सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

जनरल बिपीन रावतांचे वक्तव्य व विरोधकांचा पोटशूळ



भारतीय लष्कराचे भूदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी ' विद्यापीठे आणि काॅलेज विद्यार्थ्याना हिंसाचारासाठी उद्युक्त करते, ते नेतृव नव्हे ' असे अलीकडे विधान केले. त्यावर आपल्या येथील डावे नेते, विचारवंत व संपादक मंडळींचा पोटशूळ उठला आहे. ह्या मंडळीं पैकी बहूताशांनी जनरल बिपीन रावतांचे हे विधान अलिकडे नागरिकत्वाच्या विरोधात होत असलेल्या अंदोलना संदर्भात आहेत असा सोयिस्कर अर्थ काढला आहे. माकपाच्या सिताराम येचूरीनें ' आपण पाकिस्तानच्या दिशेने जात नाही ना ' असे प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र टाईम्सने आपल्या शनिवार दिनांक २८डिसेंबर २०२० च्या अंकातील आपल्या अग्रलेखात  माकपाच्या सिताराम येचूरीच्या प्रत्युत्तरासंबंधी नापंसती दर्शविलेली आहे. पण अग्रलेखाच्या सुरूवातीलाच  देशातील उच्च पदस्थांनी आपले मत व्यक्त करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या प्रतिमेवर होणार्या संभाव्य परीणामाचा विचार करावा,  शक्यतो भाष्य करू नये, व संयम राखावा असा अप्रत्यक्ष नव्हे तर प्रत्यक्षपणे जनरल बिपीन रावतांना सल्ला दिलेला आहे.  एक वृत्तपत्रांचा वाचक व न्यूज चॅनेलचा एक प्रेक्षक आणि अर्थात एक नागरिक म्हणून जनरल रावतांच्या विधानाचा भाजपा विरोधकांनी जो काही सोयीस्कर अर्थ लावला आहे , त्याबाबत मतप्रदर्शन करणे हा माझा ही हक्क आहे असे मानून माझे विचार मांडतो आहे.

वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या येथील डावे, पुरोगामी विचारवंत, संपादक मंडळी व विरोधी पक्षांचे नेते  गेली साडेपाच वर्षे मोदी सरकार वर टिका करणे हा एक कलमी कार्यक्रम राबवित आहेत. मोदींकडे केंद्रातील सत्ता जनतेने सोपविली आहे हे डाव्या विचारसरणीच्या लोकांना पचविणे जड जात आहे. २०१४ सालच्या लोकसभेच्या निवडणूकीतील प्रचार दरम्यान भाजपाला बहूमत मिळेल अशी शक्यता बळावत असतानाच मोदी व भाजपाला अस्थिर करण्याचे धोरण डाव्या विचारसणीच्या लाॅबीने आखले होते. म्हणून मोदी सरकार स्थिरावण्याच्या आधीच डावे विचारवंत व साहित्यीकांनी असहिष्णूता वाढली आहे असे दाखवीत पुरस्कार परत करण्याची भाषा सुरू केली होती, हे वाचकांना आठवत असेल. डाव्या विचारवंतानी मोदी सरकारच्या निषेधार्थ ना आपला देश सोडला ना आपले पुरस्कार परत केले. मग मोदी सरकारवरचे आरोप का मागे घेतले नाहीत हा प्रश्न आजही माझ्या सारख्या वाचकांना पडलेला आहे. उचलली जीभ लावली टाळूला अशीच आपल्या येथील  पुरोगामी मंडळीची वृत्ती आहे व तिचे सतत दर्शन होत असते. म्हणून त्यांना मतदारांनी  धुडकावले आहे. डावे पक्ष संपत आलेच पण त्यासोबत काॅग्रेस व मित्र पक्षांच्याही जागा घटल्या. काॅग्रेस व मित्र पक्ष आणि त्यांचे मिडीयातील मित्र वर्ग, आम्ही ना डावे व ना उजवे असे कितीही म्हणत असले तरी यांचे ( यात आपले मटा लोकसत्ता, लोकमत ही वृत्तपत्रे ही आहेत) गोत्र डाव्या  विचारसरणीच्या आम्लात रूतलेले आहे. राहूल गांधींची डाव्या पक्षांशी असलेल्या मैत्रीमूळे ते अमेठीतही पराभूत झाले. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत सपाटून मार खल्ला तरी भाजपा विरोधकांना शहाणपण येत नाही. त्याचेच प्रत्यंतर जनरल बिपिन रावत यांच्या वक्तव्यावर वादळ उठविण्याचा जो प्रयत्न ते करीत आहेत त्यातून जाणवले आहे.

जनरल बिपीन रावत ह्यांनी केलेल्या वक्तव्याने सरकार पक्षाच्या भूमिकेला ते समर्थन देत आहेत असा अर्थ लावून मटासारखी वृत्तपत्रें व विरोधी पक्ष त्यांना उपदेश करीत आहेत. मुन्शी प्रेमचंदजींच्या एका कादंबरीत वाक्य आहे ते मिडीयावाल्यांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे. ते वाक्य आहे, ' दुसरोंको उपदेश देना कितना सहज और सरल है |'  भारताच्या सरन्यायाधिशांवर आरोप ठेवीत चार न्यायाधिशांनी केलेल्या बंडाला याच विरोधी पक्षांनी , विचारवंतानी, व संपादक मंडळींनी पाठींबा दिला होता. सर्वोच्च न्यालयातील चार न्यायाधिशांनी बंड करून देशाच्या इभ्रतीत कोणती भर टाकली होती की, विरोधी पक्षांना व सेक्यूलरीस्ट संपादक महाशहांना त्यांच्या बंडाचे समर्थन करावे लागले होते? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्र टाईम्सच्या संपादक महाशहापासून ते डाव्या पक्षांचे सिताराम येचूरी पर्यंतच्या सर्वांनी प्रथम देशवासियांच्या समोर ठेवावयास हवे. न्यायाधिशांचे ते बंड तसे पाहता वरकरणी तरी न्यायालयीन कामकाजाच्या संबंधीत  होते. त्यात विरोधी पक्षांनी आगीत तेल ओतण्याची काय गरज होती (या संबंधीत ब्लाॅगवरील स्वतंत्र लेख  कृपया वाचावा)  हा  प्रश्न नंबर २ आहे? बरं त्यातील काही न्यायाधिश निवृत्त झाले आणि निवांतपणे जीवन जगत आहे. मग ते बंड होते कशासाठी? याचे उत्तर बंडखोर न्यायाधिशापेक्षा त्यांचे समर्थन करणार्या माध्यमातील मंडळींनी करावयास हवे. पण तो प्रश्न ही अनुत्तरीत राहीला.  आत्मपरीक्षण करून अशा प्रश्नांची उत्तरें देण्याची तसदी मिडीयावाले (विशेषतः स्वतःला पुरोगामी मानणारे) घेत नाहीत. त्यामूळे लोकसभेच्या मतदानाच्या वेळी मतदार यांच्या अग्रलेखांना व संपादकिय स्थंभाना कवडीची ही किंमत देत नाहीत. राज्या-राज्यातील विधानसभेच्या निवडणूकीत जरी भाजपाचे संख्याबळ घटत असले तरी भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी घटत नाही. शिवाय विधानसभेतील निवडणूकीत स्थानिक समस्या,  स्थानिक घराणेशाहीचा प्रभाव, बंडखोरी इत्यादी मुद्यांवर मतदान होत असते हे लक्षात घेणे आवश्यक असते.  महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड येथील विधानसभेच्या निवडणूकीत भाजपाची झालेल्या पिछेहाटीमूळे विरोधक व त्यांच्या मिडीयातील समर्थकांना आनंदाचे उखाळ्या फुटलेल्या आहेत. त्या आनंदाच्या नशेत नागरिकत्व सुधारीत कायद्याचे निमित्त साधून त्यांनी हिंसक अंदोलने करण्याची मोहीम आखली आहे. सतत भाजपावर सांप्रदायिकत्वाचा आरोप  करून त्याच्या नेत व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादाची, धर्माची नशा चढली असे म्हणत  राहणार्यांनी भाजपा वा संघाच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कधी केले आहे हे प्रथम पुराव्यानिशी दाखवावे. आम्ही डावे, आम्ही पुरोगामी,  आमचा वसा आधूनिकतेचा  असे म्हणत  मिरविणार्यांची नशा देशात अराजक माजविण्यापर्यंत मजल जात आहे यावर मिडीयांनी दुर्लक्ष करणे ही सुद्धा एक अत्यंत धोकादायक बाब आहे असे मला वाटते.

जनरल रावतांना काय अपेक्षित आहे याचा स्वतः अर्थ काढून मटासारख्या वृत्तपत्राने अग्रलेख लिहीला. तो लेख वाचल्यानंतर संपादक मंडळी नेहमीच तटस्थेने विश्लेषण करतात असे नाही हे अनुभवास आले. खरोखरीच मटा संपादक तटस्थेने आपले काम बजावित असते तर मटाने मुबंईतील आयाआयटी बी च्या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व सुधारीत कायद्याच्या समर्थानार्थ काढलेल्या मोर्चाच्या  फोटो खाली आपल्या २५ डिसेंबरच्या दैनिकात नागरिकत्वाच्या विरोधात काढलेला मोर्चा अशी टीप ठेवली आहे. ती वाचकांनी फक्त प्रिन्टींग चूक समजावी का? वृत्तपत्राच्या कामकाजासंबंधी रेग्यूलटरी कायद्याच्या आधारे वाचकांनी मटाचा हा खोटारडापणा चव्हाट्यावर आणला तर आमची चूक झाली अशी माफी मागून  मटाचे संपादक मोकळे होतील. मागे लोकसत्ताच्या कुबेरांनी तसेच केलेले आहे. पण त्याने काय साधणार आहे ? नागरिकत्व कायद्याला समर्थन देणार्या मोर्च्यासंबंधी इतकं धडधडीत खोटे दाखवून जनरल रावतांच्या वक्तव्यावर मटा सारख्या पत्र नव्हे मित्र असे ब्रीद घेणार्या वृत्तपत्राच्या संपादकाचे म्हणणं आम्ही वाचकांनी तटस्थेचे मानावयाचे काय?  हिंसक अंदोलने करीत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्या विद्यार्थ्यांना, कार्यकर्त्यांना,  विरोधी पक्षांच्या नेत्यांना चार खडे बोल अजून का सुनाविले नाहीत. नागरिकत्व सुधारीत कायदा मंजूर झाला आहे,  ते काही विधेयक नाही इतकी समज मटाच्या संपादक महाशहांनी अंदोलनकरांना देऊ नये का?  कायद्याच्या समर्थनार्थ निघालेला  शांततापूर्ण मोर्चाचा फोटो,  त्या कायद्याच्या विरोधातील आहे असे भासविण्याचा प्रयत्न का करावा ? मी तर म्हणतो, यातून मटाच्या संपादकांचा निव्वळ कोडगेपणाचे दर्शन झाले आहे. मूळात जे विधेयक संसदेने मंजूर करून त्याचे कायद्यात रूपातंर झाल्यानंतर दंगलदृश स्थिती निर्माण कोण करीत आहे याचा तपास पत्रकार मंडळींनी करावयाचा असतो. जर अंदोलने शांततापूर्ण झाली असती तर जनरल रावतांनी तसे वक्तव्य केलेच नसते. त्यातही जेएनयुतील देशके टुकडे गँगच्या घोषणा जनरल रावतांना ऐकू गेल्या नाहीत असे मटाचे संपादक मानत आहेत का? नैसर्गिक आपत्तीत जवान लागतात, अंदोलनातून आगीचा डोंब उसाळला की लष्कर आणावे लागते. तेव्हाच कूठे स्थिती पुर्वपदावर येत असते. अशा लष्काराच्या प्रमूखांनी अंदोलने हिंसक होतात, नेतृत्व चूकते आहे असे म्हटले तर त्यात काय मोठे आकाश कोसळले? जे सत्य आहे ते निःपक्षपाती लष्कर प्रमुखाने मांडले तेच योग्य झाले आहे. डाव्या विचारवंताच्या आहारी गेलेल्या मध्यममार्गीय, मध्यमवर्गीय आपले संपादक व पत्रकारांचीही बुद्धी भ्रष्ट झाली आहे की काय असे वाटू लागले आहे . डावे पक्ष, विचारवंत व मिडीयाच्या मालकांना आज ही अशी आशा आहे की, भाजपा व संघाला बदनाम करणारी त्यांची कम्युनिस्ट स्टाईलची मोहीम एक दिवस यशस्वी होईल. त्यांनी तशी आशा जरूर धरावी. त्या संबंधी विरोध नाही. पण त्यांनी मोहीम शांततेने राबवावी, पुर्णतः भारतिय संस्कृतीला साजेल अशी राबवावी.  स्टॅलीन आणि  क्रूश्चेव स्टाईलची नव्हे. गेली पाच वर्षे त्यांच्या मोहीमेचा भाजपालाच फायदा होतो आहे. त्यातूनच  सिताराम येचूरी व राहूल गांधींना उपहासाने भाजपाचे स्टार प्रचारक असा उल्लेख सोशल मिडीयावर होताना दिसतोय. २०२४ च्या लोकसभेचा प्रचार जेव्हा सुरू होईल, तेव्हा कदाचीत सिताराम येचूरी व राहूल गांधी सोबत, शरद पवार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, अनेक वृत्तपत्रांचे न्यूज चॅनेल्सच्या संपादक मंडळीचा ही उपहासाने भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश झालेला सोशल मिडीयावर दिसला तर आश्चर्य वाटू नये.

एकंदरीत नागरिकतत्व सुधारीत कायद्यासंबंधीत होत असलेला गदारोळ संपणार नाही हे मी मागील लेखात सुचीत केलेलं आहे. मोदी सरकारने निर्णय घ्यावयाचे  व विरोधी पक्षांनी त्याला विरोधासाठी विरोध करीत राहावयाचे;  सोबत काही न्यूज चॅनेल्स व वृत्तपत्राचे संपादक, पत्रकार, राजकीय अभ्यासक, व विचारवंतांनी विरोधकांची तळी उचलत मिरवायाचे ; हा राष्ट्रीय स्तरावरील राजकीय मंचावरचा न संपणारा खेळ वा न संपणारी एक मालिका आहे असे समजून जे होतयं ते कायद्याला समर्थन देणार्या वाचकांनी, मतदारांनी पाहात बसावे, त्यांनी मोर्चा काढू नयेत, समर्थनासंबंधीचे भाष्य करू नये अशी इच्छा झाडून सार्या पुरोगामी वृत्तपत्रे व न्यूज चॅनेल्सची झालेली असेल तर त्यांनी वाचक आणि प्रेक्षकांचे आम्ही प्रबोधन करतो आहेत असा टेंबा मिरविण्याची गरज नाही.

बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

नागरिकत्वाचं कूळ व विरोधी पक्षांचं खूळ



आपल्या येथील विरोधी पक्षांनी २०१४ च्या भाजपाच्या विजयाला, भरपूर आश्वासनांचा, जाहिरातबाजीचा व एवीम मशीनचा विजय अशी नावें ठेवली. त्यानंतर विविध राज्यांतील निवडणूका भाजपाने जिंकल्या तेव्हा विरोधी पक्षांनी भाजपावर धार्मिक धृवीकरणाचा आरोप केला. २०१९च्या लोकसभेत लोकांनी पुन्हा भाजपाला सत्तेवर बसविले तर विरोधी पक्षांनी भाजपाने राष्ट्रवादाचा उन्मादाच्या जोरावर निवडणूका जिंकल्या असा आरोप केला. या शिवाय अच्छे दिन कहाँ है, गणतंत्र खतरेमे हैं, अभिव्यक्ती स्वतंत्रता खत्म हुई है, सभी स्वायत्त संस्थांकी आजादी छीन ली है, अर्थव्यवस्था डूब गयी है, इत्यादी आरोप विरोधी पक्षांनी केले होते व करीतही आहेत. 

