गुरुवार, ३० मार्च, २०१७

आपल्यातील देव


'आपण व आपल्या देव-देवता', या विषयावर चर्चा होत नाही असं ठिकाण किंवा परिसर अस्तित्वात नाही. देव या विषयावर होणार्या चर्चेचं माध्यम म्हणजे भाषा. त्याही विभिन्न आहेत. त्या देवाला शरण जाण्याच्या तर्हा विभिन्न. त्याला कसे पाहायचे ती रूपेंही विभिन्न.

माझ्या व्यवसायातील एका मित्राने मला प्रश्न केला "कि देव आहे, याला पुरावा काय?". मी त्याला म्हणालो, "मी देव आहे असे मानतो, एवढ्या एका गोष्टीसाठी देव मला दर्शन देईल असे संभवत नाही. तसेच तू देव मानत नाही म्हणून, 'मी हा आहे' असे म्हणत तूझ्या समोर उभा राहील असे ही होणार नाही. जे जे काही चांगले, ते ते सारे देव. जे जे काही हितकारक ते ते सारे देव. जे जे काही स्वकष्टाचे ते ते सारे देव. मी एक माणूस आहे ही सत्य बाब. माझ्या अवती-भोवती समाज आहे, निसर्ग आहे, छोट्या- मोठ्या किटकांपासून ते महाकाय प्राण्यांना मी पाहतो आहे. त्या सर्व प्राणीमात्रांत प्राण नावाची एकच चेतना आहे. आप, तेज, वायू, आकाश ,पृथ्वी ह्या पंचमहाभूतांना मी जाणतो, अनुभवतो. मग आणखिन काय पूरावा हवा?". तो माझा मित्र म्हणाला, "होय हे खरे आहे. ह्याचच नाव देव असावं".

आणखिन एक उदाहरण. मी एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून काम करीत असतांना आलेला हा अनूभव. माझ्या एका एजंटचा एक मित्र होता. तो व्यवसायाने डाॅक्टर होता. पूष्कळ वेळा समजावूनही त्याने  विमा घेण्याला  सपशेल नकार दिला होता. म्हणून मला त्या डाॅकटर मित्राकडे  तो घेऊन गेला. प्रथम परस्पर ओळख झाली. चहा-पाण्याचे सोपास्कर झाले. नंतर मी विम्याचा विषय काढला. मी म्हणालो, "डाॅक्टर साहेब, तूमची वार्धक्याची सोय झाली आहे. मला आनंद आहे. तूमच्या अनूपस्थितीत तूमच्या पत्नीला आणि मूलाला ही काही कमी पडणार नाही इतकी आर्थिक तरतूद करून ठेवली त्याबद्दल मी तूमचे कौतुक करतो". मी त्यांना म्हटले, "डाॅक्टरसाहेब तूम्हाला माणूस म्हणून जन्म मिळाला त्याबद्दल देवांचे आभार मानण्याचा एक मार्ग म्हणून तूम्ही विमा घ्यायला हवा". त्यावर ते उत्तरले "मी देव मानत नाही". मी म्हटल, "ठीक आहे. बाहेर तूमचे पेशंट बसले आहेत, त्यांचा तूमच्या नाडी परीक्षेवर विश्वास आहे आणि तूमच्या हाताला गूण आहे असे म्हणत तूमचं कौतुक करतात". त्यावर डाॅक्टर महाशय म्हणाले, "हो त्यांची माझ्यावर श्रद्धा आहे". मी म्हटलं, "Exactly! श्रद्धेचंच दूसरं नाव आहे देव". मी पूढे त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सूरू केली. "डाॅक्टरसाहेब, मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे ना? तूमच्या अकस्मात देवाघरी जाण्यानं तूमचे पेशंट तूमच्या हाताच्या गूणाला आणि औषध-पाण्याला मूकणार ना? वैद्यकिय व्यवसायातील गूणवत्ता, नीतीमत्ता,  सर्जनशीलता,  शालीनता,  आणि  तत्परता हे गुण  तूमच्यापाशी आहेत  ना? ह्यावरून तूमचे ह्या जगात एक स्वतंत्र अस्तित्व आहे हे तूम्हाला मान्य आहे कि नाही?". डाॅक्टरांनी हसत हसत उत्तर दिले, "हो नक्कीचं". मी पूढे मुद्दा रेटत म्हणालो, "मग आम्ही ह्या तूमच्यातील असामान्य कौशल्याचं अशंत: संरक्षण करू इच्छितो. आणि अकस्मात रित्या तूम्ही ह्या जगाचा निरोप घेतला, तर आयुर्विमा मंडळाकडून येणार्या पैशाचं एक ट्रस्ट बनवून तूमच्या पेशंटनां, वेळोवेळी  लागणारी  औषधं,  तूमच्या नावाने देत राहू. शेवटी तूम्ही त्यांच्यासाठी देवमाणुस आहात". डाॅक्टर महाशयांनी हसत हसत देवमाणुस ह्या कल्पनेला दाद  दिली. विमा ही घेतला. वारसांच्या रकान्या समोर  पत्नी आणि मूलाचंच नाव नोंदविले. आम्ही विम्याचा फार्म भरून डाॅक्टरांचे आभार मानून बाहेर पडलो.

