गुरू नानक संस्थांपक आणि पहिला गुरू
( स्वरूप, दृष्टी आणि चमत्कार )
गुरू नानक हे उत्तम कवी होते. त्यांची वाणी मधुर होती. आपल्या मतांच्या प्रसारासाठी चार यात्रा केल्या. त्यांनी भारत, अफगणिस्तान, इराण आणि अरब येथील प्रमुख शहरात प्रवास केला. पार्शिया, मक्का, मदिना,बगदाद प्रत्येक ठिकाणी त्यांनी मानवी जीवनात सेवाधर्माला सर्वाच्च स्थान आहे हे पटवून दिले. आपल्या इथे 'सेवा परमो धर्मः' असे वेद काळापासून आजतागायत मानत आहोत.
गुरूग्रंथसाहिबाचा प्रारंभच मंगलाचरण ओंकारात होतो. तो असा ' इशक ओंकार सिरी परसावी ' आहे. हिंदु धर्मशास्त्रात ज्याने पर्वत, चार युगे व चार वेद उत्पन्न केले, जो सर्वांना मुक्ती देणार तोच ओंकार आहे.
गुरूग्रंथसाहिब मध्ये ईश्वर, अनादी, सर्वव्यापी, अंतर्यामी, निराकार, त्रिगुणातीत आहे ही कल्पना सर्वत्र मांडण्यात आली आहे. उपनिषदांमध्ये व अन्य हिंदु धर्मग्रथांत वर्णिलेल्या ईश्वर स्वरूपाशी हे सर्व वर्णन तंतोतंत जुळणारे आहे. यमदूत, यमपाश, यमदंड हे शब्द गुरूग्रंथसाहीबात पदोपदी आहेत. गुरू ग्रंथात ईश्वराला सर्वत्र हरी आणि राम असे संबोधिले आहे. जेथे मुस्लीमांना उद्देशून उपदेश केला आहे तिथे गुरू नानकांनी 'अल्ला ' या नावाचा उल्लेख केलेला अढळतो. ' संतसगती ' हे मुक्तीचे श्रेष्ठ साधन आहे. हे गुरूग्रंथसाहिबात माडले आहे. त्याचा ही उल्लेख हिंदुधर्माच्या अनेक ग्रंथात पदोपदी आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णूने नारदाला प्रत्यक्ष उदाहरण देऊन सुसंगतीमूळे एका किड्याची उन्नती होत पुढे एका राजाच्या पोटी जन्म कसा मिळतो यातून सिद्ध केले आहे.
या ठिकाणी गुरू नानकांच्या चरीत्रातील एक कथा आपल्या समोर मांडणे आवश्यक वाटते. गुरू नानक वैष्णव, काशी, प्रयाग यात्रा संपवून परत येते वेळी त्यांचा सहकारी अर्थात अनुयायीला मक्काला जावेसे वाटले. गुरू नानक तयार झाले. गुजरात येथील बंदरातून सागरी मार्गे ते गेले. तेथून पुढे पायी प्रवास करण्यासाठी दोघांनी हज यात्रेसाठी करावा लागणारा वेश घातला. प्रवासात ते दमले आणि रात्री एका गावातल्या चौकात गुरू नानक आणि मर्दाना झोपी गेले. गुरू नानकजींचे झोपताना पाय ज्या दिशेला होते त्या दिशेला मुस्लीमाचे काबा नावाचे पवित्र प्रार्थना स्थळ होते. मुस्लीमांच्या धर्मज्ञाप्रमाणे काबाच्या दिशेने पाय करून झोपणे निषिद्ध मानले जाते. भल्या पहाटे कोणी यात्रेकरूने हटकले आणि रागाने विचारले आण आपण कोण आहात ? पवित्र प्रार्थना स्थळातील अल्लाच्या दिशेने तुम्ही पाय ठेवून करून झोपला आहात ? नानकजी म्हणाले, मी प्रवासात फार दमलो आहे. कृपया ज्या दिशेला अल्ला नाहीत, त्या दिशेने माझे पाय उचलून ठेवा. यात्रेकरूने नानकजीचे पाय उचलले आणि जरा तिरके ठेवले. पण काबाची ती क्युब( अशी इमारत जिची सहा बाजूने उंची, लांबी, जाडी समान असते) आकाराची इमारत नानकजीच्या पायाच्या दिशेने दिसली. चार वेळा असाच प्रकार घडला तेव्हा त्या यात्रेकरूला जाणीव झाली की ही कोणी असाधारण व्यक्ती आहे. आपल्या संत नामदेवांना त्यांचे गुरू विसोबा खेचर यांनी शिवलिंगावर आपले पाय पादत्राणा सकट ठेवून दृष्टांत दिला होता. तो दृष्टांत हाच ' ईश्वर सगळीकडे आहे.' वैदिक काळापासून हिंदुना ' ईशावास्यम इदं सर्वम् ' (ईश्वर सर्वत्र व्यापलेला आहे ) हे ज्ञात होत आलेले आहे.
