शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

देशांतर्गत राजकारण घातक वळणावर ? (भाग - २)



लेखाच्या या भागात देशातील तीन राज्यांनी म्हणजे महाराष्ट्र, पश्चीम बंगाल आणि दिल्ली राज्याने  संघराज्य  रचनाचा आडोसा घेऊन केंद्र सरकारशी निर्माण केलेल्या बखेडाचे देशपातळीवरचे स्वरूप काय आहे यावर चर्चा करणार आहोत. या बखेडासंबंधी हायकोर्ट स्तरावर आणि सुप्रीम कोर्टातून जे काही प्राथमिक शेरे आले आहेत ते तिन्ही राज्यांना खडसावणीच्या प्रकारात मोडतात. त्यामूळे ही तिन्ही राज्यें बॅकफूटवर गेली आहेत. त्या संबंधीत या लेखात चर्चा नको करू या. सदरहू बखेडाची देशपातळीचे स्वरूप आणि कारणे यावर एकत्रीत चर्चा करू या. चर्चा अर्थात ढोबळच राहील.

१) मोदी, भाजपा आणि संघाबद्दलचा द्वेष. सध्या मोदींचे सरकार असल्यामूळे हे प्रमुख कारण आहे. जसे केंद्रात सरकार बदलले की बखेडाचं कारण आणि स्वरूप बदलते, अगदी त्याच पक्षाचे पण पंतप्रधान पदावरील व्यक्ती बदलली तहीही बखेडाचे स्वरूप बदलू शकते.

२) सत्ता स्पर्धा. सत्तेशिवाय शहाणपण नाही असे राज्यशास्त्रात म्हटलेले नाही पण राजकारणात ते मानले गेले आहे आणि आचारणात आणून बोलून ही दाखविले जाते.  राज्यशास्त्रात सत्ता हे नागरिकांच्या मूलूभूत हक्क आणि गरजा, सुरक्षा अंतर्गत आणि बाह्य,  कायदा व सुव्यवस्था, महसूल, महसूलचा विनियोग, आरोग्य, शिक्षण, उद्योग जवळपास जीवनाची निगडीत सारे विषय तसे प्रशासन विकास इत्यादी कार्ये पार पाडण्याचे माध्यम आहे. पण सत्तेतुनही सत्ता मिळु शकते ही राजकीय पक्षांनी रूजविलेली पद्धत आहे.

३) विचारधारा - विचारधाराच्या कसोटीला उतरणारे तीनच पक्ष भारतात आहेत. भाजपा, काॅग्रेस आणि साम्यवाद. विद्यमान केंद्र सरकार विरोधातला बखेडाचं स्वरूप काॅग्रेस आणि साम्यवाद आणि मित्र पक्ष एका बाजूला विरूद्ध  भाजपा ज्याला हिंदुत्ववादी पक्ष म्हटले जाते. विचारधारा किंवा विचारसरणी वरून उडणारे खटके हे राजकीय पक्षात होत असतात. ते केंद्र सरकार विरूद्ध राज्य सरकार अशा खटक्यांचे स्वरूप भासले तरी त्याला संविधानाचा बिलकूल आधार नाही. म्हणून बहुतांश वेळी न्यायालय राज्य सरकारांना फटकारते.  

४) या प्रकारातील कारणें छोटी-मोठी अनेक असतात. त्यात प्रासंगिक, प्रान्तीय अस्मिता, मानापमान, विभागिय असमोतल, इत्यादी या प्रकारात मोडतात.

५) राजकीय पक्षांत रूजलेली घराणेशाही हे एक कारण ज्यामूळे पक्षांतर्गत दुही माजते.

६) सर्वात महत्त्वाचं महत्वाचं जे आपल्या सारख्या जनसामान्यांनी फक्त ऐकलं आहे पण दिसत नाही. ते म्हणजे सत्तेत केलेल्या भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशाचा हिस्सा. प्रिन्ट आणि ईलेट्राॅनिक्स मिडीयाला हे कारण दृष्टीस पडते.  मिडीया आपल्या समोर ही माहिती पुरविते पण त्यांच्या सुत्राचा हवाला देऊन. गंमत अशी आहे की मिडीयाचं हे सुत्र नावाचं अपत्य अदृश्य असते. या बखेडाचं अस्तित्व पक्षांतर्गत असते, प्रशासनांतर्गत,  कधी ते देशाच्या सिमाही ओलांडत असते. आता आपण विद्यमान केंद्र -राज्य  बखेडाचं प्रान्तशः स्वरूप पाहू या.
    
