आज शनिवार १ ऑगस्ट २०२० भारतीय असंतोषाचे जनक, स्वातंत्र्यसूर्य लोकमान्य टिळक यांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने लोकमान्य टिळकांचे अष्टपैलू गुण, प्रचंड विद्वत्ता, जाज्वल्य राष्ट्रभक्ती, समाजाबद्दलची त्यांची असीम आत्मियता, राजकारण- शिक्षण- समाजकारण - प्रबोधन आणि धर्मजागरण इत्यादी क्षेत्रातील त्यांचे अतूल्य कार्य व ते करीत असताना स्थितप्रज्ञ वृत्तीने भोगलेला कारावास व हालअपेष्टा इत्यादी संबंधीच्या स्मृती जागविण्याचा उपक्रम अनेक स्वयंसेवी संघटना व संस्था तसेच वृत्तपत्रे, नियतकालीकांनी सुरू केला आहे. त्याबद्दल या सर्व मंडळीचे कौतूक करावे तितके कमी आहे. आज आपला देश कोरोना रूपी नागाच्या विळखात अडकल्यामूळे आपली अर्थव्यवस्था जी कोलमडली आहे, अशा वेळी, लोकमान्य टिळकांचा स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, हा चतुःसुत्रीचा मंत्र आणि त्यांनी दिलेला
पुनश्च हरी ओम असा स्पुर्तीदायक नारा निश्चीतच देशाला आत्मनिर्भराच्या दिशेने वाटचाल करण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो. या उपक्रमात मी ही सामील व्हावं असा आग्रह माझे परम मित्र श्री प्रमोदजी बापट यांनी केला. मी तात्काळ होकार दिला खरा पण लागलीच जाणवू लागले की, लोकमान्य टिळकांच्या चरीत्रातील एखादा प्रसंग लिहणे म्हणजे टिटवीने आपल्या चोचीने महासागराचे जल मापन करण्यासारखे आहे. पण त्यातून एका युगपुरूषाच्या स्मारकाच्या चरणी लीन झाल्याचे समाधान मिळणार आहे म्हणून हा लेख प्रपंच.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक नेत्याचे , क्रान्तीकारकाचे योगदान बहुमूल्य आहे. म्हणूनच आपण सर्व स्वातंत्र्यसेनानींची जंयती वा पुण्यतिथी साजरी करतो. आचार्य अत्रे हे एक उत्तुंग व अष्टपैलू व्यक्तीमत्व. त्यांनी आपल्या एका पुस्तकात विद्यार्थी दशेतील आठवणी सांगताना लिहले आहे की "आम्हां मित्रामध्यें एक असा बोली करार ठरला होता की आमच्यापैकी ज्याला कोणाला लोकमान्य टिळकांचे दर्शन झाले तर त्याने सर्वांना चहा द्यावा. आचार्य अत्रेंना लोकमान्य टिळकांचे दर्शन झाले तेव्हा त्यांनी मित्रांना चहा दिला होता. अत्रेंनी पुढे लिहले होते, '' मला तर एक दिवस लोकमान्य टिळकांचे दर्शन इतक्या जवळून झाले होते की मी त्यांच्या करकरीत उपरणाला हाताने स्पर्श केला तेव्हा मला स्वर्ग दोन बोटे उरला होता." लोकमान्य टिळकांच्यात असलेल्या तेजाचे आचार्य अत्रेंना विद्यार्थी दशेपासून अप्रूप वाटत असे. ते आपल्या त्याच पुस्तकात लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेचे वर्णन करताना म्हणतात, " लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेला लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेले लोकांचे चेहरे जणू आपला आधार हरवल्यासारखे सुतकी दिसत होते." पुढे ते स्पष्टपणे मांडतात की," त्यावेळी सडसडीत बांध्याचे मोहनदास करमचंद गांधी राष्ट्रीय सभेचा नेता म्हणून भाषणाला उभे राहीले, तेव्हा लोकमान्य टिळकांच्या इतकं ओजस्वी व तेजस्वी नेतृत्व राष्ट्रीय सभेला पुढे मिळेल अशी आशा मावळली." अत्र्यांनी लोकमान्य टिळकांच्या मृत्युचे वर्णन ' स्वातंत्र्यसूर्याचा अस्त ' अशा शब्दात केले आहे. आपल्या देशाच्या अर्वाचीन इतिहासात सूर्याची उपमा प्रथमच