच्या करीष्माचा विजय मानला. नुसता विजय मानलाच असे नव्हे तर राहूल गांधीमध्ये इतका अंहकांर वाढला की ते पदोपदी पंतप्रधान  मनमोहनसिंगाचा  अपमान करू लागले. राहूल गांधीची सरकारच्या कारभारात लुडबूड वाढू लागली. त्यातच सरकार दरबारात भ्रष्टाचार ही प्रचंड वाढला. परीणाम काय झाला, काॅगेस नामशेष झाली. आज ही गांधी घराण्याचा अंहकार कमी होताना दिसत नाही. इथे काॅग्रेसने केलेल्या चूकीचा उल्लेख केला याचे कारण आम आदमी पार्टी काॅग्रेसेचीच मतें कापणार आहे. काॅग्रेसने कॅप्टन अरमिंदरसिंगासारखा मोहरा ही गमाविला. पण त्यांच्या मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांना चन्नीच्या सरकारमध्ये स्थान ही दिले. इतकेच नव्हे तर काॅग्रेस सर्व सिटींग आमदारांना तिकट वाटप ही करणार आहे. याचा अर्थ काॅग्रेस अरमिंदरसिंगाना एकाकी पाडून आपले अस्तित्व शाबूत करीत आहे. पण हा प्रकार ' बाटली नवी पण दारू जुनीच ' असा वाटतो. काॅग्रेसच्या या धोरणामूळे आप पक्षाला फायदा होईल असे आतापर्यंतचे सर्वे ओपिनियन पोल सांगत आहेत. या शिवाय भविष्यात कॅप्टन अरमिंदरसिंगचा कोणी वारसाने पक्ष काढला तर पंजाबमध्यें काॅग्रेसची अवस्था आन्ध्र आणि तेलंगणात आहे तशी होईल. 

या सालच्या निवडणूकीत आप बर्यापैकी जागा घेईल असे मानले जात असले तरी या पक्षाचे नियंत्रण दिल्लीत असल्यामूळे तिकीट वाटपावरुन या पक्षातील उमेदवारांची जी निवड झाली आहे त्यासंबंधी पक्षात नाराजी आहे. एक तर या पक्षाची संघटन बांधणी कच्ची आहे. आपचे उमेदवार राजकारणातले नवखे आहेत.  त्यामूळे ज्यांना तिकीट मिळाले नाही असे नेते आपल्या स्थानिक कार्यकर्त्यासोबत आप चा नाद सोडतात आणि वेळप्रसंगी अपक्ष म्हणून निवडणूकीत उभे राहण्यासाठी फार्म ही भरतात. इतकेच काय निवडून आलेले आमदार First timer असल्याने पक्षातंर ही करण्याची शक्यता अधिक आहे. पंजाबात काॅग्रेस आणि अकाली दलासारखे  फ्रोफेशनल राजकीय पक्ष आपच्या आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न करतील. केजरीवालांनी मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार म्हणून भगवान मान यांची  ज्या पद्धतीने निवड केली त्याबाबत फारसे कौतूक झाले नाही. कारण तो एक स्टंट आहे हे कळण्या इतके लोक खुळे राहिले नाहीत. मुख्यमंत्री पदाचे घोषित उमेदवार भगवान मान यांना फार मोठा नेता मानला जात नाही. ते फक्त शिख आहे हीच काय ती जमेची बाजू. भगवान मान यांना काॅग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदरसिंगांने आणले असे दस्तूरखुद्द कॅप्टन अरमिंदरसिंगांनी लल्लन टाॅप चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यामूळे  भगवान मान फितूर आहेत असा प्रचार करण्याची संधी चरणजीत सिंग यांना प्राप्त झाली आहे. भगवान मान असो वा चरणजीतसिंग चन्नी हे दोन्ही नेते सोबर आहेत असे कॅप्टन अरमिंदरसिंग म्हणत आहेत पण त्यांच्यात मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची कुवत नाही अशी पुष्टी कॅप्टन अरमिंदरसिंग जोडतात. कॅप्टन प्रचार सभेत हे दोघे नेते दिल्लीतील त्यांच्या श्रेष्ठींचे होयबे ठरतील ही बाब ही सविस्तरपणे स्पष्ट करतील असे दिसते. पंजाबात जात-धर्म असे धृविकरण होणार नसले तरी पंजाबवासियांना आपल्या अस्मितेचा अभिमान आहे. ही नस ओळखून कॅप्टन अरमिंदरसिंग आपल्या प्रचाराची दिशा आखत आहेत हेच त्यांनी लल्लनटोप चॅनेल्सला दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट दिसले आहे. याचा अर्थ हा आहे की निवडणूकीच्या निकालाचे अंदाज बांधतांना कॅप्टन अरमिंदरसिंग यांना पुर्णपणे राईटऑफ करणे चूक ठरू शकते. अर्थात प्रत्यक्ष पंजाबात मी काही जाऊन आलेलो नाही त्यामूळे माझे हे विधान ही चूक ठरू शकते.

आप असो वा किसान मोर्चा असो अशा नवीन पक्षांसमोर अनेक वर्षे पंजाब राज्यातल्या जटील समस्यां ज्याचा उल्लेख पहिल्या भागात केला आहे, त्याविषयीची अपेक्षा मतदार करीत नसतात हा त्यांचा एक फायदा असतो.  काॅग्रेस आणि अकाली दल सुस्ती चढल्यासारखे दिसू लागल्यामूळे लोकांची नव्याची हौस भागविली जाईल हे नाकारता येत नाही. तसेच दिल्लीतील या पक्षांच्या कारभाराबद्दल लोकात कुतूहूल आहे. पण आप पक्षाला कार्यकर्त्यांची वानवा आहे. त्यातच पक्षाच्या स्थापनेपासून जे कार्यकर्ते नोंदले गेले होते त्यांच्यात मागील निवडणूकीतला जोश दिसत नाही अशी नोंद राजकीय अभ्यासकांनी केलेली आढळली. तसेच एक खांबी पक्ष अशी टिप्पणी पंजाबी भाषेत ऐकू येत आहे. तरीही आप पक्षाला ३५ ते ४० जागा मिळतील असा काही सर्वेचा अंदाज आहे. तो अर्थातच पंजाब मधील मतदार काॅग्रेस आणि अकाली दल या पक्षांच्या कारभाराला कंटाळलेले दिसत असल्याने बांधला असावा.  तामिळनाडूत डीएमके किंवा एडीएमके याचा landslide सारखा विजय-पराजय होत असतो तशा प्रकारचे मतदानाचे दर्शन होते  पंजाबात अजून तरी दिसले नाही आणि तशी द्विपक्षीय रचना भविष्यात ही दिसेल असे वाटत नाही. पुढील भागात अकाली दल -- बसपा आघाडी संबंधीत चर्चा करणार आहोत आणि शक्य झाल्यास त्यासोबत भाजपा कुठपर्यंत मजल मारू शकेल याचा ही समावेश करीन. 