आपल्याकडे असणारे कूठल्याही क्षेत्रातले कौशल्य हे ही देवाचेच रूप. हे आपण पाहिले. आता तिसरं उदाहरण बघू या. एकदा भगवान रामकृष्ण परमंहसच्या आश्रमात एक माता आपल्या सात-आठ वर्षाच्या मूलाला घेऊन आली आणि म्हणाली, भगवान माझ्या मूलासाठी काहीतरी तरी उपाय द्या. परमहंसने विचारले, "काय झाले आहे?". ती म्हणाली, "महाराज माझा हा मूलगा फक्त गोडधोडच खातो. ना भात-भाजी, ना भाकरी. ह्याची वाढ कशी होणार?". परमहंसनी त्या बाळाकडे नजर फिरवली आणि त्या मातेला म्हणाले तूम्ही पूढच्या रविवारी या. आश्रमातील शिष्यांनी परमहंसचे उत्तर ऐकले आणि आप-आपल्या कामाला लागले. दूसर्या रविवारी ती माता बाळाला घेऊन पुन्हा परमहंसकडे आली. परंतु परमहंसनी तिला म्हटले कि आज काही काम होणार नाही. तू पून्हा पूढच्या रविवारी ये. तिसर्या रविवारी ती माता बाळाला घेऊन आली तेव्हा आपले गुरुदेव त्या बाळासाठी काय उपाय सूचवतात ते ऐकण्यासाठी सारे शिष्य आपल्या गुरूभोवती गोळा झाले. ती माता भगवान परमहंसच्या समोर बसली. परमंहस महाराजांनी त्या बाळाला नीट निरखीले आणि आपला उजवा हात समोर धरून म्हटले, "बाळा, मला वचन दे तू यापुढे वाजवीपेक्षा अधिक  गोड पदार्थ खाणार नाही". बाळाने परमहंसच्या हातावर टाळी दिली. परमहंसनी त्या मातेला सांगितले, आता तूमचं काम झालं आहे. तुम्ही जाऊ शकता. ती माता आश्रमाच्या बाहेर गेल्यावर शिष्यांनी परमहंसांना विचारले, "गुरूदेव तूम्ही एवढंच सांगण्यासाठी त्या मातेला तीन वेळा का बोलाविले?". महाराज शिष्यांना उद्देशून बोलले, "हे बघा ती माता प्रथमता आपल्याकडे आली त्या दिवसापर्यंत मी लाडू, शिरा, जिलेबी सारखे गोड पदार्थ किती खात होतो हे तूम्हाला माहीत होतेच. त्यानतंर मी गोडधोड खाणे बंद केले हेही तूम्ही पाहिले असणार!". हो, शिष्यगणांनी उत्तर दिले. "पण तूम्ही तिसर्या रविवारी त्या मातेला का बोलावलं?". महाराज म्हणाले, "जरी मी गोडधोड खाणे सोडलं तरी दूसर्या रविवार पर्यंत गोड पदार्थांचा वास माझ्या नाकाला येत होताच. गोडधोड पदार्थांची पूर्णतया आसक्ती काल सूटली आणि त्या मूळे आज मी त्या बाळाकडून गोड पदार्थ न खाण्याच वचन घेऊ शकलो". केवढा हा प्रामाणिकपणा! स्वतःशीच खोटे न बोलता, आधी आचरण आणि मग वचन हा भाव. म्हणूनच परमहंसांना भगवान असे संबोधीत असावेत. आपण जे काही काम हाती घेतो ते समरस होऊन केले कि आपण ते काम पूर्णतेकडे नेण्यास सक्षम होतो. आपला स्वतःहाच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास असतो तेव्हा यशश्री आपल्याकडे चालत येते. आपला आत्मविश्वास, जे काम करावयाचे आहे त्यावरील आपली श्रद्धा आणि कष्ट ही परमेश्वराचीच आणखिन तीन रूपं असे मी मानतो. या रूपातूंनच यश मिळते आणि जोडीला आनंदही मिळतो. आपल्यातलाच आपला देव हा असा आहे. म्हणून आचार्य विनोबा भावे म्हणतात 'स्वरूप ओळखा'.