मिळालेली अशी राजकरणात कार्यरत असलेली पहिली विभूती लोकमान्य टिळक होय. या बाबत दूमत होऊ नये. भारतीय जनता लोकमान्य टिळकांना दैवत मानत असत. याचे कारण ते जनतेला आपले दैवत मानत असत. आचार्य अत्र्यांनी लोकमान्य टिळकांचे वर्णन भारताचे स्वातंत्र्यसूर्य असे केले ते उचीतच होते. वस्तूतः सूर्य कधी मावळत नसतो. आपली पृथ्वी स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरत असते म्हणून दिवस व रात्र चे चक्र सुरू असते. सूर्यनारायण अनादि काळापासून तेजाने तळपळत आहे. तो जीवसृष्टीला आपल्या प्रकाशातून जन्म देतो पण त्या सूर्याला त्याबद्दल उपकाराची भावना शिवत नाही. तो आपल्या प्रकाश देण्याच्या कर्मात इतका समरस होतो की तो प्रकाश देतो हे ही विसरून गेलेला आहे. आपला स्वतःचा मूलगा प्लेग मध्ये दगावला असताना, सारं दुःख विसरून प्लेगच्या साथीने पछाडलेल्या समाजबांधवांच्या सेवेसाठी लोकमान्य टिळक दिवसरात्र अविरतपणे झटत राहीले हे कसले द्योतक मानावे? असे सेवाव्रत राजकारणात दिसते तरी का? महाराष्ट्रात कोरोनाचे आक्रमण तीव्र होत असताना आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरें घरातून बाहेर ही पडत नाहीत पण सल्ला देण्याचे तेवढे काम नेटाने करीत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत पक्षांतर्गत लढाईचा तमाशा मांडत आहेत. रशियातील श्री निकीता ख्रुश्चेव्ह पक्के खूनशी राजकारणी पण त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, ' Politicians are the same all over. They promise to build a bridge even where there is no river. '
लोकमान्य टिळक राजकारणात होते पण ते राजकारणी नव्हते असे सतत वाटते. स्वराज्य हे त्यांचे ध्येय होते. ते आपल्या ध्येयात इतके समरस झाले की ते ध्येयच स्वराज्य लढ्यातील त्यांचे गुरू ठरले असावेत. त्यांनी आपल्या जीवनात जे उद्योग केले ते राजकीय पटलावर केले असे वाटत असले तरी मुख्यतः स्वातंत्र्यलढ्यातले योद्धा म्हणूनच त्यांनी आपले सारे आयुष्य वेचले. स्वामी विवेकानंदांना योद्धा संन्यासी असे गौरविले जाते तसेच लोकमान्य टिळक म्हणजे प्रपंच थाटून ही परामर्थ करणारे संन्यासी योद्धाच की. या ठिकाणी सुप्रसिद्ध समाजसेविका भारती ठाकूर यांनी आपल्या नर्मदा परिक्रमा या पुस्तकात भारतीय संस्कृतीसंबंधी यथोचित वर्णन केल्याची आठवण होते. त्या लिहीतात, " भारतीय संस्कृती जीवन परायण आहे. समग्र जीवनाचा बिनशर्त आणि संपूर्ण स्विकार हे भारतीय संस्कृतीचं मूलतत्व आहे. त्यात पलायानवाद नाही. घरदार सोडून, जबाबदारी सोडून अरण्यात जा, गिरीकंदरात जा आणि मग त्या जीवनात सार्थकता आहे असा त्याचा अर्थ नाही. अध्यात्म म्हणजे तरी काय? जाणलेलं सत्य जगणं म्हणजे अध्यात्म. जगण्याचं कर्म हीच आत्मसाधना. रोजचं जीवन हेच साधनेचं क्षेत्र आणि तेच खरे साधनेचे क्षण. प्रपंचात राहून परमार्थ करणं हीच खरी तपस्या." लोकमान्य टिळकांचा प्रपंच देशभर व्यापला होता. प्रपंचात राजकारणाला स्थान नसते. फक्त कर्म हेच जीवन असते. देशकार्यासाठी वाट्याला आलेल्या कारावासातही त्यांची कर्मभक्ती जरापण खंडीत झाली नाही. त्यांच्यातील असामान्य स्थितप्रज्ञ वृत्तीतून ते गीतारहस्य सारखा महान ग्रंथ लिहू शकले असावेत असे वाटते. महात्मा गांधीजींनी गीतारहस्य या ग्रंथावर अभिप्राय