गुरूग्रंथसाहिबातील दृष्टांत सर्वपरिचीत आहेत. पाणी पाण्याला मिळणे, ज्योतीला ज्योती मिळणे हे आत्मा-परमात्मा यांच्या ऐक्य संदर्भात आले आहे. गुरू नानक यांचा योगशास्त्राचाही चांगला अभ्यास होता. गुरूग्रंथसाहिबात भक्तांची नावे दिली आहेत, ती नारद, वाल्मिकी विदूर, कृष्ण, नामदेव, रविदास ही हिंदुना परिचीत आहेत इतकेच नव्हे तर दहा गुरूची नावें पाहिली तरी त्यातून हिंदुत्व दिसते.
गुरू नानक एकेश्वरी वादाचे पुरस्कर्ते होते पण देव-देवतांचे अवताराच्या कल्पनेला विरोध केला नाही. पण तो ईश्वर एकच आहे असे म्हणत असत. अशाच आशयाचे हिंदु धर्मात (संस्कृत) भाषेत वचन आहे. ' एकं सत् विप्रा वदन्ती बहुधा '
ईश्वरी कृपा ही कल्पना शीखमताचे वैशिष्ट्य आहे. काही शीख विद्वांनानी ईश्वरकृपा ही ख्रिस्ती तत्वाची जुळते आहे, असे म्हटले आहे. परंतु ते निराधार आहे. भगवान येशूच्या हजारो वर्षे अगोदर कठोपनिषादात या कल्पनेचे बीज आहे.
' लभ्यतैपि तस्य कृपयैव ' असे नारद भक्तिसुत्रात वाचल्याचे मला आठवते. गुरूग्रंथसाहिबातील रचनात अनेक दृष्टांत, कथा, या रामायण महाभारत आणि पुराणातल्या आहेत.
शीख वाःड्मयात पुरख, अकाल -पुरख हे ईश्वराचे नामवाचक आहेत. पुरख म्हणजे पुरूष या ईश्वरवाचक नामाचे अपभ्रंश आहे. वैदिक काळात तर ईश्वराचे वर्णन म्हणा वा व्याख्या अशी --
' सहस्त्रशिर्षा पुरूषः सहस्त्राक्षः सहस्त्रपात् ' सहस्त्र शिर, सहस्त्र डोळे आणि सहस्त्र हात-पाय आहेत असा पुरूष म्हणजेच ईश्वर आहे.
समाजात क्षात्रवृत्ती जागृत होण्यासाठी दहावे गुरू गोविंदसिंहांनी चंडी चरीत्र, चंडी दीवार, राम अवतार, कृष्णावतार ही काव्यें केली. विचित्र नाटकाच्या प्रारंभी ते महादेवाचे स्मरण करतात व चौदाव्या अध्यायात ,' देव कालिका माता हमारी असे ' समजतात.
सध्या जी खलिस्तान चळवळ डोके वर काढत आहे याचे कारण मेकाॅलिफ यांच्या सारख्या शीख पंथाच्या इतिहासकारांनी केलेल्या विकृत प्रणित शिक्षणाच्या पद्धतीतून रोवले गेलेले आहे. शीख ब्रिटीशांची राजनिष्ठ राहावेत या उद्देशाने शीखाचा इतिहास बदलला गेला. आपण हिंदुपासून वेगळे आहोत असे मानल्याने आपला फायदा होतो हे हळूहळू शीख नेत्यांच्या लक्षात येऊ लागले. ' जिथे सरशी तिथे आम्ही ' हा विचार माणसात लौकर रूजतो. कारण सृष्टीत काटेरी झुडपें सहजगत्या उगवतात. याचा अर्थ सर्वच शिखांनी खलिस्तान चळवळीत भाग घेतलेला नव्हता. ब्रिटीशांनी भारतिय तथाकथित विचारवंताना हाताशी धरून तसेच स्वातंत्र्यनंतरच्या काळात इतिहास अभ्यासक्रमाची जबाबदारी सांभाळणार्या डाव्या विचारवंतानी, हिंदु धर्मातील शीख, लिंगायत, बौद्ध, दलित-आदिवासीयांना हिंदूपासून वेगळे आहेत असा विषारी प्रसार गोबेल्स तंत्राने सुरू केलेला आहे. एखादी गोष्ट कानावर सतत पडत असली माणसाची दृष्टी आणि बुद्धी याच्यांवर प्रभाव पडतो. ब्रिटीश सत्तेने हिंदु आणि शीख यांच्यातल्या स्नेहावर फोडा आणि झोडा या नीतीने हातोडा फिरविण्याचे कार्य सन १९२० पासूनच सुरूवात केली होती. त्यातूनच खलिस्तान चळवळीच्या उदय झाला होता. स्वातंत्र्यानंतर भाषाच्या आधारे तत्कालीन केंद्र सरकारने भाषावार राज्यरचना उभी केली. त्यातूनच पंजाब आणि हरियाणा ही दोन अनुक्रमे पंजाबी आणि