बुधवार, २९ मार्च, २०१७

भाजप चा काॅंग्रेस होतो आहे का?



आपल्या देशासमोर आर्थिक, सामाजिक, कृषी, औद्योगिक, सार्वजनिकआरोग्य, अंतर्गत सूरक्षा, अतिरेकांच्या कारवाया, भ्रष्टाचार, बेकारी, दळणवळण अशा सर्वच क्षेत्रात एक ना दोन अनेक समस्या आहेत. असे असूनही भाजप चा काॅंग्रेस होतो आहे का हयासंबंधी जोरदार चर्चा होत आहे. असे का होतय? देशभरात कूठे ना कूठे होत असणार्या निवडणूका, त्या वरील ओपीनियन पोल्स आणि हाती येणारे निकाल इत्यादी बाबत न्यूज चॅनेल्स वरील कार्यक्रम, आणि त्यातून दिसणारे भाजप आणि भाजपेतर पक्षातील प्रवक्तां मधील होणारे आरोप-प्रत्यारोपामूळे सर्वसामान्य लोकही अशा चर्चेत ओढले जात असण्याची शक्यता असावी. भारत ही एक फार मोठी बाजारपेठ आहे. हे एकदा मान्य झालं कि मिडीयाला दोष देता येत नाही. जे चटकन विकलं जाते त्याच उत्पादन करायचं, त्याची जाहिरातबाजी करून मिडीयामार्फत दाखविले जाते. त्यामुळे जनमानसात जे उमटते, ते मिडीया दाखविते का हयाबाबतचा संवाद ठप्प होणारच. प्रत्येक व्यक्ती आपल्या कल्पनेप्रमाणे तसेच त्या व्यक्तीची ज्या विचारसरणीवर निष्ठा आहे त्याप्रमाणे आपलं मत मांडणार. भाजपमध्ये इतर पक्षांचे नेते सामील होत आहेत म्हणून भाजपला आरोपी ठरविणे सोपं जाते, ही एक बाजू. भाजपेतर पक्षांबद्दल लोकांमधे भ्रमनिरास झाला म्हणून इतर पक्षांचे नेते भाजपामध्ये प्रवेश करू लागले आहेत. ही दूसरी बाजू. जस आपण मिडीयासंबंधी विचार करतो तसाच विचार राजकिय पक्षांच्या बाबत केला तर जशी जिंकण्याची शक्यता तशी रणनीती भाजप आखीत असेल तर Everything is fair in love, war and politics. हे सूत्र मानून भाजप ला आरोपी म्हणून ठरविणे अयोग्य ठरते.