केंद्रात पुन्हा मोदी सरकार येऊन फक्त सात महीने झाले आहेत.  इतक्या कमी अवधीत मोदी सरकारने एका पाठोपाठ एक  महत्त्वाची बीलं मंजूर करण्याचा तडाखा लावला आहे. विरोधकांना चर्चा करण्यासाठी संसदेतील पंरपंरेनुसार अवधी दिला आणि नंतर मतदान झाले. बहुमताने ती सारी बिलं मंजूर झाली. मोदी सरकारने आता पर्यंत मंजूर करून घेतलेली सारी बीलं राष्ट्रीय हितासंबंधीत आहेत. तीन तलाक, जम्मू- काश्मीर राज्यातील कलम 370 व 35 A , नागरिकत्व दुरूस्ती, इत्यादी बीलं  राष्ट्रीय हिताची नाहीत असे कुठलाही नागरिक म्हणणार नाही.  कुठल्याही नागरिकाला राष्ट्राकडून जसे संरक्षण अपेक्षित असते तसेच नागरिकाने ही आपल्या वर्तानाने देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देता कामा नये अशी काळजी घेणे अपेक्षित असते. तरीही विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला. कोणी मतदानात भाग घेतला, कोणी बहिष्कार घालून निषेध केला. आता तर अनेक राज्यात विरोधी पक्षांनी संसदेत मंजूर झालेल्या बिलाविरूद्ध  सत्याग्रहाचे पांघरूण घेत सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करण्याचा धिंगाणा घालायला सुरूवात केली आहे. असे वर्तन लोकशाहीच्या मुल्यांशी पुर्णपणे विसंगत आहे. शांततामय पद्धतीने सरकार विरूध्द आंदोलन करता येत नाही अशीच ज्यांची समजूत झाली आहे त्यांची अवस्था झोपेचं सोंग घेतलेल्या माणसा सारखी असते. त्यामूळे भविष्यात मोदी सरकार द्वारा येणार्या प्रत्येक विधेयकांच्या वेळी  विरोधी पक्षांच्या  हेकट स्वभावाचे असेच दर्शन घडणार आहे. कारण मोदी सरकार तर्फे संसदेत सादर होणार्या  विधेयकांचे स्वरूपच विरोधी पक्षांच्या वर्मावर घाव करणारे पण देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा मजबूत करणारे असतील. तोवर २०२४ साल उजाडलेलं असेल. भाजपाला अपेक्षित असलेले नागरिकत्वाचे कूळ हे सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या व्यापक तत्वावर आधारीत आहे तर विरोधी पक्षांची भूमिका हे क्षाणिक सत्तेच्या लालसेचे एक खूळ आहे.  मग विरोधी पक्षांच्या हाती काय लागणार ? क्षाणिक सत्तेच्या लालसेचा प्रयोग प्रथम कर्नाटकात झाला तो फसला व कानडी जनतेने काॅग्रेस व जेडीएसला फटकारले. महाराष्ट्रातला प्रयोग आज ना उद्या फसणार आहे. २०१४ ला भाजपा ३५ ते ४० टक्के मतांनी जिंकला असे म्हणत भाजपाला मिळालेला जनादेश अल्पमतातला असे मानून विरोधक मंडळी सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करीत राहिली. गेल्या मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकीत कित्येक मतदारसंघात भाजपाने ५० टक्क्याहून अधिक मतें पदरात घेत केंद्रातील सत्ता काबीज केलेली आहे. २०२४ सालच्या लोकसभेच्या निवडणूकीत प्रचारच मुळी देश प्रथम की राजकारण प्रथम या प्रश्नाभोवती फिरलेला दिसेल. त्यामूळे अठराव्या लोकसभेत बहूतांश प्रमूख विरोधी पक्षांची स्थिती अत्यंत दयनीय दिसेल तर प्रादेशिक व छोटे छोटे स्थानिक पक्षांचे संसदेतील नमोनिशाण ही मिटलेले दिसेल.

नागरिकत्वाच्या सुधारीत कायद्या विरूध्द न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत. पण त्यातून फारसे काही निष्पन्न निघेल असे दिसत नाही. लोकशाही राज्यप्रणालीत संसद ही कायदे करणारी सर्वोच्च संस्था आहे. संसद म्हणजे लोकशाही व्यवस्थेचा आरसा. संसद म्हणजे  मतदारांचे प्रतिनिधीत्व करणारी संस्था. संसदेतील कारभार संविधानानुसार व्हावा असा नियम जरूर आहे. पण न्यायपालीका संसदेतील फक्त अशाच नवीन कायद्याविरूध्द निकाल देऊ शकते, जे संविधानाच्या मूळ चौकटीला बाधा आणतात. नागरिकत्व सुधारीत कायद्यान्वयें संविधानाच्या कलम १४ चा भंग झालेला नाही. न्यायालये ही एक प्रकारे संविधानाचे कवच कुंडले आहेत. याबाबत दूमत नाही. पण न्यायपालिकेला संसदनेने पारीत केलेल्या कायद्यानुसार निकाल द्यावयाचा असतो. त्या पलीकडे न्यायपालिकेच्या हाती काही नसते. कारण कायदे करण्याचा हक्क ससंदेचा असतो, पर्यायाने  बहूमताने सत्तारूढ झालेल्या सरकारचा असतो. म्हणूनच भारताचे सरन्यायधिश श्री बोबडे ह्यांनी ' मालमत्तेचे नुकसान व हिंसक अंदोलन थांबविले तरच न्यायालयात दाखल झालेल्या या विषयाच्या संदर्भातील याचिकेकडे लक्ष घातले जाईल ' असा अप्रत्यक्ष दम विरोधी पक्षांना नुकताच दिला आहे. तसे पाहता श्रीरामजन्मभूमी संबंधी निर्माण झालेली समस्या हा न्यायपालिकेच्या कक्षात येणारा विषय नव्हताच पण केंद्रातील काॅग्रेस सरकारने याबाबत सत्तर वर्षे चालढकल केली म्हणून तो विषय न्यायालयात गेला.  मोगल व इंग्रज हे आक्रमक होते. त्यामूळे त्यांच्या राजवटीतील देशातील मंदिरासंबंधीच्या केसेस रद्दबादल करून सरकाराने पुरातत्व विभागाला सोबत घेऊन सरसकट एक धोरण निश्चीत करावयास हवे होते. शेवटी बहूसंख्याकांच्या भावनाला साद स्वतंत्र भारतातील सरकार घेणार नसेल तर कोण घेणार?  द्विराष्ट्र सिद्धांत स्विकारून धर्माच्या आधारावर नव्हे तर धर्माच्या नावावर शेजारी एक कट्टर इस्लाम धार्मिक पाकिस्तान देश निर्माण कोणी केला ?  देशाच्या फाळणीच्या वेळी हिंदूच्या कत्तली कोणी केल्या? कूठला पक्ष जबाबदार होता? असे प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारावेसे वाटले होते पण मुख्यमंत्रीपदाची जबाबदारीमूळे ते इतिहास विसरले असावेत असे समजून मी टाळले.  एक चांगला फोटोग्राफर म्हणून उद्धव ठाकरे गौरवास पात्र आहेत पण बाळासाहेबांचा वारस म्हणून शोभतो असे मानणारी मंडळी शिवसेनेतच नाही मग इतरांना तरी कसे पटेल? बाळासाहेब होते तो वर युतीत शिवसेना पक्ष मोठा भाऊ म्हणून मिरवत राहीला. पण बाळासाहेबांच्या पश्चात झालेल्या दोन विधानसभेच्या निवडणूकीतील आकडे पाहीले तर छोटा भाऊ म्हणण्यापेक्षा भाजपाचा अर्धा भाऊ पण शिवसेना मिरवू शकला नाही. शेवटी युतीत राहून आम्ही वाघ आहोत, आम्ही युतीत नंबर एक येऊ ही धमक उद्धव ठाकरेकडे राहीली नाही आणि या वाघाने युतीतून पळ काढला आणि आपली शेपटी  हालवित शरद पवार व मॅडम सोनियांच्या चरणापाशी दीन होऊन लीन झाला. आपल्या मित्राचं बाळ रडतयं ना, मग चला आपण याला मुख्यमंत्रीपदाचं खेळणं हातात देऊ अशी शरदकाकाने सोनिया राणीकडे विनवणी केली. झाले एकदाची विनवणी फळली ; आपल्या मित्राच्या बाळाला मुख्यमंत्र्याच्या  खुर्चीवर बसविले. आपले मुख्यमंत्री अनुभवी नाहीत हे मान्य पण जालीयनवाला बागेतील हत्याकांडचे उदाहरण कोठे द्यावयाचे याचे भान राहू नये हे माझ्या तर्काच्या पलिकडचे वाटत आहे. असंख्य भारतियांचे प्रेरणास्थान बनलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला ब्रिटीश सरकारची उपमा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली, तेव्हापासून  निलेश राणेंनी ' यांना कोणी च्यवनप्राश द्या हो ' असा उद्धवजींना मारलेला शेरा मला ही आता पटू लागला. इथे विषयातंर झाले आहे असे मला मुळीच वाटत नाही. कारण नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्याची गरजच मूळी नाही. कारण हे बील काॅग्रेस राजवटीतच मंजूर होणे आवश्यक होते. हे बहुतांश मतदार जाणतात. मोदी सरकार द्वारा येऊ घातलेले राष्ट्रीय नागरीक नोदंणी पुस्तिका विधेयकाचे जनकत्व ही काॅग्रेस राजवटीलाच जाते. NCR म्हणजे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी. ही सध्या आसामपूरता लागू केलेली आहे ती ही सुप्रिम कोर्टाच्या आदेशानूसार हे लक्षात घेण्यासारखे आहे.  पुढे देशभर लागू होईल तेव्हा विरोधी पक्षांना चर्चेसाठी बराच अवधी मिळणार आहेच की. मग त्यावरून आताच विरोधी पक्षांनी नागरिकांचा बुद्धीभेद का करावा ? अल्पसंख्यांक मुस्लीम समाजात मोदी सरकार विरूद्ध भिती निर्माण करून मोदीच्या सत्तेचा खुंटा हलविता येतो ना, बस एवढा  राजकीय हिशोबच विरोधी पक्ष मांडताना दिसतात. राहाता राहीला प्रश्न पोलीसांनी अंदोलकांवर केलेल्या लाठीमाराचा.  हा समर्थनिय नाही असे आपल्या मुख्यमंत्र्यांना वाटणे हे अधिक अनाकलनिय वाटते. मूळात स्वतंत्र भारताच्या सरकाराने केलेला कायद्या विरोधात हिंसक अंदोलन करणे हा देशद्रोह ठरू शकतो. बरं अंदोलन कूठल्या मागणीसाठी ? या आधीच्या सरकारनेच तयार केलेल्या विधेयकाचे कायद्यात रूपातंर झाले आहे इतके साधं ज्ञान सन्माननिय मुख्यमंत्र्यांना कळू नये हे लाजीरवाणे आहे. अंदोलन करणारे कोण,   हेच ते जिहादी वाले, हेच ते देशके टूकडे टूकडे करण्याची घोषणा करणारे, हेच ते हमें आजादी चाहीये असा नारा देणारे लोक आहेत. या लेखाच्या शिर्षकाच्या खाली दिलेले चित्र पाहा मग कळेल की दोन तोंडाने म्हणणारी मंडळी कोण आहे ती ! काल सोशल मिडीयावर हिंसक अंदोलन करणार्याबाबत एक सत्य पण विनोदी व उपहासात्मक पोस्ट आलेली पाहीली. त्या पोस्ट मध्ये म्हटले आहे, " जो कल तक भारतसे आजादी मांग रहे थे, वह आज भारतकी नागरिकता मांग रहे है | " मुख्यमंत्री साहेब ह्या अंदोलन करणार्या लोकांवर आज नागरिता मागण्याची पाळी आली आहे. तरी सोशल मिडीयावर त्यांच्या बाबत सहानुभूती दिसत नाही. याचे कारणे दोन असावीत. एक अंदोलक पोलीसांवर दगड मारत आहेत , सार्वजनिक मालमत्तेचे नुकासान करीत आहेत म्हणून आणि दुसरे कारण या अंदोलंका मध्ये बेकायदेशीर रित्या  घुसगिरी करून आलेले शेजारी देशातील नागरिक असावेत. आपण स्वतःच मान्य केलं आहे की आपल्याला प्रशासनाचा अनुभव नाही. हा आपल्यतला मोठेपणा मानतो पण अतार्कीक रित्या जालीयनवाल्या बागेचं उदाहरण देण्याचा हा आपला उतावीळपणा आहे असे मानावयाचे की आपण दुसर्यांच्या मेहरबानीवर मुख्यमंत्री झालात म्हणून असे विधान करण्याचा आपल्यावर दबाव आला का? आपल्याला हा प्रश्न सतावित राहणार आहे. ते ही पुढील निवडणूकीपर्यंत .या प्रश्नाचे उत्तर देण्यापासून पलायन केले तर ते पिशाच्च म्हणून मागे लागणार हे लक्षात असू द्या. एखादं विधान करतेवेळी आपण आता फक्त शिवसेनेचे प्रमूख नाही राहीलात, तुम्ही महाराष्ट्राचे सन्मनीय मुख्यमंत्री आहात, ही जाणीव ठेवाल अशी आशा बाळगतो.

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात परकीय नागरिकांच्या बेकायदेशीर  वास्तव्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात या संबंधीची माहीती विविध अहवालातून स्व इंदिरा गांधी, स्व राजीव गांधी, डाॅ मनमोहनसिंग या तीन माजी पंतप्रधांनापर्यंत पोहचली होती आणि ह्या तिन्ही पंतप्रधानांना  याबाबतचे गांभीर्य कळले होते. पण त्याबाबत ते काही ठोस निर्णय घेऊ शकले नाहीत. ही वस्तूस्थिती मानून विरोधी पक्षांनी सरकार सोबत सांमजस्यांने नागरिकत्वाचा सुधारीत कायद्याचा प्रश्न हाताळावयास हवा होता. पण सिताराम केसरी नंतर काॅग्रेसची सुत्रे सोनिया गांधीच्या हाती आल्यापासून काॅग्रेस व मित्र पक्षांचे वर्तन राष्ट्रवादी विचारांवर आसूड घेण्याच्या पध्दतीचे राहात आलेले आहे आणि हेच नागरिकत्वासंबंधीत सुधारीत कायद्यावरून उठलेल्या गदारोळाचे मूख्य कारण आहे. स्वातंत्र्यापासून मुस्लीम समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठीचे प्रयत्न काॅग्रेस राजवटीत झालेच नाही. उलट सतत संघ-जनसंघाची भिती अल्पसंख्याकांच्या मनात रूजविण्याचे काम काॅग्रेस सकट सर्व विरोधी पक्षांनी केले व अजूनही करीत आहेत. त्यामूळे अल्पसंख्याक समाजाची एक अशी मानसिकता  झाली आहे की आपण या देशात एक विशेष जमात आहोत आणि आपल्याला सरकारकडून आपल्या धर्मातील कायदे पाळण्याची आपल्याला भूमा मिळावी ही अभिलाषा कायम मनात रूजली. आणि तशी सोय काॅग्रेस व सारे सर्वधर्मसमभाव वाले पक्ष करून देऊ लागले. त्यातून काॅग्रेस व मित्र पक्षांच्या राजवटीत आपल्याला सापत्न वागणूक मिळते अशी भावना बहूसख्यांक समाजाला होत गेली.  २०१४ साल उजाडले आणि बहूसख्यांक समाज मोदी सारख्या आक्रमक नेत्याकडे आकृष्ट झालेला आपण अनुभवत आहोत. आज भाजपा विरोधी फूस भरणे विरोधी पक्षांच्या अस्तित्वासाठी निकड बनली आहे त्यातूनच अल्पसंख्याकांचा बुद्धीभेद सारे विरोधक एकजूटीने करू लागले आहेत, त्याचीच परिणीती मुस्लीम बाहूल प्रदेशात नागरिकत्व सुधारणा कायद्या विरूध्द हिंसक अंदोलन होत असताना दिसत आहेत. काॅग्रेस, साम्यवादी व इतर मित्र पक्षांच्या कुटील नीतीची हे खूळ देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याइतपत वाढले जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असे काही राजकीय अभ्यासकांचे मत होत आहे.  साधारणतः १९७१ च्या भारत-पाक युद्धानंतर पश्चीम बंगाल व आसाम मध्ये घुसखोरीचे प्रमाण वाढले असे मानले जाते. पण अनेक राजकीय व डेमोग्राफीचे अभ्यासक, संरक्षण दलातील व सीमा सुरक्षा दलातील माजी वरिष्ठ अधिकारी, माजी नोकरशहांच्या मतें ही समस्या ६७ वर्षापासूनची आहे. त्यासंबंधीचे अनेक विडीओ व अनेक पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल  झालेले आपण पाहात आहोत. त्यावरूनच ही समस्या किती उग्र स्वरूपाची झाली आहे हे आपल्या लक्षांत येऊ शकते. भाजपाचे मूळ स्वरूप जनसंघ जो १९५२ साली स्थापन झाला होता, तेव्हापासून आज तागायत राष्ट्रीय सुरक्षा, समान नागरी कायदा, काश्मीरमधील ३७० कलम यासंबीची भाजपाची भूमिका पुर्वीपासून जी आहे ती बदलली नाही. म्हणूनच भाजपा सत्ता काबीज करण्याइतका बलवान पक्ष झाला आहे. आता सत्तेत आल्यानंतर जाहीरनाम्यानूसार भाजपा सरकार आपले धोरण आखत असेल तर त्यात भाजपाचे काय चूकले?