पंजाब मधील निवडणूक -- (भाग १) काॅंग्रेसचे भवितव्य


देशातील पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मणिपूर आणि गोवा या राज्यांच्या  विधानसभा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचतो आहे. उत्तर प्रदेशात पहिल्या चरणाचे मतदान ही पार पडले आहे.  या पाचही राज्यातील जनतेचा कल काय आहे यासंबंधी अनेक न्यूज चॅनेल्सवरून आपण ऐकले आणि पाहिले आहे. ' कल ' चा अर्थ ' मन काय सांगते '  हा आहे. मन शरीराच्या कुठच्या भागात आहे याचा ठाव विज्ञान घेऊ शकलेलं नाही. ओपिनियन पोलच्या सत्यतेबाबत राजकीय पक्ष आपआपल्या सोयीनुसार प्रतिक्रीया देत असतात. ओपिनयन पोल खोटेच ठरतात असे ठामपणे म्हणता येत नाही. कारण जी पद्धत ओपिनियन पोल साठी वापरली जाते त्याला आधूनिक विज्ञान तसेच गणिताचा आधार असतो. त्यालाच Law of probabilty असे आकडेशास्त्रात म्हटले आहे. म्हणून पुष्कळदा राजकीय अभ्यासक ओपिनयन पोलचा चर्चेत आधार घेत असतात. म्हणून  मी लेखाच्या शिर्षकाच्या वरती ओपिनियन पोल चे चित्र ठेवले आहे. पुष्कळदा राजकीय पक्ष निवडणूकीतला जनतेचा कौल कचरापेटीत टाकतात आणि सत्ता हस्तगत करतात. म्हणून जिथे जनतेचा कौल स्पष्ट येणाची शक्यता नाही तिथे सत्ता कुठल्या आघाडीला मिळू शकते हे ही या चर्चेत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच पाच राज्यातील निवडणूकाचे पक्षनिहाय स्वरूप तसेच पक्षांची आतापर्यंतची वाटचाल आणि पक्षांची विद्यमान संघटनशक्ती इत्यादी बाबी वर चर्चेत भर दिलेला दिसेल. प्रथम आपण पंजाब राज्यातील पक्षनिहाय चर्चेला  सुरूवात करीत नंतर क्रमशः उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मणिपूर आणि शेवटी गोवा करून या चर्चेची सांगता करू या. अशा प्रकारची चर्चा लांबली जाईल म्हणून प्रत्येक राज्यासाठी पक्षनिहाय स्वतंत्र चर्चा पण संक्षिप्त रित्या मांडून पुढील सप्ताहात या लेख मालिकेची सांगता करण्याचा माझा प्रयत्न राहील. कदाचित या चर्चेत एक दोन दिवस वाढण्याची शक्यता आहे पण त्या संबंधींत आपण कुरबूर न करता माझी अडचण समजून घ्याल अशी मी आशा बाळगतो.

अलीकडील पंजाबच्या निवडणूकीचे स्वरूप काॅग्रेस आणि अकाली दल या दोन पक्षातील लढत असे राहिले आहे . परंतु या सालच्या निवडणूकात काॅग्रेस, अकाली दल - बसापा आघाडी, आम आदमी पार्टी, किसान मोर्चा, आणि  भाजपा-कॅप्टन अरिमंदरसिंगाचा पक्ष अशी पंचकोनी लढत होत आहे. अशा पंचकोनी लढतीमागील मुख्य कारण काॅग्रेस आणि अकाली दलाची सुरू झालेली घसरण हे होय. काॅग्रेसचे अस्तित्व पंजाबच्या प्रत्येक गावात  शहरातील प्रत्येक प्रभागात तसेच प्रत्येक जाती-पथांत आहे. परंतू बराच काळ द्विपक्षीय लढत राहील्यामूळे पंजाबात काॅग्रेस आणि अकाली दलाच्या सत्तेच्या काळात अनेक समस्यांनी उग्र स्वरूप धारण केलेले दिसते. सेकंड ग्रीन रेव्हूलेशनचा नुसता बोलबाला झाला. ना ऑर्ग्यानिक शेती, ना ॲग्रोबेस इंडस्ट्रीयालझेन झाले.  ट्रॅडीशनल पद्धतीची शेती, जमिनीचा घटत जाणारा कस, पिकांचा खालावत जाणारा दर्जा, उद्योग क्षेत्राची खालावलेली प्रगती, बेकारी,  शिथिल आणि बेफिकीर प्रशासन, भ्रष्टाचार, बेकारीमूळे युवकामध्यें वाढत जाणारी ड्रग्ज ॲडीक्शन व त्यातून निर्माण झालेल्या आरोग्याच्या तक्रारी,  ड्रग्ज तस्करी, आणि खलिस्तान चळवळीकडे आकृष्ट होण्याचे वाढते प्रमाण, उद्योगधंद्यातील परकीय गुतंकवणीचा अभाव, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न इत्यादी समस्यांचे आपल्याला सोयर-सुतकच नाही अशाच थाटात काॅग्रेस आणि अकाली दलाच्या नेत्यांचे वर्तन नित्याचे झालेले दिसते. विद्यमान काॅग्रेस सरकारच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी शेतकर्यांच्या आंदोलनात उघड भाग घेतला नाही पण  पडद्यामागून शेतकर्यांच्या आंदोलनाला समर्थनाऐवजी विदेशी शक्तीचा प्रभाव विशेषतः खलिस्तान चळवळीचा कसा वाढेल यावरच अधिक लक्ष केंद्रीत केले अशी भावना छोट्या शेतकर्यांना झालेली दिसते. किसान आंदोलन हे विदेशी शक्तीच्या फंडातून होत असल्याचे आंदोलनजिवी शेतकर्यांना कळले. तेव्हाच शेतकर्यांचा स्वतंत्र पक्षाचे बीज रोवले गेले असावे. आंदोलनजिवी शेतकर्यांच्या नेत्यांना ही मिडीयात चमकण्याची संधी ही मिळाली. शेतकर्यांचा पक्ष स्थापन होण्यात वरील दोन कारणें महत्वाची ठरली आहेत. असे नवीन पक्ष राजकारणात फार काळ टिकत नाहीत हा इतिहास असला तरी तो पक्ष जी काही मतें खाईल ते मुख्यत्वे करून काॅग्रेस आणि अकाली दलाचीच खाणार आहे. आप पक्षच मुळी 'इंडीया अगेंस्ट करप्शन ' या चळवळी द्वारें विदेशी फंडातून जन्मला आहे. त्यामूळे आप पक्ष बहुतांश राज्यातील निवडणूकांत भाग घेत असतो. केंद्र सरकारने  कृषी बिल्स मागे घेऊन ही पंजाब मध्यें अकाली दलाने भाजपाशी घेतलेल्या काडीमोड वर पुनर्विचार केला नाही. त्याबद्दल भाजपाने हळहळ व्यक्त केली नाही म्हणून त्यावर चर्चा करण्याची गरज नाही. पण भाजपाशी वैर निर्माण करण्याची इच्छा आणि स्पर्था करण्यात सारे विरोधी पक्ष गुंतलेले आहेत. त्यातही नव्याने निर्माण होणार्या पक्षांचेही स्वरूप भाजपाशी वैर राहणार असल्याने भाजपा विषयी सहानूभूती वाढत जाते. शिवाय निवडणूकीतल्या मतांच्या गणिताचा विचार करता भाजपा विरोधी मतांचे विभाजन होत राहते त्यात नव्या पक्षांचे भर होऊन मतांचे विभाजन वाढते.  हा प्रत्येक राज्यातील अनुभव आहे. भाजपाला एक प्रकारे प्रत्येक प्रांतात स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळत आहे. आतापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधान ठरलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाची सत्ता केंद्रात असल्यामूळे मिळालेल्या संधीचा उपयोग भाजपा घेणार यात नवल ते कसले?