माझ्या एका  मित्राने महाराष्ट्रातील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयानंतर सहज गप्पांच्या  ओघात  त्याला वाटणारी खंत माझ्या समोर मांडली. त्याच्याच शब्दांत सांगतो. "व्यक्ती कडून समष्टीकडे" असे आपले तत्वज्ञान सांगते. परंतु आपल्या राजकिय व्यवस्थेत समष्टी कधीच केंद्रस्थानी नव्हती. स्वातंत्र्योत्तर सत्तर वर्षातील बहूतांश काळ या देशातील राजकारण हे एका कुटुंबाभोवती फिरत होते. आता ते एका व्यक्ती भोवती फिरेल अशी तजवीज मोदी आणि भाजप यांनी केली आहे. हे 2014 च्या निवडणूकांनी दाखवून दिले होते. ताज्या विधानसभेच्या निवडणूक निकालांनी याच सत्याचा खूंटा हलवून अधिक बळकट केला आहे. माझ्या मित्राची खंत रास्त होती. त्यामूळे थातूरमातूर उत्तर देऊन चालणारे नव्हते. आणि त्यात तो एक हूषार तरूण म्हणून आमच्या गावातील पंचक्रोशीत नावाजलेला आहे. पूष्कळदा संवादातील स्पष्टता आणि कूठल्याही पूर्वग्रहाने (जो आपल्या राजकिय पक्षांच्या व्यवहारात ठळकपणे आढळतो.) संवाद दूषित नसेल तर काही वेळा आपोआप प्रश्नाच उत्तर मिळते याचा अनूभव मला आला. मी त्याला WhatsApp वर माझ उत्तर पाठविले. ते पुढीलप्रमाणे आहे. असे म्हटले जाते, कि आपलं शरीर पंचमहाभूतांच बनलेले आहे. पंचमहाभूतांपैकी तेज (प्रकाश), वायू आणि आप(जल) ह्यांच्यातील वैशिष्ट्य पाहू या. प्रकाशाला अडथळा असला कि तो परावृत्त होतो आणि नंतर परतून अडथळा नसेल तिथे विसावतो. वायू जिथे पोकळी, तिथे घूसतो. आणि जल मग ते पावसाचे असो वा नदीचे ते उताराने प्रवास करीत असते आणि जिथे खड्डा मग तो छोटा असो वा सागरा सारखा मोठा तिथे साचतं. हा जर निसर्गाचा नियम असेल तर मानव अपवाद कसा ठरणार. त्यामुळे सर्वच क्षेत्रात माणूस समूहाकडे ओढला जात असावा. उदाहरणार्थ कपड्यांच्या दूकानात सेल लागल्यानंतर लोकांची दिसणारी झुबंड. एखाद्या घराण्याकडे वा नेत्याकडे मतदार मोठया संख्येने ओढला जातो ही बाब सूध्दा ह्या प्रकारात मोडत असावी. अमेरिका सारखी प्रगत लोकशाहीत बूश घराणे, क्लिंटन घराणे ही उदाहरणं आपल्याला ठाऊक आहेत. अर्थात हा मानसशास्त्राचा विषय आहे. मी त्यातला तज्ञ नसल्यामुळे ठोबळ उत्तर दिल. पुढे मी हे ही नमूद केलं कि कूठल्याही घराण्यात लोकोत्तर पुरुष होऊन गेल्यावर त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची पूण्ण्याई तीन पिढ्या नंतर संपत असावी त्यामुळे राहुल गांधीकडे मतदार आकृष्ट होत नसावेत. दुसरे कारण हे आहे कि जेव्हा  राष्ट्रीय स्तरावर नेतृत्वाची पोकळी दिसत असते आणि त्यातही विद्यमान  सरकारबद्दल मतदारांचा    भ्रमनिरास होतो तेव्हा  जनता नवा नेता स्वःताहून शोधत असते. जगभरातील अनेक देशाचा इतिहास ह्या सिध्दांताला साक्ष आहे. भाजपने अचूक संधी हेरून नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करून निवडणूक जिंकली, जिंकत आहे, आणि पूढच्या विधानसभेच्या आणि लोकसभेची ही निवडणूक जिंकणार असा सार्वत्रिक अंदाज आहे. त्यामुळे मोदींच्या नावाने मते मागणे ही बाब राज्यशास्त्रात गैर मानली जात नसावी.

