शनिवार, १८ एप्रिल, २०२०

कोरोनाशी लढतीतले आपले शस्त्र -- आम्ही एकशे पाच



कोरोनाशी आपली लढत या शिर्षकाखाली चार लेख लिहल्यानंतर या लेखाचे शिर्षक का बदलावे लागले हे आपल्या सारख्या सुज्ञ वाचकांना सांगावयाची गरज नाही. आजचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे; त्यामूळे माहितीचा महापूर अहोरात्र सुरू असतो. त्यात राजकीय घडामोडीच्या बातम्याचा नंबर पहीला लागतो. असे का होत आहे, त्यासंबंधीचा दोष जितका राजकीय पक्षांना जातो तितकाच लोकशाही राज्यव्यस्थेतील मतदार म्हणून आपल्याकडे ही येतो हे प्रथम मान्य करूनच आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो.

कोरोनाशी सुरू असलेली आपली लढत कधी संपेल या विषयी कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे.  प्रगत देशात ही कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आपण पाहात आहोत. आपल्या देशात कोरोनाचा संसर्ग इतर देशाच्या तुलनेत कमी असला तरी रूग्णाची वाढती संख्या केवळ चिंताजनकच नाही तर भयावह आहे. याचे कारण कोरोनाशी आपली लढत जितकी लांबली जाईल तितक्या आरोग्य, आर्थिक, उद्योग, कृषी, शिक्षण, सामाजिक, क्षेत्रातील समस्या जटील होत जातील. शिवाय कुंटुब व्यवस्थेतील भावनिक समस्या नव्याने उभ्या राहतील. आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव तिसर्या स्टेजवर गेला नाही ही आपली जमेची बाजू आहे. त्यासंबंधीचे उच्चस्तरीय श्रेय निश्चीतच आज प्रत्यक्ष रणांगणावर चोवीस तास लढत देणारे डाॅक्टर्स , नर्स, प्रशासकीय वर्ग, सफाई कर्मचारी, पोलीस व जवान, स्वयंसेवी संस्था इत्यादींना जाते. त्यानंतर सरकार मग ते केंद्र असो वा राज्यातले यांना श्रेय जाते. सरकारचे काम लढतीची आखणी, त्यानुसार कार्यन्वाही, विविध यंत्रणेतील समन्वय,आणि धन व रसद पुरवठा हे असते. आजच्या घडीला केंद्र व विविध राज्यातील सरकारचे काम समाधानकारक आहे याबाबत दुमत नाही. पण आपली राजकीय व्यवस्था अशी आहे की देशाच्या शत्रु राष्ट्राने दशहतवादी हल्याच्या रूपाने निर्माण केलेल्या  आपत्ती काळात असो वा  नैसर्गिक आपत्तीच्या काळात, आपल्या राजकीय पक्षांना राजकीय फायद्याच्या पलीकडे जाऊन काही विचार करावा, याचे भान राहात नाही. त्यामूळे ज्या राजकीय पक्षाशी आपली जवळीक आहे त्याचे कौतूक व ज्या राजकीय पक्षाशी जवळीक नाही अशा पक्षावर टिका करण्याची सवय लोकशाहीचा चौथा स्थंभ म्हणून मानला जातो, अशा प्रिन्ट व इलेट्राॅनिक्स मिडीयाला लागली आहे. तेथूनच या सवयीची लागण राजकीय अभ्यासक म्हणून मिरविणारी विचारवंत व संपादक मंडळीना आणि पुढे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व समर्थकांपर्यंत पोहचलेली  दिसते. आपला देशच नव्हे तर आख्ख जग  कोरोना सारख्या महासंकटात सापडलेले असताना राजकिय पक्षांतील सुंदोपोसुंदीचे दर्शन चॅनेल वरील चर्चेतून होत आहे. सोशल मिडीयावर ही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते भांडत असल्याचे आपण पाहातो. प्रिन्ट व इलेट्राॅनिक्स मिडीयाचे सुत्र नावाचे अपत्य कोणते हे आपल्या सारख्या सर्वसामान्यांना अजूनही ज्ञात झाले नाही हा आपल्या लोकशाही व्यवस्थेतील मोठा दोष आहे.  