हिन्दी भाषिक राज्ये झाली. पंजाबात हिंदु संख्या कमी झाली त्यातूनच स्वतंत्र पंजाब राष्ट्राची मागणी झाली. पुढे खलिस्तान राष्ट्रावाद निर्माण झाला त्यातूनच विदेशी शक्तीने खलिस्तान चळवळी उभी करण्यात हातभार लावला. हा राजकारणाचा विषय आहे म्हणून यावर आपण आज चर्चा नको करू या. एखाद्या राजकीय लेखात या संबंधी चर्चा करू या. आता शिखाच्या गुरूंची शिकवण हिंदु धर्मशास्त्राशी किती आणि कसे साधर्म्य साधते हे पाहू या आणि लेखाची समाप्ती करू या
गुरू नानक यांचा उपदेश
१) ईश्वर प्रत्येक व्यक्तीत आहे. (गीतेत भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, ' सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो ' मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे.)
२)गोर-गरीबांना अन्नदान करणे हे सर्वात मोठे दान आहे. त्याला त्यांनी नाव दिले लंगर. हा उपक्रम वर्गणीतून करावा. हिंदु धर्म शास्त्रात मांडले आहे,
क्षुधितस्य च भोजनम् म्हणजे भूकेलेल्याना भोजन द्यावे. 'हस्तस्य भूषणम् दानं' दान हे हाताचे भूषण म्हणजे अलंकार आहे.
३) सर्व समान आहेत - प्राचीन ऋषींनी समता
यावी म्हणून उपदेश केला आहे तो असा --
' समानी व आकूतिः समाना हृदयानि वः
समानमस्तु वो मनो यथा वः स सुहासति || '
(तुमची भावना व संकल्प समान असोत. तुमचे
हृदय समान असोत. तुमच्या मनोभावना
समान असोत, ज्यायोगे तुम्ही परस्पर
सहकार्याने काम करू शकाल.)
३) अंधश्र्द्धा फेकून द्या.
अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्य हिंदु नेतेमंडळीचेच केले आणि शेवटीच्या अंधश्रध्देचा पाडाव होत नाही. तोपर्यंत हे कार्य अविरत पुढे चाललेले दिसेल.
४) दुसर्या धर्माचा आदर करा. तो हिंदुच्या रक्तात भिनलेला असतो.
५) कर्म हाच सर्वोच्च धर्म, दुःख सुद्धा कर्माचेच
फळ असते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात.
' नियतं कुरू कर्म त्वं | '
६) पुनर्जन्म असतो.
७)षढरिपूवर मात करा
८) संयम आणि प्रेम ही सर्वोच्च जीवन मूल्यें.
९) मुस्लीम असाल तर मुस्लीम राहा आणि
हिंदू असाल तर हिंदू राहा. हिंदु मुस्लीम यांचे
ऐक्य साधणे गुरू नानकांचा उद्देश होता हे
सत्य असले तरी शीख हा स्वंतत्र धर्म
नव्हताच.तो हिंदूचा एक पोटविभागच.
गुरू नानक यांना हिंदु आणि मुसलमानात ऐक्य हवे होते हे सत्य आहे. पण म्हणून शीख हा हिंदु पंथ नव्हता असे सिद्ध होत नाही. कारण महात्मा गांधीजींना ही हिंदु-मुस्लीम ऐक्य हवे होते आणि त्यांनी तसे प्रयत्न ही केले. म्हणून महात्मा गांधीजीं हिंदु राहीले नव्हते असे आपण मानतो का? नानक मत असो की गांधीवाद असो, दोघे ही हिंदु धर्माचेच होते. स्वातंत्रयवीर सावरकर विचार दर्शन चे लेखक आणि संकलक डाॅ अरविंद गोडबोले म्हणतात, विवाह, घटस्पोट, वारसा इत्यादी विषयी गुरू नानकजीने विचार मांडले नव्हते. म्हणून शीख आणि शीखेतर हिंदु ह्यात यासंबंधी काही वेगळेपण नव्हते. ' हिदु- शीख कानिफ्लक्ट इन पंजाब ' शिर्षकाखाली एक पुस्तिका प्रसिद्ध झाली आहे त्यातील एक लेखात के टी लालवानी ह्यांनी म्हटले आहे की, ' एकाच घरात एक भाऊ हिंदु आणि दुसरा शीख असे राहात असत. म्हणून देशाच्या कायद्यानुसार शीख हा हिंदुधर्माचा पंथ होय.