भाजप निवडणूका जिंकण्यासाठी काग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांना आपल्यात सामील करून घेत आहे, म्हणून भाजपचा काॅंग्रेस होतोय का ह्या प्रश्नाच ऊत्तर कूठल्या हेतूने प्रश्न चर्चिला जातो त्यावर अवलंबून आहे. काॅग्रेस सर्वधर्मसमभावी असे मानले आणि भाजपामध्ये काॅग्रेस आणि इतर पक्षातील नेते सामील होत असल्यामूळे,भाजपाचा काॅग्रेस होतोय अस मानल तर, भाजपाला सांप्रदायिक म्हणून का हिणवावे? काॅंग्रेसला भ्रष्टाचाराच्या अनेक केसेसमूळे सत्तेवरून पायउतार व्हावे लागले.आणि त्या काॅंग्रेसमधील नेते भाजपात जात आहे म्हणून भाजप भ्रष्टाचारवाल्यांचा पक्ष आहे असे दाखवावयाचे असेल तर काॅंग्रेसने भ्रष्टाचारामूळे निवडणूकीत पराभव झाला असे मान्य केल्यासारखेच आहे. मोदींची जाहिरतबाजी किवा राहूल गांधींचा "मोदी अच्छे मार्केटिंग करते है और भाजपा धृवीकरण करके जितते है" हा आरोप ही खोटा ठरतो. एका प्रश्नातून दूसरा प्रश्न जन्माला येतो. त्यामूळे भाजपचा काॅंग्रेस होतोय का हा प्रश्न आजच्या राजकीय स्थितीत गैरलागू ठरतोय असे वाटते. मुळ प्रश्न नरेंद्र मोदींचा झंझावात विरोधी पक्ष कसा थोपवणार हा आहे.  ज्यांना सारे विरोधी पक्ष उदारमतवाादी म्हणून गौरवितात अशा अटलबिहारी वाजपेयींचे सरकार एका मताने पाडले होते त्याच क्षणी नरेंद्र मोदीचा राष्ट्रीय पातळीवरील राजकीय प्रवेश  नियतीने निच्चित केला होता. असेच मागे वळून पाहता म्हणावेसे वाटते.

लोकसभेच्या निवडणूका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या कार्यशैलीनूसार जनता-जनार्दनाचे समर्थन अधिक बळकट करीत आहेत. भ्रष्टाचाराविरूद्धची लढाई हे आता नाटक राहिले नाही, असे आम जनतेलाच नव्हे तर विरोधी पक्षांतील नेत्यांनांही वाटू लागले आहे. विशेष महत्वाचे म्हणजे गरीबी म्हणजे काय आणि ती कशी असते हे मोदीनीं अनुभवलं आहे. मानसशास्त्रीय सिद्धांत हे कुठल्याही ईझमवर अवलंबून नसतात. त्यामुळे जोवर राष्ट्रीय पातळीवर नेत्याची पोकळी आहे, तोवर जनता मोदींभोवती फिरत राहणार,आणि गरीबी अनूभवलेला हा नेता तळागाळातील माणसांच भलं करणार असा विश्वास निदान आज तरी वाटतो.