त्यामूळे तिथे परस्परात होणारी स्पर्धा आपल्याला मुकाटपणे पाहावी लागते. सध्याच्या लाॅकडाऊनच्या काळात राजकीय पक्षांतील नेत्या मध्यें या संकट काळात केलेल्या लोकोपयोगी कामाचे श्रेय घेण्याची सुरू असलेली स्पर्धा, मिडीयातून कोरोना रूग्णाची वाढती संख्या सांगताना अँकरच्या चेहर्यावर न दिसणारे गांभीर्य  या सार्या गोष्टी फारच खटकतात. माझा मुद्दा असा आहे की विज्ञान युगात आपण राहातो, मिरवतो, पण आपले आचार, विचार, वर्तन आदिम काळातील मानवा सारखे होत आहे की काय असा  प्रश्न जगभरातील अनेक समाजशास्त्रज्ञाला भेडसावत आहे.  बर्टाड रसेल नावाच्या विचारवंताने म्हटले आहे की, 'मानवाचा मुलभूत विकास झाल्याशिवाय वैज्ञानिक प्रगती त्याच्या पचनी पडणार नाही.' हे आज पटते. आपले महात्मा गांधीजींनी मानव जातीला सल्ला देताना म्हटले आहे की,  'सबकी जरूरतें पुरी करनेकी क्षमता अपनी धरती माँके पास है पर अपनी लालच पुरी करनेकी नही है | ' हा सल्ला पदोपदी आठवतो. आपल्या अध्यात्माचे मेरूमणी स्वामी विवेकानंदानी अमेरिका व युरोपातून मायदेशी परतल्यावर एके ठिकाणी म्हटले आहे, की आजचा युरोप ज्वालामूखीच्या तोंडाशी उभा आहे.' विवेकानंदाच्या महानिर्वाणनंतर जगात झालेली दोन महायुद्धे, सतत तिसर्या महायुद्धाचे वाहात असलेले ढग, आता सुरू होत असलेले जैविक युद्ध पाहता विवेकानंदाची भविष्यवाणी खरी ठरत आहे. कोरोना व्हायरस हा नैसर्गिक आहे की जैवीक अस्त्राच्या युद्धाचा प्रारंभ आहे हेच कळेनासे झाले आहे. जर हा व्हायरस चीनने बनविला असेल तरी आपल्या धर्मशास्त्रात उत्पत्ती, स्थिती, लय हा निसर्ग नियम असे म्हटले आहे तेच उत्तर आपल्या हाती येते.  मग विज्ञानाने आपण सुसंस्कृत झालो आहोत असे कसें मानावे ? निसर्ग नियमा नुसार कोरोनोचे थैमान थांबणार आहेच, ते काही या सृष्टीचा आताच पुर्ण विंध्वस करणार नाही. पण कोरोनारूपी संकटामूळे जगाचे चित्र बदलणार आहे हे निश्चीत. अनेक देशातील राज्य, समाज, व अर्थ या व्यवस्था पुर्णपणे बदलणार आहेत. जगातील राजकीय समिकरणे बदलणार आहेत. आपले सुदैव आहे की आज आपल्या देशात आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, सुरक्षा, व्यापार, उद्योग, कृषी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी क्षेत्रात तटस्थेने व निरपेक्ष भावनेतून विचार , सुचना, भाष्यें मांडणारी विचारवंत मंडळी व स्वयंसेवी संस्था आहेत. एक समाज म्हणून, एक देश म्हणून आपण काय करायला हवे  यासंबंधी ही निःपक्ष विचारवंत मंडळी, आणि स्वयंसेवी संस्था, विविध माध्यमातून आपली मतें मांडतांना दिसत आहेत.  त्यांचे विचार, त्यांच्या सुचना, त्यांचे विविध क्षेत्रांविषयी वरील भाष्य वाचले, ऐकले की कोरोनाच्या दशहतीवर मात करावयाची असेल तर आपल्याला  सर्व मतभेद विसरून एक समाज, एक देश म्हणून सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर नाही हे स्पष्टपणे दिसत आहे. कोरोनाशी सुरू असलेल्या युद्धातील आपल्या हाती असलेले हमखास यश देणारे शस्त्र  म्हणजे महाभारतातील युधीष्ठराने व्यक्त केलेली 'आम्ही एकशे पाच आहोत ही भावना होय. प्रश्न हा आहे की त्यासाठी पुढाकार कोणी घ्यवयाचा आहे ?

