गुरुवार, २ एप्रिल, २०२०

कोरोनाशी आपली लढत आणि पुराणातील देव दानव


जगातील बहुतांश देश कोरोना व्हायरसची दशहत अनुभवित आहेत. ही दशहत कधी संपणार असा प्रश्न केवळ आपल्या पुढेच नसून तो जगातील बहूतांश देशाच्या पुढे आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंबंधी बरीच माहिती आपल्यापर्यंत माध्यमांद्वारे आली आहे. म्हणून त्याबाबत काही लिहावयाची गरज नाही. प्रत्येक देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे स्वरूप समान दिसत असले तरी त्यातून उद्भवत असलेल्या समस्या व त्याच्याशी लढत देण्यासाठी करावी लागणारी उपाय योजना  देशपरत्वे भिन्न आहे असे दिसते. त्याचे कारण असे आहे की प्रत्येक देशात आरोग्य क्षेत्रातील मुलभूत सोयी, व्यवस्था, मेडीकल उपकरणे, रूग्णालयाची संख्या, लोकसंख्या व तिची घनता, सामाजिक स्थिती, नागरिकांची जीवनशैली व राहणीमान,  हवामान इत्यादीमध्ये भिन्नता आहे. इतर देशातील उपाय योजनांची माहिती आपले सरकार घेत राहणार आहेच व त्यातील आपल्याला जे आवश्यक आहेत तसे उपाय आपले सरकार योजेल याबाबत आपण खात्री बाळगावयास हरकत नाही. शेवटी कोरोना ही आपत्ती वैश्वीक आहे आणि कोरोना बाधीत सर्व देश सहकार्याने या आपत्तीशी झुंज देत आहेत. आजच्या घडीला आपण आपल्या देशातील कोरोनाची भयानकता व उपाययोजनावर चर्चा करू या. पण त्या अगोदर  मी प्रांजळपणे कबूल करतो की  वैद्यकीय व प्रशासन या दोन्ही क्षेत्रातील मी अधिकारी नाही व अभ्यासक ही नाही. मी आपल्यासारखाच  Stay at home and be safe  अशी प्रशासनाकडून आलेली सुचना पाळणारा एक सामान्य नागरिक आहे. म्हणून चर्चा ऐवजी मी आपल्याशी संवाद सांधतोय असेच कृपया समजावे.

आपल्या देशात कोरोना मुळे उभे राहीलेल्या संकटाचे स्वरूप इतर देशात आहे तसेच असले तरी आपल्या राजकीय, व सामाजिक व्यवस्थेत कायम स्वरूपात असलेल्या जहरी विषाणुमूळे आपल्याला दोन बाजूने लढावे लागत आहे. आपण कोरोनाशी लढत उशीरा सुरू केली असे आपल्याला वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे झाले नाही. आपल्या देशाचे क्षेत्रफळ कमी व लोकसंख्या अधिक आहे. म्हणजेच आपला देश Densly populated आहे. त्यातही शहरात झोपडपट्टी नावाच्या वस्तीची संख्या अधिक आहे. म्हणून कोरोनोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शंका सरकारला होतीच. कोरोनोची लक्षणे पहिली दिसत नाहीत आणि नंतर झटपट लागण होऊन रूग्णांची संख्या भौमितिक रितीने वाढते. म्हणून सरकारने विलगीकरण , कर्फ्यु, लाॅकडाऊन , सोशल डिस्टन्सींग  हे उपाय तातडीने अमंलात आणावयास सुरूवात केली. परदेशातून येत असलेल्या आपल्या देशबांधवांची कोरोनाची तपासणी, त्यांना क्वारंटाईन ठेवण्याची व्यवस्था इत्यादी कामें तात्काळ सुरू केली . आज  डाॅक्टर्स, नर्सेस, रूग्णालयातील इतर कर्मचारी वर्ग, पोलिस व सुरक्षा कर्मचारी सोबत लष्कारातील जवान, प्रशासनातील अधिकारी, व कर्मचारी ही मंडळी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनोशी अहोरात्र झुंज देत आहे. अनेक स्वयंसेवी संघटना, सामाजिक संस्था, रूग्णवाहिकांचे मालक, हाॅटेलचे मालक, उद्योजक, काही कलाकार, हिंदुची देव-देवतांची मंदिरं, आश्रम, चॅरीटेबल संस्था आपआपल्या परिने जसे शक्य आहे तशा प्रकारचे सहाय्य करीत आहेत. ही गोष्ट निश्चीतच स्वागतार्ह व अभिनंदनास पात्र आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोनाशी रणांगणात लढाई करणार्या यंत्रणेतील देशबांधव व भगिनींमुळे आपण सुखाचा श्वास घेत आहोत. ही मंडळी आपल्यासाठी देवतुल्यच होत.