पंजाबात काॅग्रेसचा बेस सर्व जाती-जमातीत आहे. म्हणून काॅग्रेस स्वबळावर निवडणूक लढवित आहे. त्यात सर्व सिटींग आमदारांनाही काॅग्रेस तिकीट देणार असे ऐकीवात आहे.  अकाली पक्षाचा जन्म प्रांतीय अस्मितेतून झाला आहे त्यामूळे त्याचे ही पंजाबात पाळेमूळे खोलवर रूजलेली आहेत.  तरीही त्याने बर्यापैकी दलित समाज असल्यामूळे  बसपाशी आघाडी केली आहे.  काॅग्रेसने कॅप्टन अरमिंदरसिंगाना राजीनामा देण्यास भाग पाडल्यामूळे  त्यांनी स्वतःचा पक्ष काढून भाजपाशी आघाडी केली आहे. भरीस भर म्हणून शेतकर्यांचा पक्षाची भर पडली आहे.  अशा या पंचकोनी लढतीतील सर्वात जूना आणि देशभर व्याप्ती असलेल्या काॅग्रेस पक्षाची स्वरूप, शक्ती आणि निवडणूकीतले धोरण कसे आहे ते पाहू या.

काॅग्रेस पक्ष सतत स्वातंत्र्य पुर्व कालीन पुण्याईचा प्रत्येक राज्यातील निवडणूक प्रचारात उल्लेख करीत आला आहे. पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यातच गांधी घराण्याची मक्तेदारी संपावी हा हेतू साध्य करण्यासाठी काॅग्रेसच्या मित्र पक्षाचे तसेच काॅग्रेस पक्षांतर्गत नेते प्रयत्न करीत आहेत. त्यामूळे  काॅग्रेस जशी देशभर कमजोर होत गेली तशीच पंजाब मध्ये होत आहे.  जिथे जिथे काॅग्रेसचे सरकार आहे त्या प्रत्येक राज्यात काॅग्रेसचे गांधी घराणे मनमानी करीत असल्यामूळे काॅग्रेस खिळखिळी होत आहे. पंजाबात ही तेच घडले. वस्तुतः मागच्या विधान सभा निवडणूकीत कॅप्टन अरमिंदरसिंगच्या करीष्मामूळे पंजाबात विजय झाला होता. आपण जे म्हणू तेच झाले पाहिजे, आपण म्हणू तोच मुख्यमंत्री होईल या धोरणामूळे प्रत्येक राज्यातील माजी मुख्यमंत्री अथवा माजी मुख्यमंत्र्याचा वारस  काॅग्रेसला रामराम ठोकत दुसर्या पक्षात जातो किंवा नवीन पक्ष काढतो. पंजाबात तेच घडले. आता कॅप्टन अरमिंदरसिंगची लोकप्रियता किती राहीली आहे हा ही एक प्रश्न आहेच म्हणा ! पण मग काॅग्रेसने अरमिंदसिंगाना लौकर बदलावयास हवे होते असे राजकीय अभ्यासक म्हणत आहेत. ते पटते. निवडणूका जवळ येत आहेत हे माहित असुनही फक्त तीन महिन्यासाठी  चरणजीतसिंग चन्नींना मुख्यमंत्री करून काॅग्रेसने काय मिळविलं ?

नवज्योतसिंग सिध्दु एक स्वयंभू आणि वादग्रस्त नेता. त्याच्या भरवश्यावर काॅग्रेसला खलिस्तान चळवळ उभी करणार्या विदेशी टोळीशी सख्य जमविता आले अशी ऐकीव बातमी आहे.    देशाच्या सुरक्षेसंबंधात बिघाड निर्माण करणार्या अशा टोळींशी काॅग्रेसचे सूत जमले असावे आणि ही माहिती पंतप्रधानांच्या कानीं अरमिंदरसिंग मार्फत गेली असण्याची शंका काॅग्रेसला सतावित होती. म्हणून कॅप्टन अरमिंदरसिंगला मुख्यमंत्री पदावरून हटविण्यात आले असावे. पण दलित मुख्यमंत्री हवा ही जाणीव काॅग्रेसला ऐन निवडणूकीच्या वेळी का भासली ? मला वाटते कि कॅप्टन अरमिंदरसिंग यांना दूर सारून मुख्यमंत्रीपद घेण्यासाठी इतर जेष्ठ काॅग्रेस नेते तयार झाले नसावेत. म्हणून चन्नींच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली असावी. खुद्द चन्नींना आपण दलीत आहोत असे सांगण्यापेंक्षा आपण शिख आहोत हेच मिरविणे अधिक श्रेयस्कर वाटत आहे. त्यातही अकाली दलाचे सामर्थ्य असलेला जमीनदार जाट वर्गाचा प्रभाव (दबाव)  दलित मतदारांवर पडत आलेला आहे, त्यावर चन्नी लागलीच मात करू शकणार नाहीत. 

