सार्या देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चीम बंगाल, आसाम, पाॅन्डेचरी, तामीळनाडू आणि केरळमधील निवडणूकांच्या प्रचार सभांचा धुराळा उडतो आहे, तोवर ओपिनियन पोल ही येऊ लागले आहेत. सर्व न्युज चॅनेल्स, वर्तमानपत्रें, साप्ताहिके, यु ट्युब चॅनेल्स वरून या राज्यांमधील निवडणूकांच्या प्रचाराचा रागरंग, मतदारसंघ निहाय चर्चा इत्यादी कार्यक्रमांची रेलचेल वाढली आहे. या पाच राज्यातील निवडणूकासंबंधीत आपण ही क्रमशः काही लिहावे असे वाटले. पण आपल्या महाराष्ट्रावर आख्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या वाझे प्रकरणातून अशा काही गोष्टी बाहेर येत आहेत की त्यावर आपल्याशी पुन्हा एकदा संवाद साधावा अशी इच्छा झाली म्हणून हा लेख प्रपंच.
गुरुवार, ८ एप्रिल, २०२१
वाझे प्रकरण गंभीर वळणावर ?
निवडणूका नसतानाच्या काळात ही आपला महाराष्ट्र सचीन वाझे प्रकरणामूळे नॅशनल न्यूज चॅनेल्सवरील चर्चेत अग्रणी दिसतो. एखाद्या चांगल्या कामगिरी संबंधी आपला महाराष्ट्र नॅशनल न्यूज चॅनेल्सवर चर्चेच्या अग्रणी राहिला असता तर आपल्या छातीत ऊर भरून आला असता. पण जे काही घडले आहे आणि घडते आहे त्यातून सर्वात पुरोगामी आणि विकसित राज्य म्हणून जो टेंभा आपण मिरवित होतो तो धुळीस मिळाला आहे. मुंबई हायकोर्टने उपमुख्यमंत्री अनिल देशमूख यांनी खंडणी वसूल करण्याचा आदेश पोलीस स्टाफना दिला होता त्या आरोपा संबंधी जी याचिका होती त्यावर ' सीबाय तर्फे चौकशी करावी ' असा निर्णय दिल्याची बातमी आली. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. जर परमवीर सिंगनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते तेव्हाच देशमुखांनी राजीनामा दिला असता तर इज्जत राखली गेली असती.
एकंदरीत या प्रकरणात फक्त वाझे, परमवीर सिंग आणि अनिल देशमुखाचींच इज्जत गेली असे नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काॅग्रेसचे शरद पवार यांची सुद्धा गेली आहे. तसे पाहता विधानसभेत अलिकडील अर्थसंकल्पच्या अधिवेशनात हा विषय चर्चीला जात होता त्यावेळी बकवास करणारे सर्वश्री संजय राऊत, अनिल परब, जिंतेद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, सचीन सावंत, नाना पाटोले, मलीक सारख्या नेतेमंडळीचींही इज्जत वेशीवर टांगली गेली आहे. आता म्हणे, अनिल देशमूख दिल्लीत गेले आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांनी जी काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे, ती स्वंतत्र रित्याच त्यांना चालवावी लागेल. महाराष्ट्र सरकारने त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. म्हणजे वाझे प्रकरणात अनिल देशमूख हा तिसरा बळीचा बकरा ठरला आहे.