सन २०१४ पासून केंद्रात मोदी सरकार अस्तित्वात आले आहे. पुढे इशान्य कडील काही राज्यात तसेच पश्चीम बंगालतही भाजपाने बस्तान बांधले. त्यामूळे तेथील वाम पंथीय मंडळी बेकार झाली आहे. सत्तेच्या राजकारणात त्यांचा आवाज बंद झाला आहे. पण नक्षलवाद, लिबरल विचार तसेच जशी सोय होईल तशी ख्रिस्ती, खलिस्थानी, चीन, जिहादी, पाकिस्तान इत्यादी लाॅब्यांचा उपयोग करण्यात ही डावे मंडळी माहीर आहेत. फक्त माहीर राहिले असते तर फारसं आक्षेपार्ह नसते पण त्यांची ती खोडच झाली ही देशाला सर्वात धोकादायक आहे.

दक्षिणेत भाजपा फक्त कर्नाटक मध्ये जम बसवू शकली आहे. पण दक्षिणेत इतर जे काही पक्ष सत्तेवर आहेत ते काही भाजपाचे मित्र नाहीत. तरीही २०१४ पासून दक्षिणेकडील राज्य सरकारांनी केंद्रातील मोदी सरकारशी कुठल्याही प्रकारचा मोठा तंटा उभा केलेला आढळत नाही. वाजपेयीच्या सरकारात आंध्र प्रदेशातील तेलगू दसमाच्या चंद्राबाबू नायडूंनी कुठलाही बखेडा उभा केला नाही. पण आपला फायदा धुर्तपणे घेत राहिले. पण देशात राजकीय अस्थितरता येईल आणि देवगौडाप्रमाणे आपल्याला पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी मिळेल अशी आशा बाळगित मोदी सरकारशी बखेडा उभा केला. त्यात तेच नामशेष झाले. अगदी केरळ आणि तामिळनाडूत कट्टर भाजपा विरोधी पक्षांचे सरकार आहे. पण ते ही केंद्र सरकारशी उघड असा प्रशासकीय बखेडा उभा करताना दिसत नाहीत. त्यातीही तामिळनाडूत प्रांतीय अस्मितेचे पक्ष असल्यामूळे, केंद्रातील सरकार मग  भाजपाचे असो वा काॅग्रेसचे आपआपल्या परीने मैत्री करून मोकळे होतात.

केरळ मध्ये कट्टर भाजपा विरोधक अशा डाव्यांचे सरकार आहे. तसे पाहता कम्युनिस्टांचे लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले केरळ हे पहिले राज्य आहे. वर्तमान मुख्यमंत्री पिनराई विजयन याची ही सलग दुसरी टर्म आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिथे जिथे विधायक कार्य उभे राहीले अशा सर्व ठिकाणी भाजपाचा बेस वाढतो असा सार्वत्रिक अनुभव आहे. केरळ मध्यें संघाचे कार्य चांगले उभे राहीले आहे. पण त्रिपुरा आणि आसाम सारख्या ईशान्येकडील राज्याप्रमाणे केरळ मधील भाजपा फायदा घेण्यात कमी पडला. या संबंधीची कारणे काय आहेत हे साप्ताहीक विवेकाच्या दिवाळी अंकात श्री प्रसाद देशपांडे यांनी आपल्या लेखात  केरळ राजकीय हिंदुत्वाचे ' प्रलंबित प्रतिक्षालय ' या शिर्षकाच्या लेखात सविस्तरपणे  मांडली आहेत. प्रसादजींचा हा लेख वरून पाहता केरळमधील गेल्या वर्षाच्या निवडणूक निकालांच्या विश्लेषणाचा वाटतो आणि तसा तो आहे. पण त्या लेखातील  केरळमधील सांस्कृतिक जीवना संबंधीचे वर्णन वाचून मुर्तीमंत केरळ आपल्या दृष्टीसमोर येते. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, संघटनशास्त्र, व्यवस्थापन शास्त्र इत्यादी क्षेत्रात काम करणार्यांनी, तसेच विद्यार्थ्यांनी हा लेख वाचावाच तसेच आपल्या सामान्यज्ञानात भर होते म्हणून सर्वांनीच वाचावा.  प्रसादजींनी हातचे काही न राखता कम्युनिस्ट पक्षाचा विजयासंबंधी माहिती देताना कौतूक ही केले आहे. अशी खिलाडू वृत्ती साम्यवादी तसेच काॅग्रेस सह इतर मित्र पक्ष कधी दाखवू लागतील? 