काॅग्रेसच्या पंजाबमधील ताकदीचा विचार करते वेळी राहूल गांधीच्या महत्वाच्या बैठकीस पाच खासदारांची अनुपस्थिती काय दर्शवित आहे यावर चर्चा करणे भाग आहे. वादग्रस्त नवज्योतसिंग सिध्दुला डोक्यावर घेतले आणि मग रणजितसिंग चन्नींची मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अशी घोषणा करीत सिध्दुला वाळीत टाकले. त्यामूळे नवज्योतसिंग सिध्दू दुखावले असणारच आणि काॅग्रेस समोर काहीतरी विघ्न उभे करण्याचा प्रयत्न करेल असे मानले जात आहे.  एवीतेवी काॅग्रेसला दलित समाजाची बर्यापैकी मतें  मिळत होतीच. त्यासाठी तडकाफडकी दलित चन्नीच्या मागे उभे राहणे म्हणजे पंजाबच्या सोशल पाॅवर स्ट्रक्चरला आव्हान दिल्यासारखे झाले आहे, असे काही राजकीय अभ्यासकांचे मत आहे. यात सत्यांश आहे.  पण मला वाटतं काॅग्रेस श्रेष्ठींना वाटले असावे की एवेतेवी ॲन्टी इन्कबन्सीला तोंड द्यावे लागतच आहे मग भावी काळात पंजाब मधील दलित मतांचा बेस वाढविण्याची सोय आताच ठेवली तर काय बिघडते ? पण या खेळीं मूळे काॅग्रेस पंजाबात कुठल्या मुद्यावर निवडणूका लढवत आहे हे अधिक धूसर होत आहे. कॅप्टन अरमिंदरसिंग च्या कारकिर्दितील  काही लोककल्याणकारी कामाची यादी काॅग्रेसने लोकासमोर मांडली तर अरमिंदरसिंगच्या पक्षाला मते जातील आणि जर अरमिंदरसिंगावर टिका केली की काॅग्रेस स्वतःच्याच सरकार वर टिका करीत आहे, असा संदेश मतदारांमध्ये जाईल. त्यामूळे काॅग्रेसची स्थिती फारच विचित्र झाली आहे.

मागच्या लेखात मी मांडले आहे की काॅग्रेस उत्तर प्रदेशात स्वबळावर लढते आहे याचा अर्थ  काॅग्रेस सत्तेसाठी अधिक काळ वाट पाहण्यास तयार झाली असावी. तोच अर्थ चन्नीना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरविण्याच्या निर्णयातून निघतो आहे.  दुसरे असे की देशातला मुख्य पक्ष भाजपा ज्याला काॅग्रेस कट्टर शत्रू मानते त्याचे पंजाबात स्थान नगण्यच असल्यामूळे पंजाब मध्ये लांबचा रस्ता काॅग्रेसने निवडला असावा. काॅग्रेसला उत्तर प्रदेशात पुन्हा उभारी मिळण्यासाठी फार कष्ट उपसावे लागत आहेत. म्हणून पंजाब बाबत काॅग्रेस श्रेष्ठीनी उगीच अधिक शक्ती का खर्च करावी असा हिशोब केलेला दिसतो. अगोदरच २३ मातब्बर नेते काॅग्रेस पासून  दूर झाले आहेत. या शिवाय इतर नेत्यांना प्रचारसभात सहभागी न करण्याचे धोरण कांग्रेसने अवलंबिवले आहे. त्यामूळे प्रचाराचा सारा भार  राहूल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रावर पडतो आहे.  त्यात काटछाट करणे हा उपाय जो उरला तो काॅग्रेसने स्विकारलेला दिसतो. पंजाब मध्ये कोणत्याही  पक्षाला स्पष्ट बहूमत नाही मिळाले तर किंग मेकरची भूमिका वटविता येईल हेच काॅग्रेसचे धोरण राहील. पण त्यातून काॅग्रेसचे निवडून येणारे आमदार स्वकर्तृत्वाचा आव आणण्याची शक्यता वाढेल ज्यातून त्यांना पक्षांतर करण्याची ताकद प्राप्त होईल. अशांचा काॅग्रेस कसा अटकाव करणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. इथेच नवज्योतसिंग सिध्दू काही आमदारांना फोडून आप पक्षासोबत जाण्याचा धोका आहे.

काॅग्रेस साठी काळ कसा आलाय तो पाहा. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी मतांसाठी शिख बांधवाच्या अकाल तख्तामधील स्पर्धेत नाक खुपसले आणि भिद्रनवाल्यांना हाताशी धरले. पुढे भिद्रनवाले खलिस्तानाचे खंदे समर्थक बनत  भस्मासूर होत गेले. त्यांना  नामशेष करण्यासाठी सुवर्णमंदिरात लष्कर धाडले. ते यशस्वी झाले. त्यातून शिख दुखावले गेले. त्यातून इंदिराजींची हत्या झाली. आता त्यांचेच नातू आणि नात  त्याच खलिस्तान समर्थकांशी चीन आणि पाकिस्तानच्या सांगण्यावरून पैसा आणि सत्तेसाठी काॅग्रेस जवळिक साधत आहे. गेल्या विधानसभेत ७७ जागा पटकाविणारा काॅग्रेस या निवडणूकीत निम्म्या जागा गमाविणार असे विविध सर्वे सांगत आहेत. एकंदरीत पंजाब मध्ये काॅग्रेसला चरणजीत सिंग चन्नीला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करून काही फायदा होईल असे दिसत नाही. त्याच बरोबर अरमिंदरसिंगाना हटविण्याचा ही फायदा काही होईल असे दिसत नाही. उलटपक्षी काॅग्रेसला तोटाच होण्याची शक्यता अधिक आहे. पंजाबात काॅग्रेस स्वबळावर सत्तेवर येणार नाही असे स्पष्ट दिसते. पण भाजपाचं स्थान नगण्यच राहिले तर काॅग्रेसला इतर पक्षांची मदत घेता येईल आणि तशी मदत काॅग्रेस घेऊन सरकार स्थापेल. कॅप्टन अरमिंदरसिंग आणि भाजपा च्या युतीला अनपेक्षित यश प्राप्त झाले तरच  काॅग्रेस सत्तेपासून दूर राहील पण तसे सध्या तरी संभवत नाही. एकूण चर्चेचे सार इतकेच की काॅग्रेसला पंजाबात स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही.

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

सर्वोच्च न्यायालयाचा मविआला तडाखा आणि भाजपाच्या हातीं हातोडा

 


राज्य सरकार आणि केंद्र सरकार मधील बखेडा संबंधीतल्या याचिकेवर न्यायालय, बर्याच वेळी  राज्य सरकारला फटकारते असे मी मागील लेखात म्हटले होते. त्याचे प्रत्यंतर महाराष्ट्र राज्य विधानसभेने भाजपाच्या बारा आमदारांचे केलेल्या निलंबन संबंधीतल्या याचिकेचा सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्यावरून आले आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा हिसका प्रथमच दाखविला असावा.