दुसर्या बाजूला आपल्या येथे कायम वस्ती करीत असलेले विषाणू आहेत, जसे की
१) कोरोनाचे रूग्ण कुठे आहेत, आणि कोरोना-ची
    लागण होऊन कुठे मोठ्या संख्येने मृत्यु  होत  
    आहेत, कशाला ही तपासणी हवी, कशाला हवे हे
    विलगीकरण, संपुर्ण लाॅकडाऊनची गरज आहे का,
    आपल्या मंदिरातील देव-देवता आता कुठे 
     मदतीला धावत आहेत असे वायफळ प्रश्न
     विचारणारी पुरोगामी- ढोंगी बुद्धजीवी, 
२) रस्त्यावर उतरून संचारबंदी तोडणारे व हुज्जत
     घालून पोलीसांनाच मारणारी उनाडटप्पू व मवाली
     युवक आणि पोलीसांनाच सबूरीने घ्या असे सल्ला
     देणारे गुंड प्रवृत्तीचे नेते
३) भितीने शहरातून आपआपाल्या गावाकडे प्रचंड
    संख्येने जाणारे लोक,
४) मुस्लीम समाजातील काही संघटनाचा
     हेखेखोरपणा व त्यांना त्यांच्याच धर्मगुरूंचा व 
     काही राजकीय पक्षांचा असलेला छुपा पाठींबा,
५) मुस्लीमांच्या प्रार्थना स्थळात नमाज पडणे,
     लपून बसलेल्या विदेशी नागरिकांचं पलायन.
     दिल्लीतील निजामउद्दीन येथील १८ मार्च झालेला
     मरकज (तबलिंगी) कार्यक्रमातून वाढलेला धोका.
६) पर्यावरणाच्या, मानवाधिकाराच्या, सेवेच्या नावावर
    कार्यरत असलेल्या विदेशी लाॅब्या, व स्वयंसेवी
    संघटनांची कारस्थानें
७) काही विरोधी पक्षांची निष्क्रीयता,
८) देशातील पाक पुरस्कृत आंतकवाद्यांचे हितचिंतक, 
९) डाव्या विचारसरणीचे राजकीय पक्ष, त्यांच्या
    विद्यार्थी संघटना, कामगार संघटना, नक्षलवादी
१०) काश्मीर, केरळ, ईशान्य भागातील कार्यरत 
      असलेल्या अलगावादी टोळ्या
११) भाजीपाला मार्केट, किराणा व रेशन दुकानावर
       कर्फ्यु, लाॅकडाऊन, सोशल डिस्टन्सींग सारखे 
       कायदे धाब्यावर बसविण्याची आपली सवय
इत्यादींशी आपल्या सरकार व प्रशासन यंत्रणेला समातंर पातळीवरून लढत द्यावी लागत आहे. याबाबत दुमत होऊ नये. कोरोना रूपी भस्मासूरचा पाडाव करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण वर नमूद केलेल्या  विषाणूंच्या उपद्रवांमूळे कोरोना बाधित रूग्णांची आकडेवारी वाढती आहे. त्यामूळे आपण देत असलेली लढत लांबली जाण्याची शक्यता दिसत आहे. ईश्वर करो तसे होऊ नये अशी प्रार्थना.

आपल्या देशाची काही ही चुक नसताना, आपला देश आज कोरोना वायरसच्या संकटात सापडला आहे. ह्या प्रसंगाचे गांभीर्य ज्यांना नाही अशा मंडळीमूळे आपले संकट अधिक भीषण बनत जात आहे. भितीने शहरातून आपआपल्या गावकडे जाणार्यांची संख्या वाढती आहे. दिल्लीतील निझामउद्दीन भागात तबलिंगीचा मकरज कार्यक्रमाने देशभरातील राज्यांना (विशेषकरून महाराष्ट्राला) कोरोनाशी खडतर लढाई द्यावी लागेल असे दिसते. एकंदरीत सरकार वारंवार ' जिथे आहात तिथेच राहा, गर्दी करू नका ' असे आवाहन देत आहे, तरी सुद्धा सुजाण नागरिक म्हणून आपण कमी पडणार असू तर सरकारला नाईलाजाने ' शुट ॲट द साईट ' असा आदेश द्यावा लागेल. ईश्वर कृपेने असे न होवो, पण वेळ आलीच आणि काही नागरिक मृत्युमूखी पडले तर ज्यांची मनें हलकट विचाराने कुजली आहेत अशा  विदेशी लाॅब्या सरकारवर टिका करण्यासाठी आपली लेखणी घेऊन तयार आहेत. सध्या ही मंडळी शांत आहे, आणि कोरोना वायरसच्या पाठीमागे चीन देशाचे षडयंत्र आहे अशी बातमी आली आहे त्यामूळे ही मंडळी अधिक काळ शांत राहील. पण त्याच काळात सरकारवर विशेष करून केंद्र सरकारवर खोटे आरोप लिहून ठेवण्याचे काम तयार करून ठेवतील. त्यांची ती खोडच आहे. कारण त्यांच्या दोन कुलदेवता आहेत. त्यांची नावे आहेत ' सत्ता व बंडाळी.' सन २०१४ पासून सत्तादेवी त्यांच्यावर कृपा करीत नाही म्हणून यातील काही मंडळी मनाला जे येईल तसे ओकत आहेत.