अलिकडे पिनराई विजयनजी संबंधी कुठेतरी Rightist in Left असे वाचल्याचे आठवते. पिनराई विजयनजीं आर्थिक उदारीकरण आणि गुंतवणूकीवर भर देऊन विकासाची कामें करीत आहेत. अपेक्षीत यश मिळाल्यामूळे केरळचे हे मुख्यमंत्री  गांजलेल्या पण तरीही केडर पार्टी अशी ओळख असलेल्या भारतातील डाव्या पक्षात '  मी करीन तो कायदा आणि तोच फायदा ' अशी स्वतःची प्रतिमा करण्यात यशस्वी झाले आहेत.  नेता ऊदयास आला आहे. मग ते  केंद्र सरकारशी अकारण कुचेष्टा का करेल, आणि जी काही परकीय गुंतवणूक आणण्यासाठी केंद्र सरकारशी सहाय्यता लागेल ती घ्यावी, अशी त्यांची मानसिकता झाली असावी.  कदाचीत डाव्या पक्षांची स्थिती पुर्णपणे ढासळत असताना, ते ही  तामिळनाडूतील घराणेशाही सारखा स्वतःचा पक्ष तयार करण्याच्या स्थितीत असावेत असा माझा अंदाज आहे. कारण घराणेशाही हा संसर्गजन्य रोग आहे.  शेवटी ते कट्टर डाव्या पक्षाचे त्यामूळे निर्णायक घटकेच्या वेळी केरळला  केंद्र सरकारच्या विरोधातील बखेडात दाखल करतील ही.  कारण भारतातल्या डाव्या पक्षांचे माय-बाप विदेशी आहेत.  दक्षिण भारतातील पादूंचारीत तर भाजपाचे सरकार आहे. त्यामूळे तंटाचा प्रश्न नाही. 

आन्ध्र आणि तेलगंणात काॅग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या जगनमोहन रेड्डी आणि वायएसआरचे चंद्रशेखर राव यांची सत्ता आहे. या दोघांची राजकीय विचारसरणी भाजपा विरोधी असली तरी सध्यातरी ते आपापल्या राज्यात जम बसविण्याच्या तयारीत असल्यामूळे केंद्र आणि राज्य सरकार मधील संविधानिक नात्याची मर्यादा सांभाळून आहेत. ओरिसा मधील बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक इतकी वर्षे कारभार चालवित आहेत, पण त्यांनी ही केंद्र सरकारशी भांडण केल्याचे ऐकीवात आले नाही. ओरीसाचे भौगोलिक स्थान हे दक्षिण भारत, उत्तर भारत, आणि पुर्व भारताच्या संगमाचे स्वरूप ठरल्याने ' आपण बरे आपले काम बरें ' हाच त्यांच्या राजकारणाचा बेस बनला आहे.  ३७० कलम, तिन तलाक इत्यादी बिलें राज्यसभेत भाजपाचे बहुमत नसातांना पास का झाली या प्रश्नाचे दडलेले उत्तर या तिन प्रमुख राज्याकडून प्राप्त झाले आहे.

गाय हा प्राणी असला तरी आपल्या देशाच्या प्रत्येक प्रांतात तिला गोमाता मानले जाते. तरी उत्तर भारताला काऊ बेल्ट मानले जाते. अर्थात ही संज्ञा ब्रिटीश राज्यकर्त्यांने जाणून-बूजून वापरात आणली. त्या मेकाॅले शिक्षण पद्धतीच्या मानसीक गुलामीतून आपण पुर्णतः बाहेर पडलो नाही. एक हजार वर्षाहून अधिक काळ देश गुलामीत आणि नंतर नेहरू-गांधी घराण्याच्या सत्तेत राहिलो. काॅग्रेसला आहोटी लागल्यानंतर काॅग्रेस फुटू लागली आणि भारतभर वेगवेगळ्या घराणेशाहीचे पक्ष निर्माण झाले आहेत. घराणेशाही संबंधीत एक नैसर्गिक सत्य असे आहे की तिसर्या पिढीनंतर त्या घराण्यात उपजत होणारी संतती तितकी विद्यावान आणि  कर्तृत्ववान राहात नाही. हे सत्य प्रत्येक क्षेत्राला लागू पडते. सन १९८९ च्या लोकसभा  निवडणूकीत राजीव गांधीच्या सरकाराचा पराभव झाला आणि काॅग्रेस नावाच्या पक्षाची राजकारणातील सद्दी संपली.  तसे पाहता काॅग्रेसचे स्वरूप स्वातंत्र्यानंतर सुलतानशाहीच्या सुभेदार पद्धतीचे मिळते-जुळते होते. म्हणूनच महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यानंतर काॅग्रेस विसर्जीत करावी असा सल्ला दिला होता. पण सुभेदार आणि वरील पातळीवरील अंमलदारांनी तो सल्ला धुडकावून लावला.