नागरिकत्व हे काही अंगावर परीधान केलेले वस्त्र नाही की ते आवडले म्हणून घातले. ज्यांच्या अनेक पिढ्या इथे जन्मल्या व वाढल्या आणि अशाच तर्हेने वाढत राहणार, अशा कोणत्याही धर्माच्या, सांप्रदायाच्या तसेच जाती-जमातीतल्या व्यक्तीचे नागरिकत्व त्याच्या शरीराच्या अवयवापैकी एक आहे. त्यामूळे आपल्या देशातील अल्पसंख्याक मग ते ख्रिस्ती असो वा इस्लाम असो, ज्यू असो वा पारशी हे सारेच भारतीय आहेत. त्यांना या विधेयकापासून कसलाच धोका नाही इतके स्पष्ट सरकारने मांडले आहे. नागरिकत्वासंबंधी जे बील संसदेत नुकताच मंजूर झाले आहे ते आपल्या शेजारील देशात विशेषतः बांगला देश, पाकिस्तान, व अफगणीस्तानात राहणार्या शोषित भारतिय वंशाच्या लोकांना आपल्या देशात अधिकृत रित्या सामावून घेण्याची संधी मिळावी अशा हेतूने केलेल्या दुरूस्तीचे स्वरूप आहे. भारतीय वंशाचे म्हणजेच, हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिस्ती बांधवांचा शेजारील तीन देशात छळ होत आहे त्यांना भारताने समावून घेतले नाही तर ते कूठे जातील असा प्रश्न  देशाचे गृहमंत्री श्री अमीत शहा यांनी संसदेत केलेला आपण ऐकला व पाहीला आहे.  या प्रश्नाचे उत्तर विरोधी पक्ष देत नाहीत. मताच्या राजकारणासाठी अल्पसंख्याकांच्या मनात भिती उत्पन्न करून ते आपली पोळी भाजून घेत आहेत.  गृहमंत्र्यांनी पुढे हे स्पष्ट केले आहे की देशातील अल्पसंख्याकानी  घाबरून जावयाचे कारण नाही. विरोधी पक्षांना पाकिस्तान, अफगणीस्तान व बांगला देशातील मुस्लीमांनाही भारतात येऊ द्यावयाचे व नागरिकत्व द्यावयाचे आहे का? आपल्या देशात शेजारील देशातून लाखो निर्वासितांनी घुसखोरी केली आहे. त्या सार्यांना बोगस रेशन कार्ड व मतदानाचा हक्क कसा प्राप्त झाला आहे त्याचा शोध सरकारने घेऊ नये का? असे प्रश्न देशातील करोडो मतदारांच्या मनात आहेत. त्यांच्या भावनेची कदर सरकारला घ्यावी लागतेच. लोकशाहीमध्ये निवडणूकीतील मतदानाद्वारे निवडून आलेल्या सरकारची जी मूलभूत कर्तव्यें पार पाडण्याची जबाबदारी आहे ती त्याने निभावू नये का? देशात सध्या मंदी आहे त्यावर सरकारने लक्ष केंद्रीत करावे असे विरोधकांचे म्हणणे रास्त आहे पण त्यासाठी विरोधी पक्ष म्हणून जनजागरणाचा कार्यक्रम हाती घेताना कुठे दिसतात ? फक्त सोशल मिडीयावर यांचे चमके कार्यकर्ते हवी तशी भाषा वापरून मोदी सरकारवर टिका करीत असतात. असे चमके कार्यकर्ते रस्त्यावर येऊन शांततेने धरणासाठी येतील की नाही अशी शंका विरोधी पक्षांच्या नेत्यांनाच अधिक असते. सध्या तरी मोदी सरकार ढासळेल असे दिसते का? नाही ना, मग जा जरा लोकांत, अभ्यास करा त्यांच्या समस्यांचा, आणि मग संसदेने दिलेली आयुधें वापरा की !  संसदेत मंजूर झालेल्या राष्ट्रीय हिताच्या एखाद्या कायदा- दुरूस्ती विधेयकाला विरोध का करावा ? या मागे विरोधकांचे तर्कशास्त्र तरी काय आहे हे तरी निदान जनतेला कळायला हवे की नाही.  शांततेने सरकारशी चर्चा करून आपल्या हरकती मांडल्या असत्या तर विरोधी पक्षांच्या हेतूबाबत शंका आली नसती. पण विरोधकांनी सवयीप्रमाणे आपली क्रान्तीची भाषा उच्चारीत समाजाला वेठीस धरण्याचे दृष्कृत्यं अवलंबीले आहे. सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाने देशाची अर्थव्यवस्था बळकट होणार आहे का? देशात मंदी आहे या विषयीचे गांभीर्य विरोधी पक्षांकडे बिलकूल नाही. तसे असते तर जाळपोळ आणि अवार्च्य भाषेत सरकारच्या नावाने सोशल मिडीयावर शिमगा या मंडळीने केला नसता. 

देशभर हिंसक अंदोलने होत आहेत हा एक राजकीय स्टंट आहे. अंदोलनें करण्याचा हक्क आहे पण सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ करणे हा काही हक्क मानता येतो का? स्वातंत्र्य म्हणजे कायद्याचा आपल्याला पटला तसा अर्थ काढून वर्तन करणे नाही. कालच मुबंई महापालिकेला न्यायालयाद्वारे मटन विक्रेत्यांना खाजगी जागेत प्राण्यांची कत्तल करण्याचे परवाने रद्द करण्याचा आदेश दिला आहे. मटन विक्री करणे हा व्यवसाय आहे व तो मूलभूत हक्क ही आहे पण हा हक्क वापरताना सार्वजनिक आरोग्य चांगले रहावे यासाठी मटन कापण्यासाठी जे प्रतिबंध घातले आहेत ते नाकारणे हे बेकायदेशीर आहे हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कायद्याचा अर्थ काय आहे हे समजून वर्तन करणें गरजेचे आहे. आपले जाणते राजे, पंतप्रधानपदाचे स्वप्न भगंले आणि आता मुक्काम पोस्ट बारामतीतच राहणार्या श्री शरद पवारांना मोदी सरकार विरोधात होणारी हिंसक अंदोलने पाहून एक तर पुन्हा पंतप्रधान वा राष्ट्रपती बनण्याचे स्वप्न पडले असावे किंवा जयप्रकाश नारायणासारखे लोकनायक म्हणून आपले नाव इतिहास व्हावे अशी इच्छा झाली असावी. सध्या सुरू असलेली हिंसक अंदोलने पाहून त्यांना म्हणे, जयप्रकाश नारायणांच्या नेतृवाखाली १९७४ साली झालेल्या अंदोलनाची  आठवण झाली आहे आणि तशीच स्थिती देशात आहे व मोदी सरकार आता शेवटची घटका मोजत आहे असे वाटू लागले आहे. मला शरद पवारांना सांगावेसे वाटते " अहो पवार साहेब, तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधीचा रायबेली मतदार संघातून झालेला विजय अलाहाबाद हायकोर्टाने बेकायदेशीर ठरविला. म्हणून त्यांनी आपले सुपूत्र संजय गांधीच्या टोळी करवी देशात धुडगूस घातला . देश भ्रष्ट्राचाराने बरबटीत केला. देशभर सर्वत्र हम करोसे कायदाचे राज्य सुरू केले होते. म्हणून जयप्रकाश नारायणांनी अंदोलन छेडले होते. ते अंहिसा व सत्याग्रहावर आधारीत होते. ते खर्या अर्थाने देशभर व्यापलेले होते. पण  पवार साहेब आपण जयप्रकाशजींच्या अंदोलनात नव्हताच . त्यावेळी आपण कूठे होतात? काॅग्रेस मध्येच होतात ना ! ज्या काॅग्रेसने धुमाकूळ घातला होता त्याच पक्षाचे कार्यकर्ते होतात ना?  धमक होती, सच्चेपणाची कदर होती तर जयप्रकाशजींच्या अंदोलनात घ्यावयाची होती उडी ! जयप्रकाश नारायणाच्या नेतृत्वाखाली झालेल्या अंदोलनाची आता पाठराखण करून कशाला महात्मा व लोकनायक बनण्याचा प्रयत्न करायला जात आहात ? महाराष्ट्रात ५४ जागा मिळविताना तुम्हाला घाम आला होता.  इंदिराजींचा १९७७ च्या निवडणूकीत जबरदस्त पराभव झाला, त्यानंतर आपण काॅग्रेस सोडली व पुलोद आघाडी करून महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद पटकाविले. आपली सोय संपली तेव्हा काॅग्रेस सोडावयाची व पुन्हा सोयीनूसार काॅग्रेसमध्ये येऊन वा आघाडी करून सत्ता मिळवयाची अशी तुमची नियत. नागरिकत्व म्हणजे काॅग्रेस पक्ष नव्हे. आपण निवडणूकीत पूर्ण विजय मिळविलेल्या पक्षाचे मुख्यमंत्री कधी झालातच नाही. म्हणून नागरिकत्व सुधारणा कायदा आपल्या दृष्टीला जसा दिसतो तसे आपण त्याचे वर्णन करीत आहात."

विरोधी पक्ष देशात असलेल्या आर्थिक मंदीचा बागूलबूवा असा काही उभा करीत आहेत की जणू काही युपीए १ व २ च्या काळात भारत आर्थिक दृष्ट्या महासत्ता होती. भ्रष्टाचार, बहूपक्षीय राज्यव्यवस्था  राजकारणातील घराणेशाही व त्या घराण्याची वाढलेली अमाप संपत्ती,  समाजवादी अर्थनीती, साम्यवादाचे भूत, लोकानूयी धोरणे, बड्या राष्ट्रांच्या एनजीओ, विविध विदेशी लाॅब्या, माओवाद्यांकडून मिळालेल्या पैशाच्या जोरावर क्षणोक्षणी हिंसक अंदोलने करण्यासाठी आदिवासी बांधवांना फूस भरविणारे अर्बन नक्षलवाद्यांची देशद्रोही कारस्थाने  इत्यादी कारणांमूळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था अनेक वर्षे तोळामासाची राहिली आहे. अर्थव्यवस्थेला पोखरण्यामागे आणखिन एक पण सर्वात मोठे व महत्वाचे  कारण आहे ते म्हणजे १९४७ सालची फाळणीची शोकांतिका. काश्मीर सतत धगधगता राहीला.  धर्माच्या नावाने निर्माण केलेलं, विषारी जहर प्यालेले पाकीस्तानने अनेक वर्षे दशहतवादी पोसले व आपली अर्थव्यवस्था पोखरण्याचे उद्योग सुरू ठेवले आहेत. पाकिस्तान अफगणीस्तान, बांगला देश या शेजारील देशांच्या नागरिकांची आपल्या देशात होणारी बेकायदेशीर रित्या घुसखोरीने ही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण केला आहे. म्हणून घुसखोरी रूपाने वाढलेली ही काटेरी झूडपें मुळासकट निपटून काढणे गरजेचे आहे आणि तेच काम बहूमताने निवडून आलेले विद्यमान केंद्र सरकारने हाती घेतले आहे.  तुम्ही सोबत आलात तर छान, न आलात तर तुमच्या विना देश पुढे नेत राहू असाच बाणा घेऊन पुन्हा सत्तारूढ झालेले मोदी सरकार विरोधी पक्षांच्या उपद्रवांना भीक घालील असे वाटत नाही. जमीनीतून चांगले पीक येण्यासाठी काटेरी झुडपें छाटावीच लागतात हा निसर्गाने आपल्याला शिकविलेला नियम आहे. त्याला अपवाद नसतात. हे विरोधी पक्षांनी लक्षात ठेवून आपला व्यवहार सुधारावा ह्यातच त्यांचे व देशाचे ही हित आहे.

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९

सुप्रिम कोर्टाचा निकाल व महाराष्ट्राची स्थिरतेकडे वाटचाल



आताच महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात आले. नवीन सरकारचे हार्दिक अभिनंदन ! सुप्रिम कोर्टाने मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी देवेंद्र फडणवीस सरकारला बुधवारी २७ नोव्हेंबरला पोर्टेम सभापतीच्या अध्यक्षतेखाली विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचा निकाल दिला. त्याबद्दल न्यायपालिकेचे कौतूक करावे तितके कमी आहे. वस्तुतः आपल्या देशात न्यायपालिका आणि कार्यपालिका मध्ये आपआपल्या अधिकारासंबंधी सुप्त स्पर्धा आहे असे ऐकीवात येत असते. मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या निर्णयात पक्षपात होता असा आरोप विरोधकांनी केला होता तरी पण आपल्या निकाल पत्रात न्यायालयाने त्यासंबंधी काही भाष्य केले नाही ही बाब उल्लेखनीय आहे. 

केंद्रातील काॅग्रेस व मित्र पक्षांच्या राजवटीत  तसेच अनेक राज्यातील  प्रादेशिक पक्षांच्या व साम्यवादी पक्षांच्या राजवटीत संविधानाची मूलभूत तत्वे पायाखाली तूडवून भाजपावर अन्याय केल्याच्या घटना झालेल्या आहेत. आजही बंगाल व केरळ राज्यात होत असतांना दिसत आहेत. म्हणून महाराष्ट्रातील सत्ता स्पर्धेत भाजपाने केंद्रातील सत्तेच्या ताकदीवर  राजकारणातील सत्तेच्या स्पर्धेत खुमखूमी दाखविण्याचे वर्तन केले ते भाजपाला शोभेसे नव्हते अशी चर्चा भाजपामध्ये ही झाली असे ऐकू येते. त्यामूळे विरोधकांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर टिका केली ती रास्त आहे असे समजून त्यातून भाजपानेही धडा घ्यावयास हवा.

पण इतके दिवस सत्ता वाटपात वेळ घालविला होताच मग ३० तारखेपर्यंत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते थांबले असते तर त्यांचा आपल्या आमदारांवर विश्वास होता हे सिध्द झाले असते. बहूमत सिध्द करण्याएवढे संख्याबळ असून न्यायालयात ही मंडळी गेल्यामूळे  विरोधी पक्षांनी आपल्या आमदारांना बंधिस्त व दामदाटी करून विजय मिळविला आहे अशी आशंका निर्माण झाली होती त्याचे निराकरण करणे तसेच पडून राहीले आहे.  ही बाब महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते , कार्यकर्ते व समर्थकांनी लक्षात ठेवावयास हवी. तसेच ज्या मोदींचा ही मंडळी द्वेष करत आले आहेत त्या मोदींच्या ' सबका साथ सबका विकास ' या टॅग लाईन मधील विकास शद्ब देशातील शिवसेना सकट (जी शिवशाहीच्या शद्बाचा केवळ उच्चार करते) छोट्या मोठ्या तमाम विरोधी पक्षीयांच्या नेत्यांच्या नुसता मुखीच नाही आला तर आज शिवसेनासकट सर्वच विविध पक्षांच्या आघाडीच्या नामकरणात आला हे प्रांजळपणे त्यांनी मान्य करण्याचा मोठेपणा दाखवयास हवा असे वाटते. 

राष्ट्रवादी काॅग्रेस मधील कौटुंबिक वादात अजित पवारांची हार होताच त्यांनी  परवा कोर्टाचा निकाल आल्यानंतर  स्वतःचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर आपल्याकडे संख्याबळ नसल्याने फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन आपण सरकारचा राजीनामा द्यावयास जात आहोत, हे जनतेला जाहीर केले. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंगासारखं जनता पार्टीचे सरकार पाडून  त्यांनी सत्ता काबीज केली नव्हती. म्हणून ते जाहीर रित्या राजीनामा देण्याचे धाराष्ट्य करू शकले. अजित पवार स्वतःहून बंड करून फडणवीसांकडे आल्यामूळे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने अजित पवारांच्या बंडाला तात्काळ पाठींबा देऊन सरकार स्थापन केले. पण सरकार स्थापन करण्याची रीत वापरण्यामध्ये चूक झाल्यामूळे  भाजपाची नाच्चकी झाली. करावे तसे भरावे हा सृष्टीचा नियमच आहे. ह्याच नियमाचा तडाखा अजित पवारांच्या बंडाने शरद पवारांनाही बसलाच की. भाजपाने सत्ता स्थापन करण्याबाबतची जी रित  वापरली या संबंधीची जी टिका झाली त्यात फक्त भाजपाकडून राजकारणात नैतिकतेचा आग्रह करण्यात येतो हे सत्य नाकारता येत नाही. असो. एकंदरीत  राज्यातील अस्थिरता संपली ही चांगली गोष्ट आहे, त्याचे मनापासून स्वागत आहे. आपल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सरकार स्थापण्याच्या निर्णयासंबंधी बोलताना, अजित पवारांनी सहकार्याची हमी दिल्यानंतर राज्यात तीन-चार पक्षांच्या सरकार पेक्षा दोन पक्षांचे सरकार अधिक स्थिर राहू शकते हीच भावना ठेवून सरकार स्थापन केले होते हे स्पष्ट केले. हे स्पष्ट करताना त्यांचा कुठेही मानसिक गोंधळ दिसला नाही  त्या अर्थी घाईने सत्ता स्थापन करण्याचा दोष फडणविंसापेक्षा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे अधिक जातो असे मला वाटते. शिवसेनेने जनादेशाची प्रतारणा केली ह्याचा पुनरूच्चार फडणवीसांनी केला त्यात गैर काही नाही. तसेच सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडणून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले हे ही यथोचीत आहे. 