दस्तूर खुद्द दहावे गुरू गोविदसिंहने म्हटले आहे,
सकल जगतमे खालसा पंथ गाजे
जगे धर्म हिंदु सकळ भंड भाजे
गुरूअंगदेवचे कार्य
१) गुरूमुखी लिपी तयार केली २) ६२ अध्याय लिहले. गुरू नानकांच्या सर्व रचनाचे संकलन केले. ३) गुरू (अकाल) तख्त निर्माण केले.४) देशाच्या इतर प्रांतातील १८ समकालीन संताच्या रचना, उपदेशाचा ग्रंथात समावेश केला. याचाच अर्थ देशभरातल्या सर्व साधुसंताचा आदर करा.
गुरू अर्जून देवचे कार्य
गुरू ग्रंथाची सुरवात केली.
गुरू हर गोविंदचे कार्य
मोगलाच्या अत्याचाराविरूद्ध लढण्यासाठी सेना तयार केली. ठकासी व्हावे ठग हाच उपदेश समर्थ रामदास स्वामिनी दिलेला आहे. भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापूर येथे जावयास निघाले तेव्हा त्यांनी पांडवांना आपली शस्त्रे पाजळून ठेवा म्हणजे ऐनवेळी युद्ध येऊन ठेपले तर आक्रमण थोफवितात येते.
गुरू हर रायचे कार्य
गीतेचे पारशी भाषेत भाषांतर केले.
गीते बद्दल इतकी आत्मियता काय दर्शविते?
गुरू तेग बहादूरचे धाडस
औरंगजेबची धर्मातंराच्या धमकी दिली तेव्हा त्या धमकीला गुरू तेग बहादूर यांनी भिक घातली नाही दाद दिली नाही, आणि बहादूरपणे चांदणी चौकात हत्येची शिक्षा स्विकृत केली.
गुरू गोविंद सिह
धार्मिक शांतीने न्याय मिळणार नाही असा उपदेश देत मोगल दशहतवादाला लढाईनेच उत्तर देण्याचा प्रभावी उपदेश केलाच पण स्वतः लढाईत भाग घेतला. एकूण पाच लढाया केल्या. त्यातील दोन जिंकल्या. खालसा पंथ तयार केला. वेशभूषा निर्माण केली. याला 5 K मानले जाते. केश-दाढी, कंगवा, कृपाण, कच्छ( सदरा) आणि हातात कडा. महत्वाचे कार्य म्हणजे संस्थापक गुरू नानकांनी आपल्या मुलाला गुरूपद बहाल न करता अंगदेव ला बसविले पण नंतर घराणेशाही आली होती. ती मोडीत काढली. इतकेच नव्हे गुरूपदी व्यक्ती न बसता ग्रंथालाच गुरूपदी बहाल केले.
गुरूग्रंथसाहिबात हिंदु प्रमाणेच गोहत्येचा निषेध केला आहे. त्यासंबंधी गुरू गोविंदसिंह म्हणतात ,
' यही देहु आज्ञा तुरक को खपाऊ |
गोघात का पाप जगसे मिटाऊं | |
एकंदरीत वरील चर्चेचे सार असे निघते की ' एक सत् विप्रा बहुधा वदन्ती ' हेच खरें. ईश्वर एक आहे तो अनेक रूपात दिसतो. हे आपल्या येथे प्राचीन काळापासून मानले जात आहे. शिखांच्या हिदुत्वाचे सर्व पातळ्यांवर उपलब्ध साधन आणि माध्यमांद्वारे प्रसार होणे आवश्यक आहे. हिंदूत्व हा सिद्धान्त असून हिंदु धर्म हा त्या सिंद्धांताचा प्रत्यक्ष व्यवहारीक आचार किंवा उपयोजन आहे. रंग कितीही भिन्न असले तरी इंद्रधनुष्य एकच असते. पाकळ्या कितीही आकाराने आणि रूपाने भिन्न दिसल्या तरी फुल एकच असते. अवयव आकाराने रूपाने आणि कार्याने भिन्न असले तरी शरीर एकच असते. तद्वत बहुरंगी आणि बहुढंगी असलेल्या हिंदु धर्माच्या मूळाशी एकच हिंदुत्व असते.