नेहरू-गांधी परिवाराच्या जवळपास प्रत्येक सदस्यांनी  निवडणूका उत्तर प्रदेशातून लढविल्या होत्या. त्यानंतर सोनिया आणि राहूल गांधीनींही उत्तर प्रदेशातून निवडणूका लढविल्या. म्हणूनच उत्तर प्रदेशात अनेक घराण्यांच्या, जाती प्रमुखांच्या पक्षांची भाऊगर्दी  झालेली दिसते. हा ही संसर्गाचा परीणाम.  ही सारी मंडळी काॅग्रेस नावाच्या गब्बर घराणेशाहीच्या पक्षातील संस्कारातून वाढलेली, पण २०१७ सालच्या निवडणूकीत भाजपाने सर्वांचे कंबरडे मोडले. आता त्याच उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. पण भाजपाच तिथे सत्ताधारी असल्यामूळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये तंटा उभा राहिलेला नाही. राजस्थान मध्यें काॅग्रेसचे सरकार आहे पण तिथे काॅग्रेसमध्येच दुफळी असल्यामूळे तेथील मुख्यमंत्री अशोक गेहलोतांची शक्ती सचीन पायलटांना नामोहरम करण्यात खर्च होत आहे. छत्तीसगड मध्यें ही काॅग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश वाछेल हे जेष्ठ नेते टीएस सिंहदेव यांनी निर्माण केलेले आव्हान परतावून लावण्यात गर्क आहेत. या दोन्ही राज्यातील सत्ताद्वारें काॅग्रेस केंद्र सरकाराशी बखेडा उभा करू शकत नाही. कारण आहे ती सत्ताही  मध्यप्रदेश प्रमाणे गमाविण्याचा धोका आहे.

पंजाब मध्ये काॅग्रेसची मजबूत सत्ता आहे. त्यात ही ते राज्य पाक सिमेवर आहे.  तिथे दिल्लीतील किसांनाच्या आंदोलनाच्या नावाखाली पाक, चीन आणि  कॅनडा सारख्या विदेशी शक्तीच्या साह्याने काॅग्रेसने खलिस्तान चळवळ पुनरूज्वीत करण्याचा घाट घातला आहे आणि काॅग्रेसने आपल्या कॅप्टनलाच गमाविले. खलिस्तान चळवळ पुनरूज्जीवीत करण्याची जबाबदारी नवज्योत सिद्धूकडे आहे आणि मुख्यमंत्री चन्नी फक्त प्यादे आहेत असे ऐकीवात आहे. पंजाब मध्ये जे घडले ते काॅग्रेस श्रेष्ठींच्या आदेशाने घडले आहे असे चौकशीत निष्पन्न झाले तर काॅग्रेस राष्ट्रीय स्तरावरून संपेल.

झारखंड मध्यें भाजपा आणि शिबू सोरेनची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ( झारखंड मुक्ती मोर्चा) आलटून-पालटून सत्तेवर येतात. तिथे काॅग्रेसचे अस्तित्व संपले आहे. बिहारमध्ये काॅग्रेस संपली आहे आणि भाजपा जवळपास सर्वात शक्तीमान पक्ष बनला आहे.  

छत्तीसगडमध्ये काॅग्रेसचे सरकार आहे. पण तिथे मुख्यमंत्री भूपेश वाघेल आणि जेष्ठ नेते टीएस सिंहदेव याच्यातला तंटा संपत नाही. राजस्थान मध्ये तर काॅग्रेस मध्ये इतकी दुफळी आहे की  तेथून  केंद्र सरकारशी आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर  राज्यातील सत्ता भाजपाकडे जाईल. 

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आणि हरियाण इथे सध्या तरी भाजपाचे सरकार आहे म्हणजे केंद्र सरकारशी तंटा नाही. 

ईशान्य भारतात अरूणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम,  मणिपूर इथे भाजपाची सत्ता आहे. बाकी नागालॅन्ड, मिझोरम, मेघालय या राज्यात स्थानिक पक्षांची सत्ता आहे. मोदी सरकारने संपुर्ण ईशान्य भारतातील राज्यांचा विकास टाॅप प्रायारोटीवर घेतला आहे. ईशान्य कडील राज्ये चीनच्या सिमालगत असल्यामूळे तेथील सीमावर सामरीक शक्ती वाढविण्यासाठी ज्या काही मूलभूत सेवांचे जाळे केंद्र सरकार करीत आहे त्यातून या राज्यांत ही उद्योग आणि व्यापार क्षेत्र वाढते आहे. त्यामूळे ही राज्ये केंद्र सरकारशी भांडत नाहीत. 