लोकशाहीमध्ये कुठल्याही गोष्टीचे ' एक घाव दोन तुकडे ' असा प्रकार नसतो. प्रथम चौकशी, त्यानंतर प्रथम दर्शनी गुन्हा वाटल्यास केस नोंदविणे मग न्यायालयात जाणे नंतर परिस्थितीजन्य पुरावे दाखल करणे, त्यावर खटला चालविणे, साक्षी घेणे, वेळ पडल्यास संबंधित आरोपींच्या नार्को टेस्ट्स घेणे आणि शेवटी न्यायालयाचा निकाल हाती येईपर्यंत आपल्या सारख्या जनसामान्यांचा संयम संपतो आणि ते प्रकरण आपल्या मेंदुतील विस्मरण नावाच्या स्टोअर्समध्ये जमा होते. शेवटी नाईलाजास्तव ' जसे कर्म तसे फळ ' किंवा 'आले देवादिकांच्या मनी ' अशी आपण समज करून घेतो. सचिन वाझे प्रकरणावरील या चर्चेत देवाधिदेवांचा उल्लेख आल्यामूळे कोरोनाच्या पहिल्या महामारीत सामना वृत्तपत्राचे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊतानी ' देवांनी दारें बंद करून घेतली आहेत ' असे विधान केल्याचे आठवले. या ठिकाणी मी संजय राऊतांना सांगू इच्छीतो की ' गेल्या सोमवारपासून महाराष्ट्र सरकारने छोटा लाॅकडाऊन घोषीत केला आणि मंदिरातील देव पुन्हा दारें बंद करून बसली आहेत आणि अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रीय देताना आपण म्हटले, की ' परमेश्वरा इतकी निरपेक्षपणे चौकशी करणारी यंत्रणा नसते.' 'संजयजी, हा जागा झालेला परमेश्वर कोण आहे हे जरा खुल्या मनाने रोखठोक मधून आम्हांस सांगितला तर बरें होईल. कारण तुम्ही मानलेल्या दोन ईश्वरापैकी एकाने मौन धरले आहे. दुसरा ईश्वर पोटदुखीने त्रस्त आहे. दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन खोटे-नाटे खुलासे देताना राऊतांच्या या महादेवाची तारांबळ उडालेली दिसली.' त्यामूळे संजय राऊतांनी कुठल्या निरपेक्ष परमेश्वराचा उल्लेख केला आहे हेच आता कळेनासे झाले आहे. शेवटी कुठला का असेना पण संजय राऊतांना परमेश्वर आठवला हे ही नसे थोडके ! मागील लेखात मी म्हटले होते की, ज्या तत्परतेने मोदी-शहा जोडीने एनआयए कडे हे प्रकरण सोपविले त्यावरूनच ठाकरे सरकाराच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज येतो. पण वाझे प्रकरणातून जे काही बाहेर येत आहे हे पाहता जो काही मी अंदाज बांधला होता तो फारच थिटा पडणार आहे, असे दिसू लागले आहे.
एनआयएच्या तपासातून दोन cctv vdr, दोन cpc, दोन hard disk, प्रिन्टर, दोन number प्लेट्स, बनावट पासपोर्ट, नकली आधार कार्ड, एटीम कार्ड, ज्यात बार आणि रेस्टाॅरन्ट मालकाची नावे व हिशोब असलेली एक डायरी अशा बर्याच काही गोष्टी हाती लागल्या आहेत. सचिन वाझेच्या चार मार्च या दिवसाच्या सार्या हालचाली, म्हणजे सीएसएमटी स्टेशन ते कळव्यापर्यंतचा रेल्वेने प्रवास, नंतर मनसुख हिरेनचे पार्थीव मिळाले तिथे उपस्थिती नंतर पुन्हा बारकडे जाणे सारं काही एनआयएने टिपण काढून ठेवली आहेत. ठाण्याच्या हाॅस्पीटलमध्ये जिथे मनसुख हिरेनच्या देहाचे पोस्टमार्टम झाले त्याच दिवशी त्याच वेळी तिथे वाझेची उपस्थित होती असे विडीओतून आपण पाहिले. मनसूख हिरेनचा मृत्यु हा राजकारणातला बळी मानला जातो तेव्हा त्यासाठी सरकार विरूद्ध भांडणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्य जरूर आहे. पण मुंबईतील नाईट लाईफ मध्ये सर्वसामान्य जनांतला या मनसूख हिरेनचे सचीन वाझे सारख्याशी इतके सख्य कसे जमले हा ही एक आपल्यासारख्या जनसामान्यांना प्रश्न पडतो. याचा अर्थ आपल्या समाजव्यवस्थेतच बिघाड झाला आहे हे तर मान्य करावे लागते. वाझे सोबत असलेली एक स्त्री, ती कोण होती, हे शोधणे एक दिव्य काम होते. पण एनआयएने तिचा ही शोध लावला. ती कोणीतरी मिरा रोडला राहणारी मीना जाॅर्ज आहे. तिची ही चौकशी सुरू होत आहे. त्यातून वाझे सोबत असलेले बँकेचे खाते, २५ लाखाची रक्कम, इत्यादी महत्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. वाझे