कोणाही  व्यक्तीला जनप्रतिनिधी कायद्यानुसार  मिळालेले जनप्रतिनिधीत्व, कुठलेही सरकार ५९ दिवसां पेक्षा अधिक काळ रद्दबादल करू शकत नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. याला एक अपवाद आहे तो म्हणजे निवडणूकीतला विजय गैर पद्धतीने प्राप्त केला आहे असे सिद्ध झाले तर न्यायालय त्या उमेदवाराची म्हणजेच नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री अगदी देशाच्या पंतप्रधानवरील व्यक्तीची निवड रद्द करून पुढे निवडणूक लढविण्यास काही वर्षे प्रतिबंधित करू शकते. माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी ची १९७१ सालच्या लोकसभेच्या निवडणूकीत आचार संहितेचा भंग तसेच काही गैरप्रकार सिद्ध झाल्यामूळे अलाहाबाद हायकोर्टने त्यांची निवड रद्द केली होती.  महाराष्ट्र राज्यांनी गेल्या जुलै महिन्यात भाजपाच्या बारा आमदारांचे केलेले निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. हा निकाल लक्षणिय मानला जातो. उठसुठ सत्ताधारी पक्षाला विधानसभा-विधान परिषद, लोकसभा-राज्यसभा इत्यादी वरील पिठासन अधिकारा मार्फत विरोधी पक्षांच्या आमदार - खासदारांचे निलंबन करता येणार नाही. लोकशाही एक अशी राज्यव्यवस्था आहे की तेथील न्यायव्यवस्था बर्याच वेळा मुजोर सत्ताधारी पक्षावर अंकूश ठेवू शकते हे या निकालाने सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने निर्णय देताना पीठासन अधिकार्याचा हक्काचा आम्ही सन्मान करतो पण ५९ दिवसाहून अधिक काळ जनप्रतिनिधीच्या निलंबनाने ज्या मतदार संघातून जनप्रतिनिधी निवडून येतो तेथील जनतेला एक प्रकारे वार्यावर सोडले जाते हे चूकीचे आहे. हे ही न्यायालयाने आपल्या निकाल पत्रात नमूद केले आहे. याचा अर्थ न्यायालयाने सरकारच्या कारभारात हस्तक्षेप न करता हा निकाल दिला आहे.  या ऐताहासिक निर्णयाने आजच्या राजकीय स्थितीवर विशेषतः महाराष्ट्र, पश्चीम बंगाल, दिल्ली आणि पंजाब मधील राज्य सरकारांनी केंद्र सरकाराशी उभा केलेल्या बखेडावर काय परिणाम होतील, यावर आपण चर्चा करू या. चर्चा अर्थातच राजकीय खेळीं संबंधीत असेल.

वरील नमूद केलेल्या राज्यातील सरकारांचे केंद्र सरकारशी खटके उडत आहेत हे आता जगजाहिर झाले आहे.  त्यामूळे न्यायालयाच्या या ऐताहासिक निकालावर जगभर ही चर्चा होणार आहे. बीबीसीचे  मार्क टूली सारखे जेष्ठ पत्रकार आणि राजकीय अभ्यासक निश्चीतच आपल्या येथील विरोधी पक्षांना झोडपणार आहेत. आपल्या देशात ज्या काही विदेशी शक्तींच्या लाॅब्या आहेत त्यांचे मुकादम बुचकळ्यात पडले असावेत. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी गेली सात वर्षे दाही दिशा मोदी सरकारला सळो की पळो करून सोडत असताना ही पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कमी होत नाही. पश्चीम बंगाल मध्ये नाना क्लृप्त्या लढवून ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या. पण त्यांच्या माथ्यावर पोस्ट इलेक्शन झुंडशाही संबंधी स्वतंत्र चौकशी समितीची टांगती तलवार आहे. ममता बॅनर्जीच्या कार्यकर्त्यांनी जो धुडघूस केला त्यासंबंधी केद्रिय मानवाधिकार आणि राज्यपाल ही स्वतंत्रपणे चौकशी करीत आहेत. या प्रकरणात ममता बॅनर्जीवर फौजदारी खटला ही पुढे-मागे दाखल होऊ शकतो इतकं हे प्रकरण गंभीर आहे.

महाराष्ट्रातल्या बारा आमदाराचे निलंबन रद्द केल्याचा निकाल आला. पण  शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊतांनी या निकालावर प्रतिक्रीया देताना म्हटले की  'आम्ही विधानसभेच्या सेक्रेटरींचे काय मत आहे हे जाणून घेऊ.'  मविआ सरकार मधील कोणी एक नेता बहूधा नवाब मलिक मिडीया समोर येतील आणि म्हणतील ' संजय राऊत हे काही महाराष्ट्र सरकारचे प्रवक्ते नाहीत.' नवाब मलिक इतकं बोलून पत्रकार परिषद मधून आपला पाय काढता घेतील. इतकं मविआ सरकार कोडगं बनले आहे.  महाराष्ट्रातल्या मविआ सरकाराचे वर्तन दादागिरीच्या थाटातले आहे. याचे कारण  'आम्ही वाघ आहोत ' असे विद्यमान मुख्यमंत्री सतत म्हणत असतात. तर  'आम्ही टगे आहोत ' आहोत असे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार अधुन-मधून म्हणत असतात.  वाघाचा शब्दशः अर्थ जंगालातील एक हिंस्त्र पशू तर टगे शब्दाचा अर्थ  साधारणपणे  गुंड  हा असावा. मग यांना समजाविणार कोण? 

तिथे पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना मोदी, भाजपा आणि संघ विरोधी मिडीयाने वाघिण ही उपाधी दिली आहे. त्यामूळे त्यांचे ही वर्तन दादागिरीच्या थाटातलेच असते. पश्चीम बंगाल मध्यें विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर हिंदु बांधवावर जे अमानुष अत्याचार झाले, त्यावर ममता बॅनर्जींनी ' या हिंसाचाराला निवडणूक आयोग जबाबदार आहे,  कारण माझा शपथविधी झाला नव्हता ' अशी प्रतिक्रीया दिली होती. तीच प्रतिकीया आता त्यांना नडणार आहे. त्यांच्या अंहकाराचा आकार इतका विस्तारला आहे की, राष्ट्रीय पातळीवर  सर्वानुमते आपण विरोधी पक्षाचे प्रमुख बनु आणि मोदी सरकार तसेच न्यायालयाचे ही धाबे दणाणून सोडू अशा थाटात त्या राष्ट्रीय पातळीवर राजकारण करण्यासाठी कलकत्त्याच्या बाहेर पडल्या. परंतु काॅग्रेस सकट सर्वच विरोधी पक्षांनी त्यांना अप्रत्यक्ष रित्या कात्रजचा घाट दाखविला. गमतीचा भाग असा आहे की ज्या मिडीयाने ममता बॅनर्जींना आक्रमक, झुंजार वाघिण या पदव्या दिल्या तीच चॅनल्स काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस, अखिलेश, शिवसेना, डावे पक्ष इत्यादींचे समर्थक आहेत. म्हणजे भाजपा विरोधी मिडीया विरोधी पक्षांशीच डबल गेम खेळतेय. पण त्यात मिडीयाचा दोष नाही.  कारण त्यांचे मुकादमच बुचकळ्यात पडले आहेत हे मी वर नमुद केलेले आहेत. पश्चीम बंगाल मध्ये ममताला उभरती हुई प्रधानमंत्री असे सर्टीफिकेट दिले. बिहारमधील नितीशकुमारला भावी पंतप्रधान म्हणून गौरविले. ते थकले आणि आता भाजपाने दिलेले मुख्यमंत्रीपद घेतले आणि निवृत्त होतील. बिहारमध्यें तेजस्वी यादवला प्रोजेक्ट केले पण शेवटी भाजपाने थेट तेजस्वी यादवाच्या पक्षाच्या आमदांरची संख्या गाठली.  आता अखिलेश यादवाची लाट आहे असे प्रोजेक्शन करीत आहेत. काही भाजपा विरोधी संपादक आणि पत्रकार असे आहेत की  ते स्पष्टपणे भाजपाच उत्तर प्रदेशमध्ये बाजी मारणार असे सांगतात. 