पुढाकार कोणी घ्यावयाचा या प्रश्नाचं उत्तर आपल्या संस्कृतीत आहे. आपल्या संस्कृती मधील महाजनो या गता सः पंथा,  तसेच राजा कालस्य कारणम् अशी  छोटी छोटी अनेक वचने, सुभाषितं, प्रार्थना अशा आहेत की त्यात  मानव म्हणून जन्माला येण्याचं प्रयोजन सामवलेलं आहे. ही आपल्या संस्कृतीची खासियत आहे. अभिजन वर्ग ज्या दिशेने जातो त्याच दिशेने सर्वसामान्यांनी जावे असे म्हटले आहे. तसे पाहिले तर हा सल्ला नसून ते एक शाश्वत सत्य आहे. साधारणतः सामान्यजन म्हणजे समाज हा प्रवाहपतीत असतो. सामान्यजनांकडे महनीय व्यक्ती सारखी बौद्धिक पातळी नसते म्हणून त्यांच्यात ' महाजना या गता सा पंथः ' हे जीवनाचं सुत्र अंगवळणी पडले आहे. पुढील वचन आहे राजा कालस्य कारणम् | म्हणजे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, प्रजेचं मानसिक व शारिरीक आरोग्य, सुरक्षा, उदरनिर्वाहाची व्यवस्था या सार्या गोष्टींची जबाबदारी राजावर असते. पुर्वी जगातील सर्वच देशात राजेशाही हीच राज्यप्रणाली असल्यामूळे सरकार या शब्दाऐवजी राजा हा शब्द वापरण्यात आला असावा. त्यातून प्रत्येक राजाची कारकिर्द सुद्धा काल गणनेने मानली जात असे.  आज जगात काही देशात लोकशाही, काही देशात लष्करशाही, काही देशात राजेशाही, काही चीन सारख्या देशात एक पक्षीय राज्यप्रणाली आहे. आपल्या येथे लोकशाही आहे. म्हणून सरकार निवडण्यासाठी आपण मतदान करीत असतो. तसे पाहता वैदिक काळात आपल्या देशात जशी राजेशाही होती तशी गणराज्यें ही होती. एकंदरीत आपल्या समाजाच्या प्रकृतीला लोकशाही मानवणारी आहे. देश गुलामशाहीत का गेला यामागील कारणांचा अभ्यास करून एक समाज म्हणून उभे राहण्याची भावना देशबांधवामध्ये निर्माण करून बावनकाशी सुवर्णासारखी राष्ट्रीय एकात्मता प्रत्यक्षात आकारास आणण्याचा विचार व धडपड म्हणजे राष्ट्रवाद. या संबंधी मी अनेक लेखात चर्चा केली आहे. म्हणून आज त्यावर चर्चा नको करू या. एक गोष्ट स्पष्टपणे दिसते आहे ती म्हणजे भारताचा आत्मा आपले अध्यात्म आहे. म्हणून अध्यात्म व विज्ञान याची सांगड घालण्यात आपण कमी पडतोय हे मान्य केलेलं बरे असे वाटते.

राजा म्हणजे सरकार ! म्हणून देशाचा पंतप्रधान व त्याचे मंत्रीमंडळ हे आपले सरकार. पण सत्ताधारी पक्षाला आपण (प्रजा) म्हणजे मतदारच निवडून देत असतो. याचा अर्थ ' आपणच आपले राजे ' असाच आहे. पण या न्यायाने आपण आपली जबाबदारी कर्तव्यें पार पाडत नसतो. म्हणूनच 'आपण आपल्या मनाचे राजे ' हा वाक् प्रचार आपण व्यवहारात स्वच्छंदी व स्वैराचारी वृत्तीच्या वर्णनासाठी वापरतो. लाॅकडाऊन, कर्फ्यू असूनही पाच- दहा टक्के समाजबांधव कायदा व प्रशासकीय सुचना धाब्यावर बसवितात ही गंभीर बाब आहे. त्यावरूनही राजकारण होताना दिसत आहे ती तर अधिक गंभीर बाब आहे. अशा वेळी पंतप्रधान वा मुख्यमंत्र्यांवर टिका करणे योग्य आहे का, याचा शांत डोक्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतोय असे दिसत असूनही देशातल्या प्रमूख विरोधी पक्ष काॅग्रेस, त्याचे मित्रपक्ष, व डाव्या पक्षांचे शिर्षस्थ नेते हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून गप्प बसली होती. काॅग्रेसचे सर्वसर्वा सोनिया गांधी व राहूल गांधी शेवटी पंतप्रधान मोदीवर टिकेचं शस्त्र फेकू लागले. म्हणून सोशल मिडीयावर ' इटाली चाची आपके पास कोरोना पर कोई अच्छा इलाज है, तो पहले अपने मैंकेको दिजीए, उन्हे अधिक जरूरत है |'  अशी कडवट टिका व्हायरल झालीच. काॅग्रेसच्या या दोन्ही शिर्षस्थ नेत्यांनी आपणहून कोंडमारा करून घेतला आहे. प्रधानमंत्री केअर फंड ऐवजी पंतप्रधान आपत्ती निवारण फंडात दानापोटी आलेली रक्कम टाकावी असा सोनिया गांधीची मागणी म्हणजे तो हट्ट होता कारण त्या फंडात काॅग्रेस अध्यक्षाचा सदस्य म्हणून समावेश आहे. हे सत्य लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर सोनीया गांधीना फक्त पैशाची हाव आणि ती ही कोरोनो सारख्या गंभीर संकट काळात ही सुटत नाही ही बाब फारच  खालच्या दर्जाची दिसली. पंतप्रधान मोदींना कोरोना आपत्तीचे दिर्घ काळपर्यंत निर्माण होणार्या समस्यांची पुर्ण जाणीव आहे म्हणून त्यांनी एक कायम स्वरूपाचा स्वतंत्र फंड व्हायरस इन्फेशनचे संकट जे वेळोवेळी येऊ लागले त्यासाठी तयार केला.  कोरोनाचे संकट वाटते त्याहून ही फार धोकादायक व दिर्घ कालीन टिकणारी समस्या आहे, असे दिसून आल्यानंतर काल परवा राहूल गांधी शहाणपणाने बोलले. पण तो पर्यंत काॅग्रेस व मित्र  पक्षांचे कार्यकर्ते व समर्थकांनी सोशल मिडीयावर धुमाकूळ घालायचा तो घातलाच. मरण आपल्या दाराशी येत आहे असे दिसल्यावर शहाण्यासारखं वागण्याची सुरूवात करणे म्हणजे आपले राजकीय अस्तित्व संपत आल्यामूळे काॅग्रेसचे हे शिर्षस्थ नेते भयभीत झाल्याचे लक्षण आहे हे न कळण्याइतकी आपली जनता खूळी नाही. 