राज्यातील अस्थिरतेला बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उध्दव ठाकरें यांची मुख्यमंत्री पदाची लालच हेच प्रमूख कारण आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला परंतु बाळासाहेबांची इच्छा स्वबळावर विधानसभेवर भगवा फडकावयाचे स्वप्न अधूरे राहणार असे दिसते. भगवा गेला व स्वबळाची गुर्मी ही संपली. आता ते पुढे गुर्मीत वागणार नाहीत अशी  खात्री झाली आहे. कारण दोन पक्षांच्या युतीचे नव्हे तर चार-पाच पक्षांच्या सरकारचे प्रमूख झाले आहेत ते ही जनादेशाची प्रतारणा करून. तरीही भाजपावर सडकून टिका करण्याची तयारी दर्शवित आहेत पण आघाडीचे सरकार चालवितांना त्यांना त्यासाठी वेळ मिळेल का ही शंका आहे. तसा वेळ न मिळणे हेच त्यांच्यासाठी योग्य ठरेल. कारण आतापर्यंत सत्तेत राहून ही  विरोधी पक्षांची भूमिका घेण्याची सवय जडलेल्या उध्दव ठाकरेंना सरकारच्या कारभाराची ॲप्रेन्टीसशिपची गरज आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व अनेक शुभेच्छा !  

नवे सरकार सत्तेवर आले आहे तरी सत्ता संघर्ष संपेल असे नाही. न्यायलयाचा चोवीस तासात बहूमत सिध्द करा असा निर्णय येऊनही जर अजित पवाराकडे राष्ट्रवादी पक्षांचे  दोन तृतीयांश आमदारांचे बळ असते तर फडणवीस व अजित पवारांचा विजय झाला असता. मग अशा वेळी न्यायालयाच्या निर्णयाला अर्थ राहीला ही नसता. याचा अर्थ आपल्या राजकीय व्यवस्थेत दोष आहे याकडे दुर्लक्ष करता येत नाही. तो दूर करण्यासाठी निवडणूक पूर्व यूती वा आघाडी संबंधी रितसर पुरावा निवडणूक आयोगाकडे देणे बंधनकारक ठेवण्याचा कायदा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. म्हणजे निवडणूक निकालानंतर आपल्या मनाला येईल तसे वागण्याची राजेशाही वृत्तीचा बिमोड होऊन लोकशाही बळकट होण्यास मदत होईल. या बाबतीत सर्व पक्षीय सहमती होऊन तसा कायदा आपली संसद आणेल, तो भारतिय लोकशाहीचा सूदीन ठरेल.

बहूपक्षीय लोकशाही हे ही एक आपल्या देशाच्या लोकशाहीचे वैगूण्य आहे. बहूपक्षीय राज्यव्यवस्थेमध्ये मतदारांची पक्षीय विभागणी होऊन आधीच जातीव्यवस्था असलेल्या आपल्या देशात एक नवीन पक्षीय जात  वस्ती-वस्तीत निर्माण झालेली दिसते. प्रत्येक वस्तीत आपआपल्या घरावर भिन्न राजकीय पक्षांचे झेंडे व त्यांच्या नेत्यांचे फोटो दिसतात. आम्ही अमूक पक्षांचे, आम्ही तमूक पक्षांचे अशी भाषा गावा-गावात ऐकावयास मिळते व थोडासा वादविवाद झाला की  त्याचे पर्यावसन मोठ्या भांडणात होते. मग आपल्याच समाजबांधवांचे, देशबांधवांचे रक्त सांडले जाते. असे किती वर्षे सुरू राहणार ?  

आपल्या येथील घराणेशाही पक्षांची सद्दी संपणे आवश्यक आहे. कारण घराण्यातील सत्ता स्पर्धा हे ही राजकीय अस्थिरता निर्माण करत असते हे आपण घराणेशाही पक्षांच्या इतिहासातून अनूभवत आलो आहोत. महाराष्ट्रातील सध्याचा पेचप्रसंग निर्माण करण्यातील मोठा वाटा दोन राजकीय घराण्यातील नेत्यांचा आहे. बहुतांश घराणेशाही पक्षातील नेत्यांचे वर्तन इतिहासातील लहरी महमद तुघलका सारखे  असते. राजकारणात ते कधी पलटी मारतील याचा भरवसा देता येत नाही. दुर्दैवाने अशा नेत्यांच्या या वृत्तीचा गौरव होतो हे ही भूषणावह नाही. महाराष्ट्रातील सध्याच्या सत्ता पेचप्रसंगात पवार घराण्यातील वाद उघड झाला आहे आणि तो थांबेल असे मला वाटत नाही. ठाकरे घराण्यात उध्दव-राज यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता, त्यावेळी अनेक जेष्ठ राजकीय अभ्यासकांनी त्यावर मार्मीक उत्तर दिले होते ते असे आहे, ' एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत.' तेच उत्तर पवार घराण्यातील सत्ता स्पर्धेला लागू पडते. पण राजकीय अभ्यासक घराणेशाही संबंधी ना चिंता व्यक्त करतात ना शरद पवारावर टिका करतात. यापाठीमागे अर्थस्य पुरूषो दासः हेच कारण आहे. त्यामूळे शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना मिळालेल्या यशाच्या श्रेणीच्या अनेक पटीने कौतूक होत आहे असे मला वाटते. नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात संपूर्ण गुजरात भाजपामय केला. त्यातून ते देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. पण बाळासाहेब ठाकरे व शरद पवार स्वबळावर महाराष्ट्रातील एक हाती सत्ता घेऊ शकले नाहीत तसेच आपआपल्या पक्षांच्या खासदारांची संख्या वाढवू शकले नाहीत. मतदार जागृत होत आहे म्हणूनच काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस व शिवसेनेला महाराष्ट्रातील सत्तेत आज एकमेकांसमोर वाकावे लागलेले दिसत आहे. सत्ता स्थापन करण्यात त्यांना यश मिळाल्याचा त्यांना आनंद होणे नैसर्गिक आहे .पण या तिन्ही पक्षांची  वाढ खुटंली आहे ह्याची खात्री त्यांना ही पटली आहे. म्हणजे घराणेशाही पक्ष उतरंडीला लागले आहेत. यावरून आपली लोकशाही प्रगल्भ होत आहे हे दिसते.

मी ब्लाॅगवर लिखाण सुरू केल्यानंतर ज्या वाचकांनी माझे कौतूक केले त्यापैकी माझ्या एका मित्राने सत्तेचा तिढा या लेख मालिकेतील लेख वाचून मला परवा एका मेसेज मधून सल्ला दिला की, "  मित्रा, तु संघाचा स्वयंसेवक आहेस, तर तुझ्या कडून राजकिय अभिनिवेशात एका पक्षाची बाजू घेऊन लिखाण करणे अपेक्षित नाही."  माझ्या मित्राच्या सल्ल्याचे मी स्वागत केले व त्याला माझे प्रामाणिक उत्तर Whatsapp वर मेसेज द्वारा पाठविले. ते वाचून त्यांनी लाईक केले. मी संघाचा एक सामान्य स्वयंसेवक आहे, आणि त्याच  नात्याने उत्तर दिले आहे. याचा अर्थच असा आहे की संघात वैचारिक स्वातंत्र्य आहे. त्यासाठी संघाकडून परवानगी घ्यावी लागत नाही. तिथे ना व्यक्ती पुजा, ना घराणेशाही. तिथे फक्त संघभावना आणि राष्ट्र प्रथम.  माझे ते संपूर्ण उत्तर या लेखाचा विस्तार वाढेल हे माहीत असूनही ब्लाॅगर या नात्याने नम्रपणे आपल्या समोर ठेवून या  लेखाची समाप्ती करतो.

" गेल्या पाच वर्षात अनेक ग्रुपवरून मला भाजपेतर  पक्ष व त्या पक्षांच्या नेत्यासंबंधीचे तसेच भाजपा व भाजपा नेत्या संबधीचे टिकात्मक स्वरूपातील कार्टून (मेसेज) येत आहेत. मी त्यावर कुठलीच प्रतिक्रीया देत नाही. भ्रष्टाचार सर्वच पक्षातले नेते कमी अधिक प्रमाणात करीत असतात आणि त्यास भाजपा अपवाद नाही. म्हणून भ्रष्टचार व एकूण राजकीय व्यवस्थेतील वैगूण्यावरील विनोद वा व्यंगचित्रे स्वरूपातील पोस्टला मी लाईक करतो. एक मात्र निश्चीत की मी आपल्या राज्यव्यवस्थेतील  घराणेशाही पक्षांवर टिका करतो. दुर्दैवाने भाजपा व साम्यवादी पक्ष सोडले तर बहूतांश पक्ष घराणेशाही स्वरूपाचे असल्यामूळे माझे लिखाण सर्वच राजकीय पक्षांसाठी टिकात्मक वाटू शकते हे मला मान्य आहे. साम्यवादी पक्ष हिसेंवर आधारीत क्रान्ती वर विश्वास ठेवतात, म्हणून मी टिका करतो. साम्यवाद ही चीन व रशियात रूजलेली विचारसरणी आहे. ती विचारसरणी वाईट व त्याज्य आहे असे मी मानीत नाही पण आपल्या येथील साम्यवाद्यांचे प्रेरणास्थान रशिया व चीनमधील सत्तेवर असलेले नेते नसावेत अशी माझी धारणा आहे. त्यातही ही सृष्टी विवधतेने नटली आहे, म्हणून कायदे करून ते ही व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालून, आम जनतेला देशाच्या राज्यव्यवस्थेत किंचितसा ही सहभाग न देता, एक पक्षीय राजवटीतून वर्गरहीत समाज निर्माण करणे हे निसर्गाच्या नियमाविरूद्ध आहे असे मला वाटते. सविस्तर माहीतीसाठी  माझ्या ब्लाॅग वरील  चातूर्वण्यम मया सृष्टी गुणकर्मविभागशः  हा लेख कृपया वाचावा. ज्या दिवशी भाजपा हा राष्ट्रीय स्तरावर वा कुठल्याही राज्य पातळीवर घराणेशाहीचे रूप घेईल तेव्हा मी भाजपा विरूद्ध तिखट लिखाण करीन. आजच्या घडीला भाजपा मध्ये लोकसभा, विधानसभा, व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत काही घराण्याच्या वारसांना तिकीट वाटप होत असते पण देश पातळीवर वा राज्यपातळीवर वा जिल्हा स्तरावर कुठल्या एका घराण्याच्या चरणी भाजपा वाहिलेला नाही, हाच माझ्या दृष्टीने संघ या शद्बाचा अर्थ.  माझ्या मते 
" सामूहीक नेतृत्व व सामूहिक शहाणपण व सहकार जिथे आहे तो संघ. अर्थात भाजपामध्ये ही संघ भावना कमी होऊ लागली आहे म्हणून भाजपाची महाराष्ट्रात घसरण झाली आहे. आज ही जातीवाद आपल्या देशात अस्तित्वात आहे हे दुर्दैव.  काही ठिकाणी, वर्ष प्रतिपदाच्या दिवशी शोभायात्रा काढल्या जातात त्या ही ज्ञाती संस्थाद्वारे काढल्या जातात ते ही मला पटत नाही. ज्या ज्या घटनात राजकीय पक्षाने आपआपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे तिथे तिथे मी राजकीय अभिनिवेशावर लगाम घालण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणा दाखल  देशभक्ती ही नारेबाजीत नव्हे ती असावी अंतःकरणात,  चित्रपट व समाजमन,  मुक्काम पोस्ट भीमा-कोरेगाव येथून , इत्यादी असे लेख कृपया वाचावेत व जरूर प्रतिक्रीया द्याव्यात मी आपले स्वागतच करीन. "

" अलीकडे सोशल मिडीयावर जेष्ठ साहित्यीक श्री मधु मंगेश कर्णिक यांनी भाजपा व शिवसेनेच्या हिंदूत्वा संबंधी केलेली तुलना व्हायरल झाली आहे. श्री मधू मंगेश कर्णिक यांनी म्हटले आहे  की, ' शिवसेनेचं हिंदुत्व आपल्या अंगावरील शाल सारखं आहे, नको असेल तेव्हा बाहेर काढून ठेवायचं पण भाजपचं हिंदुत्व आपल्या शरीरावरील त्वचे सारखं आहे. ते आपल्या अंतिम श्वासासोबत राहते.' हाच धागा पकडून माझ्या बुद्धीच्या कुवतीनूसार हिंदु शद्बाची व्याख्या जसी कळली आहे ती इथे मांडत आहे.'' ही माझी मातृभूमी, पितृभूमी आहे अशी भावना ज्याच्या रोमारोमात आहे, इथली मूठभर माती हातात घेतल्यानंतर ज्याच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू दाटतात , राम-कृष्ण विवेकानांदिचें चरीत्र वाचून जो नतमस्तक होतो , छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, गुरू गोविंदसिहं इत्यादींचे पराक्रमाच्या कथा वाचून ज्याची छाती अभिमाने ताठ होते, गंगायमूनादि समस्त नद्या, व  हिमालय सह्याद्री सारखे पर्वत पाहून ज्याच्या काळजात मुर्तीमंत पावित्र्य साकार होते, या भूमीतील सर्व ऋषीमूनी, संत महात्मे, सर्व भाषा, परंपरा,  साहित्यिक, शास्त्रज्ञ,  स्वातंत्रसंग्रामातील अंहिसा व क्रान्तीचा मार्ग स्विकारून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे सर्व थोर पुरूष,  समाजसेवक, समाजसुधारक, इत्यादी बद्दल ज्याच्या मनात नितांत आदर आहे, या भूमीतील कुठल्याही प्रान्तात नैसर्गिक आपत्ती आली की जो  जात-पात- भाषा-धर्म असा भेदभाव न करता समाजबांधवाच्या मदतीला धावून जातो,  वनवासी, गिरीजन, हरिजन आदिवासी, भटके जमात, दलीत- पिडीत, रूग्ण, गरीब-निरीक्षर, अनाथ-पोरके, शेतकरी-कष्टकरी, इत्यादीसाठी विविध सेवा प्रकल्प उभारतो वा अशा प्रकल्पात मदत करतो तो हिंदू. मग तो रामाची पूजा करो वा रहीमची, येशूची करो वा कोणाची ना करो."