वापरत असलेल्या उंची गाड्या, त्यांची राहणी, उंची हाॅटेलमधील वास्तव्य, सर्वच काही अलीशान, जणू एखाद्या चित्रपटातला अन्डरवर्डचा डाॅन भासावा असे अनेक विडीओ मधून वाझेंना आपण पाहीले आणि ऐकले आहे. पण समाजात नाईट लाईफच्या जीवनशैलीशी महिला वर्गाला आकर्षण कसे वाटले हा ही आजच्या बाजारी समाजव्यवस्थेतला मोठा दोष दिसतोय, त्याचे काय ? असे म्हटले जाते की प्रत्येक पेयात पाणी असते. दुधात, फळांच्या रसात, माणसाच्या रक्तात सुद्धा पाणी असते. पण ते पाणी म्हणून ओळखले जात नाही. आपली द्रवरूपता अन्य रूपात प्रगट करणारे व आपले सत्व समर्पित करून परत्त्वात विलीन होणारे पाणी हे सृष्टीतले समरसतेचे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. समाजातील आपल्या सारखी सर्वसामान्य माणसे देशासाठी हेच करतात. पडेल ते काम पत्करणारी व वाट्याला येईल ती भूमिका पार पाडणारी सामान्य माणसे जगातून चालती झाली तर मागे काय उरेल? प्रत्येक जण लोकनेता, प्रशासकीय अधिकारी किंवा तथाकथित 'श्रीमंत ' झाला तर कामें पार पडतील का? सुतार, लोहार, चांभार, दुकानदार, बस कन्डक्टर, हमाल, भाजीवाला, चायवाला, पानपट्टीवाले ही माणसे जगातून चालती झाली तर समाजजीवन शून्यवत होईल. माणसाच्या या सामान्यत्वाला लोकशाहीत नागरिकत्वाचे परिमाण लाभते. नागरिकत्वाची निर्मलता, सुदृढता हेच लोकराज्याचे खरे बळ आहे. जेव्हा सामान्य माणसाला ही जगण्यासाठी लबाडी करावी लागते, तेव्हा लोकशाहीची प्रतिष्ठा धोक्यात येते. एनआयएच्या तपासातून जे काळेबोरें बाहेर येत आहे ते पाहता फक्त राजकीय व्यवस्थाचीच लक्तरे बाहेर येत आहेत असे नाही तर संपूर्ण मराठी भाषिक समाजाची जगभर शीं थू झाली आहे. आम्ही शाहू, फूले, आंबेडकरांचा वृथा अभिमान तरी कशासाठी बाळगावयाचा? आपण स्वतःच आपली फसवणूक करीत आहोत.
सचिन वाझेंनी जितकी वर्षे पोलीस दलात काम केलं आहे. त्यातील बहुतांश काळासाठी ते बडतर्फ होते. असे ऐकीवात आले आहे की त्या काळात सचीन वाझेंनी माहिती व तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले. केवळ शिक्षणच घेऊन ते थांबले असे नाही तर त्या क्षेत्रात इतकं प्राविण्य मिळविले आहे की अट्टल सायबर गुन्हेगारां पेक्षा ते महाअट्टल गुन्हेगार ठरावेत. काल तर सचिन वाझेनीं म्हणें एक लेटर बाॅम्ब टाकला आहे आणि त्यात शिवसेनेचे मंत्री अनिल परब, अजित पवार आणि शरद पवार यांच्या ही नावाचा समावेश आहे. एखादा डोंगर पोखरला की त्यातून चित्र-विचित्र प्राणी बाहेर पडतात तसेच काहीतरी अजब आणि आपल्या तर्काच्या पलिकडचे जग कसे आहे याचे पुसटसे दर्शन होत आहे. दिवसा काबाडकष्ट करून शांतपणे घरी परतायचे आणि रात्री झोपी जाणे हा आपल्या सारख्या सामान्यजनांचा दिनक्रम. पण ही मुंबई मायानगरी आहे. इथे रात्रीच ज्यांचा दिवस सुरू होतो असे लोक ही राहातात आणि आपले करोडो रूपयाचे व्यवहार करतात. हे व्यवहार करीत असताना एकाची ऐशबाजी तर दुसर्याचे शोषण, छळ किंवा थेट मृत्यू. मग तो लपविण्यासाठी बर्याच खटपटी आणि त्यातून आपल्या सारख्यानांही उपद्व्याप. सर्वत्र पोलिसांची टेहाळणी. नाईट लाईफचे समर्थक आणि रातोंके राजेलोक राजरोसपणे आपल्यावर सत्ता गाजवित असतात. यांना माणसें म्हणावे की पशू ? एखाद्या माणसाची अवहेलना करताना आपण त्याला