सध्यातरी कोरोनावर सामाजिक अंतर हेच औषध आहे. आधूनिक विज्ञानाच्या अत्याधुनिक साधनांचा ही कोरोनासमोर टिकाव लागत नाही, हे अमेरिका व युरोपीयन देशाची स्थिती कशी झाली आहे त्यावरून सिद्ध झाले आहे. म्हणून आपल्या सरकारने लाॅकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तो यशस्वी करण्यासाठी सरकारला सहकार्य करणे हे सर्व विरोधी पक्षांचेच नव्हे तर देशातील सर्व स्वयंसेवी संस्था, विचारवंत, धर्मगुरू व सामान्यजनांचे आद्य कर्तव्य आहे. देशातील, व सर्व राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षांनी एकजूटीचा नारा द्यावा. आमचे जे काही राजकीय मतभेद असतील ते काही काळ बासनात गुंडाळून ठेवू या. अर्थव्यवस्थेतील समस्यांवर उपाय व योजना इत्यादी हळूहळू आखत पुढे चालत राहू या. देश वाचला तरच स्वातंत्र्याला अर्थ राहील. स्वातंत्र्य राहीलं तरच विकासाच्या योजना अंमलात येतील. कदाचित कोरोनोचे संकट निवाळल्यानंतर आपल्या देशाला अधिक चांगल्या संधी ही मिळतील असे ही काही अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय अभ्यासक सांगत आहेत. त्यासाठी आपल्याला
' साथी हात बढाओ ' याच न्यायाने पुढे जावे लागणार आहे. आजच्या आणिबाणीच्या स्थितीत पंतप्रधान मोदी देशातील वैज्ञानिक, डाॅक्टर्स , विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, उद्योजक, अर्थशास्त्रज्ञ, संरक्षण व परराष्ट्र खात्यातील आजी माजी सनदी अधिकारी यांचा सल्ला घेत आहेत. सर्व राज्यातील मुख्यमंत्री ही समाधानकारक कामगिरी बजावित आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांच्या शिर्षस्थ नेत्यांनी राजकीय फायद्याचे गणित विसरून खालच्या पातळीवरील नेत्यांसमोर, कार्यकर्त्यांसमोर , व सामान्यजनांसमोर संयम, सांमजस्य, आणि वेळ पडल्यास कठोर निर्णय घेण्यासाठी एकजूटीचे इतिहासातील सर्वोत्तम असे आदर्श उदाहरण ठेवल्यास करोना संकटावर आपण मात करू शकतो.Yes We can stop Corona.