" परवा शिवसैनिकांनी भाजपा कार्यकर्त्यांना डिचविण्यासाठी भाजपाच्या कार्यालयासमोर धिंगाणा घातला. विजयाच्या उन्मादात भाजपा कार्यकर्ते असे कृत्यं करीत नाहीत आणि केले असतील तर ते क्वचीत. भाजपा अनेक वर्षे विरोधी पक्षात होता. त्यावेळी भाजपाने सरकार विरोधी अनेक आंदोलने छेडली. पण  भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करण्याचा धुडगूस केलेला नाही. रामजन्मभूमी च्या मुक्तीसाठी भाजपाच्या व संघाच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती केली,  लाठीमार झेलला, कारावास भोगला व बलिदानही केले. रामजन्मभूमीचा निकाल लागला पण विजयाचा उन्माद केला नाही.  जो फरक सामना व तरूण भारत मध्ये आहे, जो फरक मार्मीक व साप्ताहीक विवेक आहे तोच फरक शिवसेनेचे कार्यकर्ते व भाजपा- संघाच्या कार्यकर्त्यांत आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांपेक्षा संघाचे स्वयंसेवक अनेक पटीने निरपेक्ष आहेत, हे जग जाहीर आहे. कारण संघ एक सांस्कृतिक संघटना आहे. संघ स्वयंसेवकांच्या मनात हिंदुत्व विचाराची शक्ती क्षीण होईल असा विचारच शिवला जात नाही मग समाजाची एकंदर शक्ती क्षीण होईल असे कृत्य करणें अशक्यच. भाजपाने शिवसेनेशी मैत्री टिकविण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. पण शिवसेना स्वतःहून भाजपा पासून फार दूर गेली आहे व जिथे गेली आहे, तिथे तिची वाढ होणे अशक्य आहे. हे एका परीने भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे. कारण महाराष्ट्रातला हिंदुत्व विचाराचा राजकीय क्षेत्रातला भागीदार पक्ष आता राहीला नाही.  साप्ताहीक विवेक व तरूण भारत भाजपाची मुखपत्रे नाहीत.  जिथे जिथे भाजपाचे नेते चूकतात तिथे भाजपावर  प्रखर टिका केलेली असतेच. भाजपाचे सरकार नव्हते त्या काळात ही संघाचे काम जोमाने सुरू होते व भाजपाची सत्ता गेली तरी ही तितक्यात जोमाने सुरू राहणार आहे. कारण संघ म्हणजे सततचा धगधगता यज्ञकूंड आहे. हे सत्य समाजाने स्विकारले आहे. म्हणूनच माझ्या लिखाणात भाजपावर टिका कमी दिसली तर माझ्या मित्रांना थोडेफार खटकते. हा माझा दोष मी प्रांजळपणे स्विकारतो. माझ्या एका लेखात  राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ मधील विधानसभेच्या निवडणूकीत पराभव का झाला यावर भाजपावर टिका केलेली आढळेल. या तिन्ही राज्यात दहा ते पंधरा वर्षे सत्तेपासून वंचीत राहीलेल्या काॅग्रेस पक्षातील राज्यस्तरीय नेते व कार्यकर्त्यांनी चिकाटी व संघटन शक्तीच्या जोरावर विजय मिळविला त्याबद्दल मी माझ्या लेखात भरभरून कौतूक केले आहे. तो लेख वाचून संघ विचारावर टिका करणार्या माझ्या दुसर्या एका जिवलग मित्राने Perfect असा प्रतिसाद दिला आहे. त्याच लेखात  लोकसभेच्या २०१९च्या निवडणूकीत या तिन्ही राज्यात भाजपा पुन्हा अप्रतिम यश मिळवेल असे मी भाकीत केले होते. पण तसे भाकीत मी भाजपाच्या प्रेमापोटी नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला देशभरातून प्रतिसाद मिळतो त्या आधारावरच केला आहे."

" संघ विचाराला आज समाजात मान्यता वाढत आहे त्या पाठीमागे  निस्सीम त्यागी वृत्तीने  समाजाची सेवा करण्याचे अपार कष्ट व ते ही अविरतपणे संघ घेत आहे हे कारण आहे. पण हे सत्य विरोधी पक्ष लक्षात घेऊ इच्छीत नाहीत. भाजपा मध्ये संघ स्वयंसेवकांची संख्या अधिक असल्यामूळे भाजपाला फायदा होत असावा. पण तेच ध्येय ठेवून संघ आपले कार्य करीत नाही. संघाचे कार्य १९२५ पासून सुरू आहे. रात्रीच्या प्रशांत समयी दंव पडत असतांना त्यांचा यत्किंचित आवाज कोणाला ऐकू येत नाही परंतु सकाळी उठून पहावे तर त्या दंवाच्या थेंबानी सर्व फुले प्रफुल्ल आणि विकसित झालेली आढळून येतात, असेच संघाचे कार्य ही  गाजावाजा न करता अत्यंत शांतपणे होत आलेले आहे. समाजबांधवांची मनें विकसित करण्याचे व त्यांना चिरसुख देण्याचे ते कार्य आहे. देश सशक्त बनविण्याचे ते कार्य आहे. भाजपाची घटना वेगळी आहे. तो एक राजकीय पक्ष आहे. माझ्या तारूण्यात  अपघाताने मला राजकारणात जावे लागले कारण तो काळ सन१९७५ सालच्या आणिबाणीचा होता. सात-आठ वर्षे भाजपाचे काम केले असल्यामूळे भाजपाला झूकते माप माझ्या लेखात मिळत असेल तर ते स्वाभाविक समजावे."

" महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट एका रात्रीत उठवून फडणवीस व अजित पवारांचा शपथविधी उरकला त्यावर मी टिका केली नाही. याचे कारण अशी कारस्थाने भाजपाच्या विरोधात प्रत्येक राज्यात  विरोधी पक्षांनी केलेली आहेत. त्याची परतफेड करणे उचीत नाही पण आपल्या राजकीय व्यवस्थेत उचीत व अनुचीत यातील सीमा संपली असल्याने राजकारणात ती सहज प्रवृत्ती मानली गेली आहे. राजकारणात नैतीकतेचा आग्रह फक्त भाजपाकडून घेतला जातो,  हे कुठल्या न्यायात बसते? आपल्या येथे अनेक पक्ष आहेत व अनेक चॅनेल व वृत्तपत्रे असतात. सार्यांच पक्षांची मिडीयाशी सलगी आहे .व सारे पक्ष भाजपा विरोधात आहेत त्यामूळे भाजपावर टिकेचा भडीमार अधिक असतो पण प्रत्यक्षात भाजपाने सर्वात मोठ्या पक्षांचे स्थान पटकाविले आहे ते मतदारांच्या पाठींब्यामूळे.  शेवटी लोकशाही राज्यप्रणाली मध्ये राजकीय पक्षाची विश्वासहर्ता जनाधाराने मोजली जाते ही बाब स्विकारावी लागते.  त्यामूळे ही भाजपावर माझ्याकडून कमी टिका होत असावी हे ही मी मान्य करतो. जगभरातील मिडीया मग प्रिन्ट असो वा इलेट्रानिक्स येनकेन प्रकाराने राजकीय घडामोडी आपआपल्या राजकीय विचासरणीचे वा आपल्या हितसंबंधाचे चष्मे डोळ्यावर लावूनच विश्लेषण करीत असतात. त्यात मी तर एक ब्लाॅगवर लिहीणारा सामान्य नागरिक. मी काही धर्मराज युधीष्ठर नाही. इतके समजून घ्यावे."

असो, काल महाराष्ट्रातील नवनिर्वाचीत आमदारांनी शपथ घेतली. आज नवीन सरकार अस्तित्वात आले. त्या सरकारला एकच सांगणे आहे की इतका काथ्याकूट करून सत्तेवर बसणार आहात, तर पाच वर्षे अत्यंत तिखट शद्बात भाजपा सरकारवर टिका करण्याची सवय जडली आहे ती आपण सोडावी व तसाच सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना देत राहा. शिवाजी पार्कवर शपथग्रहण केली आहे, तर १९७७ साली जनता पार्टीचा शपथविधी महात्मा गांधीच्या समाधीस्थळावर होऊन ही ते कोसळले. तसा कटू अनूभव महाराष्ट्राच्या वाट्याला न देता जनसामान्यांचा कैवार घेऊन पाच वर्षे स्थिर सरकार द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. नवीन सरकारला हार्दिक शुभेच्छा !
                        
                          वंदे मातरम् !

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

महाराष्ट्रातील सत्ता स्पर्धा -- भाजपाचा सर्जिकल स्ट्राईक



आताचा भाजपा हा वाजपेयी-अडवाणीचा नाही याची विरोधकांनी सतत आठवण ठेवावी असे मी मागील लेखात म्हटले होते. पण विरोधी पक्ष आपआपला सत्तेचा वाटा वाढविण्यात इतके गुंग झाले होते की राजकीय अस्थिरता, शेतकर्यांच्या समस्यांचे त्यांना भान राहीले नाही. नेमकी हीच वेळ साधून भाजपाने विरोधकांवर  सर्जिकल स्ट्राईक केला. हा सर्जिकल स्ट्राईक महाराष्ट्रावर होता असे उद्धव ठाकरे म्हणत असले तरी भाजपा-सेनेला मतदान केलेल्या सामान्यजनांना हा सर्जीकल स्ट्राईक विरोधी पक्षावर विशेषतः सेना व राष्ट्रवादी काॅग्रेसवर आहे असेच वाटत असावे. परवा सकाळी साडेआठ वाजता श्री  देवेंद्र फडणवीस आणि श्री अजित पवार ह्यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याची बातमी कळली, तेव्हाच अजित पवारांनी घरभेदी केली असावी असे मी ताडले आणि तसेच झाले असल्याचे रितसर टिव्हीवरून दिसले. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचे पाठबळ असताना पाकिस्तानवर दोनदा सर्जीकल स्ट्राईक करणार्या मोदी सरकारची नीती देशांतर्गत राजकारणात ठकास महाठक राहणार, हे गृहीत धरल्यामूळे  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांवर केलेल्या सर्जीकल स्ट्राईक संबंधी मला बिलकूल आश्चर्य वाटले नाही. फक्त इतक्या लौकर ते महाराष्ट्रातील भाजपा विरोधकांना असा धक्कातंत्र देतील असे वाटले नव्हते. 

शरद पवारांनी युतीतील शिवसेनला फूस भरून भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्याची चाल केली ती चाणक्यनीती मानायची पण मोदी सरकारने खेळलेली चाल ही लोकशाहीचा गळा घोटल्यासारखी आहे असा आकडतांडव का करावा ? तमाम भाजपा विरोधकांचा संताप समजण्यासारखा आहे. पण शिवसेनेने जनादेशाचा मान न राखता विधानसभेत हरलेल्या पक्षांच्या सहाय्याने सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले त्यातून भाजपा समर्थक व युतीला मतदान करणार्या सामान्यजंनाना संताप किती आला असेल असा विचार भाजपा विरोधकांनी लक्षात घेतला आहे का ?  विरोधी पक्षांची भूमिका व त्यांची राजकीय खेळी काय असावी याबाबतचा विचार बाजूला ठेवू पण सोशल मिडीयावर शिवसेना, राष्ट्रवादी काॅग्रेस व काॅग्रेस पक्षाच्या समर्थकांनी आपले सरकार स्थापन होत आहे असे दिसू लागताच आसूरी आनंद उपभोगलाच ना ! आनंद आणि आसूरी आनंद यात फरक असतो. तो लक्षात घेतला नाही की दुःखद बातमी आली की यातना भीषणच असतात. हा सृष्टीचा नियम आहे.  

प्रश्न नैतिकतेचा आहे , या बद्दल माझ्या मनात बिलकूल किंतू नाही. पण नैतिकतेचा प्रश्न महाविकास आघाडीला ही विचारला जावा असाच आहे की. आपल्या देशातील राजकारणाची पातळी घसरली ती इंदिरा गांधीच्या काळापासून हे आपण जाणत आहात त्यासंबंधीचा इतिहास मी एका लेखात मांडला आहे. म्हणून त्यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही. भ्रष्टाचारी अजित पवारांची सोबत भाजपाने कशी घेतली ? हा सर्वांच्या मनात घोळत असणारा प्रश्न असेल . पण या प्रश्नाचं उत्तर महाविकास आघाडी कडून प्रथम घ्यावयास हवे. परवा अजित पवार भाजपा सोबत गेले म्हणून भ्रष्टाचारी व महाआघाडीत होते तेव्हा ते स्वच्छ होते असे शिवसेनेने मानले ते योग्य कसे काय ठरते ? भाजपाने आपल्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी केला म्हणून या प्रश्नाचं भांडवल विरोधक वापरतील हे स्वाभाविक आहे. पण त्याच बरोबर 'आपल्या महाआघाडीत असे कितीतरी भ्रष्टाचारी नेते आहेत याकडे लक्ष द्या ' असे भाजपाकडून उत्तर आले की ते ही तितकेच स्वाभाविक मानावयास हवे. घराणेशाहीच्या पक्षांतील भाऊबंदकी हेच तसे पाहता सर्वात महत्वाचे  कारण महाराष्ट्रातील सध्याच्या सत्ता पेचप्रसंगात दडलेले आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद पटकावून राज ठाकरे यांनी केलेल्या बंडाचा धडा शिकविण्याची घाई झाली आहे. तर दुसरीकडे पवार घराण्यात अजित पवारांना सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना आहे.  शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले हे केवळ सत्तेसाठी असे मानता येत नाही. कारण तेव्हा शिवसेना सत्तेच्या जवळपास ही नव्हती. बाळासाहेबांच्या वार्धक्यात मातोश्रीमध्ये राज ठाकरेंना राजकीय निर्णय-प्रक्रीयेत जाणून-बूजून दूर ठेवले जात होते. अजित पवारांना तसाच अनुभव राष्ट्रवादी काॅग्रेस मध्ये येत राहीला आहे. त्यामूळे अजित पवारांनी बंड केले. ठाकरे घराणे व पवार घराणे फुटल्याचे अनेकांना अतीव दुःख झाले असावे पण त्यावर इलाज काही नाही. शेवटी आपली लोकशाही घराणेशाहीच्या विळख्यातून सुटत नाही तो पर्यंत राजकीय मंचावर होणार्या अशा घरभेदीच्या घटनेने आपल्याला होणारे दुःख आपणच पचवायाचे  हाच पहीला व शेवटचा उपाय आहे.

बाकी लोकशाहीचा गळा घोटला, छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, रात्रीचा खेळ चाले इत्यादी वाक्यें उद्धव ठाकरे , शरद पवार व अहमद पटेल यांच्या सारख्या घराणेशाही पक्षांच्या नेत्यांच्या मुखी शोभत नाहीत. बिहार मधील  सत्तेसंबंधीतला तिढ्याच्या वेळी रात्री-अपरात्री प्रशासन चालविले गेल्याचे उदाहरण आपल्या समोर आहे. आतंकवाद्यासाठी रात्री कोणी न्यायालय उघडले?, अफझल गुरूला फाशी दिवसा दिली असती तर काय बिघडत होते? १९७५ साली इंदिरा गांधीच्या सरकारने मध्यरात्री आणिबाणीची घोषणा करून राष्ट्रपतीची वटहुकूमावर सही सकाळी घेतली होती, इत्यादी प्रकरणे आज यु ट्युबवरून समाज पाहत आहे. म्हणून कालच्या राजकीय भूकंपावरच अधिक चर्चा करणे उचीत आहे.

कालच्या राजकीय भूकंपाची घटना लोकशाहीला पुरक की मारक यावर चर्चा करताना,  युती म्हणून मतदारासमोर जाऊन मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी आणि काॅग्रेस सारख्या हरलेल्या पक्षांशी शिवसेनेने केलेली आघाडी ही लोकशाही मूल्यांशी पुर्णपणे विसंगत आहे याबाबत दूमत नसावे. शिवसेनेने केलेल्या गद्दारीवर काहीही भाष्य न करता  सत्ता स्थापनेत आपण असमर्थ आहोत असे नम्रपणे राज्यपालांना कळवून त्यानंतर भाजपाचे नेते, आमदार व कार्यकर्त्यांनी पाळलेला संयम निश्चीतच कौतुकास पात्र आहे. सत्तेच्या प्रलोभनाला भीक न घालता निवडून आलेल्या भाजपा आमदारांनी आपल्या पक्षाच्या निर्णयावर दाखविलेली निष्ठा यातून भाजपामध्ये इतर पक्षापेक्षा अनुशासनता उच्च श्रेणीची आहे हे सिध्द होते. भाजपाकडे सरकार म्हणून विकासाचे मुद्दे होते. सरकार म्हणून सुरू केलेले प्रकल्प व कल्याणकारी योजना होत्या. शिवाय  मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होता. 

दुसरीकडे महाविकासाचे स्वरूप कसे असणार,  किमान समान कार्यक्रम कसा असेल,  शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार की राष्ट्रवादी पक्षाचा, काॅग्रेस बाहेरून पाठींबा देणार  कि सत्तेत सहभागी होणार, काॅग्रेसच्या अटी काय आहेत इत्यादी प्रश्नाभोवतीचं मिडीयातील चर्चेचं गुर्हाळ मतदारांना, पिडीत शेतकर्यांना भावले आहे,  सरकार स्थापन करण्यासाठी आपण अजून हवा तितका वेळ घ्या अशी जनभावना झाली आहे, आणि भाजपाला दणका द्यावा अशी जणू काही ही श्रींची इच्छा आहे अशा थाटात  विरोधी पक्ष वावरत राहीले. त्यामूळेच  सत्तेच्या खेळात विरोधकांवर विशेषतः शिवसेना व राष्ट्रवादी काॅग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची संधी व धमक भाजपाला मिळाली. आता पर्यंत चाललेल्या सत्तेच्या सामन्यात विरोधकांनी भाजपा वर मात केलेली दिसत होती पण कालच्या सर्जिकल स्ट्राईकामूळे विरोधकांची मानसिक शक्ती क्षीण करण्यात भाजपाने यश मिळविले आहे असे दिसते. शेवटी कुठल्याही युध्दात मानसिक शक्तीच कामी येते.