मंगळवार, २८ मार्च, २०१७

प्रतिपदा संवादाची


सूप्रभात! नमस्कार मंडळी! आज गुढी पाडवा. हिंदू धर्माच्या मान्यतेप्रमाणे नववर्षाचा हा पहिला दिवस. आपणांस तसेच आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यास नववर्षाच्या हार्दिक शूभेच्छा.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त. काहीतरी नवीन संकल्प सोडावा असा हा मुहूर्त. मी आपल्याशी आजपासून संवाद साधण्याचा संकल्प सोडला आहे. त्यात मला कसं आणि किती प्रमाणात यश मिळेल हा प्रश्न गौण आहे असे मी मानतो. कारण संवादात वादविवादाला स्थान नसते. वादविवादात सरशी आणि हार ह्यांचा जन्म असतो. कोणीतरी म्हटलं आहे कि "You may win the argument but lose the relationship." आणि हे पटण्यासारखे आहे. कूठल्यातरी ऐताहासिक कांदबरीच्या लेखकाने म्हटलं आहे कि "माणसाला गैरसमज टाळता आले असते,तर जगातील निम्याहून अधिक यूद्धे टळली असती". तूम्ही म्हणाल कि मी संवाद सोडून लेखकांची वाक्ये का ऐकवितो? ही काही संवादाची रीत झाली काय? तूमचा प्रश्न रास्त आहे परंतु एक सत्य नाकारण्यासारखे नाही, आणि ते म्हणजे साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ, अध्यात्मिक गूरू, इतिहासकार ही मंडळी अस्तित्वात नसती, तर मानव जात आज जितकी प्रगत दिसते,तशी ती नसती. आपल्या शास्त्रकारांनी म्हटले आहे, " साहित्य संगीत कला विहिनः साक्षात पशू पुच्छविषाणहिनः॥" असो. आता संवाद साधायचा म्हटला कि प्रथम प्रश्न समोर येतो की, तसं पाहता आजकाल आपण WhatsApp द्वारे संवाद  करीतच आहोत. मग आणखिन बाॅल्ग वर कशाला हवा संवाद?. मला प्रामाणिकपणे वाटते कि हल्ली WhatsApp द्वारे आपण संवाद कमी आणि माहिती जास्त शेअर करीत असतो. अर्थात ती ही आवश्यक आहेच. तरीसुद्धा त्यातून समोरासमोरील संवादातून मिळणार्या तृप्तीची सर नाही असाही एक मतप्रवाह आहे. अलीकडे माझ्या एका परम मित्राला सध्याच्या राजकीय स्थितीवरील त्यानी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी WhatsApp वरून पाठविली. त्याच समाधान झालं.  आम्हां दोघांना प्रत्यक्ष एकमेकांची भेट झाल्याचाच आनंद मिळाला आणि तो ही आम्हां दोघांची राजकीय मते भिन्न असूनही. असे का शक्य झाले असावे? माझ्या मित्राला मी म्हटले कि आपण सर्रास म्हणत असतो,कि व्यक्ती तितक्या प्रकृती. आपण असेही म्हणत असतो कि "पिंडी ते ब्रम्हांडी". ह्याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती चे एक स्वतंत्र ब्रम्हांड असू शकते. त्यामध्ये त्याचे कुटूंबीय, सोबती, मित्र असतात आणि नात्याच्या पलीकडील लोकही असू शकतात. नात्याच्या पलिकडची मंडळीसाठी खास नाव वा प्रकार अशी संज्ञा नाही. फक्त  "समान शीले व्यसनेषू सख्यम्! ".असे  वर्णन करू शकतो.

मी आज ह्या blog च्या माध्यमातून आपल्या सर्वांशी किमान आठवड्यातून एकदा तरी संवाद करण्याचा  संकल्प सोडत आहे. मित्रांनो माझ प्रांजळ मत असे आहे कि व्यक्ती ही प्रथम स्वःतहाचीच व्यक्त होत असते. परंतु त्याच वेळी ती अप्रत्यक्षरित्या त्याच्या जिवलग माणसांशी संवाद साधत असते. आपलं विचारचक्र चालू असते तेव्हा नैसर्गिक रित्या ही क्रिया घडत असते. आणि WhatsApp नव्हतं, त्याही काळी असे घडत होतं. इतकंच काय भाषा अस्तित्वात नव्हती तेव्हा ही क्रिया घडत आली आहे. मित्रहो आपण सारे माझ्या ब्रम्हांडातील मंडळी. आणि म्हणून मला संवाद करायला आवडेल. आपल्या प्रतिक्रिया नक्की share करा. मला विश्वास आहे कि अशा प्रकारच्या संवादासाठी जे हे माध्यम आपण वापरणार आहोत त्यासाठीचे जे नियम व बंधनं आहेत ती पूर्णतया स्विकाराल.  विषय अर्थातच विविध क्षेत्रातील चालू घडामोडी असतील. पून्हा आपल्याला नववर्षाच्या शूभेच्छा देऊन येथे थांबतो. धन्यवाद!

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...