एकंदरीत केंद्र सरकारच्या विरोधात मोठा उभा बखेडा करण्याचे बळ  विरोधी पक्षांकडे नाही. मग पश्चीम बंगाल, महाराष्ट्र, आणि दिल्ली  या राज्यातील सत्तेवरील मंडळीनी केंद्र सरकारशी बखेडा का उभा केला?  उत्तर एकच आहे आणि ते स्पष्टपणे दिसत आहे. या राज्यातील सरकारं ही गांधी, ठाकरे-पवार आणि ममता बॅनर्जी घराण्यांची आहेत. आपआपल्या राज्यातील जनतेच्या हितापेक्षा राजकारणात आपआपल्या वारसांना कसे बसवायाचे या एकाच चिंतेने ही मंडळी त्रस्त आहे. म्हणून पुरोगामी - उदारमतवादी या गोंडस नावाखाली  राजकीय अभ्यासक, विचारवंत, संपादक नावाची जमात आपल्या हाताशी धरून  ताकदीचा केवळ देखावा ही मंडळी निर्माण करीत आहेत. धोका आहे तो या मंडळींनी विदेशी शक्तीच्या साह्याने पंजाब सारख्या घटना करण्याचा. पण आता मोदी सरकार सजग असेल.  

अलिकडे काॅग्रेस कमकुवत झाल्यामूळे ममता बॅनर्जीं भारत यात्रेला निघाल्या. शरद पवार आणि उद्धव ठाकरे ही महाराष्ट्राचा उबंरठा ओलांडण्याच्या तयारीला लागलेले दिसतात. परंतु घराणेशाही राजकीय पक्षांचा बाप असलेल्या काॅग्रेस पक्षांच्या सर्वसर्वा सोनिया गांधीनी ममता बॅनर्जींना काही किंमत दिली नाही. काॅग्रेसचे युवराज राहूल गांधीनी सेनेच्या संजय राऊतकडे दुर्लक्ष केलेला विडीओ आपण पाहीला आहे.  उठसुठ कानाखाली आवाज काढण्याची भाषा करणारे संजय राऊत त्या विडीओत गरीब, भयभीत झालेली शेळी दिसली आहे.  शरद पवारावर महाराष्ट्रातल्या काॅग्रसजनांनी फारसा विश्वास दाखविलेला नाही. तसेच शरद पवारांनी ममता बॅनर्जींना किंमत दिली नाही. मग ममता बॅनर्जी शरद पवारांना का म्हणून मदत 
करेल ? त्यातही शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेसमधील  एकी तरी कुठे बळकट आहे? सध्यातरी विरोधी पक्ष टेन्टेटीव्ह मुड मध्ये आहेत . पाच राज्याच्या निवडणूकीत भाजपाला थोडाफार धक्का मिळाला तरी २०१९ प्रमाणे लोकसभेच्या निवडणूकीत नरेंद्र मोदी पुढे विरोधी पक्षांचा टिकाव लागेल असे दिसत नाही.

देशांतर्गत राजकारण घातक वळणावर ? (भाग - १)


मागे  ' देशाच्या राजकीय मंचावरील शो- महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया पश्चीम बंगाल ' या लेखमालिकेत,  केंद्र सरकारशी उभा बखेडा करणार्या तीन राज्य सरकारात पंजाब राज्य सरकारची लौकरच भर पडेल असे मी वर्तविले होते. तसेच  किसान आंदोलन - कोण जिंकल कोण हरलं या लेखात देशाचा राजकीय मंच समरांगण होईल असे भाकीत केले होते. दुर्दैवाने हे दोन्ही अंदाज खरे ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंजाबच्या दौर्यावर आपल्या सुरक्षतेच्या ताफ्यासकट हायवे वरील एका ब्रीजवर तब्बल एक तासभर असुरक्षेतेच्या भावनेत अडकावे लागले आणि शेवटी दिल्लीला परत जावे लागले. देशभर बातमी वार्यासारखी पसरली. शेतकर्यांच्या अकस्मात निदर्शनातून ट्रॅफिक जाम झाली होती आणि ज्या ब्रीजवर ट्रॅफिक जाम झाली होती तेथून पाकिस्तानची सीमा फारशी दूर नसल्याचे कळताच देशभरातील सामान्यजनांनी हा मोदीजींची हत्या करण्याचा प्रयत्न होता असे म्हणत सोशल मिडीयावर संताप व्यक्त केला.  पंजाबचे मधील काॅग्रेस सरकार, काॅग्रेस श्रेष्ठी, खलिस्तान वादी, टिकैत सारख्या शेतकरी नेत्यांवर टिका झाली. आरोप-प्रत्यारोप झाले. चौकशीतून सत्य काय ते बाहेर येईल. पण कशाही प्रकारें या घटनेसंबंधी वाद प्रतिवाद झाला, तरी पंजाब  सरकारकडून पंतप्रधानाच्या  सुरक्षतेच्या बाबत हलगर्जीपणा झाला हे कोणी नाकारू शकत नाही.