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

कोरोनाशी आपली लढत आणि पुराणातील देव दानव


जगातील बहुतांश देश कोरोना व्हायरसची दशहत अनुभवित आहेत. ही दशहत कधी संपणार असा प्रश्न केवळ आपल्या पुढेच नसून तो जगातील बहूतांश देशाच्या पुढे आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंबंधी बरीच माहिती आपल्यापर्यंत माध्यमांद्वारे आली आहे. म्हणून त्याबाबत काही लिहावयाची गरज नाही. प्रत्येक देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे स्वरूप समान दिसत असले तरी त्यातून उद्भवत असलेल्या समस्या व त्याच्याशी लढत देण्यासाठी करावी लागणारी उपाय योजना  देशपरत्वे भिन्न आहे असे दिसते. त्याचे कारण असे आहे की प्रत्येक देशात आरोग्य क्षेत्रातील मुलभूत सोयी, व्यवस्था, मेडीकल उपकरणे, रूग्णालयाची संख्या, लोकसंख्या व तिची घनता, सामाजिक स्थिती, नागरिकांची जीवनशैली व राहणीमान,  हवामान इत्यादीमध्ये भिन्नता आहे. इतर देशातील उपाय योजनांची माहिती आपले सरकार घेत राहणार आहेच व त्यातील आपल्याला जे आवश्यक आहेत तसे उपाय आपले सरकार योजेल याबाबत आपण खात्री बाळगावयास हरकत नाही. शेवटी कोरोना ही आपत्ती वैश्वीक आहे आणि कोरोना बाधीत सर्व देश सहकार्याने या आपत्तीशी झुंज देत आहेत. आजच्या घडीला आपण आपल्या देशातील कोरोनाची भयानकता व उपाययोजनावर चर्चा करू या. पण त्या अगोदर  मी प्रांजळपणे कबूल करतो की  वैद्यकीय व प्रशासन या दोन्ही क्षेत्रातील मी अधिकारी नाही व अभ्यासक ही नाही. मी आपल्यासारखाच  Stay at home and be safe  अशी प्रशासनाकडून आलेली सुचना पाळणारा एक सामान्य नागरिक आहे. म्हणून चर्चा ऐवजी मी आपल्याशी संवाद सांधतोय असेच कृपया समजावे.

आपल्या देशात कोरोना मुळे उभे राहीलेल्या संकटाचे स्वरूप इतर देशात आहे तसेच असले तरी आपल्या राजकीय, व सामाजिक व्यवस्थेत कायम स्वरूपात असलेल्या जहरी विषाणुमूळे आपल्याला दोन बाजूने लढावे लागत आहे. आपण कोरोनाशी लढत उशीरा सुरू केली असे आपल्याला वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे झाले नाही. आपल्या देशाचे क्षेत्रफळ कमी व लोकसंख्या अधिक आहे. म्हणजेच आपला देश Densly populated आहे. त्यातही शहरात झोपडपट्टी नावाच्या वस्तीची संख्या अधिक आहे. म्हणून कोरोनोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शंका सरकारला होतीच. कोरोनोची लक्षणे पहिली दिसत नाहीत आणि नंतर झटपट लागण होऊन रूग्णांची संख्या भौमितिक रितीने वाढते. म्हणून सरकारने विलगीकरण , कर्फ्यु, लाॅकडाऊन , सोशल डिस्टन्सींग  हे उपाय तातडीने अमंलात आणावयास सुरूवात केली. परदेशातून येत असलेल्या आपल्या देशबांधवांची कोरोनाची तपासणी, त्यांना क्वारंटाईन ठेवण्याची व्यवस्था इत्यादी कामें तात्काळ सुरू केली . आज  डाॅक्टर्स, नर्सेस, रूग्णालयातील इतर कर्मचारी वर्ग, पोलिस व सुरक्षा कर्मचारी सोबत लष्कारातील जवान, प्रशासनातील अधिकारी, व कर्मचारी ही मंडळी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनोशी अहोरात्र झुंज देत आहे. अनेक स्वयंसेवी संघटना, सामाजिक संस्था, रूग्णवाहिकांचे मालक, हाॅटेलचे मालक, उद्योजक, काही कलाकार, हिंदुची देव-देवतांची मंदिरं, आश्रम, चॅरीटेबल संस्था आपआपल्या परिने जसे शक्य आहे तशा प्रकारचे सहाय्य करीत आहेत. ही गोष्ट निश्चीतच स्वागतार्ह व अभिनंदनास पात्र आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोनाशी रणांगणात लढाई करणार्या यंत्रणेतील देशबांधव व भगिनींमुळे आपण सुखाचा श्वास घेत आहोत. ही मंडळी आपल्यासाठी देवतुल्यच होत.