राहता राहीला प्रश्न काॅग्रेसचा. काॅग्रेस पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष असल्यामूळे त्या पक्षाला शिवसेनेला पाठींबा देण्यासाठी वेळ लागणार होताच. पण काॅग्रेसने केलेली दिरंगाईच अजित पवारांनी निमित्त मानले व  काका मला वाचवा, असे उद्गार न काढता काका मी तुम्हालाच सोडतो असे म्हणून शरद पवारांना खच्ची करून टाकले. इतका मोठा राजकीय भूकंप अजित पवारांनी एकट्याने घेतला नसावा, कदाचित हे कारस्थान शरद पवारांनी रचलेले असावे, असा काही राजकीय अभ्यासकांचा होरा आहे.यावरून शरद पवारांची विश्वासहर्ता किती ठिसूळ आहे हे स्पष्ट होते. शरद पवार व उध्दव ठाकरेंनी निवडणूकीच्या अगोदरच सत्ता स्थापन करून भाजपाला दणका द्यावा असे ठरविले होते हे काॅग्रेस हायकमांडने जाणलेले असावे. निवडणूकीत सेना व राष्ट्रवादी काॅग्रेसला चांगले यश मिळून दोन्ही पक्षांच्या आमदारांची संख्या बहूमत मिळण्याइतकी असती तर शरद पवारांनी काॅग्रेसला ही मोडीत काढले असते हे न समजण्याइतकी काॅग्रेस श्रेष्ठीच्या राजकीय जाण ची दिवाळखोरी झालेली नाही. म्हणून काॅग्रेसने महाआघाडीत आपले हात का पोळून घ्यावे अशी दक्षता पाळत पाठींबा देण्यासाठी दिरंगाई केली. शिवाय परवाच्या  शरद पवार -उध्दव ठाकरेंच्या संयुक्त पत्रकर परिषदे पासून काॅग्रेस दूर राहीली असावी. तथापी  काॅग्रेसने शिवसेने सोबत जाण्याचा निर्णय घेतला हे ही नैतिकतेशी फारकत घेण्यासारखेच आहे की. काॅग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षात महाआघाडी संबंधी असंतोष आहे, तो फक्त सध्या दिसत नाही इतकेच. वेळ येईल तेव्हा तो दिसेल. कारण राजकारण हे असेच असते. पण त्यासाठी फक्त भाजपाला दोष देऊ नका अशी माफक अपेक्षा जनसामान्यांची आहे हे सत्य पुरोगामी संपादक व विचारवंतानी लक्षात ठेवावे असे मला वाटते.

आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आहे. आज निकाल भाजपाच्या बाजूने आला नाही आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी बेकायदेशीर ठरविला गेला तरी महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामूळे दोन्ही पक्षकारांची शक्ती वा दाव्यांची परीक्षा विधिमंडळाच्या पटलावर होईल. तो पर्यंत भाजपा व महाविकास आघाडी मधील व्टिटर, खोटे विडीओ, अफवा इत्यादी साधनाद्वारें सुरू झालेली लढाई बघत बसू या.

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

महाराष्ट्रातील सत्तेचा तिढा - शेवट व उपाय



शेवटी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली आणि महाराष्ट्रातील सत्तेचा तिढा या नाटकाचा तिसरा अंक संपला व नाटकाचा प्रयोग ही संपला. सार्या राजकीय पक्षांची सत्ता स्थापण्याची धावपळ थांबली, पण सत्ता स्पर्धा संपली असे नाही. कारण राजकीय मंचावरील नाटकाचं कथानक सत्तेची स्पर्धा या विषयाभोवती धिंगाणा घालत असते. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार व काँग्रेसचे थोरात, अहमद पटेल इत्यादींनी राष्ट्रपतीच्या निर्णयावर उपहासत्मक टिका केली असली तरी सत्तेचं गणित जमवून आणण्यासाठी जो वेळ लागणार होता तो प्रत्यक्षात मिळाल्यामूळे उलट ही मंडळी मनातल्या मनात समाधान व्यक्त करीत असतील. तसे पाहता सोनिया गांधी व शरद पवार ह्यांना सरकार स्थापण्याची घाई नव्हतीच. सत्तेची आयती संधी मिळत असलेली पाहून दोन्ही काँग्रेसचे शिर्षस्थ नेते आपआपली बार्गेनिक पाॅवर अजमाविण्यासाठी वेळ घेणारच होते. बरं त्यात गोम अशी आहे की आपण जाणून-बूजून वेळ काढतोय त्याचा पुरावा ना राज्यपाल महोदय मागणार ना मिडीया मागणार. त्यामूळे अजित पवारांनी मी बारामतीला जातोय असे म्हणून मिडीयाची चेष्टा उडविली. सत्तेचा माज कोणाला आहे ते मिडीयाला कळले ते एका परीने बरे झाले. सत्ता काबीज करण्यासाठी जो पुरावा लागणार होता तो उद्धव ठाकरेंकडे नव्हताच. तीन दिवसात संख्याबळाचे पत्र देता येणार नव्हते ही वस्तुस्थिती लपवून ठेवली. पण तीन दिवस उद्धव ठाकरेंनी मागायचे, तीन दिवस राष्ट्रवादीने मागायचे, म्हणजे राष्ट्रपती राजवट येईलच.  मोदी सरकारने आम्हाला कमी दिवस दिले अशी टिका करून महाराष्ट्रातील मतदारांच्या रोषापासून आपली सुटका करून घेणे शक्य होईल, यासाठी विरोधकांनी रचलेले ते ढोंग होते.  हे ढोंग समजू नये म्हणून उध्दव ठाकरेंना राष्ट्रपतींवर टिका करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावयाचा सल्ला ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने दिला असावा. आता त्या याचिकेची सुनावणी लौकर व्हावी यासाठीचा आग्रह उध्दव ठाकरेंनी सोडला आहे. शेवटी सत्तेसाठीचा तमाशा किती ही वेळ चालू राहीला तरी राजकीय पक्षांना त्याची चिंता नसते. हीच सत्तेचा तिढा ह्या नाटकाची  एका वाक्यात करता येणारी समीक्षा होय.

आता  ' कोण बाजी मारणार ' या शिर्षकाचं नाटक प्रिन्ट, ईलेट्रानिक्स व सोशल मिडीयावर सुरू झालेलं दिसेल.  सारे राजकीय पक्ष शेतकर्यांकडे जाताना दिसतील; शेतकर्यांना कर्जमाफीची घोषणा करतील; आम्ही स्थिर सरकार देऊ अशी हमी देतील; आपआपसात सत्ता वाटपाचा फाॅर्मूला तयार होईपर्यंत जितकी जनतेला आश्वासनं देता येतील तितकी देत राहतील. राज्यात पुन्हा निवडणूकीचं वातावरण थोडक्या प्रमाणात का असेना ते पण दिसू लागेल. राष्ट्रपती राजवटीच्या वतीने सुरू झालेला महाराष्ट्राचा राज्यकारभार अप्रत्यक्षात भाजपाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे चालला जाणार यात ही काही संदेह नाही. हे सारं घडत असतांना  शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षामधील सत्तेच्या वाटपातील सामंजस्य करारासाठी वेळ लागला तरी ही मंडळी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहात आहोत असे सोयीचे उत्तर देत राहतील. आपण मतदार हे नाटक आपल्याला आवडो वा ना आवडो पण अत्यंत चवीने चघळत राहणार आहोत. कारण आपल्याला ती सवय जडली आहे. म्हणून जाता जाता सत्तेचा तिढा या नाटकाच्या तिसर्या अंकाचा व नाटकाच्या शेवटाचे थोडक्यात मला जे आकलन झाले आहे त्याचे सार व सोबत महाराष्ट्रातील निर्माण झालेल्या पेचप्रसंगाची घटना देशातील स्वातंत्र्यानंतरची पहीली घटना असल्यामूळे त्यावरच्या उपायासंबंधी मला जे वाटते ते सांगून या लेखाची समाप्ती करतो.

                  १) सत्तेचा तिढासंबंधीचे सार

वस्तुतः राष्ट्रपती राजवटी च्या निषेषार्थ  शिवसेनेने न्यायालयात याचिका दाखल करण्याची तशी गरज नव्हती.  न्यायालयात याचिका दाखल न करता तिन्ही पक्ष आपआपसातील सत्तेच्या  वाटपाचं गणित सोडविल्यावर सत्तेचा दावा राज्यपाल महोदयाकडे पेश करू शकले असतेच. पण ते गणित जुळून येण्यासाठी वेळ लागणार हे गृहीत धरूनच हे नाटक रचले गेले होते.  या तिन्ही पक्षांची सत्ता स्थापन करण्याची कवायत सुरू झालेली असली तरी तिघांची मुदतपूर्व निवडणूकीसाठी तयारी ही जोडीला असणारच. कारण तिन्ही पक्षांना परस्पर विश्वास वाटतोच असे नाही. अगदी नवीन आघाडी जी आकारात येत आहे तिचे सरकार पाच वर्षासाठी टिकले तरी,  पुढील निवडणूकीसाठी त्यांना तिकीट वाटपातील जागा संबंधीचा तिढ्याला सामोरे जावे लागेल. पुन्हा मुख्यमंत्रीपद कोणाकडे ठेवावयाचे हे ही अगोदर ठरले जाईल. पण तरीही पुन्हा निवडणूकीनंतर असे नाटक राजकीय रंगमंचावर सुरू होणार नाही अशी शाश्वती हे तिन्ही पक्ष देऊ शकतात का?  भाजपा ही आपल्या हाती असलेल्या केंद्रातील सत्तेचा उपयोग महाराष्ट्रात आपल्या राजकीय खेळीसाठी वापरणार आहेच. हे जाणून भाजपाचे नेते चंद्रकात पाटील ह्यांनी शिवसेनेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबद्दल उध्दव ठाकरेंना नाराज होण्याचे कारण नव्हते. कारण उद्धव ठाकरेंना भाजपाने फसविले आहे, यावर विश्वास ठेवण्या इतका पुरावा दिसलाच नाही. हे सत्य  भाजपाचे अध्यक्ष अमित शहांच्या कालच्या मुलाखतीतून स्पष्ट झाले. अमित शहांच्या मुलाखतीवर विश्वास ठेवता येत नसेल तरी महाराष्ट्रातील निदान तीन-चार प्रचार सभेत जाहीर रित्या मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस पून्हा विराजमान होतील अशी घोषणा पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी प्रचारात वारंवार केली होती. मतदारांनी तसे ऐकले व वाचले ही आहे. त्यामूळे राजकारणात सब घोडे बारा टक्के असे मानताना कूणी तरी कूणासाठी नायक ठरत असतो अथवा खलनायक. महाराष्ट्रातील सत्तेचा तिढा या नाटकातील उद्धव ठाकरेंनीच साकारलेली भुमिका तुर्तास तरी नायक   (शिवसेनेच्या समर्थकांना भावेल अशी) व सध्यातरी भाजपा साठी खलनायकाची आहे असे स्पष्ट दिसते. सध्यातरी हा शब्द वापरला यासाठी की काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेसपैकी एकाचे सूत जमले नाही तर शिवसेनेचे जे मुख्यमंत्री असतील ते विधानसभा बरखास्त करतील. अशावेळी ज्यांना मध्याविधी निवडणूका नको आहेत त्या आमदारांसाठी व पक्षांसाठी ते खलनायक ठरणारण्याची शक्यता आहेच. शेवटी राजकारणात काहीही होऊ शकते हे सामान्यातला सामान्य मतदार ही जाणतो.

           २) जनादेशाच्या पालनासंबधींचा उपाय

आताचा महाराष्ट्रातील जो  सत्तेचा पेचप्रसंग आपण अनुभवत आहोत असा पेचप्रसंग देशात अजून निर्माण झालेला नाही. यावरचा उपाय लोकप्रतिनिधी कायद्याच्या (पक्षांतराचा कायदा) कक्षेत येत नसावा कारण नवनिर्वाचीत उमेदवारांची आमदार म्हणून शपथविधीचा कार्यक्रम झालेला नाही. पुन्हा असे घडू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकारात वाढ करून निवडणूकपुर्व युती वा आघाडीतील पक्ष जनादेशाचा अनादर करतील त्या पक्षांच्या सर्व नवनिर्वाचित उमेदवाराची निवड अपात्र ठरवून त्यांना फेरनिवडणुकीतून निवडून येणे कमप्राप्त व्हावे. असा कायदा अस्तित्वात आला की निवडणूकपुर्व युती वा आघाडीचा तपशील लेखी स्वरूपात आचारसंहीता लागू होण्याअगोदर निवडणूक आयोगाकडे सुपूर्त करण्याची अट घातली जाईल. म्हणजे जनादेशाचा अनादार करण्याच्या प्रवृत्तीला वा विकृतीला आळा घातला जाईल असे मला वाटते.

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९

महाराष्ट्रातील सत्तेचा तिढा - भाग ३ शिवसेनेची कोंडी



सत्तेचा तिढा या नाटकासाठी काल सकाळ पासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेसच्या कलाकारांनी भरपूर तालीम करून आपआपल्या स्क्रिप्ट ही तयार केल्या होत्या. जवळपास शिवसेना-राष्ट्रवादी काॅग्रेसचे सरकार सत्तेवर येणार अशी बातमी संध्याकाळी सात वाजता झळकावयास सुरूवात झाली होती. शिवसेनेचे नेते राज्यपाल महोदयकडे लौकरच पोहचले होते. राजभवनाकडे सार्या मराठी जनतेचे लक्ष लागले होते. राजभवनावर पत्रकारांची गर्दी झाली होती. बहूतांश संपादक महाशयांनी भाजपाची खोड मोडली या अर्थाचे अग्रलेख तयारही केले असावेत. तेवढ्यात शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई सोबत राजभवनातून बाहेर पडले. पत्रकारांची उत्सूकता वाढली. पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेने सांगितले की आम्ही राज्यपाल महोदयाकडे (फक्त) सत्ता स्थापनेचा दावा मांडला आहे. तसेच संख्याबळाची यादी व पत्रे देण्यासाठी दोन दिवसाचा वेळ मागितला आहे. राज्यपाल महोदयाने शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास नकार दिला आहे. त्यामूळे सत्तेचा तिढा या नाटकातला दुसरा अंक लौकर संपला. काल संध्याकांळी साडे सातला सत्तेचा तिढा या नाट्या चा तिसरा अंक सुरू झाला असेच समजून घेऊ या आणि आपली चर्चा पुढे रेटू या.

शिवसेनेकडे  राष्ट्रवादी काॅग्रेस व काॅग्रेस पक्षांकडून पाठींब्याचे पत्र आलेले नव्हते. राज्यपाल महोदयांना भेटून आल्यानंतर शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंनी काय झाले हे सांगताना बाजूला बसलेल्या सुभाष देसाईंच्या चेहर्यावर नाराजी दिसत होती. मागील अनेक लेखात मी वेळोवेळी मांडले आहे की उतावळेपणा शिवसेनेचा सर्वात मोठा दोष आहे,  तोच या नाट्यात नडलेला दिसतो आहे. उतावळेपणा एक वेळ क्षम्य ठरतो पण उथळ आणि उद्धठ स्वभावाचे दर्शन झाले की सर्वनाश होतो. उथळ आणि उद्धठ अशी शिवसेनेची प्रतिमा जी होत आहे त्याला फक्त संजय राऊत जबाबदार नसून खतरूड मनाचे उद्धव ठाकरें ही जबाबदार आहेत.  मालाड मढ येथील रिसाॅर्टवर असलेल्या आमदारांनी आवाज कोणाचा शिवसेनेचा   अशी गर्जना करीत संध्याकाळपासून सुरू केलेला जल्लोष अचानक थांबावा लागला. कारण आपलं सरकार स्थापन होत नाही ही दुःखद बातमी त्यांच्यापर्यंत पोहचली. पाठोपाठ संजय राऊत यांना लिलावती हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले ही बातमी ही थडकली. झी मराठी न्युज चॅनेलच्या ॲन्करने काॅग्रेसचे पाठींब्याचे पत्र आले नाही त्यामूळे त्यांचा तणाव वाढला असावा अशी पुस्ती जोडून शरद पवार  24×7 राजकारणी आहेत ते या वयातही कसे संयमी दिसतात हे नमूद करून संजय राऊतचा उतावेळपणा एक्सपोज केला. झी टीवीच्या ॲन्करने तसे करावयास नको होते पण बोलणार्यांचे तोंड कसे बंद करता येणार ? ते म्हणतील आम्ही संजय राऊतना सल्ला दिला असे म्हटले की त्यावरील चर्चा संपते. या ठिकाणी माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारींचे एक वाक्य आठवले. अटलबिहारीजी म्हणाले आहेत, बोलनेके लिए सिर्फ वाणीकी जरूरत होती है लेकीन मुहँसे अच्छे ढंगसे बात करनेके लिये वाणीके साथ विवेक की जरूरत होती है | वाजपेजींचा सल्ला सर्वांसाठी मोलाचा आहे. असो,  संजय राऊतांच्या तब्येतीत सुधारणा झाली ही चांगली  बातमी रात्री उशीरा आली. ते लौकर बरे होवोत अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून महाराष्ट्रातील महानाट्यात पुढे काय होणार यावर चर्चा करू या.