प्रमुख विरोधी पक्षांनी ममता बॅनर्जीना प्रतिसाद नाकारल्यामूळे  ममता बॅनर्जीना आपण वाघीण तर नाहीच पण वाघाची मावशी सुद्धा नाही हे कळले असावे. निदान खर्या वाघाच्या मावशीला म्यांव, म्यांव अशी विनविण्याची भाषा तरी जमते. तो प्रकार ममता बॅनर्जीना कसा जमणार ? आणि जमला तरी समोर दया-माया करणारा वाजपेयी-अडवाणीचा भाजपा नाही. आताचा भाजपा पश्चीम बंगालमध्यें एक तगडा विरोधी पक्ष म्हणून उभारून आला आहे. त्यामूळे ममता बॅनर्जींची अवस्था निदान राष्ट्रीय पातळीवर अडगडीत पडल्या सारखी झालेली दिसेल. ममता बॅनर्जींनी दिल्लीत प्रथम पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यावेळी त्या फारशा दबावाखाली नसाव्यात पण पंतप्रधान मोदींनी  त्यांचा पक्ष पुर्वीच्या एनडीएचा घटक होता ही आठवण करून देत बंगाल मधील हिंदुवर झालेल्या अत्याचारांबद्दल कडक शब्दात नाराजी व्यक्त केली असणारच. अशा भेटीतला तपशील बाहेर येत नसतो. आता सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दिलेल्या निकालामूळे आपल्याला ही असाच फटका न्यायालया तर्फे मिळेल या भितीने ममता बॅनर्जी ग्रासल्या जाणार आहेत.  राजकारणात कोर्टाने फटकारलेल्या पक्षाला नेस्ताबूत करण्याची संधी सत्ताधारी पक्ष सोडत नसतो. विद्यमान केंद्र सरकार सुडाच्या भावनेने नव्हे तर पश्चीम बंगालमधील हिंदु समाजावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी निश्चीतपणे प्रयत्नशील राहील. यात राजकारण तर राहणारच आहे. कारण सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीतल्या प्रचारासाठी भाजपाला ममता बॅनर्जीनी आयतेच धृवीकरण करून दिलेले आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांचा नेता बनण्याची इच्छा झालेली नसावी. पण ते अशा तोरात वागत आहेत  की दिल्लीतील मोदी सरकार फक्त त्यांच्या पाठींब्यावर अवलंबून आहे. वाजपेयी सरकारच्या काळातल्या मिजाशीत राहणार्या चंद्राबाबू नायडूंची मोदी सरकारने औकात काय आहे हे दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर  विधान सभेत जाण्याऐवजी  मागच्या दारातून विधान परिषदेचे सदस्यत्व स्विकारले. ते ही राज्यपालांच्या कोट्यातून. असा हा आगळा वेगळा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री. पाच वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्तेचा उपभोग घेऊन सतत मोदी सरकारवर टिका केली पण विधानसभेतील आपल्या पक्षाचे बळ पंच्चावन्न संख्येच्या पुढे गेलं नाही ते ही भाजपाशी युती करूनही.  याचे कारण शिवसेनेची दानत लोकांनी तेव्हाच जोखली होती. आता तर स्वपक्षातील बडे नेतेच मुख्यमंत्र्यावर टिका करू लागले आहेत. सरकाराचा कारभार मुख्यमंत्री चालवत आहेत असे जाणवतच नाही. एक तर त्यांना संसदिय कार्याचा बिलकूल अनुभव नव्हता आणि अजूनही फारसा अनुभव आल्याचे दिसत नाही. कारण ते कोणाकडून काही शिकण्याचा प्रयत्न करीत नाहीत. करणार तरी कसे हो ? घराणेशाही पक्षातील बहुतांश नेत्यांची स्थिती अशीच असते.  आपण मुख्यमंत्री झालो आहोत हे भान आलेच नसेल तर वर्तनात प्रगलभता तरी कशी दिसेल? दिसते ती फक्त भाजपा बद्दलची द्वेषाची परिसीमा ! प्रगलभता येण्यासाठी अभ्यास करावा लागतो. सतत उठसूठ ठोकशाहीची भाषा करणार्यांना कायद्याच्या चौकटीत अलगदपणे अडकविणे सोपे असते. हे सत्य फक्त सत्तेच्या खेळातच आहे असे नाही. जिथे जिथे स्पर्धा आहे अशा सर्वच क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात या सत्याचा अनुभव येत असतो. कमालीचा संयम दाखवून मोदी सरकारने मविआ सरकारला हवे तसे म्हणजे अलगत अडकविले आहे. या संकटाची सारी जबाबदारी उद्धव ठाकरें आणि भास्कर जाधवांवर टाकून राष्ट्रवादी काॅग्रेस आणि काॅग्रेस पक्ष मोकळे झाले तरी त्यात आश्चर्य वाटणार नाही. शेवटी जी अवस्था ममता बॅनर्जीची झाली आहे तीच अवस्था शिवसेनेची होईल. कारण  सुप्रिम कोर्टाने बारा आमदारांचे निलबंन रद्द करून भाजपाच्या हातात ३५६ कलम वापरण्याची अप्रत्यक्ष रित्या परवानगी दिली आहे. आता पुढे काय होणार ? मविआ सरकारला कोमातच ठेवावे की बरखास्त करावे हे आता सर्वस्वी मोदी-शहांवर अवलंबून आहे. मोदी-शहांचा आजचा भाजपा काय क्लुप्त्या लढवतिल यांचा अंदाज देश- विदेशातील  प्रभावशाली डाव्या आणि उजव्या विचारांच्या स्ट्रॅटेजिंयन्सनां लागत नाही तर आपण काय अंदाज वर्तविणार ?