दुसर्या बाजूला आपल्या येथे कायम वस्ती करीत असलेले विषाणू आहेत, जसे की
१) कोरोनाचे रूग्ण कुठे आहेत, आणि कोरोना-ची
    लागण होऊन कुठे मोठ्या संख्येने मृत्यु  होत  
    आहेत, कशाला ही तपासणी हवी, कशाला हवे हे
    विलगीकरण, संपुर्ण लाॅकडाऊनची गरज आहे का,
    आपल्या मंदिरातील देव-देवता आता कुठे 
     मदतीला धावत आहेत असे वायफळ प्रश्न
     विचारणारी पुरोगामी- ढोंगी बुद्धजीवी, 
२) रस्त्यावर उतरून संचारबंदी तोडणारे व हुज्जत
     घालून पोलीसांनाच मारणारी उनाडटप्पू व मवाली
     युवक आणि पोलीसांनाच सबूरीने घ्या असे सल्ला
     देणारे गुंड प्रवृत्तीचे नेते
३) भितीने शहरातून आपआपाल्या गावाकडे प्रचंड
    संख्येने जाणारे लोक,
४) मुस्लीम समाजातील काही संघटनाचा
     हेखेखोरपणा व त्यांना त्यांच्याच धर्मगुरूंचा व 
     काही राजकीय पक्षांचा असलेला छुपा पाठींबा,
५) मुस्लीमांच्या प्रार्थना स्थळात नमाज पडणे,
     लपून बसलेल्या विदेशी नागरिकांचं पलायन.
     दिल्लीतील निजामउद्दीन येथील १८ मार्च झालेला
     मरकज (तबलिंगी) कार्यक्रमातून वाढलेला धोका.
६) पर्यावरणाच्या, मानवाधिकाराच्या, सेवेच्या नावावर
    कार्यरत असलेल्या विदेशी लाॅब्या, व स्वयंसेवी
    संघटनांची कारस्थानें
७) काही विरोधी पक्षांची निष्क्रीयता,
८) देशातील पाक पुरस्कृत आंतकवाद्यांचे हितचिंतक, 
९) डाव्या विचारसरणीचे राजकीय पक्ष, त्यांच्या
    विद्यार्थी संघटना, कामगार संघटना, नक्षलवादी
१०) काश्मीर, केरळ, ईशान्य भागातील कार्यरत 
      असलेल्या अलगावादी टोळ्या
११) भाजीपाला मार्केट, किराणा व रेशन दुकानावर
       कर्फ्यु, लाॅकडाऊन, सोशल डिस्टन्सींग सारखे 
       कायदे धाब्यावर बसविण्याची आपली सवय
इत्यादींशी आपल्या सरकार व प्रशासन यंत्रणेला समातंर पातळीवरून लढत द्यावी लागत आहे. याबाबत दुमत होऊ नये. कोरोना रूपी भस्मासूरचा पाडाव करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण वर नमूद केलेल्या  विषाणूंच्या उपद्रवांमूळे कोरोना बाधित रूग्णांची आकडेवारी वाढती आहे. त्यामूळे आपण देत असलेली लढत लांबली जाण्याची शक्यता दिसत आहे. ईश्वर करो तसे होऊ नये अशी प्रार्थना.

आपल्या देशाची काही ही चुक नसताना, आपला देश आज कोरोना वायरसच्या संकटात सापडला आहे. ह्या प्रसंगाचे गांभीर्य ज्यांना नाही अशा मंडळीमूळे आपले संकट अधिक भीषण बनत जात आहे. भितीने शहरातून आपआपल्या गावकडे जाणार्यांची संख्या वाढती आहे. दिल्लीतील निझामउद्दीन भागात तबलिंगीचा मकरज कार्यक्रमाने देशभरातील राज्यांना (विशेषकरून महाराष्ट्राला) कोरोनाशी खडतर लढाई द्यावी लागेल असे दिसते. एकंदरीत सरकार वारंवार ' जिथे आहात तिथेच राहा, गर्दी करू नका ' असे आवाहन देत आहे, तरी सुद्धा सुजाण नागरिक म्हणून आपण कमी पडणार असू तर सरकारला नाईलाजाने ' शुट ॲट द साईट ' असा आदेश द्यावा लागेल. ईश्वर कृपेने असे न होवो, पण वेळ आलीच आणि काही नागरिक मृत्युमूखी पडले तर ज्यांची मनें हलकट विचाराने कुजली आहेत अशा  विदेशी लाॅब्या सरकारवर टिका करण्यासाठी आपली लेखणी घेऊन तयार आहेत. सध्या ही मंडळी शांत आहे, आणि कोरोना वायरसच्या पाठीमागे चीन देशाचे षडयंत्र आहे अशी बातमी आली आहे त्यामूळे ही मंडळी अधिक काळ शांत राहील. पण त्याच काळात सरकारवर विशेष करून केंद्र सरकारवर खोटे आरोप लिहून ठेवण्याचे काम तयार करून ठेवतील. त्यांची ती खोडच आहे. कारण त्यांच्या दोन कुलदेवता आहेत. त्यांची नावे आहेत ' सत्ता व बंडाळी.' सन २०१४ पासून सत्तादेवी त्यांच्यावर कृपा करीत नाही म्हणून यातील काही मंडळी मनाला जे येईल तसे ओकत आहेत.