आज कोरोनाशी प्रत्यक्ष रणांगणावर दोन हात करीत झुंज देत असणार्या अशा समाजबांधवांना व भगिनींना आपण सारे जण देवतुल्य मानतो. पण काहींना देव या शब्दाची ॲलर्जी आहे. आपल्या समाजात एखाद्याचा स्वभाव चांगला असेल व तो सतत लोकांच्या अडचणीच्या वेळी उपयोगी पडत असेल त्याला आपण भला माणूस, देवमाणूस, भोळा शंकर असे म्हणतो, ते ही अगदी सहजपणें. आपल्या मातृभाषेंचं सौंदर्याचे वर्णन अमृताते पैजा जिंके असे आहे. पण या डाव्या व पुरोगामी मंडळींना आपल्या भाषेचे सौंदर्य दिसतच नाही मग कळणार तरी कसे? 'आपली दैवते कोरोनाला भिऊन मंदिरात दारे बंद करून बसले आहेत ' असा घसा फोडून सांगणार्या वृत्तपत्राच्या संपादकांवर काही टिका करावी असे वाटत नाही. कारण मंदिरातील आमच्या सार्या दैवतांनी  ट्रस्टींच्या रूपाने प्रगट होऊन सरकारकडे आर्थिक मदत केली आहे. अशा प्रकारचा आर्थिक ओघ झाला की आपण महालक्ष्मीची कृपा झाली असे मानतो. केवळ आर्थिक ओघ म्हणजेच देव असे मानून आपण थांबत नसतो. जिथे गरज आहे तिथे आमची देवता,माता महालक्ष्मीदेवी दानाचं रूप घेते.  हे सत्य त्या संपादक महाशयांना कळतंय कि नाही हे जाणून घेण्याची आमची इच्छा नाही. पण अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळातून चालणारी कारस्थाने व एक दमडीची आर्थिक मदत येत नाही या संबंधी त्यांच्याकडून रोख-ठोक लेख लिहण्याची अपेक्षा आपण ठेवू या. पण ते तसे करतील असे वाटत नाही कारण ' हाताला लकवा येतो का ' असा वाकप्रचार राजकारणात प्रथमच उपयोगात आणणार्या नास्तीक नेत्यांकडे सध्या त्यांची उठबैस आहे. असो.

केंद्र व बहुतांश राज्यातील सरकार जबाबदारीने कामगिरी बजावीत आहेत. सरकार निश्चीतच कौतूकास  पात्र आहे पण त्यांना यश मिळण्यासाठी आपण  सरकारला शंभर टक्के सकारात्मक प्रतिसाद देत राहणे आवश्यक आहे. आज सत्यवचनी श्रीरामाची जयंती आहे. आपण आपले वचन पाळू या. जाता जाता त्या संपादक महाशयांच्या माहितीसाठी राम नवमीच्या निमीत्ताने  या देशाचा बहुसंख्याक समाजाच्या देव-दैवातांच्या कल्पना कशा स्वरूपाच्या असतात त्या संबधी थोडसं सांगून या लेखाची समाप्ती करतो.