देताना म्हटले की " गीतेवरील टिळकांची टिका हीच त्यांचे शाश्वत स्मारक होय. स्वराज्याची लढाई फत्ते झाल्यानंतरही तें टिकूनच राहील. तेव्हा देखील टिळकांचे निष्कलंक चारित्र्य आणि गीतेवरील त्यांची महान टिका यामूळे त्यांची स्मृती चिरप्रेरक राहील. त्यांच्या हयातींत किंवा आता सुद्धा टिळकापेक्षा अधिक व्यापक किंवा सखोल शास्त्रज्ञान कोणाचेंही सापडणे शक्य नाही. गीता आणि वेद यांतून निर्माण होणार्या प्रश्नांचे टिळकांनी केले त्यापेक्षा जास्त व्यवस्थित संशोधन कोणींही केले नाही. अगाध विद्वत्ता, अमर्याद स्वार्थत्याग व आजन्म देशसेवा यामूळे जनता जनार्दनाच्या हृदयात टिळकांनी अद्वितीय स्थान मिळविले आहे."
लोकमान्य टिळकांच्या चरीत्रात असे अनेक दाखले मिळू शकतात की त्यावरून त्यांच्या जीवनाचे ध्येय फक्त राष्ट्रसेवा होते. म्हणूनच ते सच्चे राष्ट्रवादी ठरले. लेखाच्या विस्तारभयाने सारेच दाखले इथे देता येत नाहीत. पण त्यांच्या विद्यार्थी दशेपासून ते मृत्युपर्यंतचा सारा प्रवास राष्ट्रभक्तीरूपी ज्योतीच्या प्रकाशाने झळाळलेला होता. त्यांच्यी बालवयात दिसून आलेली कुशाग्र बुद्धी आणि करारीपणा, स्थंभीत करणारा होता. विद्यार्थी दशेतच बाळ गंगाधर टिळक आपल्या वर्गशिक्षकाला ठणकावून उत्तर देतो '' मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही व मी मार खाणार नाही. '' असे खणखणीत उत्तर देणारा विद्यार्थी ब्रिटीश राजवटीला हादरून सोडणार हे नियतीनेच ठरविले होते. बाळ मॅट्रीकला असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले. एवढा मोठा आघात पण बाळ गांगरला नाही. शांतपणे त्याने आपला अभ्यास चालू ठेवला. मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाला. " माझी शिकण्याची इच्छा होती पण ती तशीच राहीली. पण तुला खुप शिकलेला पाहून मी ती भागविणार आहे. " आपल्या पिताश्रीचे हे बोल बाळच्या अंतःरकरणात सतत प्रेरणा देत होते. म्हणून आपल्या नातेवाईकांचा "नोकरी कर, घर व संसार सांभाळ " असा उपदेश पाळत नव्हता. तो स्पष्टपणे उत्तर देत होता, " मी स्काॅलरशिप मिळविन, व उच्च शिक्षण घेईनच घेईन. एके काळी आपल्या देशात सोन्याचा धूर निघत होता. दुधातुपाच्या नद्या वाहात होत्या. तिथे आज अठरा विश्वे दारिद्य्र आले आहे. आणि साहेबांच्या इंग्लंडात जिथे लोखंड आणि दगडी कोळसा या पलीकडे काहीही पिकत नाही, तिथे आज भरभराट व समृद्धी आहे. ज्यांनी ही स्थिती केली त्यांची मी चाकरी करू म्हणता? आपल्या आईचे रक्त पिणार्या दुष्ट नराधमांची मी नोकरी करू म्हणता? छेः ! ते कदापि शक्य नाही. मला त्यांना हाकलून द्यावयाचे आहे. आपल्या भारतमातेला मला स्वतंत्र करावयाचे आहे. तिच्या सेवेत मला आयुष्य वेचावयाचे आहे. चाकरी करीन ती फक्त भारतमातेची करीन, विद्यादेवीची करीन. पोटासाठी शत्रूची चाकरी करीन अशी कधी कल्पनाही मनात आणू नका. " बाळचे असे उद्गार ऐकून त्याला उपदेश करायला आलेले नातेवाईक हळूच काढता पाय घेत. पण जाताना आपआपसांत बोलत होते, 'पोर छांदिष्ट आहे, कोणाचे ऐकणार नाही.' ते खरे हो, पण या अचाट कल्पना ! कोठे आपण आणि कोठे इंग्रज ! केवढे त्यांचे साम्राज्य ! काय अचाट त्यांचे सामर्थ्य ! पण हे मात्र खरे, एवढ्या वयात केवढी ही उंच झेप या बाळची ! बोलण्यात किती कणखरपणा ! जशी काही सिंहगर्जनाच !