आज कोरोनाशी प्रत्यक्ष रणांगणावर दोन हात करीत झुंज देत असणार्या अशा समाजबांधवांना व भगिनींना आपण सारे जण देवतुल्य मानतो. पण काहींना देव या शब्दाची ॲलर्जी आहे. आपल्या समाजात एखाद्याचा स्वभाव चांगला असेल व तो सतत लोकांच्या अडचणीच्या वेळी उपयोगी पडत असेल त्याला आपण भला माणूस, देवमाणूस, भोळा शंकर असे म्हणतो, ते ही अगदी सहजपणें. आपल्या मातृभाषेंचं सौंदर्याचे वर्णन अमृताते पैजा जिंके असे आहे. पण या डाव्या व पुरोगामी मंडळींना आपल्या भाषेचे सौंदर्य दिसतच नाही मग कळणार तरी कसे? 'आपली दैवते कोरोनाला भिऊन मंदिरात दारे बंद करून बसले आहेत ' असा घसा फोडून सांगणार्या वृत्तपत्राच्या संपादकांवर काही टिका करावी असे वाटत नाही. कारण मंदिरातील आमच्या सार्या दैवतांनी  ट्रस्टींच्या रूपाने प्रगट होऊन सरकारकडे आर्थिक मदत केली आहे. अशा प्रकारचा आर्थिक ओघ झाला की आपण महालक्ष्मीची कृपा झाली असे मानतो. केवळ आर्थिक ओघ म्हणजेच देव असे मानून आपण थांबत नसतो. जिथे गरज आहे तिथे आमची देवता,माता महालक्ष्मीदेवी दानाचं रूप घेते.  हे सत्य त्या संपादक महाशयांना कळतंय कि नाही हे जाणून घेण्याची आमची इच्छा नाही. पण अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळातून चालणारी कारस्थाने व एक दमडीची आर्थिक मदत येत नाही या संबंधी त्यांच्याकडून रोख-ठोक लेख लिहण्याची अपेक्षा आपण ठेवू या. पण ते तसे करतील असे वाटत नाही कारण ' हाताला लकवा येतो का ' असा वाकप्रचार राजकारणात प्रथमच उपयोगात आणणार्या नास्तीक नेत्यांकडे सध्या त्यांची उठबैस आहे. असो.

केंद्र व बहुतांश राज्यातील सरकार जबाबदारीने कामगिरी बजावीत आहेत. सरकार निश्चीतच कौतूकास  पात्र आहे पण त्यांना यश मिळण्यासाठी आपण  सरकारला शंभर टक्के सकारात्मक प्रतिसाद देत राहणे आवश्यक आहे. आज सत्यवचनी श्रीरामाची जयंती आहे. आपण आपले वचन पाळू या. जाता जाता त्या संपादक महाशयांच्या माहितीसाठी राम नवमीच्या निमीत्ताने  या देशाचा बहुसंख्याक समाजाच्या देव-दैवातांच्या कल्पना कशा स्वरूपाच्या असतात त्या संबधी थोडसं सांगून या लेखाची समाप्ती करतो.