सुश्री ममता बॅनर्जी सरळ तिसर्या खेपेला निवडणूका जिंकून मुख्यमंत्री झाल्या असल्या तरी आता देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांना तोंडघाशी पाडल्याने त्या एकाकी पडण्याची शक्यता आहे. काॅग्रेस आणि डाव्या पक्षांनी काही अंशी गेल्या विधानसभेच्या निवडणूकीत ममता बॅनर्जीना रान मोकळे ठेवले होते,  तसे सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत ते करणार नाहीत. ते दोन्ही पक्ष युती करून मोदी सरकारशी झुंज देतील.  ममता बॅनर्जीची न्यायालयाच्या निर्णयाने हिंदुविरोधी जी प्रतिमा झाली आहे त्याचा फायदा काॅग्रेस घेऊ इच्छीत असेल तर कदाचित काॅग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल आणि त्यासाठी राहूल गांधीनीं जानवे आणि प्रियंका गांधी वाड्रानीं साडी तयार करून ठेवली असणार. एकंदरीत पश्चीम बंगालमध्ये लोकसभेची निवडणूक ही तिरंगी लढत दिसेल. ममता बॅनर्जींचे दुखणे असे आहे की त्या मोठेपणा दाखवून लोकसभेच्या कमी जागा घेऊन काॅग्रेस किंवा डाव्या पक्षाशी युती करेल असे संभवत नाही.

पश्चीम बंगालमध्ये भाजपाने जसे स्थान पटकावले तसे पंजाब मध्ये मिळविण्याचा प्रयत्न करेल असे मी एक-दोन वर्षापुर्वी म्हटले होते.  पंजाब हे सिमावर्ती राज्य असल्याने भाजपाला आपले स्थान नगण्य असल्याचे शल्य टोचत होते. पंजाब मधील बादल घराणेशाहीमुळे अकाली दलाची विश्वासाहर्ता कमी होत जाईल असा कयास भाजपाने बांधला होताच. पंजाबात अकाली दलाच्या नेत्यांचे  सधन शेतकरी- दलालांशी हितसंबंध गुंतले असल्यामुळे कृषी बिलांना विरोध करीत तो पक्ष स्वतःहून एनडीए मधून बाहेर पडला. एका परिने सुंठीवाचून खोकला गेला असे भाजपाच्या धोरण कर्त्यांना वाटले असावे. दरम्यान शेतकरी आंदोलनात काॅग्रेसने पडद्या मागून नवज्योतसिंग सिध्दुच्या भरवशांवर खलिस्तानचे वर्चस्व निर्माण केले. त्यातून गेल्या वर्षी लाल किल्ल्यावर आंदोलक शेतकर्यांनी केलेल्या तमाशामुळे विना सायास  भाजपा सारख्या राष्ट्रवादी पक्षाच्या हातात धारदार तलवार मिळाली आहे. शिवाय अलिकडे पंजाबात पंतप्रधान मोदींच्या दौर्यात घडलेल्या घटनेमूळे काॅग्रेसची स्थिती कमकुवत होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यातच काॅग्रेसने पंजाब मध्ये कॅप्टन अरमिंदरसिंगांना मुख्यमंत्री पदावरून हटवून स्वतःसाठी खड्डा खणला. ज्या नवज्योतसिंग सिद्धूवर काॅग्रेस भरोसा ठेवते आहे असे दिसत असले तरी सध्या काॅग्रेस आणि नवज्योतसिंग सिद्धू मध्ये बिनसले आहे. दोघांत शह-प्रतिशहाचा खेळ सुरू झाल्याचे ऐकू येत आहे. पंजाब मध्यें अकाली दलातील नेते अकाली वार्धक्याच्या भितीने त्रस्त होऊन भाजपात सामिल होतील असा अंदाज मी मागील लेखात दिलेला आहे. तो खरा ठरताना दिसतोय. तेथिल काॅग्रेसजनात ही श्रेष्ठीं बद्दल असंतोष दिसत आहे. असे काॅग्रेसजन भाजपाशी आणि कॅप्टन अरमिंदरसिंगाशी हात मिळवित आहेत. भाजपा तिथे ही जम बसवू शकेल. पंजाबात भाजपा आणि कॅप्टन  Say No to Drugs and No to Khalistan अशी घोषणा करीत प्रचारात आघाडी घेईल. भाजपा अकाली दलावर फारशी टिका करणार नाही. आप या पक्षावर मोठी टिका करून त्याचे महत्व फारसे वाढू न देणे ही भाजपा व कॅप्टनची रणनिती राहील असे वाटते.

दिल्लीतील केजरीवाल सरकारला कोरोनाच्या साथीत ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून भाजपाशी निष्कारण तंटा निर्माण केल्यावर कोर्टाने ऑक्सीजन च्या स्टाॅकचे ऑडीट करण्याची धमकी दिली होती. याची केजरीवालांना आठवण असणारच. भाजपा कायदेशीर लढाईत वाकबगार आहे हे तेव्हाच सिद्ध झाले आहे. केजरीवाल ऑक्सीजनचा काळा बाजार करीत होते ही बाब निवडणूकीच्या काळात जनतेसमोर आणण्याचे तंत्र भाजपाने विकसित करून ही ठेवलेले असणार. त्यामूळे  सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत आप पक्षाच्या हाती काही लागणार नाही. उत्तर प्रदेशातील विधानसभेचा निवडणूक प्रचार शिगेला पोहचू लागला आहे. तेथील विभिन्न ओपिनियन पोल भाजपा सत्तेवर येणार हेच दाखवित आहेत.  साधारणतः सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत उत्तर भारत, मध्य भारत, पश्चीम भारत आणि  ईशान्य भारत भाजपाच्या पाठिशी उभा राहणार आहे.

दक्षिणेतील पक्षांच्या जोरावर तर मोदी सरकारने तीन तलाक आणि घटनेतील ३७० कलम हटविले आहे. त्यामूळे तेथील पक्ष आपलं स्वतंत्र अस्तित्व राखून ठेवतील. दुसरे कारण असे आहे की तेथील मुख्यमंत्र्यांना मोदीशी टक्कर देऊन पंतप्रधान बनण्याची इच्छा असली तरी ताकद नाही हे वास्तव ते जाणून आहेत. उगीच आपण कशाला देवेगौडा बनावे अशी त्यांची मानसिकता असणार. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इतकं साधं राजकारण समजत नाही असे म्हणता येत नाही. पण भाजपा संबंधी आत्यंतिक द्वेषाने ते सैरभैर झाले असावेत. म्हणून तर कोर्टाचा असा तडाखा तो ही कानाखाली खावा लागला. वाईट वाटते कारण ते स्वर्गीय बाळासाहेबांचे सुपुत्र ! पण आपण काय करू शकतो?  विनाशकाले विपरीत बुद्धी !