मॅट्रीकची परीक्षा नुकताच उत्तीर्ण झालेला हा बाळ राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळा काढणार, स्वराज्यसाठी समाजाची एकता स्थापना करण्यासाठी धर्म जागृती करणार, स्वदेशीची चळवळ उभारणार, युवकांना प्रेरणा देणार, ब्रिटीश सत्तेशी झुंजणार, शेतकरी, कष्टकारी, मजूर, गोरगरीबांना मार्गदर्शन करणार ही सर्व कार्ये नियतीने टिळकांकडून करून घ्यावयाचे ठरविलेले होते. म्हणूनच नियतीने साहित्य क्षेत्रात व नीतीशास्त्रात जागतिक पातळीवरचे अत्युच्च स्थान लोकमान्य टिळकांना पटकाविण्यापासून वंचित केले असावे अशी अंतःकरणातील भावना गीतारहस्य ग्रंथावरील अभिप्राय देताना महर्षी योगी अरविंद यांनी व्यक्त केलेली आहे. त्यावरूनच असे वाटते की लोकमान्य टिळक राजकारणात होते पण राजकारणी नव्हते. ते आसक्ती आणि विरक्ती मधील परमावधी गाठणारे युगपुरूष होते.
रॅन्डसाहेबांच्या खूनानंतर चहूकडे नाकेबंदी झाली. पटाईत गुप्त पोलीस बोलाविण्यात आले. कसून शोध सुरू झाला पण मारेकरी सापडले नाहीत. तेव्हा सरकारने लोकांचा छळ वाढविला. धरपकड, धमक्या, निरनिराळ्या प्रकारें दडपशाही करायला सुरूवात केली. तेव्हा टिळकांनी केसरीत "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का" असा अग्रलेख लिहून भारतीय जनतेची बाजू अगदी सरळ आणि स्पष्टपणे मांडली. पाठोपाठ " राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे " असा दुसरा लेख लिहिला. आपल्याला कारावास भोगावा लागला तरी त्यांना पर्वा नव्हती. त्यांना भारतीय जनतेवरील अत्याचार पाहवत नव्हता. लेखणी हे शस्त्र वापरणारा अर्वाचीनच नव्हे तर भारताच्या प्राचीन इतिहासातही लोकमान्य टिळकासारखा योद्धा नसावा असे वाटते.
छत्रपती शिवाजी महाराज हे टिळकांचे प्रेरणास्थान होते. त्यामूळे त्यांनी ब्रिटीश सरकार विरूद्धच्या ज्या राजकीय चाली खेळल्या त्यात निर्भयता दिसत होती. राजकीय किंवा राजकारणातील व्यक्ती बहूतांश आपल्या प्रतिमेला जपतात. म्हणजे एका परिने भित्रे असतात. टिळकांनी, १८९७ च्या सुमारास केसरीच्या एका अंकात " शिवाजी उद्गार " या नावाची एक कविता प्रसिद्ध केली होती.