'पशू' असे म्हणून मोकळे होतो. पशू मुके असतात. त्यांना सत्य समजते पण उच्चारता येत नाही. माणूस समजून उमजून सहज खोटे बोलतो. माणसे तंटेबखेडे करतात. चोर्या करतात. लूट करतात. मारामारी करतात. दंगली व जाळपोळ करतात. कोर्टाची पायरी झिजेपर्यंत तिचा चढउतार करतात. पशू अशा प्रकारची आगळीक करीत नाहीत. भूक नसताना ते खात बसत नाहीत. ते भक्ष्य मिळवितात आणि लागलीच खातात. उद्याच्या दिवशी खाण्यासाठी तजवीज व्हावी म्हणून फ्रिजमध्ये ठेवतात किंवा बेकायदा साठा करतात असे काही ऐकीवात आले नाही. पशू उगाच कोणाची छेड काढीत नाहीत. द्वेष-मत्सर हा भाव त्यांच्या जीवनात आढळत नाही. पशू-पक्षांना मानसोपचाराची गरज नसते. त्याच्यांत पक्ष, गट, संघटना नसतात. असतात ते थवे आणि कळप. स्वार्थ साधावा म्हणून ते संस्था काढीत किंवा चालवित नाहीत. हे सर्व पशू-पक्षी जीवन पाहिल्यावर माणसाने जीवन सुधारावे असे वाटते की नाही? सत्ता, मत्ता, मानापमान ही नाटके सोडून पशूंची पार्दशकता पत्करून आपल्याला किमानपक्षी सुखाने जगता येऊ शकते की नाही ? श्रीगोपाळकृष्ण, श्रीपशुपतिनाथ आणि श्रीदत्तगुरू सारख्यां पशुधनाचा आदर करणार्या देवाधिदेवांची, संत-महंतांची परंपरा असलेल्या आपल्या समाजाने पशू-पक्ष्यांकडून काही शिकावयास हवे की नाही? इत्यादी प्रश्न आपल्यासारख्या जनसामान्यांच्या मनात उभे राहिले आहेत.
वाझे प्रकरण इतकं गंभीर वळणावर आलेलं आहे की ते केवळ महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसून आपल्या देशाच्या सुरक्षतेला आव्हान उभे करणार्या पाकिस्तान देशाने रचलेल्या कटाशी संबंध आहे असे राॅचे निवृत्त अधिकारी एन. के. सूद , माजी पोलीस महासंचालक अरविंद इमानदार, माजी केंद्रीय गृह सचीव आर. वी. एस. मणी यांच्या सारख्या अनुभवी अधिकार्यांच्या मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे. वाझे प्रकरणाला आपल्या बाॅलीवूड मधील कलाकारांचा, राजकीय नेत्यांचा मुंबईत १९९३ साली बाॅम्बस्पोट घडवून आणणार्या मोस्ट वान्टेड खतरनाक दाऊद ईब्राहीमशी थेट असलेल्या संबंधाची मोठी पार्श्वभूमी आहे असे ही म्हटले जात आहे. एनआयएच्या तपासातून जे काही बाहेर येत आहे त्यावरून मविआ नावाचे सरकार अस्तित्वात आणण्याची योजना२०१९ च्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारातच आखली होती की काय असा संशय बळावतो आहे. मविआ सरकारने फक्त केंद्र सरकारच्या विरूध्दात बोलणे, सारा दोष केंद्र सरकारचाच असा पवित्रा घेऊन महाराष्ट्रात इतक्या हत्या घडत असुनही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर नाही असा देखावा विद्यमान राज्य सरकार करीत आहे. ही तर हद्दच झाली हो ! आता तर महाराष्ट्र सरकार गृहमंत्री अनिल देशमुखाच्या पाठीशी बळ उभे करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच की ! आताच्या ताज्या बातमीनुसार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमूख यांच्या याचिका फेटाळल्या आहेत. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मविआ सरकारच्या अध्वैर्युंच्या थोबाडीत सणसणीत हाणली आहे. जे ' महा राष्ट्र ' म्हणून ओळखले जावे यासाठी ज्या १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले, ज्यांनी तहान-भूक विसरून संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन छेडले, केंद्र सरकार मधील अर्थमंत्रीपदाचा ज्यांनी राजीनामा दिला, ज्यांनी ' हे मराठी भाषिकाचे राज्य ' असे उद्गार काढीत समस्त मराठी लोकांच्या अभिमानरूपी सागराच्या लाटेतून आलेला, १मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण कलश आपल्या हातात घेऊन आले, अशा आपल्या पुर्वाश्रमींच्या स्वप्नातील हाच तो आधुनिक, पुरोगामी, आणि विकसित महाराष्ट्र का ? येत्या १मे ला आपल्या राज्याचा ६२ वा वर्धापन दिन आपण साजरा करणार आहोत पण कुठल्या हाताने साजरा करणार ? निरपधार्यांच्या रक्ताने माखलेल्या हाताने की लोकांकडून खंडणी स्विकारलेल्या हातानी ? कुठल्या मुखाने आपण जय महाराष्ट्र म्हणणार आहोत ? हे फक्त तो सर्वसाक्षी परमेश्वरच जाणो !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)
गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...