पंजाब मध्ये घडलेल्या या घटनेने देश हादरून गेला. ही घटना आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेत राहात आहे. या घटनेचे पडसाद कसे आणि किती काळ उमटत राहतील हे  राजकीय पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची वक्त्व्यें आणि परस्परांमधील व्यवहार, तसेच प्रिन्ट, इलेक्ट्राॅनिक्स आणि सोशल मिडीयाचा रोल कसा राहील यावर अवलंबून राहील. सर्वात महत्वाचं म्हणजे देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मानसिकतेवर अधिक अवलंबून आहे. या संदर्भात इथे भूतपुर्व पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयींचा राजकारण संबंधीतला दृष्टीकोन आणि व्यवहार कसा होता याबाबतचा प्रसंग आपल्या समोर ठेवतो. 

प्रसंग आहे सन १९९०-९१ चा. सन १९८९च्या लोकसभेच्या निवडणूकीत काॅग्रेसचे पंतप्रधान राजीव गांधीच्या सरकारचा पराभव झाला. केंद्रात विश्वनाथ प्रतापसिंगचे विरोधी पक्षांच्या आघाडीतून तयार झालेले सरकार होते. ते सरकार पडले. नंतर श्री चंद्रशेखर यांचे काॅग्रेसच्या पाठींब्यातून सरकाल आले. काॅग्रेसने आपल्या सोयीनूसार चंद्रशेखरच्या सरकारचा पाठींबा काढून घेतल्या. लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या. प्रचार सुरू झाला. ऐन प्रचाराच्या धामधुमीत माजी पंतप्रधान- विरोधी पक्षाचे नेते राजीव गांधी यांची तामिळनाडूत एका प्रचारसभेत हत्या झाली. देश हादरला. निवडणूक प्रचार स्थगित झाला. काही दिवसानंतर निवडणूक प्रचार सुरू झाला. भाजपा तर्फे बोरीवलीत भाजी मार्केटच्या गल्लीत रामलिला मैदानावर माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयीची जाहीर सभा होती. सभास्थानी वाजपेयींचे आगमन होत असल्याचे माईक वरून घोषित झाले. कार्यकर्ते उठून उभे राहीले आणि देशका नेता कैसा हो, अटलबिहारी अटलबिहारी अशा जोरदार घोषणा सुरू झाल्या आणि वाजपेयीजी मंचावर विराजमान होईपर्यंत चालू होत्या. नंतर वाजपेयींनी भाषणाची सुरूवातच गंभीर आवाजात केली,  ' देवी और सज्जनों , सवाल देशका नेता कैसा हो यह नही है, सवाल देश कैसा हो, यह है | सवाल चुनाव प्रचारका नही, सवाल राजनिती कैसी हो, सवाल समाज कैसा हो यह है |  सभेत निरव शांतता पसरली. देशाच्या माजी पंतप्रधान राजीव गांधींना एक यथोचित श्रद्धांजली अर्पण झाली. ती ही निवडणूकीच्या प्रचार सभेत. भले पंजाब मध्ये अनिष्ट घटना घडली नसेल पण जे काही घडले त्या संबंधीत राजकीय पक्षांनी आणि मिडीया हाऊसेसांनी कसा व्यवहार ठेवावा, याहून अधिक आदर्श आणि मोलाचं सल्ला राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कुठला आसावा? 

वरील सल्ला फक्त मोदी विरोधकांसाठी नाही तर तो मोदीच्या समर्थकासाठी ही आहे. संकट पंतप्रधानपदावरील व्यक्तीवर असले तरी ते देशावरचे संकट असते. परकीय आक्रमण होवो किंवा नैसर्गिक आपत्ती आणि करोना सारख्या महामारीचे होवो ते आपल्या सर्वांवर आहे. संकट समयी सारे भेद विसरून महाभारतात युधिष्ठीरांनी सांगितलेला 
 वयं पंचाधिकम शतम् | हाच आपला धर्म होय !