आपल्या पुराणातील देव-दानवांचे स्वरूप व कथा इत्यादी सारं प्रतिकात्मक आहेत. आपल्या पुराणांची भाषा भावगर्भित आहे, तशीच ती लक्षणा व रूपकें यांनी भरलेली असते. बुद्धीवंतानीं आपल्या बुद्धीचा कस लावून त्यातील भावगर्भित अर्थ शोधून आनंद घ्यावयाचा असतो  तर जनसामान्यांनी त्यातील गोष्टी वाचून आनंद घ्यावयाचा असतो. म्हणून जो ईश्वर अनंत आहे, त्याला सान्त रूपात आणले;  तो जो ईश्वर   निराकार आहे, त्याला आकार रूपात आणले. त्यातूनच हिंदुच्या देव-देवतांच्या मुर्ती आल्या, पाठोपाठ पुजा आली, आरती ओवाळणी आली व मंदिरे आली. आपण ज्या ग्रहावर राहतो, ती पृथ्वी, आपली धरणीमाता अवकाशातून एका छोट्या ठिपक्याइतकी दिसते. ईश्वर त्या अवकाशा पलिकडे आहे; तो सर्वत्र आहे; त्याचा थांगपत्ता आपल्याच काय, संपूर्ण मानवजातीला लागत नाही. म्हणून त्याला आपण विविध  मुर्तीरूपात आणले. पण त्यातून  मानव जातीचे काय अकल्याण झाले आहे ते त्या संपादक महाशयांनी उदाहरणे देऊन सांगावे.  आतापर्यंत एकच ईश्वर, तो ही आमचाच असे मानणार्या दोन मानव  जमातीमध्येंच धर्मयुद्धे झाली आहेत. हा इतिहास आहे.  विसाव्या शतकाच्या पुर्वाधात जगात एक नास्तीक जमात उदयास आली. ही जमात साम्यवादी नावाने ओळखली जाते. आमच्या संस्कृतीने नास्तिकांना ही परके मानले नाही. पण या नास्तिक जमातीने मानव जातीला काळीमा फासणारी अघोरी कृत्यें केली आहेत. या जातीच्या नेत्यांनी तर केवळ सत्तेच्या नशेसाठी त्यांच्या देशबांधवांच्याच लाखोंच्या संख्येंने कत्तली उडविल्यात आहेत आणि आज ही ते सत्र सुरूच आहे. विसाव्या शतकात या भूतलावर सत्ता स्पर्धेत जी दोन महायुद्धें झाली व संहारक शस्त्रें वापरली ती ईश्वराला मुर्तीत पाहणार्या हिंदु समाजामूळे झाली नाहीत. हा ही इतिहास आहे. आज ही  कोरोनाच्या रूपाने मानव जातीवर जे मोठे संकट उभे आहे ते साम्यवादी चीनने त्यांची अर्थव्यवस्था डबघाईला आल्यामूळे उभे केले आहे, अशी जगभर चर्चे सुरू झाली आहे. अनेक देव-देवता मानणारा हिंदु समाज व तो जिथे बहूसंख्याक आहे असा आपला भारत देश मानव जातीसाठी खलनायक कधी ठरला नाही व पुढे ही ठरणार नाही. कारण आम्ही  
' इशावास्यम इदं सर्वम् ' म्हणजे ईश्वर चराचर सृष्टीत सामावलेला आहे असे मानतो. त्यामूळे आम्ही  ' अतिथी देव भव ' अशी भावना ठेवून  समोर भेटणार्या पाहूण्यास नमस्ते म्हणत दोन हात जोडत असतो. त्याच पद्धतीचे महत्व सार्या जगाला सध्याच्या संकट समयी कळून चूकले आहे. आपल्या संस्कृतीत कोणाचा मृत्यु झाल्यावर शवाला अग्नी देण्याच्या पद्धतीचे ही आज जगभर कौतूक तर झाले आहे.  कोरोनाने मृत्युचे तांडव मांडल्यामूळे आपल्या संस्कृतीतील अग्नी संस्कार मध्ये असलेले विज्ञान तत्व ही मान्य होताना दिसते आहे. ही बाब आपल्यासाठी अभिमानाची असली तरी आम्ही त्या संबंधीची आत्मप्रौढी मानत नाही हे ज्यांना समजत नाही अशा लोकाबाबत आमची तक्रार नाही. " जे आपल्या स्वार्थासाठी व आपल्या देशातील सत्तेच्या लालसेतून, हिंदु देवांची कुचेष्टा करतात, विदेशी शक्तीशी छुप्या मार्गाने हातमिळवणी करतात तेच पुराणात वर्णन केलेले दानव आहेत.  तसेच " जागतिक पातळीवर कुटील खेळी रचून या जगाची महासत्ता बनण्याच्या अघोरी लालसेतून चीन सारखे देश मानव जातीला महासंकटाच्या खाईत लोटण्याची कृत्यें करतात "  ते ही पुराणात वर्णन केलेले  दानवच होत. " जे कुठल्याही धर्माचा अनादार करीत नाहीत, ईश्वर एक आहे असे मानून अनेक मुर्तीतून त्याला पाहतात, दुसर्याला आपल्या वर्तनाने, वाणीने, लेखणीने जे दुखावित नाहीत " तेच पुराणात वर्णिलेले आजचे देव आहेत.

२ टिप्पण्या:

  1. अतिशय मुद्देसुद व वस्तुनिष्ठ विवेचन म्हात्रेजी. आपण नोंदलेल्या अडथळ्यांची जंत्री खरोखर मार्मिक आहे.आज टीव्हीवर मरकझ मधील छुप्या पलायनखोरांचे, जागोजाग थुंकणे, पोलीसांवर मेडीकल टीमवर हल्ला दगडफेक करणे ई. घृणास्पद चाळे बघीतल्यावर मास्तकांत संतापाची तिडिक गेली व आपण दर्शविलेल्या लास्ट रीसाॕर्ट शुट अॕट साईटसाठी खरोखर हे समाज घातक सरकारला भाग पाडणार अस वाटु लागल. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...