"स्वर्गातून शिवाजी महाराज भारतातील स्थिती पाहात आहेत. आपण पेरलेले गुण त्यांना कुठेच दिसत नाहीत. सगळीकडे दुर्गुणच दुर्गुण दिसतात. हे पाहून त्यांना फार दुःख होते. इंग्रजांना ही ते सांगतात की, मी सुरत लुटली तेव्हा तुम्हाला धक्का लावला नव्हता याची जरा आठवण ठेवा." असा त्या कवितेतील आशय होता. त्याच अंकात शिवाजी उत्सवातील, टिळकांच्या भाषणातले एक वाक्य लिहले होते की, " म्लेच्छांना येथे राज्य करण्याचा ताम्रपट कोणी दिलेला नाही." सरकारने टिळकावर राजद्रोहाचा आरोप ठेवला. टिळकांच्या काही मित्रांनी माफी मागण्याची कल्पना मांडली. टिळकांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले," राज्ये फुकट मिळत नसतात. त्या करीता बलिदान करावे लागते." टिळकांच्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीतून साकार झालेले अग्रलेख लोकांच्या हृदयाला साद घालीत असत. देशाच्या सर्व प्रातांत टिळकांच्या भाषणांचा कार्याचा प्रभाव पडत गेला. कुशाग्र बुद्धीचे टिळक जनतेशी संवाद वा भाषण करताना अंतःकरणातून बोलत असावेत. त्यांची ओघवती हृदयस्पर्शी भाषेतील मातृभूमीची भक्ती व ब्रिटीश सरकारवर कडाडून प्रहार करण्याच्या पद्धतीतून अनेक युवकांनी टिळकांनी स्वराज्यरूपी मांडलेल्या अग्नीकूंडात उडी मारली आणि सशस्त्र क्रान्तीचा मार्ग स्विकारून यश ही मिळविले. स्वराज्य, स्वदेशी, विदेशी मालावर बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुःसुत्रीचे देशभर जाळे विणले गेले. बंगालच्या फाळणीविरूद्ध त्यांनी केलेली जागृती इतकी ताकदवान ठरली की सरकारला बंगालची फाळणी रदबादल करावी लागली. टिळक बोले देश डोले अशी स्थिती देशभर झाली होती. जनतेच्या सुखदुःखात ही ते सहभागी होत असत. कामगार असो, मजूर असो, शेतकरी असो की छोटा व्यापारी जिथे जिथे सरकारने अन्याय केला असेल तर ते केवळ अग्रलेख लिहून थांबत नसत तर ते प्रत्यक्ष दुःख निवारण्यासाठी लोकात जात असत. म्हणून त्यांना तेल्याबोळाचे टिळक अशी उपाधी मिळाली. म्हणूनच साम्यवाद्यांनाही टिळक आपलेसे वाटत होते.
लोकमान्य टिळक धर्मभिमानी होते. पण हिंदू समाजातील दोष नाहीसे व्हावेत या मतावर ही ते ठाम होते. अन्यथा त्यांची आगरकरांशी इतकी घनिष्ठ मैत्री जडलीच नसती. राजकीय सत्ता पदरात पाडून घेतल्याशिवाय सामाजिक सुधारणा होतील पण त्या स्थायी स्वरूपाच्या ठरतील का या बद्दल ते सांशक असावेत. दुसरे कारण असे होते की ब्रिटीश सरकार आपली सत्ता मजबूत करण्यासाठी फोडा आणि झोडा हे तंत्र वापरणार हे टिळकांच्या लक्षात आले होते. स्वराज्य प्राप्ती हेच ध्येय जनतेपुढे ठेवले तर सारा भारतीय समाज लौकर एकजिनसी होऊ शकतो असा दुर्दम्य आशावाद त्यांच्याकडे होता. ते खर्या अर्थाने लोकमान्य असल्याने जनतेची नाडी तेच सर्वात चांगल्या रितीने ओळखत होते. इंग्रज सरकारला हे माहीत होते म्हणूनच त्यांना कारावास इतर काॅग्रेसच्या पुढार्यांपेक्षा अधिक काळ भोगावा लागला. त्यांना काही सवलती इंग्रज सरकारने दिल्या पण तो पर्यंत त्यांची तब्येत ढासळली होती. म्हणून गोर्या लोकांबद्दल चांगले मत मांडणार्यांनी एक सत्य लक्षात घ्यावयास हवे होते की पहील्या महायुद्धानंतर इंगलंडच्या अर्थव्यवस्थेला झटके बसले होतेच. त्यातच लोकमान्य टिळकांचा फार मोठा प्रभाव क्रान्तीकारकांवर होता. सारे गोरे अधिकारी लढवय्ये व धाडसी होतेच असे नाही. क्रान्तीकारी आपला गेम करू शकतात या भितीने इंग्रज अधिकारी त्रस्त झालेले होतेच.
इतिहासाचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, १९०५-०७ च्या काळात टिळकांनी कलकत्यात केलेल्या भाषणात काॅग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष दादाभाई नवरोजींना ही इंग्रजासंबंधी भ्रमनिरास झाला होता असे म्हटले होते. इतकेच नव्हे तर दादाभाई सारख्या नेमस्त नेत्यांने ' आपण परस्पर गळे कापणार नाहीत पण हे परकीय आपले गळे कापणार आहेत. आपला सत्यनाश होणार अशी निराशजनक भाषा त्यांच्या मुखातून येऊ लागली ' हे ही टिळकांनी आपल्या भाषणात विशद केलं. याच सभेत टिळकांनी एक सत्य घटना ऐकवली. महाभारतात पांडवानी कृष्णाला एक तडजोड घडवून आणण्यासाठी पाठविले. पण पांडव व कौरव दोघेही तडजोड अयशस्वी झाली तर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपआपली शक्ती संघटीत करीत होते.' यालाच राजकारण म्हणतात. तुमची मागणी सरकारने फेटाळली तर तुम्ही संघर्ष करण्यासाठी तयारीत आहात काय? तशी तुमची तयारी असेल तर तुमची मागणी नाकारली जाणार नाही. पण संघर्षाची तयारी ठेवली नाही तर मात्र तुमची मागणी नाकारली जाईल यात काहीच शंका नाही- कदाचित कायमचीच. आपल्याकडे काही शस्त्रे नाहीत. पण असण्याची गरज ही नाही. आपल्याकडे अस्त्र आहे. चांगले राजकीय अस्त्र. ते म्हणजे बहिष्कार. लोकमान्य टिळकांची दूरदृष्टी व राष्ट्रभक्ती असामान्य होती. त्यांच्या त्या भाषणाने समाज प्रभावित झाला होता. म्हणून राष्ट्रीय सभेतील जहाल गटाचा म्हणजे लोकमान्य टिळकांचा मार्ग देशासाठी अधिक भला ठरला असता, असे अनेक इतिहासकारांनी व राजकीय अभ्यासकांनी आपले मत नोंदविले आहे.
लोकमान्यांच्या काळात हिंदूना जातीय मानण्यात आले नव्हते. त्यामूळे त्यांनी शिवजयंती उत्सव व गणोशोत्सव राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरे करण्यास प्रारंभ झाला. त्यांनी लखनौ करार करण्यात चूक केली असे काही लोक मानतात. पण त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट सांगितले होते की, " यापेक्षा काहीही अधिक दिले जाणार नाही. तो करार मुस्लीमांनी नाही पाळला तर त्यावर कारवाई करायला हवी." अशी जाणीव टिळकांनी त्यांना दिली होती. पण दुर्दैवाने लोकमान्य टिळकांची इहयात्रा संपली, तशी स्वातंत्र्यलढ्याची ज्योत ही क्षीण झाली. पुढचा सारा इतिहास आपण सारे जाणतो. जगभरात निर्माण होत असलेल्या विविध राज्यप्रणाली व विचारधाराची लागण आपल्या देशाला झाल्याने विविध राजकीय पक्ष अस्तित्वात आले. प्रांतीय बोर्डावरील निवडणूका व अंतर्गत स्पर्धेमूळे ब्रिटीश सरकारला फोडा व झोडा ही नीती अवलंबविणे अधिक सोपे झाले असे दिसते.
गांधींजीच्या ठायी महात्मा होण्यासारखी वैशिष्टे होती. पण त्यांच्याकडून भगवद् गीतेचा चुकीचा अर्थ लावला गेला असावा. त्यातून शत्रुमित्रसमभावाच्या नावाखाली मुस्लीमांचे तुष्टीकरण अथवा संतुष्टीकरण सुरू झाले. मग मजल देशविभाजनापर्यंत गेले. मुस्लीमाची तुष्टीकरण करण्याची परंपरा स्वातंत्र्यानंतर ही सुरूच राहिली. इथे हे नमूद करावेसे वाटते की प्रत्यक्ष महात्मा गांधीजींनी (संदर्भ दिल्ली डायरी २६-९-१९४७ ) म्हटले आहे की, जर पाकिस्तानला स्वतःची चूक समजून सुधारणा करावयाची नसेल तर युद्धाशिवाय दुसरा मार्ग नाही.