आपण म्हणाल सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीतला अंदाज या क्षणाला वर्तवून तो खरा ठरेल हे कशावरून सांगता आहात ? याचे महत्वाचे कारण म्हणजे शेखर गुप्ता सारखे डावे विचारवंत ही प्रांजळपणे म्हणतात की पंतप्रधान मोदीच्या लोकप्रियतेत घट होतच नाही. इतकेच काय तर बेकारी, महागाई  हे विषय निवडणूकाचे मुद्दे होत नाहीत. त्यातही पंतप्रधान मोदींजीनी अशा काही योजना गरीबांसाठी राबविल्या आहेत त्या पुर्वी कधीच अंमलात आणल्या गेल्या नव्हत्या. शेखर गुप्तांनी प्रिन्ट नावाच्या चॅनलवर तर  Modi -Shah are leftist in Rightists  या शिर्षकाचा एक विडीओ पब्लीश केलेला मी ऐकला आहे. गेल्या सात वर्षात मोदी सरकाने ज्या कल्याणकारी योजना अंमलात आणल्या त्या संबंधीची माहिती शेखर गुप्तांनी त्या विडोओत दिली आहे. आताच्या  मोदी- शहांच्या भाजपाचे संघटन कार्य किती व्यावसायीकतेने होते या संबंधितल्या एका विडीओ वर त्यांनी बुथ पातळी पासून ते थेट केंद्रीय स्तरावर पर्यंत कसे नेटवर्क तयार केले आहे  याचे पुर्ण वर्णन शेखर गुप्तांनी दिले आहे.  भाजपा हा एकच असा राजकीय पक्ष आहे ज्याने आजच्या तंत्रज्ञान युगाचा उचीत उपयोग करीत आहे असे ही शेखर गुप्तांनी म्हटले आहे.  दुसरी कडे आजतकचे  प्रभू चावलांने उत्तर प्रदेशच्या निवडणूकीचा ओपियन पोल संबंधी म्हटले आहे की मतदार फक्त मोदी आणि योगी या जोडीला पाहूनच मतदान करणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. म्हणून निवडणूकीच्या निकाला संदर्भात चर्चा करण्यात ही काही अर्थ राहिला नाही अशी विवशतेने टिपण्णी प्रभू चावलांनी केलेली मी ऐकली आणि पाहिली आहे.

या लेखात सन २०२४ च्या निवडणूकी नंतर लोकसभेचे काय चित्र असू शकेल हे आता या घटकेला देण्याचे कारण काय असा आपल्याला प्रश्न पडला असेल.  कारण असे आहे की देशातील राजकारणाच्या केंद्र स्थानी भाजपाच झालेला आहे. दुसरे असे की विरोधी पक्षातील जे काही नेते आहेत त्यांचा प्रभाव राष्ट्रीय पातळीवर पडत नाही. नितीश कुमार पंतप्रधान होण्याच्या मार्गावर जात असतांना थकून गेले आणि शेवटी भाजपाने दिलेले बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवून ते निवृत्ती घेतील.  शरद पवार यांच्या पुढाकाराने साकरलेले मविआ सरकाराला सुप्रीम कोर्टाने नुकताच एक तडाखा दिला आहे.  त्यामूळे मोदी सरकार कधीही कलम ३५६ लावून महाराष्ट्रातले सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावतील. जो पर्यंत सत्तेवर आहेत तो पर्यंत महाराष्ट्रातील मविआ पक्षात एकी राहील. नंतर ती एकी नष्ट होईलच पण सोबत मविआतील नेते ही भाजपात जाऊ लागतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरें यांची कारस्थाने उजेडात आणण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणली जाईल. जसजशी कारस्थाने उजेडात आणली जातील तसतशी महाराष्ट्रातील काॅग्रेस नरो वा कुंजरो अशी भुमिका घेत आपल्या पक्षाचे महाराष्ट्रातील स्थान शाबूत करण्याचा प्रयत्न करेल.

काॅग्रेसची ताकद उत्तर प्रदेशाच्या निवडणूक निकाला नंतर संपेल असे नाही. पण पराभव तर निश्चीतच आहे. त्यामूळे महाराष्ट्रातील काॅग्रेसचे काही नेते भाजपाचा आश्रय घेतील. आणि भाजपा त्यांना आश्रय देईल. कारण राष्ट्रवादी काॅग्रेसचे बळ वाढविण्याचा नसता उद्योग भाजपा करणार नाही.  असे असले तरी  गांधी घराणे हार मानणार नाही. कारण भाजपाशी लढू शकेल असा काॅग्रेस एकच पक्ष आहे असे भासविण्यात काॅग्रेसला इतर विरोधी पक्षांपेक्षा अधिक यश मिळत असते. या शिवाय राहुल गांधी आणि प्रिय॔का गांधी-वाड्रा तरूण आहेत. म्हणून जितकं राजकारणात तरता येईल तितकं तरत राहावे हीच त्यांची भुमिका राहील. उत्तर प्रदेश मध्ये काॅग्रेस स्वतंत्र रित्या निवडणूक लढवित आहे. यातून काॅग्रेस केंद्रातील सत्तेसाठी उतावळी झाली नाही, आणि अजून दहा वर्षे थांबायला तयार आहे असे दिसते.  सोबत काॅग्रेस इतर पक्षांना दाखवू इच्छीत आहे की भाजपा प्रत्येक प्रान्तात आपली शक्ती वाढवित असल्याने तुमचे पक्ष तरी कुठे  टिकणार आहेत ? आमचा पक्ष राष्ट्रीय आहे, तुम्हांला काॅग्रेसचीच गरज लागेल. यात तथ्य आहे. काॅग्रेसची हीच भाषा साम्यवादी चीन सुद्धा आपल्या कडील चीनच्या शिष्यांना सांगत असेल. म्हणूनच पश्चीम बंगालमध्ये डावे पक्ष काॅग्रेसशी युती करीत असते. अलिकडे तर कन्हैय्याने मला काॅग्रेसची गरज आहे असे काॅग्रेस मध्ये प्रवेश करताना म्हटले आहे. तो एक प्रयोग आहे, जो चीनशी काॅग्रेस पक्षाने केलेल्या करारानुसार असू शकतो.

एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाच्या महाराष्ट्रातील आमदारांच्या निलंबन सबंधितल्या याचिकेवरील निर्णयाने देशातील राजकारणावर दुरगामी परिणाम होतील. राजकारणातील मोदी द्वेष कमी होताना दिसेल अशी आशा बाळगतो.  आम्ही राजकारणात भाजपाला धोबी-पछाड करू हा विरोधकांचा समज जवळपास संपला आहे. मोदी सरकार राजकारणात पटाईत आहेच पण कायदेशीर लढाईत ही तरबेज आहे. असा अनुभव आपल्या येथील विरोधी पक्षांना येतोच शिवाय शेजारील शत्रू देशांना ही येतो.

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...