पुढे काय होणार यावर चर्चा करण्याअगोदर एक गोष्ट स्पष्ट दिसली आहे ती म्हणजे घराणेशाही पक्षांच्या टोळीत आज ही नेहरू-गांधी घराणेच शक्तीमान आहे. पवार व ठाकरे घराण्याचा मराठी बाणा दिल्लीतील काॅग्रेस नेत्यांसमोर नुसता वाकलाच नाही तर मोडून पडला आहे. शिवसेनेचं हिंदुत्व ही संपले व मराठी बाणा ही मोडला गेला आहे. त्यावर कितीही डागगुजी झाली तरी त्यात सुधारणा होण्यासाठी बराच अवकाश लागेल. शरद पवारांची ताकद ही कमी पडली असावी त्यामूळे काॅग्रेसचा पाठींबा मिळण्यात उशीर झाला असावा. शरद पवारांची ताकद दिल्लीपुढे कधीच दिसलेली नाही. फक्त त्यांच्या आश्रयाले असलेले साहित्यिक, संपादक मंडळींनी निर्माण केलेल्या ताकदीची ती सूज आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे.  मागील लेखात मी म्हटले आहे की काॅग्रेस इतक्या सहजा सहजी शिवसेनेला पाठींबा देणार नाहीत. भले काॅग्रेसचे महाराष्ट्रातील नेते व आमदार सत्तेत सामील वा सेनेला बाहेरून पाठींबा देण्यासाठी तयार असले तरी आपली शक्ती दाखविण्याची आयती आलेली संधी गांधी घराणे सोडणार नव्हतेच. पण उतावळीचा दुर्धर रोग झालेल्या शिवसेनेला कळत नाही त्यास भाजपाला दोष देण्यात काय अर्थ आहे ? 

रात्री उशीरा आलेली बातमी अशी आहे की राज्यपाल महोदयांनी राष्ट्रवादी काॅग्रेसला सत्ता स्थापण्यासाठी आमंत्रण दिले आणि तदनुसार अजित पवार राज्यपालांना भेटून आले.  त्यांना ही एक दिवसाचा वेळ मिळाला असल्याचे दिसते. कदाचित राष्ट्रवादी काॅग्रेसच्या सरकारला पाठींबा देण्याचा विचार काॅग्रेसने केला असावा. परंतु ही शक्यता आहे. कारण दिल्लीतील हायकमांडच्या दरबारात शरद पवाराचे नाही, जे चालते ते पृथ्वीराज चव्हाणांचे असणार. शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण सरकारसंबंधी जी हिणकस लकव्याची भाषा केली होती त्याचे उट्टे काढण्याची संधी काॅग्रेसच्या हायकमांडने सोडली नसावी. दुसरे असे की शरद पवार हे आता पश्चीम महाराष्ट्रातील काही भागाचे नेते राहीले आहेत, त्यांना शिवसेनेसोबत सोयरीक करणे परवडते नव्हे तशी शरद पवारांची गरज ठरली आहे. काॅग्रेस तसे पाहता आजही राष्ट्रीय पक्ष मानला तर जातोच ना ! त्यामूळे हिंदुत्ववादी पक्षाला सरकार स्थापन करण्यास मदत करणे काॅग्रेसला झेपणारे नाही. इथेच उध्दव ठाकरेंची भली मोठी चूक झाली आहे. भाजपाच्या कोअर बैठकीतून आलेले सुधीर मुनगंटीवारांनी आम्ही Wait and Watch च्या भूमीकेत आहोत असे पत्रकारांना सांगितले. त्यातून भाजपा ऑऊट ऑफ रेस झालेला नाही हेच दिसते. मध्यंतरी काॅग्रेसचे अहमद पटेलांनी भाजपाचे नेते नितीन गडकरींची भेट घेतली होती. त्याबबत माध्यमांनी चर्चा केली नाही. असे असले तरी एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे की राष्ट्रीय स्तरावरील भाजपा व काॅग्रेस आपआपली शक्ती वापरून शिवसेना व राष्ट्रवादी काॅग्रेसला जितंक वाकवता येईल तितकं वाकविण्याचा प्रयत्न करून मध्यावधी निवडणूकीला स्वतंत्र रित्या सामोरे जाण्याची तयारी करीत असावेत. 

आता माध्यमात  चर्चा होत आहे की भाजपाला सरकार स्थापण्यासाठी अधिक अवधी दिला. या आरोपात फारसे तथ्य नाही. निकाल लागल्यानंतर आमचा मुख्यमंत्री होणार असा घोषा  शिवसेनेचा होता. म्हणजे शिवसेनेने शरद पवारासमवेत  आधीच या नाट्याची तालीम करून घेतली असावी, अशी समजूत जनसामान्यांची झाली होती. तसाच अर्थ राज्यपाल महोदयांनी गृहीत धरला असावा. बिचारे शिवसेनेचे व राष्ट्रवादी काॅग्रेसचे समर्थक जल्लोषातच वावरत राहीले. त्यांची फार मोठी निराशा झाली. राज्यपालांच्या भुमिकेबद्दल विरोधी पक्षांनी किती आक्रोश केला तरी त्याचा राज्यपालांना मिळालेल्या  घटनात्मक अधिकारांवर परीणाम होईल असे  वाटत नाही. तसा आक्रोश भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये तीन वेळा करावा लागला आहे. भारतीय राजकारणात राज्यपालांच्या भूमिके संबंधी जी सांशकता निर्माण होते त्याला मतदार म्हणून आपण जो अधांतरीत कौल देतो तो ही तितकाच जबाबदार आहे. आपली लोकशाही बहूपक्षीय असल्यामूळे असे घडते असे मानून सत्तेचा तिढा हे नाटक पाहात बसणे या पलीकडे आपण काही करू शकत नाही. जाता जाता एक आठवण विरोधकांना करून द्यावीसी वाटते ती ही की काही राजकीय चाली करण्याअगोदर आताचा भाजपा हा वाजपेयी-अडवाणीचा नाही हे पक्के ध्यानात ठेवले तर बरें. निदान आपल्या बावळटपणाचे प्रदर्शन होण्याचे तरी टळेल.

रविवार, १० नोव्हेंबर, २०१९

महाराष्ट्रातील सत्तेचा तिढा व संभाव्य अस्थिरता (भाग २)



विधानसभेचा कार्यकाल संपला आणि तांत्रीक दृष्ट्या श्री देवेंद्र फडणवीसांनी परवा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, आणि लागलीच पत्रकार परिषद घेऊन सत्तेचा तिढा या नाटकाच्या दुसर्या अंकात रंगभूमीवर एन्ट्री घेतली. श्री देवेंद्र फडणविसांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिलेलं नव्हते हे प्रथम स्पष्ट केले. शिवसेना मोदींवर टिका करते, मग सत्ता हवी कशाला असे सूचक विधान केले. शेवटी युती अस्तीत्वात आहे असे ही म्हटले.  त्यानंतर श्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद  घेऊन भाजपा व फडणवीस खोटे बोलत आहेत, आम्ही ठाकरे घराणे खोटे बोलत नाही, असे म्हणत एक दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर शिवसेनेचा माणूस बसवेन असे वचन स्वर्गीय बाळासाहेबांना दिल्याचा त्यांनी उल्लेख केला. बाकी हिंदुत्व म्हणजे सत्य, राम मंदिर हा न्यायालयाचा निर्णय आहे,  राम मंदिर हा प्रश्न कुठल्या पार्टीला श्रेय घेण्याचा नाही इत्यादी संबंधीचे उद्धव ठाकरेंची वक्तव्यें स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या  थेअरीला छेद देत आहेत कि बाळासाहेबांच्या थेअरीला अनुसरून आहेत हा विषय शिवसेना पक्षांचा अंतर्गत आहे. त्याचा महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेशी काही संबंध नाही. तसेच उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर भाजपाने रामजन्मभूमी साठी उत्तर प्रदेशची सत्ता पणाला लावली होती, असे भाजपा नेते श्री सुधीर मनगुंटीवारानी दिलेल्या प्रत्युत्तरावर इथे चर्चा करण्याची गरज नाही. कारण मंदिर वही बनायेंगे हा विषय भाजपाच्या एजंडावर होता आणि त्यासंबंधी निवडणूक आयोगाने कधी आक्षेप घेतलेला नाही.  परवा एका बाजूला फडणवीस व उद्धव ठाकरेंच्या मुलाखती झाल्या तर दुसर्या बाजूला शिवसेना सकट विरोधी पक्षांची पुढील अंकाच्या तालीम साठी शरद पवारांच्या घरी बैठक झाली. त्या तालीमीचे  स्वरूप काय व कसे असेल, हे सध्या गुलदस्त्यात आहे .

युतीतील दोन्ही शिर्षस्थ नेत्यांच्या परवाच्या पत्रकार परिषदेतून सत्तेचा तिढा हा फक्त मुख्यमंत्रीपदासाठी आहे हे स्पष्ट झाले आहे. मागील लेखात मी म्हटले होते की, भाजपा महाराष्ट्रातील सत्तेवर पाणी सोडण्याचा जुगार खेळू शकते. त्यासाठी भाजपाकडे जे तीन मार्ग आहेत, ते ही तिथे दिले आहेत. श्री देवेंद्र फडणवीसांनी सत्ता हवी कशाला असे जे म्हटले आहे ते फार महत्वाचे आहे. त्यातून दोन अर्थ प्रतीत होत आहेत. पहिला अर्थ असा आहे की शिवसेना महायुतीच्या सत्तेत राहून मोदीवर टिका करणार असेल तर शिवसेनेने विरोधात बसावे. दुसरा अर्थ असा आहे की आतापर्यंत सत्तेत राहून शिवसेनेने मोदीवर केलेली टिका भाजपाने सहन केली, पण आता पुढे सहन करणार नाही,  त्यासाठी भाजपा सत्तेवर पाणी सोडावयास तयार आहे. कालच्या पत्रकार परिषदेत श्री फडणवीसांचा आत्मविश्वास उठून दिसला, तर दुसरीकडे श्री उद्धव ठाकरेंना केविलवाण्या स्वरात बाळासाहेबांच्या स्वप्नाचा आडोसा घ्यावा लागला. २०१४ पासूनच्या भाजपा-सेनामधील कलगीतुरा संबंधीच्या अनेक लेखात मी म्हटले आहे की आताचा भाजपा वाजपेयी- अडवाणींचा नाही. तसेच उद्धव ठाकरे  बाळासाहेब होऊ शकणार नाहीत, हे ही मी म्हटलेले आहे. पण सारे विरोधी पक्ष भाजपा वाजपेयी-अडवाणीचा नाही इतकेच सत्य स्विकारीत आहेत. ते ही २०१४ च्या लोकसभेच्या निवडणूकीतील दारूण पराभव झाल्यापासून, कारण त्यांना सोयीचे म्हणून. वाजपेयीचे सरकार एक मताने पाडणार्यांनी राजकारणातील शुचीतेचे ढोंग घेऊ नये. आपण स्वतः यंशवतराव चव्हाण नाहीत, आपण बॅरिस्टर नाथ पै नाहीत, आपण डाॅ राम मनोहर लोहिया नाहीत, आपण इंदिरा गांधी नाहीत, हे सत्य स्विकारून आपल्यात बदल करू इच्छीत नाहीत, अशी ही विरोधी पक्षांची नेतेमंडळी. स्वर्गीय बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेच्या मर्यादा स्पष्ट होत गेल्या आहेत. श्री उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांनी शिवसेनेचा कार्याध्यक्ष केल्यापासून शिवसेनेचा  कारभार कशा रीतीने होऊ लागला ह्या बाबतची माहिती जनतेपर्यंत तर सोडाच पण शिवसेनेच्या नेत्यांपर्यंत आलेली नाही.  या संदर्भात निखील वागळेंच्या मॅक्स महाराष्ट्र व आवाज मराठीचा यांना दिलेल्या मुलाखतीच्या विडीओतील दोन वाक्ये फारच बोलकी आहेत. निखिल वागळे म्हणतात, " उद्धव ठाकरेंना बाळासाहेब कळलेच नाही. बाळासाहेब दिलदार होते."  निखिल वागळे ह्यांचे उद्धव ठाकरे संबंधीचे दुसरे वाक्य " उद्धव ठाकरे हा खुतरूड मनाचा माणूस आहे."  निखिल वागळे, भाजपाचे मित्र नाहीत उलट भाजपाचे कट्टर शत्रू आहेत. २०१४ सालच्या विधानसभा निवडणूकीतल्या प्रचार काळात भाजपा- सेनेतील कलगीतुर्यावर निखिल वागळेंनी लोकमत चॅनलवरून शिवसेनेलाच पाठींबा दिलेला आपण पाहीला आहे. २०१४ला शिवसेना एकाकी नव्हती. भाजपा एकाकी होता. शिवसेना, राष्ट्रवादी, काॅग्रेस, मनसे इत्यादी सारे पक्ष मोदी-शहावर सडकून टिका करीत होते आणि सर्व मराठी चॅनेल्स, व वृत्तपत्रे मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना पंसती मिळत आहे असे चित्र  रंगवित प्रसारीत करीत होते. इतके करूनही शिवसेना ६३ वर अडकली. शरद पवारांनी निवडणूकीचा पुर्ण निकाल यावयाच्या अगोदर भाजपाला बिनशर्त पाठींबा दिला होता. तरीही शिवसेनेला सत्तेत भागिदारी देऊन भाजपाने सरकार बनविले. शरद पवाराने न मागता दिलेल्या पाठींब्यावर भाजपाने चलाखीने पाच वर्ष मौन पाळत शरद पवारांची विश्वासअर्हता हळूहळू कमी करीत ठेवली. शरद पवारांना आताच्या निवडणूकीत अपेक्षित यश न मिळण्यापैकी हे ही एक कारण होते. आता ह्याच पवारांच्या साथीने शिवसेना सरकार स्थापन करू इच्छीत आहे. शिखर बँकेतील घोटाळ्याची टांगती तलवार जी राष्ट्रवादी व काॅग्रेसच्या नेत्यांवर आहे त्यापासून सुटका करून बाळासाहेबांचे स्वप्न श्री उद्धव ठाकरे पुर्ण करणार असतील तर त्यांना आपण अडविणारे कोण?