पंजाब मधील अनपेक्षित तितकीच भयावय घटनेने पाच राज्यांतील निवडणूकांचा प्रचार, मतदान सुरळीत पडेल का, तिथल्या गल्ली-गल्लीत मिडीयातील पत्रकार कॅमेरामन, जात-पात, धर्म-पंथ, शेतकरी- कष्टकरी , दुकानदार, युवक-महिला इत्यादी  घटकांच्या घोळख्या घोळख्याने मुलाखती घेतांना काही दुर्घटना, घातपात जाळपोळ होणार नाही ना असे असंख्य प्रश्न तेथील मतदारांच्या मनात तसेच इतर राज्यातील लोकाच्या मनात उभे असणारच की ! चॅनल्सवर होत असलेल्या मोकाट चर्चासत्रांच्या ट्रॅफिकतून आरोप-प्रत्यारोप, शिव्या-शाप हे ही एक प्रकारचे मानसिक आघात-अपघातच नव्हे काय?  देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक घटनेवर मग ती घटना मामूली असली तरी त्यात राजकारण घूसवून  केंद्र सरकाराला अडचणीत कसे आणावे हाच बहुतांश विरोधी पक्षांचा एजंडा राहिला आहे. मग केंद्र सरकार कडून प्रत्युत्तर दिले जाते हे ही खरें आहे. पण सोशल मिडीयावर पंतप्रधानांवर खालच्या पातळीवरून टिका होते यावर आळा कसा बसेल, यावर मिडीयात कधी चर्चा होत नाही त्याचे काय?

देश कैसा हों, समाज कैसा हों, राजनिती कैसी हों  अटलजींचे हे बोल आजही कानात गुंजत असतात.  यावर गंभीर विचार होऊन समाजाला मार्गदर्शन कोण देणार? बरं मार्गदर्शन देण्यासाठी कोणी पुढे आले तर त्यांना तुम्ही कोण आम्हांला शिकविणारे असे उत्तर येणं हे ही नित्याचं झालं आहे.  जगभरातील राजकारणाचा दर्जा खालावला आहे .  शेवटी नव्या तंत्रज्ञान युगाचे म्हणा वा आर्थिक उदारिकरणाचे म्हणा हे सारे खेळ असावेत आर्य चाणक्यांनी म्हटले आहे  हर एक नई सुविधा असुविधाको जन्म देती है | हेच खरें. 

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या पंजाब  दौर्यातील घटनेची रितसर चौकशी सुरू झाली आहे. त्यासंबंधी अधिक भाष्यं करणे योग्य नाही. पण देशातील काही राज्य सरकारांनी केंद्र सरकारशी उभा केलेल्या ' उभ्या बखेडांचे ' लोण पंजाब सारख्या सिमावर्ती राज्यात पोहचू लागले ही बाब देशाच्या सार्वभौमत्वला आव्हान तयार झाले आहे. या बखेडाची व्याप्ती (ज्याला आपण रूंदी म्हणतो) तीन-चार राज्यापुरता सिमीत आहे. हे खरे पण दोन सिमावर्ती राज्यात. त्यातील एक पश्चीम बंगाल, दुसरा पंजाब. कालच पंजाबाच्या मुख्यमंत्र्याच्या नातेवाईकाच्या घरावर ईडीने छापा टाकला त्यावर मुख्यमंत्री चरणजीतसिंगनी त्यावर प्रतिक्रीया दिली त्यात ईडीच्या छाप्यातून मिळालेली करोडो रूपयांची बंडले हाती लागली याचा उल्लेख केला नाही. अशीच धाड पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्र्याच्या नातेवाईकाच्या घरावर पडली होती असे म्हणत आमच्यावर दबाब आणत आहेत असे चन्नीने म्हटले. महाराष्ट्रातील ईडीच्या धाडीवर काही उल्लेख केला नाही .फक्त पश्चीम बंगालचा उल्लेख केला यावरून चन्नीना या दोन्ही राज्याच्या सिमा दोन इस्लामी देशांना जोडलेली आहे त्यामूळेच आमच्यावर दबाव वाढविला आहे असे अप्रत्यक्ष सुचविले आहे असे दिसते. चार राज्यांनी उभा केलेला उभ्या बखेडाची खोली वाढती आहे. हे भिमा-कोरेगाव, सीसीए कायद्या विरोधी झालेला धुमाकूळ, शाहीनबाग धरणं, आंदोलक शेतकर्यांनी प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर फडकाविलेला खलिस्थान वाद्यांचा झेंडा आणि आता पंजाबात घडलेल्या घटनेवरून सिद्ध होते. ही बखेडाची खोली विशेषतः मोदी आणि मोदी सरकारच्या  द्वेषांनी भरलेली आहे.