-
मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात स...
-
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली तरीही अधूनमधून नवीन चित्रपट येऊ घातला कि समाजातील एखाद्या वर्गाच्या भावना दुखावल्या जाण...
-
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकाचा निकाल लागला. महायुतीचा प्रचंड विजय झाला. असा एकतर्फी निकाल महाराष्ट्रात आजपावेतो आला नव्हता हे सत्य आहे ...
नमस्कार म्हात्रेजी,
उत्तर द्याहटवायापेक्षा अधिक परखड काय, अतिशय स्पष्टपणे केलेल आकलन. इतक्या बेकायदा कारवाया होऊनही हे राज्यकर्ते, एक मिनिट सुध्दा खुर्चींत कसे रहातात हे आकलन शक्तिच्या बाहेर.व मिडियाही गप्प. हेच चित्र जर उलट असतं, (असणार नाही याची खात्री आहे) तर किती प्रचंड गदारोळ झाला असता, मिडियासह, याची मात्र निश्चित कल्पना आहे.
धन्यवाद.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात हीच परिस्थिती होती. लोकं नेहरुं पासून ना. स. का. पाटील आणि यशवंत राव चव्हाण यांच्या पर्यंत काळी निशाणे, जोडे घेऊन धावायची. एकही सभा होऊन द्यायची नाहीत. झालीच पोलीस बळचा वापर करून तर श्रोते कमी पोलीस जास्त. अशी एकूण परिस्थिती. आचार्य अत्र्यांनी सभेत प्रश्न विचारला की सगळे काँग्रेस चे नेते मुंबई सह संयुक्त महाराष्ट्रासाठी आम्ही महाभारतसारखं दुसरं धर्मयुद्ध करू, नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकू. अशी वक्तव्य करतायत. जोडे खातायत लोकांचे पण सत्ता काही सोडत नाहीत असे का? याचे उत्तर अत्र्यांनी असे सांगितले होते की लोकं एकच जोडे मारतायत. दुसऱ्या पायाचा जोडा मारलात तरच त्यांना काहीतरी उपयोग होईल. म्हणून सर्व नेते दुसऱ्या पायाचा मापाचा जोडा मिळण्याची वाट बघत तसेच खुर्चीला चिकटून बसले आहेत. ही आचार्य अत्र्यांनी केलेली भविष्यवाणी 65वर्षांनतर ही तितकीच खरी आहे.
हटवाबिवलकरजी, धन्यवाद !
उत्तर द्याहटवाधन्यवाद Unknown. आमची मुंबई आमचा महाराष्ट्र या शिवसेनेच्या घोषणा आणि आम्ही महाराष्ट्राचा बिहार आणि उत्तर प्रदेश होऊ देणार नाही या शरद पवाराच्या घोषणा. याच पवारांनी नरसिंह राव, गौडा, गुजराल, चंद्रशेखर, मनमोहनसिंग याच्यां सरकारात मुलायम आणि लालू च्या मांड्यांना मांड्या लावून सत्ता उपभोगली. शिवसेनेने सत्तेसाठी शरद पवाराशी सोयरिक केली आणि महाराष्ट्रात हत्त्या घडविल्या.एका वर्षात यांनी पुर्वीचा बिहार आणि उत्तर प्रदेशा ची प्रतिमा होती तशी महाराष्ट्राची प्रतिमा केली. आज बिहार आणि उत्तर प्रदेश विकास करीत आहेत. आणि इथे महाराष्ट्र सरकारच जणू आरोपीच्या पिंजर्यात अडकलेलं दिसते. खंडणी, हत्त्या आणि स्त्रीयांचा छळ असे आरोप सरकारवरच होत आहेत.आपलं दुर्दैव आणखिन काय म्हणावं ?
उत्तर द्याहटवा