परवा पासून सुरू झालेल्या दुसर्या अंकात श्री देवेद्र  फडणवीसांनी बाजी मारली की श्री उद्धव ठाकरेंनी,  याबाबतचे विश्लेषण  राजकीय अभ्यासक, व मिडीया आपआपल्या सोयीने करू लागले आहे  तेच आपण  टिव्हीवर पाहात आहोत. परवा शरद पवारांनी कर्नाटक मध्ये भाजपाने सरकार स्थापन कसे केले ह्याचा  उल्लेख केला. पण कर्नाटकात हरलेल्या काॅग्रेस व जेडीएसने कशी सत्ता काबीज केली होती ह्याचा उल्लेख ते करीत नाहीत. तशाच पद्धतीने  शिवसेना  शरद पवार व काॅग्रेस या पराभूत झालेल्या पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे दिसते. तरीही एकंदरीत  'सत्तेचा तिढा ' मधील दुसर्या अंकातील पहील्या भागात भाजपा नेते आक्रमक रित्या व आत्मविश्वासाने मिडीयाला सामोरे जाताना दिसले. आणि त्यांनी अलगद चेंडू उद्धव ठाकरे कडे पास ऑन केला आणि आम्ही दुसरे पर्याय पाहू असे वाक्य त्यांच्याकडूनच जाहीर रित्या वदवून घेतले. आता यात कोणा पत्रकाराला वा राजकीय अभ्यासकाला उद्धव ठाकरेचे ते उत्तर रोखठोक  वाटत असेल तर तो त्यांच्या स्वभावाचा गुण. एकंदरीत फडणविस व उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीनंतर,  महाराष्ट्राचा मुख्यमंत्री घराणेशाही पक्षांच्या टोळीतला हवा आहे की लोकांच्या पसंतीचा हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावर प्रथमच दिसू लागला आहे.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

महाराष्ट्रातील सत्तेचा तिढा व संभाव्य अस्थिरता



विधानसभेच्या निवडणूकीचा निकालानंतर बारा दिवस होऊन गेले तरीही महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात आलेले नाही. ज्या युतीचा विजय झाला आहे त्या युतीतील  दोन्ही पक्षात सत्ता वाटपावरून भांडण वाढलेले दिसत आहे. त्यामूळे काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेसला आनंद होणे  स्वाभाविक आहे.  अवकळी पावसाने शेतकर्यांवर ओढवलेल्या आपत्तीची ह्या दोन्ही पक्षांना होत असलेली काळजी ही दिखाऊ असली तरी विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारी पक्ष गोंधळात असतो तेव्हा फायदा घेण्याची संधी साधणे हे राजकारणात गैर नाही. पण पिण्याच्या  पाण्याच्या टंचाई वरील उपाय सुचविताना स्वतःच्या लघुशंकेचा उल्लेख अजित पवारांनी सत्तेवर असतेवेळी केला होता ह्याची आठवण शेतकर्यांना असणारच. म्हणून तर जीवाचे रान करून ही शरद पवारांना अपेक्षित यश मिळाले नाही. काॅग्रेसच्या जागा वाढल्या ह्याचे कारण राष्ट्रीय पातळीवर आजही काॅग्रेस मुख्य विरोधी पक्ष असल्यामूळे भाजपा सरकारच्या कारभारावर जी काही मतदारांमध्ये नाराजी असते तेव्हा काॅग्रेसला फायदा होतो हे साधं समीकरण आहे.

गेले बारा दिवस सत्तेची माळ युतीतील पक्षांच्या गळ्यात पडणार की विरोधी पक्षांना सत्तेत भागिदारी मिळेल असे तर्क -वितर्क काढले जात आहेत.  राजकारणात काही ही घडू शकते हे वाक्य प्रत्येक न्यूज चॅनेलवरून आपल्या कानीं पडते आहे. असे असले तरी भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्यामूळे कुठल्या तरी  एका विरोधी पक्षासोबत (विशेष करून राष्ट्रवादी काॅग्रेस) सत्तेचा वाटप करून तो पक्ष सत्तेवर बसणार नाही हे तर स्फटिका इतके स्वच्छ आहे. मग महाराष्ट्रातील सत्ता स्थापण्यात जी दिरंगाई रूपी अस्वच्छता आणली आहे ह्याला जबाबदार युतीतला शिवसेना पक्ष आहे हे ही स्फटिका इतके स्वच्छ आहे. पण हे सत्य महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषक स्विकारीत नसल्याचे दिसत आहे. बहूतांश प्रिन्ट व ईलेट्राॅनिक्स (विशेषतः मराठी भाषिक) मिडीया भाजपा आणि शिवसेना ह्या दोघांतील भांडणासंबंधी भाजपाला दोष  देताना दिसत आहे. कारण भाजपा केंद्रात सत्तेवर आहे. केवळ सत्तेत नाही तर सर्व विरोधी पक्षांचे भाजपाने कंबरडे मोडले असल्यामूळे मिडीयातील लोकांना सत्तेच्या परीघाभोवती मिरवायाची आणि ऐषरामाची संधी हूकली आहे. म्हणून महाराष्ट्रातील सत्तेसंबंधी काहीही तर्क-वितर्क मांडून भाजपाला आरोपाच्या पिंजर्यात मिडीया मांडताना दिसत असल्याचे आश्चर्य वाटत नाही. मुंबई सारख्या शिवसेनेच्या बालकिल्ल्यात महापालिकेत शिवसेनेइतक्या जागा मिळवून सत्तेसाठी सेनेची अडवडणूक केली नाही ह्यासंबंधीचे भाजपाचे कौतूक मिडीयाने का केले नाही, व शिवसेनेला भाजपाच्या या उदारपणाची जाणीव मिडीया का करून देत नाही ह्यावरून मिडीया पक्षपाती आहे हे दिसत आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपाची कोंडी केली आहे असा समज करून ज्यांना आनंदाच्या उकाळ्या होत आहेत अशा मंडळींना केंद्रातील भाजपाची सत्ता नडत आहे. विरोधी पक्षांना व शिवसेनेला पूरक वातावरण निर्माण करण्याचे काम मिडीया करीत आहे.  भाजपा शांततेने सारी चर्चा ऐकत आहे. मुख्यमंत्री पद भाजपा सोडणार नाही. कारण फडणविसाच्या नेतृत्वाखाली भाजपाने निवडणूक लढविली आहे. हे माहीत असूनही शिवसेनेने भाजपावर सुरू केलेली टिका अव्यवहारी आहे. त्यामूळे जी काही चर्चा मिडीयात होत आहे ती शिवसेनाभोवती होत आहे. कारण शिवसेना राजकारणात उतावेळपणा करीत आलेली आपण पाहात आहोत. शिवसेनेचा हा उतावेळपणा जर मतदाराने चांगला मानला असता तर शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून मतदारांनी पसंती दिली असती. ' हीच वेळ आहे ' ह्या टॅग लाईनला ही मतदारानी प्रतिसाद दिलेला दिसला नाही. शिवसेनेने फडणवीस सरकारवर सत्तेत राहून इतकी टिका करून लोकसभेची निवडणूक शिवसेनेने स्वतंत्र रित्या का लढविली नाही?  
खिशात राजीनामे घेऊन फिरतो आहोत अशी सेना मंत्र्यांच्या दार्पोक्तीची सोशल मिडीयावर टर उडविलेली आपण अनुभवली आहे. मागील लेखात मी म्हटले आहे की महाराष्ट्राच्या निवडणूकीतील निकालाच्या आकड्यानी सर्वच पक्षांना निराश केले आहे. पण ही निराशा शिवसेना व राष्ट्रवादी काॅग्रेसला अधिक जाणवत आहे. महाराष्ट्रात भाजपाला अडकून ठेवणे ही ह्या दोन पक्षांची तातडीची निकड दिसत आहे. त्यापाठीमागचे कारण शिखर बँकेंतील घोटाळा हे आहे. केंद्र सरकारची भ्रष्ट्राचार विरोधी कारवाईची सुरू झालेली मोहीमे मूळे सेना-राष्ट्रवादी मध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. म्हणून सध्या सत्तेसंबंधी तर्क-वितर्क मांडून जी चर्चा होत आहे ती ही या दोन पक्षाभोवती फिरत असताना दिसत आहे. त्यातून शिवसेना-राष्ट्रवादी सत्तेत येणार व काॅग्रेस बाहेरून पाठींबा देईल ही शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात तसे घडले तर ते कर्नाटकात जेडीएस व काॅग्रेसने स्थापन केलेले सरकार असेल. कर्नाटकात हरलेले पक्ष काॅग्रेस व जेडीएस होते. महाराष्ट्रात दोन्ही काॅग्रेस व शिवसेना असे तीन पक्षांचे सरकार आले तर  ते किती काळ टिकेल या प्रश्नांचे निश्चीत उत्तर भाष्यकार देऊ शकतात का? ते सरकार सदैव अस्थिरच राहणार आहे. कारण बाहेरून पाठींबा देणारा काॅग्रेस आपले अस्तित्व टिकाविण्याची दक्षता घेत राहील, आणि काॅग्रेसचा तो हक्क कोणी नाकारू शकत नाही.

आता दुसर्या शक्यतेचा विचार करू या. भाजपा महाराष्ट्रातील सत्तेवर पाणी सोडू शकण्याचा जुगार खेळू शकते. ह्याचे कारण हातात असलेली केंद्रातील भक्कम सत्ता. महाराष्ट्रातील सत्तेवर पाणी सोडण्याचे तीन मार्ग भाजपाकडे आहेत. त्यातील पहीला मार्ग म्हणजे राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून दिलेली संधी घेऊन अल्पमताचे सरकार स्थापन करावे आणि आमदारांच्या अंतरमनाला आवाहन करण्याचा फार्स करावयाचा. सोबत शिवसेनेला गद्दार म्हणून शिक्का मारण्याचा प्रचार करेल. शिवसेनेला गद्दार म्हणून शिक्का घेऊन मिरविणे फार जड जाईल. कारण आपल्या देशात कोणी मानो वा ना मानो पण हिंदुत्व आणि सर्वधर्मसमभाव असे मतदारांचे धृविकरण झालेले आहेच. त्यातच रामजन्मभूमीसंबंधी खटल्याचा निकालाने धृविकरणात भर पडणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील राजकारणातील  मोदींच्या उदयामूळे देशातील विधानसभेच्या निवडणूकीतील मतदानावर धृवीकरणाचा प्रभाव वाढू लागला आहे.  मुळात शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे नंतर एक प्रकारचे एक सॅच्यूरेशन आले आहे. जी काही सेनेला मतें मिळत आहेत ती ही बाळासाहेबांच्या जाज्वल हिंदुत्वामूळे. राष्ट्रीय स्तरावर मोदी नावाचा हिंदू हृदयसम्राट म्हणून उदय झाल्यावर शिवसेनेच्या जून्या कार्यकर्त्यांच्या घरात मोदीकडे आकृष्ट झालेले नवमतदार आहेत. काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस तसेच देशभरातील अनेक स्थानिक पक्षांच्या बाबतीत असे घडले आहे व घडत आहे.

भाजपाकडे महाराष्ट्रातील सत्तेवर पाणी सोडून देण्याचा जो  दुसरा मार्ग आहे त्यावर चर्चा करू या. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यांचा आधार प्रमाण म्हणून भाजपा जनतेला सांगेल की आम्ही सत्ता स्थापनेचा विचार सोडून सशक्त विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचे ठरविले आहे. शिवसेनेला सत्तेची गरज वा इच्छा जबर आहे. पण शिवसेना सांगू शकते की भाजपाने आमच्याकडे प्रस्ताव ठेवला नाही म्हणून आम्ही राष्ट्रवादी काॅग्रेसची साथ घेऊन सरकार स्थापन केले. पण शिवसेनेचा हा प्रतिवाद लोकांना फारसा रूचणार नाही. कारण राष्ट्रवादी काॅग्रेसची प्रतिमा मलीन झालेली आहे. भले काॅग्रेस पेक्षा अधिक जागा मिळाल्या असल्या तरी राष्ट्रवादी पेक्षा  काॅग्रेसला महाराष्ट्रात पसंती अधिक आहे. ही बाब काॅग्रेस सतत मनात ठेवून आपले पत्ते टाकत राहील. आपला जम पुन्हा बसावा यासाठी काॅग्रेसचे प्रयत्न होत राहणार त्यातून शिवसेनेच्या संभाव्य सरकारला हादरे बसत राहणार आहेत. ते सरकार कोसळले तर  अवकाळी पावसामूळे शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानाचे गांभीर्य न दाखविल्यामुळे राजकीय पक्षाच्या व्यवहाराबद्दल जनतेत रोष निर्माण होऊन मध्यावधी निवडणूकीत भाजपा व सेनेला जबर फटका बसू ही शकतो. ही जाणीव ठेवून भाजपा व शिवसेना नेते  सामोपचाराने समेट करतील का हे आज उद्या पर्यंत कळेल.

भाजपाकडे सत्तेवर पाणी सोडण्याचा तिसरा मार्ग जो आहे तो कलम ३५६ मधून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची संधी. पण हा मार्ग भाजपा स्विकारेल असे ठाम सांगता येत नाही. कारण ह्या बाबतचे न्यायालयीन निकालाचा इतिहास पाहता भाजपा स्वतःसाठी अडचण निर्माण करेल असे दिसत नाही. 

राहता राहीले दोन प्रश्न. एक भाजपा इतर पक्षात फूट पाडून विश्वासदर्शक ठराव पास करून सत्ता राखेल का?  आणि दुसरा आहे भाजपा आणि शिवसेनेत समेट होऊन सरकार अस्तित्वात येईल का?  पहील्या प्रश्नाचे उत्तर ठामपणे नाही असे म्हणवत नाही. कारण भाजपा हा ही राजकीय पक्ष आहे. शिवाय केंद्रात भाजपाची सत्ता २०२४ नंतरही राहणार असे दिसत असल्यामूळे इतर पक्षातील नेत्यांची भाजपाकडे जाण्याची फॅशन जी सुरू आहे ती तशीच पुढे चालू राहील. भाजपातील आमदार फोडण्याचे काम शरद पवार करू शकत नाहीत. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चड्डी संबंधी शरद पवाराने केलेली टवाळी. शरद पवारांच्या पक्षातून आलेल्या भाजपाच्या आमदाराना पवारांनी फोडायचा प्रयत्न केला तर पवारांवर निष्ठा राखून असलेले आमदार नाराज होतील.  शरद पवारांची अशी स्थिती आहे, तिथे संजय राऊतची काय डाळ शिजणार ? म्हणे आमच्याकडे १७५ आमदार आहेत. संजय राऊत जे काही बेताल वक्तव्ये करीत आहेत ते ऊद्धव ठाकरेंची परवानगी विना करीत आहे असे समजण्याची गरज नाही. त्यामूळे शिवसेनेत असंतोष आहे. भाजपाची केंद्रातील सत्ता शिवसेनेच्या नेत्यांनाही भुलवित आहे त्यामूळे असे नेते भाजपात जाऊ शकतात. पण भाजपा मधील आमदार सेनेत जाणार नाहीत एवढे निश्चीत. 

आता दुसर्या प्रश्नाकडे वळू या. सत्तेसाठी भाजपा आणि शिवसेनेत समेट होऊ शकेल का?  शेवटी हे राजकारण आहे. सत्ता कोणाला नको असते ? भाजपाने ही समेट करण्याचा प्रयत्न करावयास हवा आणि तसा तो मोठ्या भावाला साजेसा ही ठरू शकतो. तसा समेट होईल अशी आशा थोडी का असेना पण आहे. कारण हे भांडण संघाच्या दरबारात गेले आहे व ती जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीवर सोपविली जाण्याचे ऐकीवात  आहे. समेट कसाही झाला तरी शिवसेनेने जो तमाशा मांडला आहे त्या संबंधीचा दोष शिवसेनेकडे अधिक राहील असे दिसते. 

सारांशाने असे म्हणता येईल की सध्या आपला महाराष्ट्र नव्वदच्या दशकातील उत्तरप्रदेश सारखी राजकीय अस्थिरता अनुभवीत आहे. ही अस्थिरता दहा वर्षे ही टिकू शकते. हळू हळू ह्या अस्थिरतेतून महाराष्ट्रात पुढे मागे जास्तीत जास्त दोन ते तीन पक्ष अस्तीत्वात राहतील पण केंद्रस्थानी भाजपा राहणार. राष्ट्रवादी काॅग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील अस्तित्व संपेल. जर काॅग्रेसने राज्य स्तरावर राष्ट्रवादी काॅग्रेसला अधिक जागा देण्याची तयारी दाखविली तर महाराष्ट्रात दोन्ही काॅग्रेसची आघाडी बराच काळ टिकू शकेल. महाराष्ट्रातील या अस्थिरतेला भाजपा-सेना दोघेही जबाबदार असले तरी दोन्ही काॅग्रेसची मदत घेण्याची शिवसेनेने दाखविलेली तयारी शिवसेनेच्या मनगुटीवर बसलेले भूत ठरेल व ते शिवसेनेला ताठ उभे राहू देईल असे वाटत नाही. त्यामूळे शिवसेनेला सतत स्पर्धक राहीलेला मनसे बळकट होण्याची शक्यता आहे.  शिवसेनेने आक्रमक राज ठाकरेंची मदत घ्यावी, असे मानणारा एक मोठा गट आहे. त्या आधारे सेना-मनसे भविष्यात एकत्र येऊ शकतात असे मानले जात आहे.  इतर छोटे-मोठे पक्ष ह्या तीन प्रमूख राजकीय प्रवाहाच्या वळचणीला लागलेले असतील त्यात फायदा कोणत्या आघाडीला राहील हे आता सांगता येणार नाही. शेवटी ही सारी जर तर ची भाषा आहे, राजकारणात काही ही होऊ शकते. ह्याचा विसर न पडू देता या लेखात महाराष्ट्रातील राजकीय स्थितीसंबंधी भाष्य केले आहे आणि त्यातले सारे काही आपल्याला भावेल अशी माझी अपेक्षा व धारणा ही  नाही.

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...