मुस्लीम राष्ट्रनिष्ठ नेत्यांस महत्व दिल्यास व अराष्ट्रीय प्रवृत्तीच्या नेत्यांस नगण्य केले गेल्यास मुस्लीम समाज हिंदु संस्कृतीत सामावला जाईल . ज्या संस्कृतीने शक, हुण, कुशान या आक्रमकांनाही सामावून घेतले त्या संस्कृतीस आपल्याच समाजातील बाटलेल्या अथवा बाटवलेल्या हिंदुच्या वंशजांस सामावून घेणे बिलकूल अशक्य नाही. केवळ हिंदु संस्कृतीचे कैवारी सत्तेवर आल्यास होऊ शकते असे डाॅ वि वा देशपांडेनी आपल्या राष्ट्रधर्म जागवावा या पुस्तकात शेवटी निष्कर्षाच्या प्रकरणात आशावाद व्यक्त केला आहे. केंद्रात आता राष्ट्रवादी विचाराचे भाजपाचे सरकार आहे म्हणून डाॅ वि वा देशपांडेचा आशावाद खरा ठरू शकेल अशी अपेक्षा ठेवू या.
अति सुंदर प्रस्तुति । आप लेख के लिए इतनी मेहनत सामग्री कैसे जुटाते हैं । आपका हर लेख संजोये रखता हूँ । नमस्कार ।
उत्तर द्याहटवाफारच सुंदर, एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा सखोल परीचय. लखनौ कराराबद्दल अधिक माहिती शोधायला हवी. धन्यवाद म्हात्रेजी.
उत्तर द्याहटवासंजयजी नमस्कार !इस लेख के लिए सामग्री जुटानेके लिए
उत्तर द्याहटवाज्यादा देर नही लगी | मेरे घरमें पुस्तकालयमें किताबोंका सब्जेक्टवाईज बाॅयफरग्रेशन करनेके बजह मैने कितोबोंके साईज वाईज रखा है | लेख लिखते लिखते सिक्वेन्स तैयार हो जाता है तब जरूर पडती है तब कौनसे साईजके किताबेसे संदर्भ लेना है इसका स्मरण हो जाता
है | वैसे इस लेखके लिए किताबोंकी जरूरत नही पडी इसका कारन अच्छी बातें स्मरणमे ज्यादा समय तक टिक जाती है यह नैसर्गिक नियम है क्योंकी ईश्वरकी सबसे बडी निर्मीती मानव जात है | मेरे ब्लाॅगपर आपल्यातला देव यह लेख 2017 में पब्लीश किया है उसमें एक कथा दियी है | वह जरूर पढना | अपनी पढनेकी आदतमें अध्यात्मिक विषयके कितोंबोकी संख्या अधिक रहे तो युहीं स्मरण शक्ती बढती है ऐसा मेरा अनुभव है | मै जेष्ठ हूँ इसिलीए यह सलाह आपको पसंदमे आयेगी ऐसा विश्वास
है | सुरक्षित रहें , तंदुरस्त रहे और भगवान श्रीरामकी कृपा सदा आपके परिवारपर रहें ऐसी प्रार्थना !
बिवलकरजी नमस्कार ! आपला माझ्यावर लोभ ही नियतीची इच्छा होती हे सिद्ध झाले कारण आपण प्रत्येक लेख वाचता व प्रोत्साहन देत आहात. आपली ओळख सोलापूरच्या मंदिरात झालेली आहे , म्हणजेच महादेवाची कृपा | धन्यवाद !
उत्तर द्याहटवाम्हात्रेजी,
उत्तर द्याहटवासत्य सांगीतलेत.मी आपला सिध्देश्वर मंदिरांत झालेला आपला परिचय हा, ईश्वरी ईच्छा व अलभ्य योगांतुन झालेला अलभ्य लाभ मानतो. असेच उत्तम लेखन करत रहा व असाच लोभ वृध्दिंगत ठेवा. नमस्कार व धन्यवाद.