या सर्व घटनांच्या मुळाशी जाऊन अभ्यास केला की आपल्याला मूळ कारण हाती मिळते.  सन २०१४ सालच्या ही अगोदर नरेंद्र मोदीनी गुजरातमधून काॅग्रेस नामशेष करण्याचे काम हाती घेतल्याचं शल्य जे सोनिया गांधीना टोचत होते ते त्यांनी जाहिर सभेत  मौतका सौदागर  अशा टिप्पणीतून व्यक्त केलं. त्या दिवसा पासून सार्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात नरेंद्र मोदी संबंधी पराकोटीचा द्वेष निर्माण झाला आहे. त्याचं रूपातंर विषात झाले आहे. त्यासाठी काही मिडीया हाऊसेस, विदेशी शक्ती, बाॅलिवूड शक्ती, अन्डरवर्ल्ड, सो काॅल्ड लिबरल विचारवंताचा हातभार लागला. सन २०१७ पासून ब्लाॅगवरील बहुतांश राजकीय विषयावरील लेखात मांडत आलो आहे. दिले आहे. १५ जूलै २०१७ रोजी म्हणजे मोदीजी पंतप्रधान झालेल्या फक्त तीन वर्षच पुर्ण झालेली असताना भाजपा आणि विरोधी पक्षातील धुमचक्री का वाढली जाते, या संबंधीचा उहापोह  ' युद्ध मोदी समर्थक आणि विरोधकात ' या लेखात विस्ताराने मांडलेलं आहे. त्या लेखाचा सारांश म्हणा वा विरोधी पक्षाचां मोदीं विषयींचा प्रचंड द्वेषाचं कारण थोडक्यात खाली मांडतो आणि या लेखाच्या भाग १ ची समाप्ती करतो.

सन २०१४ च्या लोकसभेतील भाजपाचा प्रचंड विजय विरोधी पक्षांच्या नेते - कार्यकर्ते  त्यांचे समर्थक मिडीया, विचारवंत आणि काही कलाकार साहित्यिक मंडळींना  पचला नाही. बहुतांश पत्रकार, संपादक मंडळींनी तो विजय मोदींच्या जाहिरातबाजीचा मानला. ही मंडळी मोदींची लाट ओसरणार आणि २०१९ ला परिवर्तन होणारच अशा थाटात वावरत राहीली. वस्तुतः विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री जेव्हा झोपा काढत होते तेव्हा प्रतिकूल परिस्थितीत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदी गुजरातच्या विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी अहोरात्र मेहनत करीत होते. पारंपारीक निवडणूका जिंकण्याच्या क्लृप्त्या कालबाह्य ठरण्याचे युग सुरू झाले होते. तरीही विरोधी पक्षांचे मुत्सुद्धी नेते मोदींना भगवा दशहतवादी ठरविण्यातच गुंतले आणि भ्रष्ट्राचारातून आपल्या थैली भरत होते. कुठे गेले सी चिदबंरम्, कुठे गेले सुशील कुमार शिंदे, मणिशंकर अय्यर ? सोनिया गांधी आणि राहूल गांधी काॅग्रेसचे सर्वेसर्वा होते म्हणून नावाने तरी टिकले आहेत. आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जुनी झालेलं शेंडी-जानवं हिंदुत्वावर टिका करीत आहेत. महाराष्ट्रातील नवमतदार इतके खुळे नाहीत.  शरद पवार गेल्या शताब्दीच्या सत्तरच्या दशकातील संघावर अर्धी चड्डी वरून टिका करतात जणू काही शरद पवार जन्मतः फुल पॅन्ट आणि हाफ बुशशर्ट अशा वेषात भूतलावर आले आहेत की काय?  

महाराष्ट्र टाईम्सने २०१४ च्या निवडणूक प्रचारा दरम्यान 'मोदी  एक जाहिरातबाजीचा चेहरा 'असा प्रताब आसबेंनी लिहलेला लेख पब्लीश केला होता. तेव्हा मी उत्तरादाखल एक लेख (त्याची काॅपी अजूनही मी ठेवली आहे) मटा च्या मेलवर पाठविला. पण त्यांनी पब्लीश केला नाही. प्रताब आसबे प्रकाश बाळ सारखे देशभरातील लिबरल आणि पुरोगामी संपादक मंडळी तसेच असहिष्णूतेची बोंब उठवून देश सोडून जाणार असे म्हणणारी कलाकार मंडळी,, साहित्यिक सन २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालानंतर पुर्णपणे गप्प झाली आहे.  तात्पर्य हे आहे की जो पर्यंत विरोधी पक्ष  मोदी, संघ , आणि भाजपाचा द्वेष करीत राहतील तो पर्यंत त्यांना विजयाची वाट दिसणार नाही. मोदी समर्थकांना अंधभक्त म्हणता म्हणता यांना विजयाची वाट दिसणे बंद झाले आहे. 

(या लेखाच्या दुसर्या भागात केंद्र सरकार विरूद्ध महाराष्ट्र, पश्चीम बंगाल  दिल्ली, आणि पंजाब  सरकारने जो बखेडा उभा केला त्याचे स्वरूप आणि इतर राज्यातून त्याला पाठींबा कितपर्यंत मिळतो यावर आपण चर्चा करू .)

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...