आपल्या पुराणातील देव-दानवांचे स्वरूप व कथा इत्यादी सारं प्रतिकात्मक आहेत. आपल्या पुराणांची भाषा भावगर्भित आहे, तशीच ती लक्षणा व रूपकें यांनी भरलेली असते. बुद्धीवंतानीं आपल्या बुद्धीचा कस लावून त्यातील भावगर्भित अर्थ शोधून आनंद घ्यावयाचा असतो  तर जनसामान्यांनी त्यातील गोष्टी वाचून आनंद घ्यावयाचा असतो. म्हणून जो ईश्वर अनंत आहे, त्याला सान्त रूपात आणले;  तो जो ईश्वर   निराकार आहे, त्याला आकार रूपात आणले. त्यातूनच हिंदुच्या देव-देवतांच्या मुर्ती आल्या, पाठोपाठ पुजा आली, आरती ओवाळणी आली व मंदिरे आली. आपण ज्या ग्रहावर राहतो, ती पृथ्वी, आपली धरणीमाता अवकाशातून एका छोट्या ठिपक्याइतकी दिसते. ईश्वर त्या अवकाशा पलिकडे आहे; तो सर्वत्र आहे; त्याचा थांगपत्ता आपल्याच काय, संपूर्ण मानवजातीला लागत नाही. म्हणून त्याला आपण विविध  मुर्तीरूपात आणले. पण त्यातून  मानव जातीचे काय अकल्याण झाले आहे ते त्या संपादक महाशयांनी उदाहरणे देऊन सांगावे.  आतापर्यंत एकच ईश्वर, तो ही आमचाच असे मानणार्या दोन मानव  जमातीमध्येंच धर्मयुद्धे झाली आहेत. हा इतिहास आहे.  विसाव्या शतकाच्या पुर्वाधात जगात एक नास्तीक जमात उदयास आली. ही जमात साम्यवादी नावाने ओळखली जाते. आमच्या संस्कृतीने नास्तिकांना ही परके मानले नाही. पण या नास्तिक जमातीने मानव जातीला काळीमा फासणारी अघोरी कृत्यें केली आहेत. या जातीच्या नेत्यांनी तर केवळ सत्तेच्या नशेसाठी त्यांच्या देशबांधवांच्याच लाखोंच्या संख्येंने कत्तली उडविल्यात आहेत आणि आज ही ते सत्र सुरूच आहे. विसाव्या शतकात या भूतलावर सत्ता स्पर्धेत जी दोन महायुद्धें झाली व संहारक शस्त्रें वापरली ती ईश्वराला मुर्तीत पाहणार्या हिंदु समाजामूळे झाली नाहीत. हा ही इतिहास आहे. आज ही  कोरोनाच्या रूपाने मानव जातीवर जे मोठे संकट उभे आहे ते साम्यवादी चीनने त्यांची अर्थव्यवस्था डबघाईला आल्यामूळे उभे केले आहे, अशी जगभर चर्चे सुरू झाली आहे. अनेक देव-देवता मानणारा हिंदु समाज व तो जिथे बहूसंख्याक आहे असा आपला भारत देश मानव जातीसाठी खलनायक कधी ठरला नाही व पुढे ही ठरणार नाही. कारण आम्ही  
' इशावास्यम इदं सर्वम् ' म्हणजे ईश्वर चराचर सृष्टीत सामावलेला आहे असे मानतो. त्यामूळे आम्ही  ' अतिथी देव भव ' अशी भावना ठेवून  समोर भेटणार्या पाहूण्यास नमस्ते म्हणत दोन हात जोडत असतो. त्याच पद्धतीचे महत्व सार्या जगाला सध्याच्या संकट समयी कळून चूकले आहे. आपल्या संस्कृतीत कोणाचा मृत्यु झाल्यावर शवाला अग्नी देण्याच्या पद्धतीचे ही आज जगभर कौतूक तर झाले आहे.  कोरोनाने मृत्युचे तांडव मांडल्यामूळे आपल्या संस्कृतीतील अग्नी संस्कार मध्ये असलेले विज्ञान तत्व ही मान्य होताना दिसते आहे. ही बाब आपल्यासाठी अभिमानाची असली तरी आम्ही त्या संबंधीची आत्मप्रौढी मानत नाही हे ज्यांना समजत नाही अशा लोकाबाबत आमची तक्रार नाही. " जे आपल्या स्वार्थासाठी व आपल्या देशातील सत्तेच्या लालसेतून, हिंदु देवांची कुचेष्टा करतात, विदेशी शक्तीशी छुप्या मार्गाने हातमिळवणी करतात तेच पुराणात वर्णन केलेले दानव आहेत.  तसेच " जागतिक पातळीवर कुटील खेळी रचून या जगाची महासत्ता बनण्याच्या अघोरी लालसेतून चीन सारखे देश मानव जातीला महासंकटाच्या खाईत लोटण्याची कृत्यें करतात "  ते ही पुराणात वर्णन केलेले  दानवच होत. " जे कुठल्याही धर्माचा अनादार करीत नाहीत, ईश्वर एक आहे असे मानून अनेक मुर्तीतून त्याला पाहतात, दुसर्याला आपल्या वर्तनाने, वाणीने, लेखणीने जे दुखावित नाहीत " तेच पुराणात वर्णिलेले आजचे देव आहेत.

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...